My Authors
Read all threads
"शाहू महाराज यांनी खेड्यातील "कुलकर्णी" वतने नष्ट करून ब्राम्हणी वजन समाजातून कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न." 👇
(भाग -२)

"कुलकर्णी" वतन खालसा करण्यासाठी काढलेला हुकुम महाराजांनी जुलै मध्ये अमलात आणला. त्यानंतर कुलकर्ण्यांनी महाराजांशी पत्रव्यवहार सुरू केला.
त्याचबरोबर सर्व कुलकर्णी मंडळींची पहिली सभा शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली मठात भरली.

शाहू महाराजांनी कुलकर्ण्यांच्या पत्रास प्रतिउत्तर म्हणून एक पत्र अगदी युक्तिवादासहित पाठविले. हा युक्तिवाद पुढीलप्रमाणे:
१) कुलकर्णी वतनासंबंधीच्या हुकमाचा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाशी काही संबंध नाही. हा वाद फार पुरातन आहे.
२) कुलकर्णी वतन खालसा झाले तर वतनी जमिनी त्यांच्याकडेच ठेवल्याने त्यांचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान झालेले नाही.
३) पूर्वी कुलकर्ण्यांकडून चूक झाली तर त्याचे उत्पन्न सरकारजमा होण्याचा धोका असे. असे इतःपर होण्याचा प्रश्न नाही‚ हा त्यांचा फायदा नाही काय?
४) खरे तर गावच्या हिशेबाचे काम म्हणजे काही श्रेष्ठ दर्जाचे काम नाही. कुलकर्णी लोकांसारख्या बुद्धिमान मंडळींनी अशा कनिष्ठ दर्जाच्या कामात
गुंतून राहणे हे त्यांच्या समाजाच्या दृष्टीने योग्य नाही. तेव्हा त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठील अन्य क्षेत्रांत आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करावा.
५) जे कुलकर्णी घराण्यातील लोक वतनी नोकरी करीत नाहीत‚ ते आपल्या स्वतंत्र कर्तबगारीने समाजात उदयास आलेले आहेत.
६) शिवाय कुलकर्ण्यांना अशा कनिष्ठ दर्जाच्या सेवेतून मुक्त केल्यामुळे त्यांच्या ब्राह्मण्याचे तेज विशेष वाढणार आहे.
७) खरे म्हणजे कुलकर्ण्यांना वाईट वाटते आहे ते त्यांच्या वतनासाठी अथवा आर्थिक नुकसानीसाठी नव्हे; तर केवळ त्यांची ‘ब्युरॉक्रॅटिक सत्ता’ हातातून जाते म्हणून.
८) सध्याचा काळ सर्व प्रकारच्या ब्युरॉक्रसी नष्ट होण्याचा आहे. ब्राह्मणांनीच नव्हे‚ तर राजेरजवाडे मंडळींनीही आपली सत्ता सोडावयास तयार होणे हे परिस्थितीस अनुसरून नाही काय?
९) ब्रिटिश सरकारनेही आपल्या ‘ऑफिसियल ब्युरॉक्रसी’चे न ऐकता हिंदी लोकांना हक्क दिले आहेत.
याच्यासोबत एक विनंती करणार
"ताजा कलम" जोडला. तो असा...

‘सोशल रिफार्म करणे स्वामींकडे (शंकराचार्य) आहे. स्वामींनी या दृष्टीने काही तरी चळवळ केलीच पाहिजे. ब्राह्मण‚ मराठे या ब्युरॉक्रसी‚ अस्पृश्य जातींना म्हणजे आमच्या देशबांधवाना‚ कुत्र्या-मांजरासारखे (कमी) समजतात‚
ही मोठी कीव येण्यासारखी गोष्ट आहे. तेव्हा स्वामींनी मनुष्याला मनुष्यत्व आहे‚ असे ठरविण्याची खटपट करावी‚ अशी माझी इच्छा आहे.’
आपल्या खास अधिकारांच्या व हक्कांच्या जोरावर मक्तेदारी निर्माण करून दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणारी व समाजातील कमजोर वर्गाची पिळवणूक करणारी कोणतीही समाजव्यवस्था महाराजांच्या दृष्टीने ‘ब्युरॉक्रसी’च होती.
त्यात महाराजांनी राजेशाहीलाही अपवाद मानलेले नाही. आज ना उद्या आपली राजेशाहीही बरखास्त होऊन लोकशाहीचे हक्क लोकांना द्यावे लागणार आहेत‚ याची पूर्ण जाणीव त्यांना होती. त्या दृष्टीने त्यांनी जाहीरपणे वक्तव्येही केलेली आढळतात.’’

क्रमशः
संदर्भ:

१. राजर्षी शाहू : राजा व माणूस
२. राजर्षी - एक व्यक्तिदर्शन
३. कित्ता
४.राजर्षी शाहू महाराजांची भाषणे
६. राजर्षी शाहू छत्रपती
७. राजर्षी शाहू छत्रपती एक मागोवा
(डॉ.जयसिंगराव पवार)
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Sahil V

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!