होय! हे तेच @AjitPawarSpeaks आहेत, ज्यांनी पंढरपूर - मंगळवेढ्याच्या विधानसभा पोटनिवडणुकीत येऊन प्रचार केला. केवळ जाहीर सभाच नाही तर गल्लोगल्ली फिरून याच दादांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
त्या भागात आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना मात्र हेच अजित दादा बेताल वक्तव्ये करत+
सुटले आहेत. हे म्हणतात की, "या कोरोनाच्या उद्रेकाला तिथली जनताच जबाबदार आहे".
खरंतर अशा प्रकारचे वक्तव्ये हे लाजिरवाणे आहे, दादा हे वागणं बरं नव्हं. जर त्या भागात तुमचे अर्धा डझन मंत्री आणि तुम्ही स्वतः येऊन सभा घेतली नसती तर कशाला लोक जमले असते?लोकांना दोष देणं बंद करा.
भाजपाने+
प्रचार केला, मात्र अशाप्रकारे जबाबदारी ढकलली नाही, ना बेताल वक्तव्ये केलीत. उलट त्या ठिकाणी कोविड सेंटर व्हावे यासाठी भाजपा नेतेच प्रयत्नशील आहेत.
पण दादांनी आजच आपली पंढरपूर - मंगळवेढ्याची हार मान्य केली आहे, मतांचा जोगवा मागूनही लोकांनी इंद्रायणी काठ दाखवला असल्याची कुणकुण+
दादांना लागलीच असेल, म्हणूनच आता लोकांवर त्याचा राग काढताहेत.
राष्ट्रवादीचे हे जुनेच धोरण आहे, आम्हाला पाडलं तर तुमची अडवणूक होणार हा त्यांचा ठरलेला खुनशी फॉर्म्युला आहे. पण दादा अगोदरच अशी धावपळ करून कसं चालेल, कोरोनाची स्थिती काय आज ना उद्या आटोक्यात येईलच, भाजपा त्यासाठी+
सक्रियपणे काम करत आहे. पण अजित दादा, तुमची बेताल वक्तव्ये आणि "गरज सरो आणि वैद्य मरो" ही भूमिका लोकं कायम लक्षात ठेवतील!
- विकास विठोबा वाघमारे
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
महत्वाचा थ्रेड👇🌷
राज्य सरकार नेमकं मोफत काय देणार! आणि फुकटच्या क्रेडिटसाठी राज्य नेमकं कितीवेळा तोंडचलाखी करणार हे सांगणं तसं अवघड आहे. आयजीच्या जीवावर बायजी उधार म्हणजे काय खाली सांगतो बघा! उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री म्हणून तर सपशेल अपयशी आहेतच, पण माणूस म्हणूनही ते त्या+
पात्रतेत बसत नाहीत, कारण या मरणासन्न काळात सर्वात जास्त राजकारण आणि द्वेष जर कुणी केला असेल तर उद्धव ठाकरे यांनीच केलाय.
काल मीडियाच्या माध्यमातून अजून एक दलाली करण्याचा प्रयत्न केला आणि राज्यातल्या लोकांना एक मेसेज पोहचवण्याचा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे सरकारने केला की,+
"केंद्र सरकार विकत लस देत आहे, आणि राज्य सरकार आपल्या पैशातून सर्व नागरिकांना मोफत लस देत आहे." मग सगळे पाळलेले दलाल आणि गुलाम वाहवा करायला लागले. पण तुम्हाला मी सत्यता सांगतो. सोबतच गुलामांच्या आणि राज्य सरकारची दलाली करणाऱ्यांच्या तोंडावर हाणायला लिंकसुद्धा देतो.👇
महत्वाचा थ्रेड👇
हे दोन फोटो बघा! राज्यात आरोग्य व्यवस्था आज चव्हाट्यावर आहे, राज्यकर्ते महत्त्वाकांक्षी आणि धोरणात्मक निर्णय घेणारे नसल्याने आज राज्याची वाताहत झालीय हे नाही म्हणलं तरी निखळ सत्य आहे. देवेंद्रजी फडणवीस या माणसावर विरोधकांचा राग असू शकतो पण या माणसाची राज्याच्या+
प्रशासनावर आणि कारभारावर घट्ट पकड होती. आणि आजही आहे. त्याची अनुभूती अवघ्या राज्याला अजूनही येतेय..
खरंतर देवेंद्रजींनी गेल्या पाच वर्षात आरोग्य क्षेत्रात जे काम केलं ते आत्तापर्यंतच्या इतिहासात कधीच झालं नाही हे दाव्याने सांगू शकतो. गावगाड्यातल्या माणसाला उपचार मिळाले पाहिजेत+
आणि उपचाराविना कोणीही जीवानिशी गेला नाही पाहिजे हे काळजात कोरून काम करणारा देवेंद्र नावाचा माणूस! अन सोबतीला झपाटून आणि झोकून देऊन तळमळीने काम करणारे ओमप्रकाश शेटे सर...
