थ्रेड👇
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहमंत्री अनिल देशमुखांवर आज अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी एक 8 पानी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे,त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की,"गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी+
केली". यासोबतच अनेक धक्कादायक खुलासे आणि आरोप यामध्ये केले आहेत.
खरंतर हे जेव्हा वाचलं तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्याचं काहीच नवल वाटलं नाही, कारण जेव्हा तीन पक्ष, ज्यांची विचारधारा परस्पर अत्यंत विरोधी आहे, आणि ते एकत्र येतात, एकत्र येत असताना महाराष्ट्राच्या+
डोळ्यात धूळफेक करायची म्हणून त्याला एक गोंडस नाव दिलं जातं. त्याला म्हणलं जातं की, "कॉमन मिनिमम प्रोग्राम". जो प्रोग्रामच महाराष्ट्र लुटायचा आहे, खंडणी वसुलीचा आहे, राज्य लयाला लावण्याचा आहे. आणि हे गेले दीड वर्ष महाराष्ट्र रोज अनुभवतोय.
सत्ता ही केवळ भ्रष्टाचार आणि खंडणी+
करण्यासाठी राबविणे हा एककलमी कार्यक्रम घेऊन सत्तेच्या चाव्या हातात घेतलेल्या नेत्यांचं आणि सरकारचं नवल काय!
माजी शिवसैनिक सचिन वाझेची बाजू घेण्यासाठी सभागृहात पोट तिडकीने त्याच्या बाजूने बोलणारा अनिल देशमुख नावाचा गृहमंत्री मला आठवला. अन परमबीर सिंगांनी केलेले आजचे आरोप. सोबत+
सभागृहात गैरहजर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सभागृहाबाहेर वाझे बिन लादेन आहे काय हे बोललेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे!
पण गृहमंत्री अनिल देशमुखांनी चुकीचं काय केलं? त्यांनी तर सभागृहात वाझेची बाजू घेतलीच पाहिजे, कारण त्याच्याकडून महिन्याला खंडणी वसूल करून घेण्याची जबाबदारी+
आहे, जर त्याला सहजासहजी निलंबित तर ते पुण्यवंत कार्य करेल कोण?
खरंतर, आता मार्च एन्ड आहे, अशातच स्फोटक प्रकरण गाडीत घुसलं, मनसुख हिरेन हत्या(?) आणि इतर इतक्या घटना घडल्या आणि लचांड मागे लागलं की देशमुखांचे, माजी शिवसैनिक सचिन वाझेचे आणि परमबीर सिंगांचे मार्च एन्डचं टार्गेट+
पूर्ण झालं की नाही यात शंकाच आहे! झालं नसेल तर त्याची हाय NIA ला लागेल!
पुन्हा एकदा सांगतो, अभ्यासू आणि तडफदार लोकनेते देवेंद्र फडणवीस काय करू शकतात हे अजूनही कळलेलं नसेल तर तिघाडीवाल्यांनो आणि त्यांची बाजू घेणाऱ्यांनो एकदा पुन्हा लक्षात घ्या. ज्या दिवशी देवेंद्रजींनी सभागृहात +
तुम्हाला सळो की पळो करून सोडलं त्याच दिवशी नारायण भंडारी सरकारच्या झांजा वाजायला सुरुवात झालीय. आणि दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा काऊंटडाऊन सुरू झालाय. स्वतःला आंतरराष्ट्रीय नेते समजणारे का पळताहेत हे तुम्हाला कळलं असेलच, पण अजून तर सचिन वाझेकडून NIA माहिती घेत आहे, समजून +
घेत आहे. तोवरच हे सरकार गॅसवर आहे, एका API अधिकाऱ्यामुळे हे सरकार पडणार नाही म्हणून अजूनही जाहीर मुके घेणारा खाजदार "साहेबांच्या" मागे का वाऱ्या करतोय? प्रकरण स्थानिक आहे म्हणणारे साहेब मिटिंगा मिटिंगा खेळणं सोडायला तयार नाहीत.
फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानं सगळं शांत होईल+
असं वाटत असेल तुम्ही खुळे आहात. देवेंद्रजींनी ज्या दिवशी सांगितलं की, "सचिन वाझे फार छोटा माणूस आहे, मात्र याच्या मागच्या पॉलिटिकल बॉसला शोधा."तेव्हाच हे सरकार डोलायला लागलं आहे.
आज परमबीर सिंगांनी एक पत्र लिहून देशमुखांची वरात काढलीच आहे,अक्षरशः तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही,+
याची चाड बाळगून लवकरच राजीनामा देतील अशी अपेक्षा आहे. मनसुख हिरेन मृत्यू/हत्या? प्रकरणाचा तपासही आजच NIA ने आपल्या ताब्यात घेतला. तोवर परमबीर बोलायला लागले, आता विचार करा, अजून तरी सचिन वाझेचे स्टेटमेंट ओपनली आले नाही मात्र सचिन वाझे जेव्हा घडाघडा बोलेल तेव्हा काय होईल? समजा+
पॉलिटिकल बॉसचे नाव घेतले तर काय होईल? फक्त विचार करा....
