हे दोनच फोटो राज्यातल्या दळभद्री आघाडी सरकारने कायम लक्षात ठेवावेत!एकीकडे राज्याची वाट लावता लावता आज लाखो MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न ही आघाडी करतेय.
मात्र आजच्याच दिवशी एकीकडे आमदार गोपीचंद पडळकर तर दुसरीकडे आमदार रामभाऊ सातपुते हे दोन+
वाघ थेट मैदानात उतरत विद्यार्थ्यांच्या साथीला बसले आहेत, या आघाडीचा करेक्ट कार्यक्रम हेच वाघ करतील याबाबत चिंता करू नका!
गावगाड्यातनं शहरात जाऊन अभ्यास करून आयुष्याची अधिकारी पदाची स्वप्नं रंगवणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा विडा या ठाकरेंच्या तिघाडी सरकारने+
उचलला आहे. निवडणूकिसाठी पावसात भिजणारे पाहून महाराष्ट्र फसला मात्र या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी घामांनी भिजलेले हे दोन वाघ आज महाराष्ट्र बघतोय, येणाऱ्या काळात आघाडीवाल्यांनो तुम्हाला हे जळी स्थळी दिसतील, अन यांच्या प्रेरणेने गाव गाड्यात तयार झालेले अशी लाखो पोरं तुमच्या+
पायात काटा बनून आडवी येतील हे विसरू नका!
आमदार गोपीशेठ आणि आमदार रामभाऊ तुमचा आज पुन्हा अभिमान वाटला, सत्ताधारी जेव्हा विद्यार्थ्यांचा पट उध्वस्त करत होते तेव्हा तुम्ही जीवाची बाजी लावून लढत होतात, पोरांना न्याय मिळालाच पाहिजे, उध्वस्त होणारी पोरांची आयुष्य वाचली पाहिजेत!
जोर+
जुलूम की टक्कर में, संघर्ष हमारा नारा हैं।💪💪💥
- विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
महत्वाचा थ्रेड👇
मुंबईतला जो भाग अतिमहत्वाचा मानला जातो, त्या भागात स्फोटकांनी भरलेली गाडी सापडते, सचिन वाझे नावाचा अधिकारी सर्वात पहिले त्या ठिकाणी जातो, गाडी ज्यांच्या नावावर आहे आणि ज्यांच्या मूळ मालकीची आहे त्याचा काहीच दिवसात हत्या(?)/मृत्यू होतो, वाझे नावाचा अधिकारी+
संशयाच्या भोवऱ्यात येतो, विधानसभा अधिवेशनात विषय गाजला जातो मात्र एका API अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि तीन पक्षाचे सगळेच नेते कामाला लागतात. देवेंद्र फडणवीस नावाचा खमक्या लोकनेता या कटाचा पर्दापाश करण्यासाठी कंबर कसतो अन थेट सभागृहात CDR सादर+
करतो. तपास NIA कडे जातो अन ज्याला खुद्द मुख्यमंत्री वाचवत असतात त्यांच्या पक्ष्याचा माजी प्रवक्ता सचिन वाझे याला NIA कडून अटक होते.
खरंतर हा सगळा घटनाक्रम जर पुन्हा एकदा हळूहळू डोळ्यासमोरून घातला तर डोकं सुन्न होतं!
नेमका महाराष्ट्र आपण कुणाच्या हातात दिलाय! राज्य वाचवावे की+
कालचा दिवस आमदार गोपीचंद पडळकरांचा होता, अन इथून पुढेही त्यांचाच जलवा असणार आहे. मला सातत्याने वाटत आलंय की, @GopichandP_MLC हे गावगाड्यातल्या बहुजन समाजाच्या पोरांना आत्मभान जागृत करायला भाग पाडणारं दमदार रसायन आहे. अरे ला कारे करून सामान्य पोरांना प्रस्थापितांच्या मानगुटीवर+
बसायला लावणारा, अन प्रस्थापितांना गोटात खळबळ माजवणारा स्वाभिमानी नेता म्हणून पडळकर आता महाराष्ट्रभर वावरत आहेत.
