काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमितभाई शहा आणि देशातल्या सर्व राज्याचे मुख्यमंत्री बैठकीत उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांचा आढावा आणि उपाययोजने संदर्भात चर्चा झाली.
जेव्हा महाराष्ट्रातील कोरोनाचा आढावा+
घेतला जात होता तेव्हा चुकीची आकडेवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अमितभाईंना दिली, खरंतर अजून उद्धवजींनी अमितभाईंना ओळखलं नसावं, करेक्ट आकडेवारी अन मजबूत नॉलेज घेऊन वावरणाऱ्या या मोटाभाईंना कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही. पण काल उद्धवजींनी राज्यातील कोरोनाची आकडेवारी देताना चूक केली+
अन तिथेच मोटाभाईंनी उद्धवजींना रोखत आपल्याकडे असलेली करेक्ट आकडेवारी सांगितली,पण उद्धवजींची चूक उघडी पडली हे मानायला तयार नव्हते तिथेच दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाल्याचं समजलं, एवढ्यात मोदीजींनी मध्यस्थी करत हे सगळं तात्काळ थांबवलं.बरं झालं मोदीजी ऐनवेळी धावून येऊन मध्यस्थी केली,+
नाहीतर सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये अजून आपल्या राज्याची जाहीर बेइज्जत झाली असती.😆
उद्धवजींना, एवढ्यावरून तरी लक्षात आलंच असेल, आपण कुणालाही शेंड्या लावू शकतो पण मोटाभाईंना नो चॅलेंज...🤣🤙😆
जय हो मोटाभाई..🔥🔥🔥
- विकास विठोबा वाघमारे
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
थ्रेड👇
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहमंत्री अनिल देशमुखांवर आज अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी एक 8 पानी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे,त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की,"गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी+
केली". यासोबतच अनेक धक्कादायक खुलासे आणि आरोप यामध्ये केले आहेत.
खरंतर हे जेव्हा वाचलं तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्याचं काहीच नवल वाटलं नाही, कारण जेव्हा तीन पक्ष, ज्यांची विचारधारा परस्पर अत्यंत विरोधी आहे, आणि ते एकत्र येतात, एकत्र येत असताना महाराष्ट्राच्या+
डोळ्यात धूळफेक करायची म्हणून त्याला एक गोंडस नाव दिलं जातं. त्याला म्हणलं जातं की, "कॉमन मिनिमम प्रोग्राम". जो प्रोग्रामच महाराष्ट्र लुटायचा आहे, खंडणी वसुलीचा आहे, राज्य लयाला लावण्याचा आहे. आणि हे गेले दीड वर्ष महाराष्ट्र रोज अनुभवतोय.
सत्ता ही केवळ भ्रष्टाचार आणि खंडणी+
शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना, सर्वसामान्य जनतेच्या वीज बिल सवलत देण्याचा मुद्दा येतो तेव्हा मात्र राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असतो पण ऊर्जा मंत्र्यांच्या कार्यालय व घराचे सुशोभीकरण करताना सढळ हाताने पैसा खर्च केला जातो, उधळलाच जातो. ऊर्जामंत्री नितीन राऊतांच्या हवाई सफरीसाठी+
MSEB विभागातून तब्बल 29 लाखांचा अनधिकृत खर्च केला जातो. आज वावरात शेतकऱ्यांचं हिरवं पीक विजेअभावी जळतंय, पण निर्लज्ज सत्ताधाऱ्यांचे पंचतारांकित घर मात्र उजळतंय!
यावर नितीन राऊत निर्लज्जपणे म्हणतात की, "मला चांगली राहणीमान आवडते, माणसाने लॅविश राहू नये का?" पण शेतकऱ्यांची पिळवणूक+
करून चांगलं राहण्याची बुद्धी असलेला मनुष्य सत्तेवर बसायच्या लायकीचा असू शकतो?
