मित्रानो आजच्या धाग्याचे नाव आहे डिसले तसे नसते अर्थात सध्या गाजत असलेल्या डिसले गुरुजींचा विषय त्यांना मिळालेल्या७ कोटीच्या पुस्काराची एक बाजू विमुक्त नी एका थ्रेड मधून मांडली आहेच त्याच संदर्भातडॉ विनय काटे यांचा एक लेख वाचनात आला त्याचेच सार ह्या धाग्यात आहे
@PadmakarTillu
चला तर वाचू या "डिसले तसे नसते" धागा
गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, देशातील मीडियात रणजितसिंह डिसले गुरुजींचं नाव गाजत आहे,कारण त्यांना मिळालेला "ग्लोबल टीचर अवार्ड 2020"अगदी अलीकडेच म्हणजे2015साली वरक्के (Varkey)फाउंडेशन या ब्रिटनमध्ये ऑफिस असणाऱ्या संस्थेने हे अवार्ड सुरूकेले
आणि त्याची रक्कम 1 मिलियन डॉलर इतकी ठेवली. भारतीय चलनात ही रक्कम 7 कोटींपेक्षाही जास्त असल्याने या रक्कमेकडे पाहूनच भारतीय लोकांचे डोळे विस्फारले. मग डिसले गुरुजींना महाराष्ट्रभूषण द्या, राज्यपालनियुक्त आमदार बनवा वगैरे मागण्या राजकीय क्षेत्रातून आल्या,
@ROHITKUMBHOJKAR
जणू काही तसे केल्याने राज्याचे, देशाचे शैक्षणिक धोरण आणि शिक्षणाचा दर्जा आमूलाग्र बदलणार आहे.
थोडेसे जाणून gheu या वरक्के (Varkey) फाउंडेशन बद्दल Varkey Foundation हे सनी वरक्के या दुबईत स्थायिक असणाऱ्या अनिवासी भारतीय उद्योजकाने सुरू केलेले आहे,
@ProfParkhe
जे स्वतः शिक्षणाच्या व्यवसायात आहेत आणि अब्जाधीश आहेत. त्यांच्या GEMS Education या संस्थेच्या दुबई, ब्रिटन, भारत, आफ्रिका अशा अनेक ठिकाणी 70 च्या आसपास उच्चभ्रू शाळा आहेत. आणि साहजिकच कुठलाही उद्योगपती जेव्हा अशी पारितोषिके देतो तेव्हा तो त्याच्या व्यवसायास अनुरूप अशा गोष्टींना Sunny Varkey
आणि बाजारपेठांनाच जवळ करतो. त्यामुळे फक्त पारितोषिकाच्या रक्कमेकडे न पाहता, ते पारितोषिक देणारी संस्था नेमकी काय उद्देशाने हे देतेय आणि मुळात त्या संस्थेची विश्वासार्हता आणि निष्पक्षता किती हा विचार करणे महत्वाचे ठरते
डिसले गुरुजीं ची कार्यपद्धत थोडक्यात सांगायची तर त्यांनी डिसले गुरुजींनी गेल्या 3-4 वर्षात पाठ्यपुस्तकात QR कोड छापले, ज्यांना मोबाईलने स्कॅन करून मुले त्या अभ्यासाशी संबंधित व्हिडीओ मोबाईलवर पाहायला लागली.
डिसले गुरुजींच्या काही मुलाखती पाहिल्यावर हे कळलं
की ते ज्या शाळेत रुजू झाले तिथे मुले शाळेतच येत नव्हती. कारण शाळेत अगदी साध्या सोयीही नव्हत्या,
डिसले गुरुजींच्या या गेल्या 5-7 वर्षातील कार्याला मीडियात आलेल्या मुलाखतीतून पाहताना लोक भारावून जातायत,
पण थोडा विचार केला तर ह्यातले बहुतांश उपक्रम ह्या उच्चभ्रू आणि शहरी शाळांत फार आधीपासून अस्तित्वात आहेत. QR कोडला स्कॅन करून जो काही व्हिडीओ-ऑडिओ मुलांना मोबाईलवर दाखवला जातो त्यासाठी content development, app development आदी खर्चिक आणि तांत्रिक गोष्टी कराव्या लागतील,
ज्या प्रत्येक शिक्षकाला वैयक्तिक पातळीवर करणे शक्य नाही. यासाठी डिसले गुरुजींना नक्कीच काही संस्था आणि व्यक्तींनी मदत केली असणार. हे कंटेंट पाहायला डिसले गुरुजींच्या शाळेत दिसते तसे internet connectivity आणि मोबाईल/टॅबलेट वगैरेही असलेच पाहिजे,
