My Authors
Read all threads
"आजचा कोरोना आणि छत्रपती शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षे आधी दिलेला प्लेग विरुद्धचा लढा."

खूप काही शिकण्यासारखे...👇
शाहू महाराजांनी १८९६-९७ काळात कोल्हापूर संस्थानात आलेली प्लेगची साथ आणि दुष्काळा या दोन्ही विरूद्ध दिलेला लढा आपल्यासमोर आदर्श ठरेल.
"राज्याधिकार प्राप्त झाल्यावर अवघ्या तीन वर्षांनीच शाहू महाराजांना दुष्काळ व प्लेग या दोन भयंकर संकटांना तोंड द्यावे लागले. या दोन्ही संकटांशी त्यांनी अविश्रांतपणे मुकाबला केला. ही संकटे अशी होती की‚ त्यांनी प्रजाजनांच्या अस्तित्वावरच घाला घातला होता.
प्लेगसारख्या साथी देवदेवतांच्या प्रकोपामुळे येतात‚ अशा लोकांच्या भ्रामक समजुती होत्या. तेव्हा महाराजांनी पहिली गोष्ट अशी केली की‚ प्लेगची शास्त्रशुद्ध माहिती देणारी हजारो पत्रके त्यांनी राज्यभर वाटली.
गावोगावी सभा भरवून या पत्रकांचे वाचन पाटील-कुलकर्ण्यांकडून करून घेतले.लवकरच त्यांनी सरकारने योजिलेल्या उपाययोजनांचे व लोकांनी घ्यावयाच्या खबरदारींचे जाहीरनामे प्रसिद्ध केले. जेव्हा प्लेग सुरू झाला‚तेव्हा प्लेगग्रस्त गावांतील लोकांना गावांबाहेर काढून त्यांना झोपड्या बांधून दिल्या.
हे पुनर्वसनाचे कार्य प्रचंड होते. खुद्द कोल्हापूरसारखे राजधानीचे शहरही महाराजांना रिकामे करावे लागले होते. अशा हजारो लोकांच्या वसाहतींची‚ त्यांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंच्या पुरवठ्याची व्यवस्था लावणे‚ ही सामान्य गोष्ट नव्हती.
त्यासाठी महाराजांसह दरबारचे सर्व वरिष्ठ अधिकारी रात्रंदिन राबत होते. दिवाण सरसबनीस‚ भास्करराव जाधव यांची त्यासाठी ‘प्लेग कमिशनर’ म्हणून नेमणूक झालेली होती. याशिवाय संस्थानात अनेक ठिकाणी महाराजांनी प्लेगच्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत म्हणून सुसज्ज दवाखाने उभे केले होते.
प्रवाशांकडून प्लेगचा फैलाव होऊ नये म्हणून ठिकठिकाणी क्वारंटाईन कॅम्प्सही स्थापन केले होते. खरे तर महाराजांनी प्लेग व दुष्काळ यांच्यावर मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांवर एक स्वतंत्र ग्रंथ होईल इतकी साधनसामग्री आज उपलब्ध आहे.
१८९६ मध्ये प्लेगने मुंबई शहरात प्रवेश केला होता आणि त्यानंतर लवकरच त्याने सर्व इलाख्यात धुमाकूळ घातला होता. पण शाहू महाराजांनी घेतलेल्या सावधगिरीच्या उपाययोजनांनी प्लेगचा शिरकाव दोन वर्षांपर्यंत कोल्हापूर संस्थानात होऊ शकला नाही.
आणि जेव्हा तो झाला त्या वेळीही इतर मुलखांच्या मानाने इथे फार कमी मनुष्यहानी तो करू शकला. महाराजांनी प्लेग आणि दुष्काळ या संकटांशी केलेल्या मुकाबल्याच्या वार्तांना त्या काळात सर्वत्र मोठी प्रसिद्धी मिळाली.
महाराजांचे गुरू फ्रेजरसाहेब हे या वेळी बंगलोरात होते. त्यांनी या वार्ता वर्तमानपत्रांत वाचल्यावर आपल्या शिष्याला शाबासकी देताना लिहिले −
‘I am gratified to read in the papers how highly your subjects appreciate your personal exertions in the matter of plague and famine. Stick to it, Maharaja, this is the time to show what a man is made of.’
आजचे राज्यकर्ते शाहू महाराजांकडून काय शिकले ??

निवडणूक जाहिरातींवर आवर्जून फुले,शाहू,आंबेडकरांचा फोटो लावणारे नेते या महापुरुषांचे विचार अामलात आणताना दिसतात का ??
अजुन किती दिवस फुले, शाहू, आंबेडकरांचा उपयोग मते मागण्यासाठी केला जाणार आहे ??

खरचं आजच्या राज्यकर्त्यांनी "छत्रपती शाहू महाराज" वाचायला हवे होते...☑️

क्रमशः
संदर्भ :-
१. Rajarshi Shahu Chhatrapati Papers, Vol. II
२. कित्ता‚ पृ. ३५४
३. राजर्षी शाहू छत्रपती एक मागोवा.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Sahil V

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!