थ्रेड👇
माजी शिवसैनिक व पोलीस अधिकारी सचिन वाझेला अंबानी स्फोटक प्रकरणात NIA ने अटक केल्यावर आंतरराष्ट्रीय नेते असलेल्या शरद पवारांनी अत्यंत बचावात्मक पवित्रा घेत सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "वाझे हा विषय स्थानिक आहे, मी स्थानिक विषयावर बोलणार नाही".
पण स्थानिक विषयावर+
बोलणार नाही म्हणल्यावर सेनेच्या गोटात खळबळ झाली असेल कारण ज्यांच्या चावीने आपण पळतो त्यांनीच असा हात काढून घेतला तर पुढे काय! पण शरद पवारांचे राजकारण धूर्त आहे, स्थानिक प्रकरणावर ते बोलणार नाही म्हणाले पण त्यांना शांत बसवेना. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय फासा फिट्ट बसलाय हे+
दिसायला लागलं!
वाझेंच्या अटकेनंतर तातडीने धावतपळत दिल्लीवरून मुंबईला आलेले पवार साहेब, सोमवारी सकाळपासून मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, लागलीच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक घेतात. एव्हाना उपमुख्यमंत्री अजित दादांच्या सोबत एक बैठक होते. पुन्हा सरकारमधील काही+
नेत्यासमवेत आणि मंत्र्यांसमवेत मॅरेथॉन बैठका पार पडतात.दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, राजीनामा घेण्याच्या हालचालींना वेग अशी मीडिया मार्फत हुल दिली जाते. पण एवढं सगळं करूनही पवार साहेब अजूनही ठाम असतात की,स्थानिक प्रश्नांवर मी बोलणार नाही.🤣+
एवढंच नाही तर पवार साहेब राज्यात तिघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर तातडीने पुन्हा दिल्ली दरबारी रवाना होतात ते काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या भेटीसाठी! हे सगळं बघत असताना शरद पवारांच्या अधिकृत फेसबुक पेजवर मला एक कव्हर फोटो दिसला, त्यावर लिहिलंय की,"दिल्लीच्या तख्तासमोर+
महाराष्ट्र झुकत नाही, हा इतिहास आहे" आणि हेच नेते थेट सोनिया गांधींच्या भेटीला गेले आहेत. आता इतिहासच बघायचा झाला तर राष्ट्रवादी स्थापना कशासाठी झाली, आणि ज्यावेळी काँग्रेस मधून पवार बाहेर पडले तेव्हा काय बोलले होते हे एकदा तुम्हीच तपासून बघा! हा विषयच वेगळा! असो. पण अजूनही+
स्थानिक प्रश्नावर पवार साहेब बोलायला तयार नाहीत.😝😷
सेनेचा रूबाब तर निराळाच! दिल्लीला जायला उद्धवजींना मेळ लागत नाही, मग त्यांचे खास एकनाथ शिंदेच्या दिल्ली रवानगीची कुणकुण लागलीय. आता भाजपला रिमोट कंट्रोलवरून उपदेश देणाऱ्या सेनेचा अख्खा कंट्रोलच बारामती अन 10 जनपथ दिल्लीला आहे.+
तरीही आपला मुख्यमंत्री असल्याचा शिवसैनिकांचा आनंद काही औरच आहे.
हे सगळं धावपळीचं अन कात्रीत अडकलेलं वातावरण असतानाच इकडे माजी शिवसैनिक सचिन वाझे NIA ला अजून काय काय सांगतो याने मात्र नारायण भंडारींची झोप उडाली असेल.
एकंदरीत काय तर पाचर फिट्ट आहे!
