कालपासून मराठी माध्यमे महाराष्ट्र आणि गुजरात अशी तुलना करत ठाकरे सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी गुजरातची लोकसंख्या कमी आहे तरी लसी जास्त दिल्या जात आहेत असा दावा ते करत आहेत.
1️⃣
पण यावेळी ही गोष्ट सोयीस्करपणे सांगत नाहीत की उत्तरप्रदेशमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त लोकसंख्या (आणि भाजपा सरकार) असूनही त्यांना महाराष्ट्रापेक्षा कमी लस पुरवण्यात आली आहे. यावरून स्पष्ट होते की लोकसंख्या आणि लस पुरवठा यांचा काहीही संबंध नाही.
2️⃣
लसीकरणाच्या पहिल्या काही टप्प्यांमध्ये आणि आजही सर्वाधिक लस पुरवठा झालेल्या काही राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे.
3️⃣
इथे मुद्दा फक्त लोकसंख्येचा नसून लसीकरण मोहीम राबवण्याचा आहे. आज देशातील सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. पण ठाकरे सरकारने आजही १४% आरोग्य कर्मचाऱ्यांना अजून लसीचा पहिला डोसही दिला नाहीये. तर २७% फ्रंटलाईन वर्कर्सना लसीचा पहिला डोस देण्यात आला नाहीये.
4️⃣
तर महाराष्ट्रातील फक्त २५% जेष्ठ नागरीकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. मग प्रश्न हा उद्भवतो की लसीकरण मोहीमेच्या पहिल्या २ टप्प्यांत महाराष्ट्राने नेमके काय केले???
5️⃣
महाराष्ट्राची गुजरात सोबत तुलना करायची तर ती सगळ्याच बाबतीत कर.
लसीकरण केंद्र
महाराष्ट्र:- ४६९६
(सरकारी:- ४०६४ खासगी:- ६३२)
गुजरात:- ४९०२
(सरकारी:- ४६२० खासगी २८२)
6️⃣
महाराष्ट्रापेक्षा लसीकरण केंद्र जास्त. त्यात पण सरकारी केंद्र जास्त. म्हणजेच आरोग्य सुविधा उभारणीत महाराष्ट्र सरकारपेक्षा जास्त काम.
एकूण लसीकरण
महाराष्ट्र:- ८९,६०,१४९
पहिला डोस:- ८०,८४,६०३
दुसरा डोस:- ८,७५,५४६
गुजरात:- ८१,५३,२३१
पहिला डोस:- ७२,२९,४५८
दुसरा डोस:- ९,२३,७७३
7️⃣
या आकड्यांमधून कळते की महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातचा लसीकरणा वेग अधिक आहे. त्यात त्यांनी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मोहिम राबवल्याचे दिसते.
8️⃣
त्यामुळे लसीचा दुसरा डोस मिळालेल्या गुजराती नागरिकांची संख्या महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. काल केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी पत्रात दिलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात लसीकरण धड झालेले नाही.
9️⃣
पण गुजरातमध्ये ते झालेले दिसते. त्यामुळे आता लसीचा दुसरा डोस मिळणे गुजरातच्या नागरिकांना आवश्यक आहे. त्यामुळे त्या आवश्यकतेनुसार त्यांना लसीकरणाचा पुरवठा होणे अत्यंत स्वाभाविक आहे.
🔟
ठाकरे सरकारच्या PR चे काँट्रॅक्ट घेतल्यागत वार्तांकन करणाऱ्या मराठी मीडियाला या खोलात शिरण्यात रस नाही आणि इच्छा तर त्याहुन नाही. मोंदींमुळे गुजरात राज्याचा द्वेष करून तुम्ही ठाकरे सरकारी अब्रू वाचवायचा प्रयत्न कितीही केलात तरिही तुम्ही वस्तुस्थिती बदलू शकत नाही
1️⃣1️⃣
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
निवडणुकांना सामोरे जाऊन, ३०३ खासदारांचे बहुमत घेऊन सत्तेत आलेल्या सरकारने संसदेत संविधानीक मार्गाने कृषी कायदे पारित केले.
(1/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
विरोधकांना या कायद्यावर चर्चा न करता गोंधळ घालून सभात्याग करणे जास्त महत्वाचे वाटले.
(2/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
देशभरात शेतकऱ्यांचे नव्हे तर शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन सुरू झाले तेव्हा त्यांनी लोकशाही मार्गाने होऊ दिले.