जेही या देशातल्या किंवा जगातल्या बहुतांश सामान्य घरातल्या मुलांकडे उपलब्ध नाहीयेत. डिसले गुरुजींचं लोकांनी कौतुक करण्यात मला काहीही आक्षेप नाही, पण ते जे काम करत आहेत त्यात नावीन्य खूप कमी आहे आणि सोबतच भारतासारख्या टोकाच्या आर्थिक विषमतेने भरलेल्या देशात
त्यांची पद्धतीavailable, sustainable आणिscalable व्हायला जो खर्च लागेल तो करणार कोण हा मोठा प्रश्न आहे.
डिसले गुरुजींनी ज्या Information & Communication Technology(ICT)चा पुरस्कार करत शिक्षणHi-Fi करायचे जे स्वप्न पाहिले आहे,त्यासाठी लागणाऱ्या इंटरनेट उप्लब्धतेत भारत खूप मागे आहे
भारतात इंटरनेटचा प्रसार ५०% लोकांपर्यंत झाला आहे, जिथे अमेरिकेत हाच आकडा ८८% आणि चीनमध्ये ६१% आहे. भारतात स्मार्टफोन वापरणारे लोक फक्त ५० कोटीच्या आसपास आहेत, त्यातही ७७ % लोक मोबाईल इंटरनेट वापरतात ज्यावर डेटा वापरण्याची विशिष्ट मर्यादा आहे.
कोरोनाच्या साथीत शाळा बंद पडल्या तेव्हा महागड्या खाजगी शाळांनी online शिकवणे सुरू केले. त्याचे अनुकरण नंतर सरकारी शाळांनाही करायची वेळ आली तेव्हा काही मुलांनी घरात स्मार्टफोन नाही म्हणून आत्महत्यासुद्धा केल्या.
यावर उपाय म्हणून चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात नव्या दमाच्या शिक्षक, तंत्रज्ञ लोकांना हाताशी घेऊन प्रशासकीय यंत्रणेने गावातील भिंतीवर अभ्यासाचे धडे रंगवले की जेणेकरून सगळ्या मुलांना अभ्यास करता येईल आणि मुले एकमेकांसोबत त्यावर चर्चा करून शिकतील.
दुर्दैवाने या तळमळीला मात्र कुठेही पुरस्कार मिळणार नाही!
काही अभ्यासानुसार भारतात 5 वर्षे ते 24 वर्षे या वयोगटात जवळपास 50 कोटी विद्यार्थी आहेत आणि शिक्षणक्षेत्राची उलाढाल वार्षिक जवळपास 7 लाख कोटी रुपये आहे.
टाटा ट्रस्टच्या एका रिपोर्टनुसार भारतात सगळ्या शाळांत ICT द्वारे शिक्षण देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च हा साधारण 70,000कोटी रुपयांच्या आसपास आहे.BYJU सारखे appद्वारे शिकवणारे ICT प्लॅटफॉर्म शाहरूख खानला ब्रँड अंबसेडर म्हणून घेतात,White Hat Jr ला जवळपास 2,000कोटींना विकत घेतात
आणि त्याच्या जाहिरातीसाठी ह्रितीक रोशनला घेतात यावरून कुणालाही सहज अंदाज येऊ शकते ही हे नवीन मार्केट किती मोठे आहे. थोडक्यात, 70,000 कोटी रुपयांच्या ICT च्या मार्केटसाठी 7 कोटी रुपयांचा पुरस्कार देऊन, भारत सरकारवर सकारात्मक दबाव आणणे यात नक्कीच एक बिझनेस सेन्स आहे
आपल्या देशात जवळपास 10% मुले शाळेची पायरीच चढत नाहीत आणि अजून 11% मुले-मुली गरिबी, खर्चिक शिक्षण, कामासाठी स्थलांतर, अवेळी लग्न, शाळेत शौचालय नसणे आदी गोष्टींमुळे शिकायची इच्छा असूनही शाळा सोडून देतात, पण हा प्रश्न सोडवण्यासाठी कुठलीही कंपनी पुढाकार घेताना दिसत नाही,
कारण हे प्रश्न ज्या मुलांचे आहेत त्या मुलांचे आईबाप या कंपन्यांचे ग्राहकच नाहीत
डिसले गुरुजी एकटेच आहेत का हो भारतात जे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत आहेत ?? असे बिलकुल नाही डिसले गुरुजींसोबतच शुवाजीत नावाचा एक भारतीय शिक्षकही पहिल्या पन्नास लोकांत यादीत होता.