मला मात्र एकच प्रश्न सतत पडतोय+
की, "अकेला देवेंद्र क्या क्या करेगा!"🤣🤣🤙💥😉😝
- विकास विठोबा वाघमारे
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
थ्रेड 👇
ज्यावेळी स्फोटक भरलेली गाडी सापडली तेव्हापासूनच महाआघाडी सरकार आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माजी शिवसैनिक सचिन वाझेला पाठीशी घालत होते. त्याच दरम्यान मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला, तरीही त्यावर हे तिघाडी सरकार पाऊल उचलत नव्हते. उलट प्रकरण शांत+
करण्याच्या प्रयत्नात होते पण तीन पक्षाच्या बुद्धीला एकट्या देवेंद्र फडणवीसांनी चितपट केलंच. पहिल्यांदा त्या प्रकरणात पडदा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारची देवेंद्रजींनी थेट सभागृहात अन रेकॉर्ड चिरफाड केली तेव्हा गृहमंत्री नमते झाले, उद्धवजींनी तर भर अधिवेशनात सभागृहाला दांडीच+
मारली होती. पण देवेंद्रजी एवढ्यावर थांबले नाहीत तर मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या FIR ची प्रतच सभागृहात वाचून दाखवली. आणि मनसुख हिरेन ची हत्या ही सचिन वाझेंनीच केल्याचा थेट आरोप देवेंद्रजींनी सभागृहात केला, CDR सादर केला तेव्हा मात्र आघाडीची पळताभुई थोडी झाली, CDR च्या+
महत्वाचा थ्रेड👇
मुंबईतला जो भाग अतिमहत्वाचा मानला जातो, त्या भागात स्फोटकांनी भरलेली गाडी सापडते, सचिन वाझे नावाचा अधिकारी सर्वात पहिले त्या ठिकाणी जातो, गाडी ज्यांच्या नावावर आहे आणि ज्यांच्या मूळ मालकीची आहे त्याचा काहीच दिवसात हत्या(?)/मृत्यू होतो, वाझे नावाचा अधिकारी+
संशयाच्या भोवऱ्यात येतो, विधानसभा अधिवेशनात विषय गाजला जातो मात्र एका API अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि तीन पक्षाचे सगळेच नेते कामाला लागतात. देवेंद्र फडणवीस नावाचा खमक्या लोकनेता या कटाचा पर्दापाश करण्यासाठी कंबर कसतो अन थेट सभागृहात CDR सादर+
करतो. तपास NIA कडे जातो अन ज्याला खुद्द मुख्यमंत्री वाचवत असतात त्यांच्या पक्ष्याचा माजी प्रवक्ता सचिन वाझे याला NIA कडून अटक होते.
खरंतर हा सगळा घटनाक्रम जर पुन्हा एकदा हळूहळू डोळ्यासमोरून घातला तर डोकं सुन्न होतं!
नेमका महाराष्ट्र आपण कुणाच्या हातात दिलाय! राज्य वाचवावे की+
हे दोनच फोटो राज्यातल्या दळभद्री आघाडी सरकारने कायम लक्षात ठेवावेत!एकीकडे राज्याची वाट लावता लावता आज लाखो MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न ही आघाडी करतेय.
मात्र आजच्याच दिवशी एकीकडे आमदार गोपीचंद पडळकर तर दुसरीकडे आमदार रामभाऊ सातपुते हे दोन+
वाघ थेट मैदानात उतरत विद्यार्थ्यांच्या साथीला बसले आहेत, या आघाडीचा करेक्ट कार्यक्रम हेच वाघ करतील याबाबत चिंता करू नका!
गावगाड्यातनं शहरात जाऊन अभ्यास करून आयुष्याची अधिकारी पदाची स्वप्नं रंगवणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा विडा या ठाकरेंच्या तिघाडी सरकारने+
उचलला आहे. निवडणूकिसाठी पावसात भिजणारे पाहून महाराष्ट्र फसला मात्र या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी घामांनी भिजलेले हे दोन वाघ आज महाराष्ट्र बघतोय, येणाऱ्या काळात आघाडीवाल्यांनो तुम्हाला हे जळी स्थळी दिसतील, अन यांच्या प्रेरणेने गाव गाड्यात तयार झालेले अशी लाखो पोरं तुमच्या+
कालचा दिवस आमदार गोपीचंद पडळकरांचा होता, अन इथून पुढेही त्यांचाच जलवा असणार आहे. मला सातत्याने वाटत आलंय की, @GopichandP_MLC हे गावगाड्यातल्या बहुजन समाजाच्या पोरांना आत्मभान जागृत करायला भाग पाडणारं दमदार रसायन आहे. अरे ला कारे करून सामान्य पोरांना प्रस्थापितांच्या मानगुटीवर+
बसायला लावणारा, अन प्रस्थापितांना गोटात खळबळ माजवणारा स्वाभिमानी नेता म्हणून पडळकर आता महाराष्ट्रभर वावरत आहेत.
