My Authors
Read all threads
📌📌📌

भूतकाळात रमायचं नसतं म्हणतात. मात्र भविष्यातील उत्कर्षासाठी हा 'इतिहास' समजून घ्यायला हवा..
-----------
अनेक दिवसांपासून लॉर्ड मेकॉलेच्या त्या वाक्यावर लिहायचंच होतं. त्याकाळी ब्रिटिशांनी देशांवर राज्य करताना पहिलं त्या देशाचा अभ्यास करण्याचा पायंडा रचला होता.
भारतावर राज्य करण्यापूर्वी हेच तंत्र त्यांनी अवलंबलेलं होतं. मूळ विषयाला हात घालण्यापूर्वी, त्यातील इतर मुद्द्यांचा उल्लेख सुरुवातीलाच करतो. म्हणजे थ्रेड समजणे सोपे जाईल. मी मागे एका थ्रेडमध्ये म्हटलेलं की, आपल्याकडे संशोधनाला पुरेसा वाव नाही.
त्यामुळे आपल्याकडे 'शोध' लागतात. मात्र फार मर्यादित. मुळात आपण आपला इतिहास पहिला तर आज अनेक शोधांचे जनक भारतीयच आहेत. मात्र वाङ्मयचौर्याप्रमाणे संशोधनचोरीत काही 'विकसित' म्हणवून घेणाऱ्या देशांनी डिग्री मिळवलीय. असो, ते केळीच्या पानावर जेवणे असो, किंवा
हळदीचे गुणधर्म त्यावर इतर देशांनी उगाचच संशोधन केल्यासारखं दाखवत ते आपल्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला. मात्र माशेलकरांसारख्या व्यक्तीनं आपलं यश आपल्या दारी घेचून आणलंच. मात्र असे अनेक 'शोध' आहेत ज्यांच्यावर भारताचा शिक्का असायला हवा होता. याच विषयाला
अनुसरून आपल्या देशात असलेल्या नालंदा विद्यापीठाची गोष्ट आणि भारतातील शिक्षणव्यवस्था खिळखिळी करण्याचा डाव नेमका कसा आखला गेला हे पाहून गरजेचं वाटतं.

तर लॉर्ड मँकोले नावाच्या अभ्यासकाने भारताला गुलाम बनवायचे असेल तर काय करावे याचा अहवाल ब्रिटीश संसदेत सादर केला.
त्यात तो म्हणतो 'मी संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात फिरलो. परंतु मला असा एकही व्यक्ती भेटला नाही जो चोर किंवा भिकारी असेल. अशी अफाट संपत्ती, इतके उच्च नैतिक आदर्श आणि इतके प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेल्या या देशाला आपण कधीच जिंकू शकत नाही. मात्र तरीही भारताला गुलाम
बनवायची अतीव इच्छा असल्यास या देशाचा आधारस्तंभ अर्थात भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा मोडाव्या लागतील. यासाठी माझा सल्ला आहे की भारताची शिक्षणव्यवस्था आणि संस्कृती यांना मोडीस काढावं लागेल, कारण जेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात ही गोष्ट चांगल्याप्रकारे
घर करेल की जे काही विदेशी आहे ते त्यांच्या देशापेक्षा श्रेष्ठ आहे, महान आहे तेव्हा या हिन भावनेने ग्रस्त होऊन ते आपला स्वाभिमान, आपले संस्कार, स्वदेश-प्रेम आणि आपली ओळख विसरून जातील, जेव्हा त्याचं मनोबल तुटेल तेव्हा आपण खऱ्याअर्थाने यशस्वी होऊ.'

या ओळींमधून आम्ही
काय बोध घेतला? की ब्रिटिशांनी कसं आमचं घर फोडलं? कसे आम्ही पारतंत्रात होतो वगैरे वगैरे.. मात्र आपण काय होतो? आणि आता पुन्हा एकदिलाने तसे होऊ शकू का? याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. ही शोकांतिका आहे. देशाचं पुढचं पुढे बघू किमान आपण आपल्या राज्यात आपल्या शहरात
आपल्या गावात पुढाकार घेऊन करूया?

भारताची बुद्धिसंपदा, पुस्तकसंपदा, अफाट ज्ञान जाणून घ्यायचे झाल्यास केवळ नालंदा विद्यापीठाची माहिती याक्षणी पुरेशी वाटते. या विद्यापीठाच्या केवळ ग्रंथालयाचे वर्णन करायचे झाल्यास हे ग्रंथालय ९ मजल्यांचे होते.
माझ्या वाचण्यात आल्यानुसार यातील ७ मजले 'अंडर ग्राउंड' होते. या ग्रंथालयात तब्बल ९० लाख पुस्तके, कादंबऱ्या, ग्रंथ, महाग्रंथ होते. तुर्की शासक बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठाला आग लावली होती. यावरूनच भारताचे 'स्वामित्व' तेव्हापासूनच अनेकांना छळणारे होते
हे लक्षात येते. विद्यापीठातील लाखो पुस्तकांमुळे तब्बल तीन महिने ही आग धूमसत असल्याची इतिहासात नोंद झालीय.