गृहमंत्री अनिल देशमुखांनी दरमहा 100 कोटींची मागणी ही एका पोलीस आयुक्तांकडे करणे हे इतकं सोप्प नाही. लक्षात घ्या, महाराष्ट्रात किती आयुक्त आहेत! नेमकं कुणाकुणाला असं टार्गेट दिलं होतं? आणि ही मिळालेली रक्कम नेमकी+
कुणाकुणाच्या घशात जात होती? पण हे सगळं सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत कसे काय?
हे सरकार खंडणीखोरांचं आहे हा संशय होता, आज परमबीर सिंगांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
पोलीस अधिकारी गृहमंत्र्यांवर खंडणीचा आरोप करताहेत, गृहमंत्री पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हेगारीचा आरोप करताहेत.+
फक्त एका माजी शिवसैनिक सचिन वाझेने इतकं सगळं उजेडात आलंय.
देवेंद्रजी, तुमचे मनापासून आभार, हे आघाडी सरकार स्वतः सज्जनतेचा बुरखा घेऊन आम्ही महाराष्ट्राचे पालनकर्ते आहोत अशी टिमकी वाजवत होते, एकट्या वाझेंमुळे अक्षरशः नागडे होत आहे. जसे जसे पत्ते खोलले जातील तसे तसे तोंड लपवायला+
लागतील, आता काही कॉरंटाईन झालेत, काही अंडरग्राउंड! आता एक परमबीर सिंग धावून आलेत, अजून खूप लाईनमध्ये
असतील... सबका हिसाब होगा.✌️🤙😎
- विकास विठोबा वाघमारे
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
थ्रेड👇
आज दिल्लीत शरद पवार साहेबांनी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेलं आरोप गंभीर आहेत असं बोलले मात्र सर्व पत्रकार परिषदेत ही परमबीर सिंग दोषी आहेत म्हणत यांच्यावर बिल फाडलं, देशमुखांवर गंभीर आरोप होतात मात्र त्यांना हाकलून दिले जात नाही, त्या+
घटनेची चौकशी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.
त्यांची प्रेस संपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात प्रेस कॉन्फरन्स घेतली, पवार साहेबांनी सरकार वाचवण्यासाठी केलेलं लंगडं समर्थन देवेंद्रजींनी अक्षरशः चिरफाड करून दाखवलं. शरद पवार म्हणतात की,सदर घटनेची चौकशी व्हावी, मग+
त्यामध्ये नेमकी कुणाची चौकशी? फक्त परमबीर सिंगांची की गृहमंत्री अनिल देशमुखांची पण? आणि जर देशमुखांची चौकशी करणार असाल तर गृहमंत्री पदावर असताना कशी निष्पक्ष चौकशी होईल असा सवाल केला. जर मनापासून चौकशी करायची असेल तर तातडीने अनिल देशमुखांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे.
यामध्ये+
शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना, सर्वसामान्य जनतेच्या वीज बिल सवलत देण्याचा मुद्दा येतो तेव्हा मात्र राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असतो पण ऊर्जा मंत्र्यांच्या कार्यालय व घराचे सुशोभीकरण करताना सढळ हाताने पैसा खर्च केला जातो, उधळलाच जातो. ऊर्जामंत्री नितीन राऊतांच्या हवाई सफरीसाठी+
MSEB विभागातून तब्बल 29 लाखांचा अनधिकृत खर्च केला जातो. आज वावरात शेतकऱ्यांचं हिरवं पीक विजेअभावी जळतंय, पण निर्लज्ज सत्ताधाऱ्यांचे पंचतारांकित घर मात्र उजळतंय!
यावर नितीन राऊत निर्लज्जपणे म्हणतात की, "मला चांगली राहणीमान आवडते, माणसाने लॅविश राहू नये का?" पण शेतकऱ्यांची पिळवणूक+
करून चांगलं राहण्याची बुद्धी असलेला मनुष्य सत्तेवर बसायच्या लायकीचा असू शकतो?
असो! जितका अन्याय आणि पिळवणूक करायची तेवढी करून घ्या, जनता सगळं लक्षात ठेवतीय, ज्यावेळी पायउतार व्हाल तेव्हा या आघाडी सरकारच्या इतिहासात एकच वाक्य लिहिलं असेल, "एवढं क्रूर, दगाबाज आणि विश्वासघातकी+
काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमितभाई शहा आणि देशातल्या सर्व राज्याचे मुख्यमंत्री बैठकीत उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांचा आढावा आणि उपाययोजने संदर्भात चर्चा झाली.