शुवाजीत IIM लखनौमधून शिक्षण घेऊन, नंतर लंडनमध्ये IBM मधली करत असलेली नोकरी सोडून राजस्थानमध्ये बंकर रॉय यांच्या बेअरफूट कॉलेज या राजस्थानमधील संस्थेत अत्यंत गरीब घरातील मुलांना शिकवतोय. त्याने Hi-Fi शिक्षणापेक्षाही
आत्यंतिक दारिद्र्यात असणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा ध्यास घेतलाय. बंकर रॉय यांना तर Time ने 2010 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये निवडले होते, जे 1972 पासून हे कार्य करत आहेत. IIM अहमदाबाद मधील प्राध्यापक अनिल गुप्ता गेली कित्येक वर्षे भारतभरातील
शालेय मुलांच्या innovative idea ना व्यवहारात उपयोगी कसे आणता येईल यावर काम करत आहेत. डॉ. जयंत नारळीकर, अरुण देशपांडे आदी संशोधक लोक मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन कसा आणता येईल यासाठी आयुष्य खर्ची घालत आहेत.
ओरिसामधल्या बिनोदिनी समल या शिक्षिका गेली कित्येक वर्षे नदी पोहून पार करत शाळेत जातात, आणि मुलांना शिकवतात. आदिवासी पाडे आणि नक्षली भागात सेवा करणारे हजारो शिक्षकही आपल्या देशात आहेत. पण या हजारो शिक्षकांच्या आयुष्यभर केलेल्या कामापेक्षा 5-7 वर्ष Hi-Fi शिक्षणाच्या श्रीमंत मॉडेलला
खेड्यात नेऊन दाखवण्याला अवार्ड दिला जातो, कारण त्यात पुरस्कार देणारांचे आणि प्रयोजकांचे व्यावसायिक हितसंबंध दडलेले असतात.
मित्रानो आपल्याला ऐश्वर्या रॉय प्रियांका चोप्रा डायना हेडन युक्ता मुखी माहित आहेतच काय साम्य आहे
ह्यांच्यात तर ह्या चारचौघी आहेत १९९४ ते २००० या ७ वर्षातील ४ भारतीय मिस वर्ल्ड आणि सुश्मिता सेन आणि लारा दत्ता ह्या दोघी मिस युनिव्हर्स म्हणजे त्या ७ वर्षात तब्ब्ल ६ भारतीय मुलींना जागतिक पुरस्कार मिळाले
1966 नंतर १९९४ पर्यंत एकही भारतीय सुंदरी हे किताब मिळवू शकली नाही
याचा अर्थ, तेव्हा भारतात सुंदर युवतीच नव्हत्या का? ह्या किताबांच्या लयलुटीमागे WTO वर नुकतेच स्वाक्षरी केलेल्या भारतात सौंदर्यप्रसाधनांचे प्रचंड मोठे मार्केट निर्माण करण्याची बहुराष्ट्रीय कंपन्यांची प्रेरणा होती.तसेच काही से डिसले गुरुजीं ना मिळालेल्या पुरस्काराचे इंगित आहे
कोरोनाच्या साथीच्या लॉकडाऊननंतर 4G तंत्रज्ञानाच्या सोबतीने ऑनलाईन होत असलेल्या शैक्षणिक क्षेत्रात ICT ची भली मोठी भारतीय बाजारपेठ जगभरातील कंपन्याना खुणावत आहे, आणि त्या बाजारपेठेला आकार देण्यासाठी माहिती व संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना
या क्षेत्रात भारतीय आयडॉल निर्माण करावेच लागतील. पण शिक्षणाची बाजारपेठ आणि सौंदर्यप्रसाधनाची बाजारपेठ या अत्यंत वेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी आहेत. शिक्षण क्षेत्रात आणलेले फॅड (अल्पकाळाचे चोचले), दीर्घकाळाचे प्रश्न निर्माण करू शकतात
त्यामुळेच डिसले गुरुजीं ना मिळालेल्या ७ कोटींच्या पुरस्काराकडे पाहून म्हणावेसे वाटते
"डिसले तसे नसते"
लेखक डॉ विनय काटे
@AadiShakti1010

