भाजपा का कार्यकर्ता कभी हारता नही है,
वो केवल सीखता है, या जीतता हैं।🌷🧡
भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयीजी यांनी दिलेला हा मंत्र भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन अविरत चालणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात ठेवायला हवा. आपण जिंकण्यासाठी राजकारणात नाही, सेवा, समर्पण+
आणि राष्ट्र प्रथम याच्या भोवती फिरणारे आपले राजकारण आहे.
राज्यात सर्वात जास्त 105 जागा जिंकून बॉस असलेला पक्ष आपलाच आहे, अभिमान वाटावा असे केंद्रात आणि राज्यात नेतृत्व आपलेच आहेत, आता राज्यात 3 पक्षांनी एकत्र येत भाजपाला विधानपरिषदसाठी पराभूत केलं असेल तर खचून जाऊ नका, कारण+
राज्याचे नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या दमदार नेतृत्वात आपण निर्णायक मते घेतली आहेत. आता पुन्हा जोमाने काम करायचं, "गगन कहे विजय भव.." इथपर्यंत जाणार हे नक्की!
एकेकाळी 2 खासदार असणारा पक्ष 303 खासदारांपर्यंत प्रवास करतो तो पक्ष लोकनेते देवेंद्रजींच्या नेतृत्वात+
राज्यात शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात अडकला असताना मात्र स्वतः सत्तेत असलेले राज्यमंत्री बच्चू कडू (@RealBacchuKadu ) शांत होते, राज्यभरात मोठ्या प्रमाणात दोनवेळा अवकाळी पाऊस झाला आणि शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला त्यावर सरकार म्हणून बच्चू कडू मंत्री असलेल्या सरकारने काय मदत दिली? +
अगदी रेड कार्पेट टाकून अन पुलावर बोलावून पाहणी करण्याचे दिवे त्यांच्या नेत्यांनी लावले. त्यावर बच्चू भाऊंना बोलायला वेळच नव्हता! राज्यातल्या करोडो शेतकऱ्यांना दुप्पट - टिप्पट आणि चौपटही वीजबिल पाठवलं, सर्वसामान्य माणसांनाही तसंच वीजबिल पाठवलं त्यावर बच्चू भाऊंनी किती मोर्चे+
काढले? किती आंदोलने केली? रात्रीची वीज मिळते, त्यामुळे कितीतरी जीव गेलेत त्यावर सत्तेत गेलेले बच्चू भाऊ काही बोललेत का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या हजारोंच्या संख्येत झाल्यात, केवळ गेल्या वर्षभरातला जरी आकडा पाहिला तरी तो हजारोंचा आकडा होईलच. शेतकऱ्यांचा सरसकट ७/१२ कोरा करतो म्हणून+
संघटना ही कार्यकर्त्यांच्याच जीवावर असते हे खरंय. संघटना आपल्यासाठी असतेच. पण आपल्याशिवाय संघटनाच नाही किंवा आपणच म्हणजे संघटना असं कधीच होत नाही. "प्रत्येक जण महत्वाचा पण अपरिहार्य कुणी नाही" हे आम्हाला अभाविपमध्ये शिकवलं, हे फक्त तेव्हाच काम करताना उपयोगाला आलं असं नाही तर+
आजन्म ज्या ज्या क्षेत्रात आपण जातो त्या त्या ठिकाणी कायम उपयोगाला येतं.काल भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यावर अनेकांनी अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या.काही तर असंही म्हणाले की "भाजपाला गळती लागली, भाजपा संपण्याच्या मार्गावर आहे, भाजपचा अंत जवळ आलाय."+
पण त्यांना मुळात कार्यपद्धती माहिती नाही, संघटनेचं "तत्व" माहिती नाही.
नाथाभाऊ जेष्ठ आहेत, आदरणीय आहेत, अनुभवी आहेत, त्यांनी पक्षासाठी मेहनत घेतलीय, पक्षाला समाज मान्यता मिळवून देण्यासाठी अपार कष्ट केले, बिकट परिस्थितीत पक्ष सामान्य माणसांच्या घरापर्यंत नेला हे भाजपाचा शेवटचा+
पावसामुळे शेतकरी उध्वस्त झालाय आणि अनेकांच्या टीकेनंतर कित्येक महिन्यांनी मुख्यमंत्री घराबाहेर पडले आहेत. घराबाहेर पडले म्हणजे जणू उपकारच केला आहे अशा अविर्भावात त्यांचा दौरा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फसव्या घोषणा करणारा हा माणूस आता नुकसानाची पाहणी करायला सांगवी+
खुर्द ता. अक्कलकोट येथे आला.