जेव्हा महाराष्ट्रातील कोरोनाचा आढावा+
घेतला जात होता तेव्हा चुकीची आकडेवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अमितभाईंना दिली, खरंतर अजून उद्धवजींनी अमितभाईंना ओळखलं नसावं, करेक्ट आकडेवारी अन मजबूत नॉलेज घेऊन वावरणाऱ्या या मोटाभाईंना कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही. पण काल उद्धवजींनी राज्यातील कोरोनाची आकडेवारी देताना चूक केली+
अन तिथेच मोटाभाईंनी उद्धवजींना रोखत आपल्याकडे असलेली करेक्ट आकडेवारी सांगितली,पण उद्धवजींची चूक उघडी पडली हे मानायला तयार नव्हते तिथेच दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाल्याचं समजलं, एवढ्यात मोदीजींनी मध्यस्थी करत हे सगळं तात्काळ थांबवलं.बरं झालं मोदीजी ऐनवेळी धावून येऊन मध्यस्थी केली,+
थ्रेड 👇
ज्यावेळी स्फोटक भरलेली गाडी सापडली तेव्हापासूनच महाआघाडी सरकार आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माजी शिवसैनिक सचिन वाझेला पाठीशी घालत होते. त्याच दरम्यान मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला, तरीही त्यावर हे तिघाडी सरकार पाऊल उचलत नव्हते. उलट प्रकरण शांत+
करण्याच्या प्रयत्नात होते पण तीन पक्षाच्या बुद्धीला एकट्या देवेंद्र फडणवीसांनी चितपट केलंच. पहिल्यांदा त्या प्रकरणात पडदा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारची देवेंद्रजींनी थेट सभागृहात अन रेकॉर्ड चिरफाड केली तेव्हा गृहमंत्री नमते झाले, उद्धवजींनी तर भर अधिवेशनात सभागृहाला दांडीच+
मारली होती. पण देवेंद्रजी एवढ्यावर थांबले नाहीत तर मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या FIR ची प्रतच सभागृहात वाचून दाखवली. आणि मनसुख हिरेन ची हत्या ही सचिन वाझेंनीच केल्याचा थेट आरोप देवेंद्रजींनी सभागृहात केला, CDR सादर केला तेव्हा मात्र आघाडीची पळताभुई थोडी झाली, CDR च्या+
थ्रेड👇
माजी शिवसैनिक व पोलीस अधिकारी सचिन वाझेला अंबानी स्फोटक प्रकरणात NIA ने अटक केल्यावर आंतरराष्ट्रीय नेते असलेल्या शरद पवारांनी अत्यंत बचावात्मक पवित्रा घेत सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "वाझे हा विषय स्थानिक आहे, मी स्थानिक विषयावर बोलणार नाही".
पण स्थानिक विषयावर+
बोलणार नाही म्हणल्यावर सेनेच्या गोटात खळबळ झाली असेल कारण ज्यांच्या चावीने आपण पळतो त्यांनीच असा हात काढून घेतला तर पुढे काय! पण शरद पवारांचे राजकारण धूर्त आहे, स्थानिक प्रकरणावर ते बोलणार नाही म्हणाले पण त्यांना शांत बसवेना. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय फासा फिट्ट बसलाय हे+
दिसायला लागलं!
वाझेंच्या अटकेनंतर तातडीने धावतपळत दिल्लीवरून मुंबईला आलेले पवार साहेब, सोमवारी सकाळपासून मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, लागलीच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक घेतात. एव्हाना उपमुख्यमंत्री अजित दादांच्या सोबत एक बैठक होते. पुन्हा सरकारमधील काही+
महत्वाचा थ्रेड👇
मुंबईतला जो भाग अतिमहत्वाचा मानला जातो, त्या भागात स्फोटकांनी भरलेली गाडी सापडते, सचिन वाझे नावाचा अधिकारी सर्वात पहिले त्या ठिकाणी जातो, गाडी ज्यांच्या नावावर आहे आणि ज्यांच्या मूळ मालकीची आहे त्याचा काहीच दिवसात हत्या(?)/मृत्यू होतो, वाझे नावाचा अधिकारी+
संशयाच्या भोवऱ्यात येतो, विधानसभा अधिवेशनात विषय गाजला जातो मात्र एका API अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि तीन पक्षाचे सगळेच नेते कामाला लागतात. देवेंद्र फडणवीस नावाचा खमक्या लोकनेता या कटाचा पर्दापाश करण्यासाठी कंबर कसतो अन थेट सभागृहात CDR सादर+
करतो. तपास NIA कडे जातो अन ज्याला खुद्द मुख्यमंत्री वाचवत असतात त्यांच्या पक्ष्याचा माजी प्रवक्ता सचिन वाझे याला NIA कडून अटक होते.
खरंतर हा सगळा घटनाक्रम जर पुन्हा एकदा हळूहळू डोळ्यासमोरून घातला तर डोकं सुन्न होतं!
नेमका महाराष्ट्र आपण कुणाच्या हातात दिलाय! राज्य वाचवावे की+