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा,राष्ट्रधर्म वाढवावा

Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा,राष्ट्रधर्म वाढवावा Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rajrajsi

16 Oct
" शारदीय नवरात्र"
हिंदु धर्मात भगवती देवीची विशेष आराधना वर्षातून 2 वेळा केली जाते.
वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्धप्रतिपदा ते चैत्र शुद्धनवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.
@kul_anagha @Amruta39117837
शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरदऋतूच्या प्रारंभी येते. पूर्वीच्या ऋषी-मुनींनी बल संवर्धनार्थ हेच शारदीय नवरात्र पसंत केले
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात,
काही तयार झालेली असतात आणि शेतकरी निवांत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
Read 17 tweets
13 Oct
मित्रानो गेले काही दिवस मी रोज समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक पोस्ट करत आहे
मनाच्या श्लोकात श्री रामाचे नाव असते.
श्री राम कुठे नाही, जळी स्थळी काष्टी पाषाणी राम राहे भरुनी
इतकंच नाही तर आपल्या सर्वांच्या नावातच राम भरून राहिला आहे असे सांगितले तर
@kul_anagha
कसा हे मी नाही दुसरे महान राम भक्त संत तुलसीदास सांगून गेलेत कसा ते पाहू या "आपले नाम राम" ह्या धाग्यात
माझ्या वाचनात आल्यावर मी खूप टेम्प्ट झालो आपल्यापुढे ठेवायला म्हणून आज बॅक टू बॅक धागा लिहित आहे
खात्री आहे आपल्याला नक्की आवडेल
@Vishakh50862352
तुलसीदासांना एकदा एका भक्तांने विचारले की,
"महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?
तुलसीदास म्हणाले :- "हो"
भक्त :- मला पण दर्शन घडवाल का ?
तुलसीदास :- "हो नक्की"
@RajeGhatge_M @TheDarkLorrd
Read 10 tweets
12 Oct
शुभ संध्या मित्रांनो,एक कबीर कथा
कबीराचा मुलगा कमाल एकदा काशीतून फिरत असता एका घराचे दार उघडे दिसले.त्याने आत डोकावून पाहीले तर तिथे एक बाई दळण दळत होती
कमाल खूप वेळ उभा राहून ते पाहात होता.दाणे जातात कुठे ???
त्याला रडू आले
त्याचा समज झाला की सर्व दाण्यांचे पीठ झाले व ते मेले
त्याने विचार केला,आपणही या काळाच्या चक्कीत असेच पिसले जात आहोत
कमाल घरी आला, वडीलांजवळ जाऊन रडू लागला
कबीर महाराज विचारताहेत..
"कमाल अरे काय झाले रे ?
कमाल सर्व पाहिलेलं सांगतो,आणि म्हणतो.
"जात्यामध्ये सर्व दाणे मेले"
कबीर कमालाला घेऊन त्या बाईच्या घरी गेले
जात्याची वरची पाळी बाजुला करुन दाखविली
खुंट्याजवळ२,४दाणे तसेच चिकटलेले होते
ज्या दाण्यांनी त्या खुंट्याचा आधार घेतला होता ते तसेच होते.
कमाल च्या भाषेत ते वाचले