कुशल संघटक, करारी नजर, दमदार भाषणशैली आणि अभ्यासू वृत्ती याने माणदेशी माणसांच्या गराड्यात राहणारा आणि अनेक वर्षे पिचत असलेल्या माणसाला सन्मान आणि स्वाभिमान देणारा हा+
नेता आहे. बंडखोर स्वभाव असला तरी सामान्य माणसाला अपार प्रेम देणारा गोपीशेठ आता विरोधकांना पुरून उरतोय. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर लाखोंच्या सभा घेत समाजात अंगार निर्माण केला. आपल्या आक्रमकतेने अनेक आंदोलन त्यांनी केली, कालचं आंदोलन हे त्याचीच एक झलक आहे.+
राज्यात शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात अडकला असताना मात्र स्वतः सत्तेत असलेले राज्यमंत्री बच्चू कडू (@RealBacchuKadu ) शांत होते, राज्यभरात मोठ्या प्रमाणात दोनवेळा अवकाळी पाऊस झाला आणि शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला त्यावर सरकार म्हणून बच्चू कडू मंत्री असलेल्या सरकारने काय मदत दिली? +
अगदी रेड कार्पेट टाकून अन पुलावर बोलावून पाहणी करण्याचे दिवे त्यांच्या नेत्यांनी लावले. त्यावर बच्चू भाऊंना बोलायला वेळच नव्हता! राज्यातल्या करोडो शेतकऱ्यांना दुप्पट - टिप्पट आणि चौपटही वीजबिल पाठवलं, सर्वसामान्य माणसांनाही तसंच वीजबिल पाठवलं त्यावर बच्चू भाऊंनी किती मोर्चे+
काढले? किती आंदोलने केली? रात्रीची वीज मिळते, त्यामुळे कितीतरी जीव गेलेत त्यावर सत्तेत गेलेले बच्चू भाऊ काही बोललेत का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या हजारोंच्या संख्येत झाल्यात, केवळ गेल्या वर्षभरातला जरी आकडा पाहिला तरी तो हजारोंचा आकडा होईलच. शेतकऱ्यांचा सरसकट ७/१२ कोरा करतो म्हणून+
भाजपा का कार्यकर्ता कभी हारता नही है,
वो केवल सीखता है, या जीतता हैं।🌷🧡
भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयीजी यांनी दिलेला हा मंत्र भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन अविरत चालणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात ठेवायला हवा. आपण जिंकण्यासाठी राजकारणात नाही, सेवा, समर्पण+
आणि राष्ट्र प्रथम याच्या भोवती फिरणारे आपले राजकारण आहे.
राज्यात सर्वात जास्त 105 जागा जिंकून बॉस असलेला पक्ष आपलाच आहे, अभिमान वाटावा असे केंद्रात आणि राज्यात नेतृत्व आपलेच आहेत, आता राज्यात 3 पक्षांनी एकत्र येत भाजपाला विधानपरिषदसाठी पराभूत केलं असेल तर खचून जाऊ नका, कारण+
राज्याचे नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या दमदार नेतृत्वात आपण निर्णायक मते घेतली आहेत. आता पुन्हा जोमाने काम करायचं, "गगन कहे विजय भव.." इथपर्यंत जाणार हे नक्की!
एकेकाळी 2 खासदार असणारा पक्ष 303 खासदारांपर्यंत प्रवास करतो तो पक्ष लोकनेते देवेंद्रजींच्या नेतृत्वात+