कुशल संघटक, करारी नजर, दमदार भाषणशैली आणि अभ्यासू वृत्ती याने माणदेशी माणसांच्या गराड्यात राहणारा आणि अनेक वर्षे पिचत असलेल्या माणसाला सन्मान आणि स्वाभिमान देणारा हा+
नेता आहे. बंडखोर स्वभाव असला तरी सामान्य माणसाला अपार प्रेम देणारा गोपीशेठ आता विरोधकांना पुरून उरतोय. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर लाखोंच्या सभा घेत समाजात अंगार निर्माण केला. आपल्या आक्रमकतेने अनेक आंदोलन त्यांनी केली, कालचं आंदोलन हे त्याचीच एक झलक आहे.+
राज्यात शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात अडकला असताना मात्र स्वतः सत्तेत असलेले राज्यमंत्री बच्चू कडू (@RealBacchuKadu ) शांत होते, राज्यभरात मोठ्या प्रमाणात दोनवेळा अवकाळी पाऊस झाला आणि शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला त्यावर सरकार म्हणून बच्चू कडू मंत्री असलेल्या सरकारने काय मदत दिली? +
अगदी रेड कार्पेट टाकून अन पुलावर बोलावून पाहणी करण्याचे दिवे त्यांच्या नेत्यांनी लावले. त्यावर बच्चू भाऊंना बोलायला वेळच नव्हता! राज्यातल्या करोडो शेतकऱ्यांना दुप्पट - टिप्पट आणि चौपटही वीजबिल पाठवलं, सर्वसामान्य माणसांनाही तसंच वीजबिल पाठवलं त्यावर बच्चू भाऊंनी किती मोर्चे+
काढले? किती आंदोलने केली? रात्रीची वीज मिळते, त्यामुळे कितीतरी जीव गेलेत त्यावर सत्तेत गेलेले बच्चू भाऊ काही बोललेत का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या हजारोंच्या संख्येत झाल्यात, केवळ गेल्या वर्षभरातला जरी आकडा पाहिला तरी तो हजारोंचा आकडा होईलच. शेतकऱ्यांचा सरसकट ७/१२ कोरा करतो म्हणून+
भाजपा का कार्यकर्ता कभी हारता नही है,
वो केवल सीखता है, या जीतता हैं।🌷🧡
भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयीजी यांनी दिलेला हा मंत्र भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन अविरत चालणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात ठेवायला हवा. आपण जिंकण्यासाठी राजकारणात नाही, सेवा, समर्पण+
आणि राष्ट्र प्रथम याच्या भोवती फिरणारे आपले राजकारण आहे.
राज्यात सर्वात जास्त 105 जागा जिंकून बॉस असलेला पक्ष आपलाच आहे, अभिमान वाटावा असे केंद्रात आणि राज्यात नेतृत्व आपलेच आहेत, आता राज्यात 3 पक्षांनी एकत्र येत भाजपाला विधानपरिषदसाठी पराभूत केलं असेल तर खचून जाऊ नका, कारण+
राज्याचे नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या दमदार नेतृत्वात आपण निर्णायक मते घेतली आहेत. आता पुन्हा जोमाने काम करायचं, "गगन कहे विजय भव.." इथपर्यंत जाणार हे नक्की!
एकेकाळी 2 खासदार असणारा पक्ष 303 खासदारांपर्यंत प्रवास करतो तो पक्ष लोकनेते देवेंद्रजींच्या नेतृत्वात+
संघटना ही कार्यकर्त्यांच्याच जीवावर असते हे खरंय. संघटना आपल्यासाठी असतेच. पण आपल्याशिवाय संघटनाच नाही किंवा आपणच म्हणजे संघटना असं कधीच होत नाही. "प्रत्येक जण महत्वाचा पण अपरिहार्य कुणी नाही" हे आम्हाला अभाविपमध्ये शिकवलं, हे फक्त तेव्हाच काम करताना उपयोगाला आलं असं नाही तर+
आजन्म ज्या ज्या क्षेत्रात आपण जातो त्या त्या ठिकाणी कायम उपयोगाला येतं.काल भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यावर अनेकांनी अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या.काही तर असंही म्हणाले की "भाजपाला गळती लागली, भाजपा संपण्याच्या मार्गावर आहे, भाजपचा अंत जवळ आलाय."+
पण त्यांना मुळात कार्यपद्धती माहिती नाही, संघटनेचं "तत्व" माहिती नाही.
नाथाभाऊ जेष्ठ आहेत, आदरणीय आहेत, अनुभवी आहेत, त्यांनी पक्षासाठी मेहनत घेतलीय, पक्षाला समाज मान्यता मिळवून देण्यासाठी अपार कष्ट केले, बिकट परिस्थितीत पक्ष सामान्य माणसांच्या घरापर्यंत नेला हे भाजपाचा शेवटचा+
पावसामुळे शेतकरी उध्वस्त झालाय आणि अनेकांच्या टीकेनंतर कित्येक महिन्यांनी मुख्यमंत्री घराबाहेर पडले आहेत. घराबाहेर पडले म्हणजे जणू उपकारच केला आहे अशा अविर्भावात त्यांचा दौरा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फसव्या घोषणा करणारा हा माणूस आता नुकसानाची पाहणी करायला सांगवी+
खुर्द ता. अक्कलकोट येथे आला.
अक्षरशः गाव पाण्यात गेलं आहे, कित्येकांचे नुकसान झाले आहे, शेती वाहून गेली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ पाहणीचा फार्स करायला आले आहेत. त्यातही हद्द ही केली की, बोरी नदीच्या पुलावर शेतकऱ्यांना भेटायला बोलावलं आहे, कारण काय असेल! गावात जायला+
भीती वाटते? रस्त्यात चिखल आहे? त्याहून मोठी गोष्ट अशी की, ज्या पुलावरून हे पाहणी करत आहेत तिथे पाहणी करण्यासाठी एक स्टेज उभारला आहे, हा काही महाबळेश्वर पाहणी दौरा नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेलं पाणी पुसण्यासाठी तुमची गरज आहे म्हणून बोलावलं होतं. त्या खुर्चीवर आहात म्हणून+