अक्षरशः गाव पाण्यात गेलं आहे, कित्येकांचे नुकसान झाले आहे, शेती वाहून गेली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ पाहणीचा फार्स करायला आले आहेत. त्यातही हद्द ही केली की, बोरी नदीच्या पुलावर शेतकऱ्यांना भेटायला बोलावलं आहे, कारण काय असेल! गावात जायला+
भीती वाटते? रस्त्यात चिखल आहे? त्याहून मोठी गोष्ट अशी की, ज्या पुलावरून हे पाहणी करत आहेत तिथे पाहणी करण्यासाठी एक स्टेज उभारला आहे, हा काही महाबळेश्वर पाहणी दौरा नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेलं पाणी पुसण्यासाठी तुमची गरज आहे म्हणून बोलावलं होतं. त्या खुर्चीवर आहात म्हणून+
● जेव्हा सभागृहात विधेयकावर चर्चा होती तेव्हा साहेब गैरहजर होते.
● जेव्हा सभागृहात विधेयक मंजूर होत होते तेव्हा साहेब गैरहजर होते.
●जेव्हा विधेयक मंजूर होत होते तेव्हा राष्ट्रवादीच्या उरलेल्या राज्यसभा खासदारांनीही सभात्याग केला होता.+
● साहेबांना स्वतःला कारखाने, सहकारी संस्था वगैरे प्रचंड आवडतात पण शेतकरी व्यापक भूमिकेवर येतोय, डेव्हलपमेंटच्या संधी दिसताहेत, कॉर्पोरेट कंपन्या आता ग्रुपच्या माध्यमातून शेतकरीही करू शकतो, कॉर्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांच्या बांधावर जातील, शेतकऱ्यांकडे तंत्रज्ञान येईल असं हे उज्वल"+
भविष्य दिसायला लागले तर लगेच आता विरोध सुरू केलाय!
कार्यकर्त्यांनो, तुमच्या साहेबांना एकच प्रश्न विचारा, जर हे विधेयक इतके वाईट आहे तर सभागृहात चर्चेला का नव्हतात? मंजूर होताना मतदान (विरोधात/समर्थनात) करायला सभागृहात का नव्हतात? राष्ट्रवादीच्या बाकीच्या खासदारांना पण सभात्याग+
आज राज्यसभेत 'कृषी सुधारणा विधेयके' मंजूर झाली आणि खऱ्या अर्थाने देशातल्या अवघ्या शेतकऱ्यांना आनंद झाला. खरंतर हा क्षण यायला 70 वर्षे उलटून गेली मात्र कोई माय का लाल हे करू शकला नाही पण "नरेंद्र दामोदरदास मोदी" या युगपुरुषाने हे करून दाखवलं. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तळहातावर+
फोड घेऊन, कधी अनवाणी पायाने, अंगावर चिंध्या पांघरून, मिरची भाकरी खाऊन अवघ्या जगाला पोसण्याचं काम हा शेतकरी मायबाप करतो. सगळं जग थांबलेलं होतं तेव्हाही माझा बाप शेतात राबत होता कारण तो शेतकरी आहे. पण त्याच शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी, त्याच्या पायातल्या बेड्या सोडवण्यासाठी आजचा+
दिवस यावा लागला. हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंद होणारा दिवस आहे, आणि हे भारतीय जनता पार्टीने करून दाखवले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो आहे.
या नवीन विधेयकांमुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे आणि ‘एक देश एक बाजार’ या संकल्पनेला प्रोत्साहन मिळणार आहे. शेतकऱ्यांना बाजार+
👇हा व्हिडीओ(48 सेकंदानंतर बघा) पाहिल्यापासून भयंकर अस्वस्थ आहे,निशब्द, हतबल आहे. डोळ्यात पाणी कधी आलं कळलं नाही. राज्य अक्षरशः मरतय..😢
कोरोनाच्या भयंकर परिस्थितीवर बोलताना हुंदका देऊन रडणारा नितळ मनाचा माणूस कोण हे माहितीय का! हे आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजी+
प्रमुख ओमप्रकाशजी शेटे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षात 21 लाख रुग्णांना 1500 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देत उपचार करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी.
राज्यातली कोरोनाची परिस्थिती भयंकर वाईट आहे, भयंकर वाईट!😢 लाखों लोकं उपचारासाठी+
धडपड करताहेत...घरदार विकताहेत..ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना कोणीच उभा करत नाही. सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही. सत्ताधारी घराच्या बाहेरही पडत नाहीत, लोकांना वाली कोणीच नाही... भावांनो, आत्तापर्यंत राज्यात कोरोनामूळे तब्बल 31 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालाय.😢+