महत्वाचा थ्रेड👇
हे दोन फोटो बघा! राज्यात आरोग्य व्यवस्था आज चव्हाट्यावर आहे, राज्यकर्ते महत्त्वाकांक्षी आणि धोरणात्मक निर्णय घेणारे नसल्याने आज राज्याची वाताहत झालीय हे नाही म्हणलं तरी निखळ सत्य आहे. देवेंद्रजी फडणवीस या माणसावर विरोधकांचा राग असू शकतो पण या माणसाची राज्याच्या+
प्रशासनावर आणि कारभारावर घट्ट पकड होती. आणि आजही आहे. त्याची अनुभूती अवघ्या राज्याला अजूनही येतेय..
खरंतर देवेंद्रजींनी गेल्या पाच वर्षात आरोग्य क्षेत्रात जे काम केलं ते आत्तापर्यंतच्या इतिहासात कधीच झालं नाही हे दाव्याने सांगू शकतो. गावगाड्यातल्या माणसाला उपचार मिळाले पाहिजेत+
आणि उपचाराविना कोणीही जीवानिशी गेला नाही पाहिजे हे काळजात कोरून काम करणारा देवेंद्र नावाचा माणूस! अन सोबतीला झपाटून आणि झोकून देऊन तळमळीने काम करणारे ओमप्रकाश शेटे सर...
महाराष्ट्रात एकही गाव असं नसेल की ओमप्रकाश शेटे सरांना आम्ही ओळखत नाही. अवघा महाराष्ट्र देवदूत म्हणून ओळखतो,+
देवेंद्रजी सत्तेत आले अन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची जबाबदारी ओमप्रकाश सरांच्या खांद्यावर आली. त्याचवेळी "ओमप्रकाशजी, इतकं काम करा की राज्यातला एकही रुग्ण पैशाअभावी उपचार झाला नाही म्हणून मरण पावला नाही पाहिजे" हे देवेंद्रजींचे शब्द...
ओमप्रकाशजी झोकून देऊन कामाला+
लागले, गावगाड्यातनं फाटकी माणसं मदतीच्या आशेपायी मंत्रालयाच्या पायऱ्या चढायला लागली, मदत व्हायला लागली. आपल्या घरचाच माणूस आहे अशी वागणूक रुग्णांना, नातेवाईकांना मिळायची. 4 वर्षाच्या थोडक्या काळात तब्बल 21 लाखांपेक्षा जास्त लोकांना 1500 कोटी रुपयांची मदत करणारे ओमप्रकाश शेटे हे+
देवदूत. कधी कधी मुंबईला जाऊ न शकणारी माणसं फोनवर ढसाढसा रडायची, काळीज असलेला हा अधिकारी लोकांना धीर द्यायचा, अन फोनवर कागदपत्रे मागवून काम मार्गी लावायचा. अडल्या नडल्याचं काम झालं पाहिजे, माणसाच्या मदतीला आलं पाहिजे, दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना आत्मिक समाधान मिळालं+
पाहिजे, प्रत्येक फाईलला लाईफ म्हणूज पाहिलं, हाच एवढा उदात्त हेतू ठेऊन काम केलं. हे सगळं करत असताना देवेंद्रजींसारखा मोठ्या मनाचा लोकनेता पाठीशी कायम ठाम उभा होता, हे सर्वात महत्वाचं!
आज राज्यातली भयावह परिस्थिती पाहिली की या जोडीची आठवण येते, राजकारण काहीही असो, काम करणारी माणसं+
खुर्चीत पाहिजे, काळीज असलेली माणसं पदावर पाहिजेच.