महाराष्ट्रात एकही गाव असं नसेल की ओमप्रकाश शेटे सरांना आम्ही ओळखत नाही. अवघा महाराष्ट्र देवदूत म्हणून ओळखतो,+
गेल्या चार - पाच दिवसांपासून महाराष्ट्राचे पप्पू नाना पटोले, वाचाळवीर मंत्री कबाब मलिक आणि इतर राज्यातले उंटावरचे शहाणे हे केंद्र सरकार, देवेंद्रजी फडणवीस आणि प्रवीणजी दरेकर यांच्यावर रेमडीसिविर इंजेक्शन विषयात टीका आणि आरोप करत आहेत, त्या महावसुली वाल्यांना आज त्यांच्याच+
मंत्रिमंडळात असलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सणसणीत चापट लगावली आहे.
डॉ. शिंगणे म्हणतात की, "मागच्या आठवड्यात मला विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर भेटले, त्यांच्यासोबत काही कंपन्यांची माणसं होती, त्यांनी निवेदन दिलं, त्यांनी मला सांगितलं की रेमडीसिविर+
ची उपलब्धता आहे, जे निर्यातीसाठी आहे, पण तो आपल्याला मिळू शकतो, त्यानुसार आम्ही अन्न व औषध प्रशासनाने परवाना दिला आणि तो साठा फक्त सरकारला मिळू शकत होता, ठरल्याप्रमाणे विरोधी पक्ष सरकारलाच मिळवून देत होता, मात्र मधल्या काळात काही वाईट राजकारण झालं."
थ्रेड👇
आज दिल्लीत शरद पवार साहेबांनी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेलं आरोप गंभीर आहेत असं बोलले मात्र सर्व पत्रकार परिषदेत ही परमबीर सिंग दोषी आहेत म्हणत यांच्यावर बिल फाडलं, देशमुखांवर गंभीर आरोप होतात मात्र त्यांना हाकलून दिले जात नाही, त्या+
घटनेची चौकशी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.
त्यांची प्रेस संपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात प्रेस कॉन्फरन्स घेतली, पवार साहेबांनी सरकार वाचवण्यासाठी केलेलं लंगडं समर्थन देवेंद्रजींनी अक्षरशः चिरफाड करून दाखवलं. शरद पवार म्हणतात की,सदर घटनेची चौकशी व्हावी, मग+
त्यामध्ये नेमकी कुणाची चौकशी? फक्त परमबीर सिंगांची की गृहमंत्री अनिल देशमुखांची पण? आणि जर देशमुखांची चौकशी करणार असाल तर गृहमंत्री पदावर असताना कशी निष्पक्ष चौकशी होईल असा सवाल केला. जर मनापासून चौकशी करायची असेल तर तातडीने अनिल देशमुखांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे.
यामध्ये+
थ्रेड👇
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहमंत्री अनिल देशमुखांवर आज अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी एक 8 पानी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे,त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की,"गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी+
केली". यासोबतच अनेक धक्कादायक खुलासे आणि आरोप यामध्ये केले आहेत.
खरंतर हे जेव्हा वाचलं तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्याचं काहीच नवल वाटलं नाही, कारण जेव्हा तीन पक्ष, ज्यांची विचारधारा परस्पर अत्यंत विरोधी आहे, आणि ते एकत्र येतात, एकत्र येत असताना महाराष्ट्राच्या+
डोळ्यात धूळफेक करायची म्हणून त्याला एक गोंडस नाव दिलं जातं. त्याला म्हणलं जातं की, "कॉमन मिनिमम प्रोग्राम". जो प्रोग्रामच महाराष्ट्र लुटायचा आहे, खंडणी वसुलीचा आहे, राज्य लयाला लावण्याचा आहे. आणि हे गेले दीड वर्ष महाराष्ट्र रोज अनुभवतोय.
सत्ता ही केवळ भ्रष्टाचार आणि खंडणी+
शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना, सर्वसामान्य जनतेच्या वीज बिल सवलत देण्याचा मुद्दा येतो तेव्हा मात्र राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असतो पण ऊर्जा मंत्र्यांच्या कार्यालय व घराचे सुशोभीकरण करताना सढळ हाताने पैसा खर्च केला जातो, उधळलाच जातो. ऊर्जामंत्री नितीन राऊतांच्या हवाई सफरीसाठी+
MSEB विभागातून तब्बल 29 लाखांचा अनधिकृत खर्च केला जातो. आज वावरात शेतकऱ्यांचं हिरवं पीक विजेअभावी जळतंय, पण निर्लज्ज सत्ताधाऱ्यांचे पंचतारांकित घर मात्र उजळतंय!
यावर नितीन राऊत निर्लज्जपणे म्हणतात की, "मला चांगली राहणीमान आवडते, माणसाने लॅविश राहू नये का?" पण शेतकऱ्यांची पिळवणूक+
करून चांगलं राहण्याची बुद्धी असलेला मनुष्य सत्तेवर बसायच्या लायकीचा असू शकतो?
असो! जितका अन्याय आणि पिळवणूक करायची तेवढी करून घ्या, जनता सगळं लक्षात ठेवतीय, ज्यावेळी पायउतार व्हाल तेव्हा या आघाडी सरकारच्या इतिहासात एकच वाक्य लिहिलं असेल, "एवढं क्रूर, दगाबाज आणि विश्वासघातकी+