मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पूर आणि अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. एकूणच भयानक नुकसान झाले आहे. पिकं वाहून गेली आहेत, जमीन खरडून गेली आहे, रस्त्यांची विल्हेवाट लागली आहे, विहिरी गाळाने भरून गेल्या आहेत, विजेचे खांब उलटे पालटे झाले आहेत.
सगळ्यांचा विचार केल्यानंतर आम्ही आढावा घेतला. या आपत्तीच्या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून या सगळ्याचा विचार करून १०,००० कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलं आहे.
हे १०,००० कोटी रुपये विविध कारणांसाठी असतील. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उध्वस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, या सर्व गोष्टींसाठी ₹ १०,००० कोटी आम्ही जाहीर करत आहोत.
आज आम्ही ₹ १०,००० कोटी आपत्तीग्रस्त बांधवांसाठी, माता-भगिनींसाठी जाहीर करत आहोत. दिवाळीपर्यंत ही पूर्ण मदत प्रत्येक आपत्तीग्रस्तापर्यंत पोहोचावी, असा आमचा प्रयत्न राहील.
जिरायत, बागायत जमिनीसाठी ₹ ६,८०० प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ₹ १०,००० देणार आहोत.
फळपिकांसाठी १८,००० रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५,००० रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) मदत करण्यात येईल.
मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी वाढीव मदत देण्यात येईल.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with CMO Maharashtra

CMO Maharashtra Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @CMOMaharashtra

21 Oct
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुढील प्रमाणे मुद्दे मांडले: Image
आज मी तुळजापूर आणि या परिसराची धावती भेट घेतली. शेतकरी संकटात आहे, अनेकांची घरे-दारे वाहून गेली आहेत. अतिवृष्टी होत असताना थोड्या थोड्या वेळाने माहिती शासनाकडे येत असते. प्रशासनाला मी नेहमी हेच सांगतो, संकटे आल्यानंतर जीवितहानी होऊ देऊ नका, जीवितहानी कमीतकमी होईल याकडे लक्ष द्या. Image
मी इथे दौरा करतो आहे आणि तिकडे मंत्रालयात मदत कशी आणि कधी करायची त्यासंदर्भात कामही सुरू झाले आहे. पंचनामे जवळपास झाले आहेत. नुसता विचार नाही तर प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा, ते आम्ही पाहतोय. विमा कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. दोन-तीन दिवसांत याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. Image
Read 6 tweets
30 Sep
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

#मंत्रिमंडळनिर्णय Image
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

#मंत्रिमंडळनिर्णय Image
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

#मंत्रिमंडळनिर्णय Image
Read 5 tweets
26 Sep
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मराठवाड्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहिम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल असा विश्वास वाटतो आहे. यात ज्यांना-ज्यांना महाराष्ट्र आपले कुटुंब वाटते ते सर्व सहभागी होतील. माझ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते या मोहिमेत सहभागी होतील.
मराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. आरटी-पीसीआर टेस्टची संख्या वाढविणे आवश्यक आहे. ज्यांची अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आली असेल आणि लक्षणे असतील त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट होणे आवश्यक आहे. त्यांचे दोन द्राव्य (Swab) घेण्याचे सांगितले आहे.
Read 9 tweets
17 Sep
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्रामच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:
आजच्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने झेंडावंदन करताना, मानवंदना देताना हा मराठवाडा मुक्त झाल्यानंतर पहिला तिरंगा इथे फडकला असेल तो रोमांचकारी क्षण, त्या भावना आजदेखील ताज्या आहेत. या दिनाच्या शुभेच्छा देताना मी भावनेने, मनाने आणि हृदयाने आपल्यासोबत तिथे उपस्थितच आहे.
मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संतांची शिकवण आहेच, पण त्याच बरोबरीने अन्यायाविरुद्ध लढून अन्याय मोडून, तोडून टाकणे आणि स्वातंत्र्य मिळवणे ही आपल्या भूमीची आणि मातीची खासियत आहे.
Read 11 tweets
16 Sep
Decisions taken in a cabinet meeting chaired by Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray today; Image
Image
Decisions taken in a cabinet meeting chaired by Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray today; Image
Read 4 tweets
13 Sep
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the state today; Image
Namaskar. At the outset, I would like to thank all citizens of Maharashtra for showing remarkable restraint in the last few months while celebrating religious and cultural events. My heartfelt thanks to all communities and groups.
Starting September 15, I will be running a campaign in the state. I appeal to everyone who loves this land, considers its own, regardless of the caste, creed, party, and any form of politics, to participate and show their support to this campaign.
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!