कित्येक लोकांचे फोन येतात, कुणाला बेड पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, व्हेंटिलेटर पाहिजे, रेमडीसिवीर पाहिजे. पण परिस्थितीच अशी आहे की सर्वांनाच मदत करता येत नाही, कधी शक्य होतं, कधी होत नाही, वाईट वाटतं, पण पर्याय नाही.😢
राज्यकर्त्यांनी+
सजग असलं पाहिजे, माणुसकीच्या नात्यानं काम केलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत, दूरदृष्टी आणि व्यापक भूमिका यामुळेच कर्तृत्व उजाळून निघतं पण हे जमलं पाहिजे,आज मी कित्येक लोकं अशी पाहतोय की राजकारण काहीही असो पण देवेंद्रजी आणि ओमप्रकाशजी ही जोडी पुन्हा या मंत्रालयात हवी असं मनापासून+
बोलताहेत, माणसाचं काम बोललं पाहिजे, यांचं काम बोलतंय. महाराष्ट्र अडचणीत असताना यांची आठवण येणं हेच लाखमोलाचं आहे, या दोन कार्यक्षम जोडीची खरंच महाराष्ट्र पुन्हा वाट पाहतोय...🌷❤️
- विकास विठोबा वाघमारे
मोहोळ, सोलापूर
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गेल्या चार - पाच दिवसांपासून महाराष्ट्राचे पप्पू नाना पटोले, वाचाळवीर मंत्री कबाब मलिक आणि इतर राज्यातले उंटावरचे शहाणे हे केंद्र सरकार, देवेंद्रजी फडणवीस आणि प्रवीणजी दरेकर यांच्यावर रेमडीसिविर इंजेक्शन विषयात टीका आणि आरोप करत आहेत, त्या महावसुली वाल्यांना आज त्यांच्याच+
मंत्रिमंडळात असलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सणसणीत चापट लगावली आहे.
डॉ. शिंगणे म्हणतात की, "मागच्या आठवड्यात मला विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर भेटले, त्यांच्यासोबत काही कंपन्यांची माणसं होती, त्यांनी निवेदन दिलं, त्यांनी मला सांगितलं की रेमडीसिविर+
ची उपलब्धता आहे, जे निर्यातीसाठी आहे, पण तो आपल्याला मिळू शकतो, त्यानुसार आम्ही अन्न व औषध प्रशासनाने परवाना दिला आणि तो साठा फक्त सरकारला मिळू शकत होता, ठरल्याप्रमाणे विरोधी पक्ष सरकारलाच मिळवून देत होता, मात्र मधल्या काळात काही वाईट राजकारण झालं."
थ्रेड👇
आज दिल्लीत शरद पवार साहेबांनी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेलं आरोप गंभीर आहेत असं बोलले मात्र सर्व पत्रकार परिषदेत ही परमबीर सिंग दोषी आहेत म्हणत यांच्यावर बिल फाडलं, देशमुखांवर गंभीर आरोप होतात मात्र त्यांना हाकलून दिले जात नाही, त्या+
घटनेची चौकशी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.
त्यांची प्रेस संपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात प्रेस कॉन्फरन्स घेतली, पवार साहेबांनी सरकार वाचवण्यासाठी केलेलं लंगडं समर्थन देवेंद्रजींनी अक्षरशः चिरफाड करून दाखवलं. शरद पवार म्हणतात की,सदर घटनेची चौकशी व्हावी, मग+
त्यामध्ये नेमकी कुणाची चौकशी? फक्त परमबीर सिंगांची की गृहमंत्री अनिल देशमुखांची पण? आणि जर देशमुखांची चौकशी करणार असाल तर गृहमंत्री पदावर असताना कशी निष्पक्ष चौकशी होईल असा सवाल केला. जर मनापासून चौकशी करायची असेल तर तातडीने अनिल देशमुखांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे.
यामध्ये+
थ्रेड👇
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहमंत्री अनिल देशमुखांवर आज अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी एक 8 पानी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे,त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की,"गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी+
केली". यासोबतच अनेक धक्कादायक खुलासे आणि आरोप यामध्ये केले आहेत.
खरंतर हे जेव्हा वाचलं तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्याचं काहीच नवल वाटलं नाही, कारण जेव्हा तीन पक्ष, ज्यांची विचारधारा परस्पर अत्यंत विरोधी आहे, आणि ते एकत्र येतात, एकत्र येत असताना महाराष्ट्राच्या+
डोळ्यात धूळफेक करायची म्हणून त्याला एक गोंडस नाव दिलं जातं. त्याला म्हणलं जातं की, "कॉमन मिनिमम प्रोग्राम". जो प्रोग्रामच महाराष्ट्र लुटायचा आहे, खंडणी वसुलीचा आहे, राज्य लयाला लावण्याचा आहे. आणि हे गेले दीड वर्ष महाराष्ट्र रोज अनुभवतोय.