असो! जितका अन्याय आणि पिळवणूक करायची तेवढी करून घ्या, जनता सगळं लक्षात ठेवतीय, ज्यावेळी पायउतार व्हाल तेव्हा या आघाडी सरकारच्या इतिहासात एकच वाक्य लिहिलं असेल, "एवढं क्रूर, दगाबाज आणि विश्वासघातकी+
थ्रेड 👇
ज्यावेळी स्फोटक भरलेली गाडी सापडली तेव्हापासूनच महाआघाडी सरकार आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माजी शिवसैनिक सचिन वाझेला पाठीशी घालत होते. त्याच दरम्यान मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला, तरीही त्यावर हे तिघाडी सरकार पाऊल उचलत नव्हते. उलट प्रकरण शांत+
करण्याच्या प्रयत्नात होते पण तीन पक्षाच्या बुद्धीला एकट्या देवेंद्र फडणवीसांनी चितपट केलंच. पहिल्यांदा त्या प्रकरणात पडदा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारची देवेंद्रजींनी थेट सभागृहात अन रेकॉर्ड चिरफाड केली तेव्हा गृहमंत्री नमते झाले, उद्धवजींनी तर भर अधिवेशनात सभागृहाला दांडीच+
मारली होती. पण देवेंद्रजी एवढ्यावर थांबले नाहीत तर मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या FIR ची प्रतच सभागृहात वाचून दाखवली. आणि मनसुख हिरेन ची हत्या ही सचिन वाझेंनीच केल्याचा थेट आरोप देवेंद्रजींनी सभागृहात केला, CDR सादर केला तेव्हा मात्र आघाडीची पळताभुई थोडी झाली, CDR च्या+
थ्रेड👇
माजी शिवसैनिक व पोलीस अधिकारी सचिन वाझेला अंबानी स्फोटक प्रकरणात NIA ने अटक केल्यावर आंतरराष्ट्रीय नेते असलेल्या शरद पवारांनी अत्यंत बचावात्मक पवित्रा घेत सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "वाझे हा विषय स्थानिक आहे, मी स्थानिक विषयावर बोलणार नाही".
पण स्थानिक विषयावर+
बोलणार नाही म्हणल्यावर सेनेच्या गोटात खळबळ झाली असेल कारण ज्यांच्या चावीने आपण पळतो त्यांनीच असा हात काढून घेतला तर पुढे काय! पण शरद पवारांचे राजकारण धूर्त आहे, स्थानिक प्रकरणावर ते बोलणार नाही म्हणाले पण त्यांना शांत बसवेना. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय फासा फिट्ट बसलाय हे+
दिसायला लागलं!
वाझेंच्या अटकेनंतर तातडीने धावतपळत दिल्लीवरून मुंबईला आलेले पवार साहेब, सोमवारी सकाळपासून मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, लागलीच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक घेतात. एव्हाना उपमुख्यमंत्री अजित दादांच्या सोबत एक बैठक होते. पुन्हा सरकारमधील काही+
महत्वाचा थ्रेड👇
मुंबईतला जो भाग अतिमहत्वाचा मानला जातो, त्या भागात स्फोटकांनी भरलेली गाडी सापडते, सचिन वाझे नावाचा अधिकारी सर्वात पहिले त्या ठिकाणी जातो, गाडी ज्यांच्या नावावर आहे आणि ज्यांच्या मूळ मालकीची आहे त्याचा काहीच दिवसात हत्या(?)/मृत्यू होतो, वाझे नावाचा अधिकारी+
संशयाच्या भोवऱ्यात येतो, विधानसभा अधिवेशनात विषय गाजला जातो मात्र एका API अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि तीन पक्षाचे सगळेच नेते कामाला लागतात. देवेंद्र फडणवीस नावाचा खमक्या लोकनेता या कटाचा पर्दापाश करण्यासाठी कंबर कसतो अन थेट सभागृहात CDR सादर+
करतो. तपास NIA कडे जातो अन ज्याला खुद्द मुख्यमंत्री वाचवत असतात त्यांच्या पक्ष्याचा माजी प्रवक्ता सचिन वाझे याला NIA कडून अटक होते.
खरंतर हा सगळा घटनाक्रम जर पुन्हा एकदा हळूहळू डोळ्यासमोरून घातला तर डोकं सुन्न होतं!
नेमका महाराष्ट्र आपण कुणाच्या हातात दिलाय! राज्य वाचवावे की+
हे दोनच फोटो राज्यातल्या दळभद्री आघाडी सरकारने कायम लक्षात ठेवावेत!एकीकडे राज्याची वाट लावता लावता आज लाखो MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न ही आघाडी करतेय.
मात्र आजच्याच दिवशी एकीकडे आमदार गोपीचंद पडळकर तर दुसरीकडे आमदार रामभाऊ सातपुते हे दोन+
वाघ थेट मैदानात उतरत विद्यार्थ्यांच्या साथीला बसले आहेत, या आघाडीचा करेक्ट कार्यक्रम हेच वाघ करतील याबाबत चिंता करू नका!
गावगाड्यातनं शहरात जाऊन अभ्यास करून आयुष्याची अधिकारी पदाची स्वप्नं रंगवणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा विडा या ठाकरेंच्या तिघाडी सरकारने+
उचलला आहे. निवडणूकिसाठी पावसात भिजणारे पाहून महाराष्ट्र फसला मात्र या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी घामांनी भिजलेले हे दोन वाघ आज महाराष्ट्र बघतोय, येणाऱ्या काळात आघाडीवाल्यांनो तुम्हाला हे जळी स्थळी दिसतील, अन यांच्या प्रेरणेने गाव गाड्यात तयार झालेले अशी लाखो पोरं तुमच्या+