यावर ऊच्चशिक्षणात नक्कीच खुप चांगला अभ्यास आहे पण याचे तज्ञ, व्यावसायिक सल्लागार मंडळी दांडगी फी आकारतात;
जे रास्तही आहे.
कारण फुकटच्या सल्ल्याला लोक कधीच किंमत देत नाहीत.
दुसरा उपाय म्हणजे स्वत: या विषयांमधे खोल अभ्यास करून या विषयातील तज्ञांशी वेळोवेळी चर्चा करणे #म#आर्थिक
आर्थिक, वित्तीय गोष्टींचा दररोज मागोवा घेणे; आपण व्यावसायीक आहात कि नोकरी करता हे दुय्यम असते.
अगदी शाळेत असल्यासारखे एक एक टप्पा पार करणे (याला शाॅर्टकट नाही, तो वापरूही नये)
वेळ लागेल पण आर्थिक साक्षरता ही शिक्षणाइतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक गरजेची आहे. #म#मराठी#Thread
सुरूवातीला तसा हा प्रकार म्हणजे अंध व्यक्तींनी पाहिलेल्या हत्तीच्या गोष्टीसारखा वाटेल पण जसजसे आपण पुढे जाऊ तसे ते सोपे होईल.
प्रचलित पद्धतीत बॅंकेतील खात्यावर व्यवहार करता येणे, किंवा एखाद-दोन घरे, एखादी चार चाकी किंवा दुचाकी घेणे, किंवा थोडेफार सोने, राष्ट्रीयकृत बॅंकेत #म
एफडी, ॲानलाईन व्यवहार वा विमा संरक्षणालाही गुंतवणुक समजणे म्हणजे पुर्ण आर्थिक साक्षरता का तर अजिबात नाही.
खरतर वरील गोष्टी करता येणे म्हणजे बाराखडी शिकल्यासारखे आहे.
वित्तीय नियोजन,
गुंतवणुक,
बचत,
वाढ हे त्याचे काही प्रमुख टप्पे!
आपल्या स्वप्नांवर कुत्सितपणे हसणाऱ्यांना कधीही उत्तरं द्यायचं नसतं……आपल्या समाजाचा खूप मोठा हिस्सा अशा लहान लहान लोकांनीच भरलेला आहे.
हे वाक्य लहानपणापासून प्रचंड अवहेलना वाट्याला तमाशात काम करणाऱ्या वडीलांच्या मुलाचे आहे. तो एका मल्टीनॅशनल कंपनीत मलेशियात कंट्री हेड आहे.
कोण कोणाच्या पोटी जन्म घेतो. त्याचे आईवडील काय करतात? त्याची जात कोणती? धर्म कोणता? भाषा? रंग ? किंवा प्रांत यात कशातच कोणाला जन्माच्या आधी चॉइस नसतो. मग जी गोष्टीत आपले काहीच कर्तृत्व नाही त्याचा फुकाचा अभिमान बाळगून काय हशील?
आपापल्या कर्तृत्वाच्या जोरावर जो तो पुढे जातोच. एखाद्याच्या स्वप्नपुर्तीसाठी आपण हातभार लावत नसू तर निदान हे कुत्सितपणे हसणं किमान एकविसाव्या शतकात तरी थांबायला हवं.
काळ बदलला आहे. इंटरनेट आणि जगाच्या स्पर्धेत आपल्या माणसांनी आता १८ व्या, १९ व्या, २० व्या शतकातून बाहेर पडून
आपल्याकडे इंडस्ट्री आल्या, शहरीकरण वाढले,पायाभूत सोईसुविधांसाठी सरकारकडून जमिनींचे अधिग्रहन झाले.
खाजगी उद्योगासाठी,बिल्डींग्जसाठी जमिनींचे व्यवहार झाले.अनेकांकडे अचानक खूप पैसे आले.
काहींनी तो पैसा जपला परंतू बरीच मंडळी तो पचवू शकली नाहीत
#आर्थिकसाक्षरता #SaturdayThread १/१४
त्यातच इंटरनेटमुळे जागतिकीकरणास अधिक गती मिळाली.
काही मंडळी चांगली शिकली. काहींना सरकारी/खाजगी नोकऱ्या लागल्या.
चांगले पगार मिळायला लागले.
काहींनी उद्योग व्यवसायातून पैसा उभारला. बहुतांश लोकांनी आपापल्या बौद्धीक व सामुहीक परंपरेनुसार तो पैसा जसा वापरता येईल तसा वापरला,
२/१४
काहींनी तो गुंतवला.
ते करत असताना मात्र यातल्या अधिकाधिक लोकांनी तो रिअल इस्टेट, गाड्या,टोलेजंग घरं, ब्रॅंडेड वस्तू,गॅझेट्स, लग्न समारंभ, खाणपिणं, राजकारण किंवा एकमेंकांच्या द्वेष व मत्सरापोटी खर्च केला.
यातले बहुतांश फार लवकरच कफल्लक झाले किंवा पहिल्यापेक्षा अधिक गरिबीत
३/१४
बऱ्याचदा स्वतःच्याच क्षमता आपल्याला नीट उमजत नाहीत….. सहसा गरीब, निम्नमध्यम वर्गीय किंवा समाजाच्या खालच्या स्तरातल्या कुटूंबात तर कोणी यावर साधी चर्चाही करत नाही.
काय करावं, कुठे जावं काही समजत नाही!
तूला जसं जमतेय ते कर यामागे स्वातंत्र्य नसते तर - नक्की आपण काय सांगायचं हे अगतिक अज्ञान असतं.
कितीतरी जीव फक्त - आता पुढे काय करायचं या प्रश्नापुढे जातच नाहीत…. एक भयंकर न्यूनगंड (जे जवळपास प्रत्येकातच असतो) आहे त्या परिस्थितीतच ठेवतो…..
निर्लज्ज पणे करियर बद्दल प्रश्न विचारता यायला हवेत, तसं वातावरणं तयार व्हायला हवं. खर तर पुस्तकं, इंटरनेट आणि समाजमाध्यम यात फार मोठी भूमिका निभावू शकतात पण त्यात फार कोणाला इंटरेस्ट नसतो….. ट्रॅक्शन नसतं… हे जग नक्की आपल्याला कुठे घेवून चाललंय?