(3/15)
इराण हा एक अधिकृत इस्लामिक देश आहे, जिथली ९९% पेक्षा जास्त लोकसंख्या मुसलमान आहे.
अशा इराण मधले एक जागतिक दर्जाचे दिग्दर्शक माजिद माजदी (नावात बरंच काही आहे) यांनी २०१५ साली एक चित्रपट काढतात ज्याचे नाव 'Mohammad:- The Messenger Of God'.
(1/n)
हा त्यावर्षी इराणची Academy Awards साठीची Official Entry असतो आणि त्यावर्षी इराणमधे सगळ्यात जास्त व्यवसाय करणारा हाच चित्रपट असतो.
हा चित्रपट आता Digital Platform वर Release होत आहे आणि या चित्रपटावर भारत नावाच्या Secular देशात बंदी घालावी अशी मागणी 'रझा अकॅडमी' करते.
(2/n)
त्याची दखल थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री घेतात आणि केंद्र सरकारला पत्र लिहीतात. याआधीच रझा अकॅडमीने २०१५ साली या चित्रपटाचे दिग्दर्शक माजदी आणि संगीत दिग्दर्शक ए.आर.रहमान यांच्या विरोधात फतवा काढायचा प्रताप करून झाला आहे.
• या कोरोना काळात एकिकडे महाराष्ट्र सरकारवर चहुबाजूने टीका होत असताना सोनू सूद करत असलेल्या कामावर मात्र कौतुकाचा वर्षाव होत आहे
(1/n)
• अशातच सोनू सूद राज्यपालांना राजभवनात जाऊन भेटतो, रोहित पवार सोनू सूदच्या घरी जाऊन त्याला भेटतात. त्याची माध्यमांत चर्चा होते. पण या सगळ्यात 'मातोश्री' कुठेच नसते.
(2/n)
• एकीकडे सोनू सूद राज्यपालांना स्वतःहून भेटतो पण मुख्यमंत्र्यांना भेटायची त्याची इच्छा होत नाही. आता ती का होत नाही हे सोनूलाच माहिती पण यातून त्यांचा EGO मात्र दुखावला जातो
(3/n)
जेव्हा संजय राऊतांमुळे बाळासाहेबांना खुलासा करावा लागतो!!!
स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे एक गाजलेले भाषण आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या चित्र-चरित्र प्रकाशानाच्यावेळी केलेले ते भाषण हा एका उत्कृष्ट वक्तृत्वाचा नमुना आहे.
त्या भाषणात प्रमोदजी सांगतात की 'मला बाळासाहेब का आवडतात?'
(1/n)
याचे एक कारण म्हणजे बाळासाहेब कधीही 'हे मी बोललोच नाही' अशा पद्धतीचा घुमजाव करत नाहीत. ते बोलण्याच्या आधी किंवा नंतर नाही तर बोलतानाच विचार करत बोलतात. बाळासाहेबांची ही एक खरंच खासीयत होती.
(2/n)
पण जो माणूस बोलतानाही एवढी विचारपूर्वक बोलतो त्या माणसाला त्याच्या लिखाणावर खुलासा/स्पष्टीकरण द्यायला लागते ही गोष्ट पटणारी आहे का??
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,
छान बोलतात, शांतपणे बोलतात, संयत बोलतात, घरातला मोठा भाऊ बोलतोय असं वाटतं, वगैरे वगैरे म्हणत कौतुकाचे पूल बांधणाऱ्या (PR agency च्या प्रचाराचे बळी ठरलेल्या??) सर्वांना एक छोटीशी आठवण.....
ते मुख्यमंत्री आहेत...वक्तृत्व स्पर्धेतले स्पर्धक नाहीत!!
(1/n)
त्यांना शासन चालवायचंय...वक्तृत्व प्रशिक्षण वर्ग नाहीत!!
त्यांना काम करायला नेमलंय...फक्त तुम्हाला धीर द्यायला नाही!!
एखाद्या डॉक्टरने पेशंटची ट्रिटमेंट केली नाही पण फक्त त्याच्या नातेवाईकांना धीर दिला तर चालेल का??
तसंच आहे हे!!!!
राज्य सरकारचे काम कोणी दाखवू शकेल का??
(2/n)
केंद्राच्या योजना पण धड राबवत नाहीयेत,
स्वतःची एखादी योजना सुरू करणे वगैरे तर खूप लांबची गोष्ट.
तेव्हा Evaluation कामाचे करा...भाषणाचे नाही!!!
(3/n)