My Authors
Read all threads
बऱ्याच भाजप समर्थकांना असं वाटतंय की अश्या "अडचणीच्या" काळात सरकारवर टीका करून "राजकारण" करू नये. ही भावना प्रामाणिक आहे. त्यात थोडासा भाव नैतिकतेचा आहे नि थोडी जनतेच्या मनातील पक्ष प्रतिमेची काळजी आहे.

भारताचा जबाबदार नागरिक, महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून मी माझं मत मांडतोय. +
भाजपची #महाराष्ट्र_बचाओ हाक योग्यच नव्हे. तर देर आये दुरुस्त आये अशी आहे.

महाराष्ट्राती सर्वात मोठा पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपचं पहिलं कर्तव्य आहे सरकारवर वचक ठेवणे, सरकारसमोर जनतेचे प्रश्न घेऊन जाणे. +
मग, कोरोनासारख्या संकटात सरकारच्या कुचकामी कामगिरीची जबर किंमत जनता मोजत असेल तर भाजपची प्रमुख जबाबदारी काय आहे?

सरकारच्या चुका दाखवून परिस्थिति सुधारायची नाही का? सरकार कर्तव्यशून्य असेल तर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला नकोय का? +
ज्यांना "ही वेळ योग्य नाही" असं वाटतं, त्यांनी स्वतःला विचारावं - मग कोणती वेळ योग्य ठरेल? कोरोनाचं संकट "गेल्यावर" टीका करायची का? नंतर, सगळं मुसळ केरात गेल्यावर टीका करून काय होणारे? तोपर्यंत झालेल्या नुकसानाचं काय?

#Maharashtra_Bachao
#MaharashtraBachao
आज टीका करून सरकारला कोर्स करेक्शन करण्यास भाग पाडल्याने नुकसान कमी होणार नाही का?

लक्षात घ्या, हे काही एक घडलेलं भ्रष्टाचाराचं प्रकरण नव्हे एकदोनदा टीका करून गप बसायला. रोज मरण मरतोय आपण. मार्च पासून मे उजाडला अजून लोकांना घरात बसवता येईना सरकारला. +
त्यामुळे आताच टीका करून सरकारला जागं करणं आवश्यक आहे.

मुळात ही टीका करण्यातच उशीर केला आहे भाजपने. पहिले २ महीने वाया घालवले आहेत. आधीच फोकस्ड टीका केली असती, सरकारला २०% जरी ताळ्यावर ठेवलं असतं तर आज आपले धंदे आहेत तेवढ्या खड्ड्यात गेले नसते. +

#महाराष्ट्रबचाव
चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करणे आणि टीव्हीवर तद्दन पोकळ भाषण करणे हे सोडून मुख्यमंत्र्यांनी कोणतं काम केलं आहे? डोंबिवलीत माझ्या घरासमोर लॉकडाऊनचा बोऱ्या वाजतोय रोज. क्वारंटाईन केलेले लोक अदृश्य होत आहेत. +
देशाचा रिकव्हरी रेट आणि महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट यात भयंकर मोठा फरक आहे.

हे सगळं होत असताना विरोधी पक्षाने दणदणीत आवाज करून सरकारला ताळ्यावर आणावं ही अपेक्षा करू नये का? कुणाकडून करू अपेक्षा?

जर हे काम विरोधी पक्षाने करायचं नाही, तर कुणी करायचं? +
जनतेने भाजपला दिलेल्या मतांचा, निवडून आलेल्या १००+ जागांचा फायदा काय?

सध्या महाराष्ट्रात जे घडतंय् ते अक्षम्य आहे आणि हे असं घडत असताना भाजप गप बसून राहिला तर त्यांचे निवडून आलेले आमदार आणि त्यांना दिलेलं मत वाया गेलं असं समजेन मी. +
आंदोलन हाच दबाव टाकण्याचा आणि सरकारला जागं करण्याचा मार्ग आहे. कर्मशून्य सरकार असल्याने जनता हवालदिल झाली असताना विरोधी पक्ष आंदोलन नाही करणार तर काय करेल?

सत्ताधारी बेसिक कामं नीट करू शकत नसतील तर त्यांच्यावर दबाव आणून कामं करून घ्यायला हवीत. भाजप तेच करत आहे. तेच करायला हवं. +
हे "राजकारण" असेल - तर एक नागरिक म्हणून माझी इच्छा आहे की प्रत्येक राजकीय पक्षाने हेच राजकारण करावं.

सत्ताधारी हे कधीच मान्य करणार नाहीयेत. भाजप समर्थकांनी हे सगळं नीट समजून घेणं आवश्यक आहे.

: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Omkar Dabhadkar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!