नालंदा विद्यापीठाला आग लावण्याचे कारण बख्तियार खिलजीचे आजारपण आणि त्या आजारपणातून निर्माण झालेला 'इगो' हे होते. खिलजी खूप आजारी होता. त्याच्यावर अनेक हकीमांनी
उपचार केले. मात्र प्रकृती सुधारत नव्हती. अखेर जीव वाचवण्याच्या भीतीने तेथील हकिमांनी नालंदा विद्यापीठातील आयर्वेद विभागप्रमुख आचार्य राहुल श्रीभद्र यांच्याकडून तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आचार्यांना बोलावण्याचे ठरले. मात्र हिंदुस्थानद्वेषी खिलजीने
या मातीतील औषध घेणार नाही अशी अट ठेवली. म्हणजे 'गिरे तो भी टांग उपर' असा खिलजीचा तोरा.. त्यात त्यानं 'जर मी बरा झालो नाही तर आचार्याची हत्या करेन' अशी घोषणा केली.

दुसर्‍या दिवशी आचार्य त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याला कुराणाची काही पानं वाचण्यास सांगितले.
खिलजीने तसेच केले. त्याला बरे वाटू लागले. आपण बरे झालो याचा आनंद होण्याऐवजी त्यास राग आला. आमच्या हकीमांस जे जमले नाही ते एका हिंदुस्थानी वैद्याने केले? इथे त्याचा 'इगो' चाळवला. भारतीय ज्ञानाचे श्रेष्ठत्व सहन न होऊन त्याने ११९९ साली नालंदा विद्यापीठाला आग लावली.
तेथील बौद्ध भिक्षूंना ठार केले. प्रत्यक्षात खिलजी बरे होण्याचे कारण म्हणजे आचार्य राहुल यांनी खिलजीला कुराणाची जी पाने वाचण्यास सांगितली त्या पानांच्या कोपर्‍यावर त्यांनी आयुर्वेदिक औषधींचा लेप बेमालूमपणे लावला होता. खिलजी कुराणाची पाने उलटत असताना बोटाला थुंक
लावत होता. त्याने काही ठराविक पाने चाटली आणि औषध त्याच्या नकळतपणे लावला होता. याची परतफेड त्याने नालंदा विद्यापीठ आगीच्या भक्षस्थानी देऊन केली.

या जळालेल्या नालंदा विद्यापीठात आठ विभाग होते. १० मंदिरे, मेडिटेशन हॉल, शेकडो अभ्यासवर्ग, बगीचे, तलाव असे बरेच काही होते.
विशेष म्हणजे, विद्यापीठात एकाचवेळी १० हजार विद्यार्थी, २ हजार शिक्षकांची राहण्याची, शिक्षणाची सोय होती. विद्यापीठात तिबेट, चीन, ग्रीस, पर्शिया येथील विद्यार्थ्यांचा विशेषतः बौद्ध भिख्खूंचा समावेश अधिक होता. हे विद्यार्थी आपल्याकडील ग्रंथसंपदेचा अभ्यास करत नोट्स काढत.
त्यांनी ते आपल्या देशात नेले. परिणामी आपले नालंदा विद्यापीठ जाळून खाक झाले. मात्र परदेशी विद्यार्थ्यांकडे आपली 'संपत्ती' शाबूत राहिली. आज हेच प्रयोग यशस्वी करून जगाला 'आपले' म्हणून दाखवले जातात.

खरंतर या दोन्ही प्रकारात आपल्या शिक्षणव्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजवले
हे लक्षात आले असेलच. मला या भूतकाळात फार रमायचे नाही. मात्र या पुढील काळात आपल्या देशातील (किमान राज्यातील) संशोधनवृत्तीला आपण नीटपणे पाणी घालू शकलो नाही. तरी बौद्धिक विकासाचा वेग हा मर्यादितच राहील. तसेच स्वाभिमान, आपले संस्कार, स्वदेश-प्रेम, एकजूट, माणूसप्रेम
हे किती महत्त्वाचे आहे हे रुजवायला हवे. ते आपल्याकडे येऊन अभ्यास करतात. आपण आपल्याकडे अभ्या करायला हवाच. मात्र आपणही तिथे जाऊन आपले प्रबंध, आपले दुर्लक्षित माहात्म्य काय होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. इतकंच नाहीतर आपल्याकडे लॉर्ड मेकॉलेने दिलेल्या
अहवालाचे अभिवाचन व्हायला हवे. तरुणांना ब्रिटिशांचे काय विचार होते. त्यांच्या आक्रमणापूर्वी आपण काय होतो, आपल्याला काय व्हायचेय, भारतात सोन्याचा धूर निघत असे का म्हणायचे या गोष्टी मनावर सातत्याने बिंवत राहायला हवे. बिंबवत राहायला हवे. केवळ बिंबवत राहायला नको तर
त्या दृष्टीने शिक्षणव्यवस्थेमध्ये बदल घडवायला हवेत. तरच भविष्यात अधिक वेगाने उत्कर्ष करणे शक्य होणार आहे. त्यामुळे भविष्यातील उत्कर्षासाठी हा 'इतिहास' समजून घ्यायला हवा असेच मला वारंवार वाटत राहील.
सूचना स्वागतार्ह! खरंतर इतिहासाचे संदर्भासहित दाखले देऊन लेख ताणायचा नव्हता.
• आपली एकजूट नसल्यास, मानसिकतेवर कसा घाला घातला जाऊ शकतो.
• आपलं आपण कसं राखायला हवं
हे मुद्दे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न होता.
यावर सर्वांनी फोकस करून त्यादृष्टीनं नियोजन करावं ही इच्छा! धन्यवाद!
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with प्रथमेश सुभाष राणे.

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!