"आपल्याही जीवनाच्या जात्याला एक खुंटा आहे."
Read 4 tweets
12 Oct
मित्रानो आज आठवड्याचा पहिला दिवस,
या आठवड्याचा शनिवार शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ
आजपासून विजयादशमी पर्यंत शक्य तो थ्रेड देवी भवानीच्या संदर्भात पोस्ट करायचा मानस आहे
त्या निमित्ये देवी सेवा आणि देवीचे नाम घेणे होईल
@RajeGhatge_M @Vishakh50862352
२ दिवसांपूर्वी मी तुळजाभवानी मातेच्या घोर निद्रेच्या संदर्भात एक विडिओ पोस्ट केला होता
पण माता तुळजाभवानी ची हि एवढीच निद्रा नसते
आजचा धागा त्या महामायेच्या निद्रे विषयी आहे
चला पाहू या हा

"मंचक निद्रा" धागा

श्री तुळजाभवानी देवी वर्षातून ३ वेळा निद्रा घेत असते
या निद्रा दोन प्रकारच्या मंचकावर (पलंगावर) होत असतात ते खालीलप्रमाणे.

१) चांदीचा मंचक

२) लाकडी मंचक

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते.
उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते
@shivajirao29
Read 13 tweets
10 Oct
मित्रानो शनिवार रविवार आले कि सर्व जण आपल्या परीने २ निवांत दिवस कसे मजेत घालायचे याचे प्लॅनिंग करतात.
पण दुर्गप्रेमी आज कुठल्या किल्लयाचा ट्रेक करायचा हे खूप आधीच ठरवून
शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवार सकाळीच
आपल्या मोहिमेला सुरवात करतात
@Amruta39117837
चला आज आपण हि ट्रेक करून फिरून येऊया
अशा एका किल्ल्यावर ज्या किल्ल्याशी
माझ्या कॉलेज जीवनाच्या आठवणी निगडित आहेत
किल्ला म्हंटले कि त्याला भूगोल आणि इतिहास हा हवाच
नाही तर तो किल्ला कसला
@RajeGhatge_M
महाराष्ट्रातले बहुसंख्य किल्लयांना
मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत,
पण आपण आज चाललो आहोत त्या किल्ल्याला काही हजारो वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी आहे.
या किल्ल्याचा संदर्भ श्री रामाचा पूर्वज असलेल्या
राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे
Read 27 tweets
6 Oct
"राहुल तेवतीया आणि २०२०"
दोन दिवसापूर्वी एक भन्नाट समीकरण वाचनात आले
ते आपल्यापुढे ठेवत आहे २७ सप्टेंबरला शारजा येथे झालेल्या IPL २०-२० खेळात रात्रीचे साडे अकरा वाजेपर्यंत राहुल तेवतीया हा खेळाडू साऱ्या क्रिकेट रसिकांच्या चेष्टेचा आणि रंगाचा धनी बनला होता
@gajanan137
मला हि आठवतंय कि डॉ आनंद रंगनाथन या नामवंत सन्मान्य व्यक्तीला हि ह्या राहुल बद्दल ट्विट करावंसं वाटलं होत कि हा नक्की करतोय काय १७ वि ओव्हर संपली २० बॉल खेळून सुद्धा त्याला एक हि चौकार व षटकार मारता आला नव्हता समालोचक म्हणत होते हा रिटायर्ड आऊट का होत नाही
@Amruta39117837
१७व्या ओव्हर नंतर त्याच्या टीम ची जिंकण्याची शक्यता होती
२% फक्त
अठरावी ओव्हर वेस्ट इंडिजचा सॅल्युट स्पेशल कॉट्रेल टाकायला आला चाचपडणारा राहुल तेवतिया स्ट्राईकवर त्याच्याकडून शून्य आशा आणि मित्रानो चमत्कार घडला
Read 14 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!