सत्ता ही केवळ भ्रष्टाचार आणि खंडणी+
शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना, सर्वसामान्य जनतेच्या वीज बिल सवलत देण्याचा मुद्दा येतो तेव्हा मात्र राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असतो पण ऊर्जा मंत्र्यांच्या कार्यालय व घराचे सुशोभीकरण करताना सढळ हाताने पैसा खर्च केला जातो, उधळलाच जातो. ऊर्जामंत्री नितीन राऊतांच्या हवाई सफरीसाठी+
MSEB विभागातून तब्बल 29 लाखांचा अनधिकृत खर्च केला जातो. आज वावरात शेतकऱ्यांचं हिरवं पीक विजेअभावी जळतंय, पण निर्लज्ज सत्ताधाऱ्यांचे पंचतारांकित घर मात्र उजळतंय!
यावर नितीन राऊत निर्लज्जपणे म्हणतात की, "मला चांगली राहणीमान आवडते, माणसाने लॅविश राहू नये का?" पण शेतकऱ्यांची पिळवणूक+
करून चांगलं राहण्याची बुद्धी असलेला मनुष्य सत्तेवर बसायच्या लायकीचा असू शकतो?
असो! जितका अन्याय आणि पिळवणूक करायची तेवढी करून घ्या, जनता सगळं लक्षात ठेवतीय, ज्यावेळी पायउतार व्हाल तेव्हा या आघाडी सरकारच्या इतिहासात एकच वाक्य लिहिलं असेल, "एवढं क्रूर, दगाबाज आणि विश्वासघातकी+
काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमितभाई शहा आणि देशातल्या सर्व राज्याचे मुख्यमंत्री बैठकीत उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांचा आढावा आणि उपाययोजने संदर्भात चर्चा झाली.
जेव्हा महाराष्ट्रातील कोरोनाचा आढावा+
घेतला जात होता तेव्हा चुकीची आकडेवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अमितभाईंना दिली, खरंतर अजून उद्धवजींनी अमितभाईंना ओळखलं नसावं, करेक्ट आकडेवारी अन मजबूत नॉलेज घेऊन वावरणाऱ्या या मोटाभाईंना कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही. पण काल उद्धवजींनी राज्यातील कोरोनाची आकडेवारी देताना चूक केली+
अन तिथेच मोटाभाईंनी उद्धवजींना रोखत आपल्याकडे असलेली करेक्ट आकडेवारी सांगितली,पण उद्धवजींची चूक उघडी पडली हे मानायला तयार नव्हते तिथेच दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाल्याचं समजलं, एवढ्यात मोदीजींनी मध्यस्थी करत हे सगळं तात्काळ थांबवलं.बरं झालं मोदीजी ऐनवेळी धावून येऊन मध्यस्थी केली,+
थ्रेड 👇
ज्यावेळी स्फोटक भरलेली गाडी सापडली तेव्हापासूनच महाआघाडी सरकार आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माजी शिवसैनिक सचिन वाझेला पाठीशी घालत होते. त्याच दरम्यान मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला, तरीही त्यावर हे तिघाडी सरकार पाऊल उचलत नव्हते. उलट प्रकरण शांत+
करण्याच्या प्रयत्नात होते पण तीन पक्षाच्या बुद्धीला एकट्या देवेंद्र फडणवीसांनी चितपट केलंच. पहिल्यांदा त्या प्रकरणात पडदा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारची देवेंद्रजींनी थेट सभागृहात अन रेकॉर्ड चिरफाड केली तेव्हा गृहमंत्री नमते झाले, उद्धवजींनी तर भर अधिवेशनात सभागृहाला दांडीच+
मारली होती. पण देवेंद्रजी एवढ्यावर थांबले नाहीत तर मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या FIR ची प्रतच सभागृहात वाचून दाखवली. आणि मनसुख हिरेन ची हत्या ही सचिन वाझेंनीच केल्याचा थेट आरोप देवेंद्रजींनी सभागृहात केला, CDR सादर केला तेव्हा मात्र आघाडीची पळताभुई थोडी झाली, CDR च्या+