धर्मस्वातंत्र्य म्हणजे तत्त्वज्ञान सांगायचे स्वातंत्र्य, संघटितपणे प्रचार करण्याचे स्वातंत्र्य नव्हे. देशाच्या एकीला व नेकीला विरोधी असे धर्मस्वातंत्र्य असूच शकत नाही.
- स्वातंत्र्यवीर सावरकर
हिंदु समाजाला संघटित करणं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ध्येय होतं.
२/१३
सावरकरांना भारतीय समाजात मतभेद निर्माण करणार्या प्रथा नष्ट करायच्या होत्या.
६ जुलै, १९२० रोजी बंधू नारायणराव यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलेलं की, “मला इंग्रज राजवटी विरूद्ध लढा देण्याची जितकी गरज वाटते तितकीच जातीभेद आणि अस्पृश्यतेविरूद्ध बंड करण्याची गरज वाटते.”
३/१३
६ जानेवारी, १९२४ ला सावरकर बंधूंची रत्नागिरीच्या कारागृहातून सुटका झाली.
पण त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा सोडून जाण्यास बंदी होती.
रत्नागिरीतला हा काळ सावरकरांनी हिंदु समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्थकी लावला.
रत्नागिरीत केलेलं जात्युछेदक कार्य याच मोहीमेचा भाग होतं.
तात्यारावांनी तथाकथित खालच्या जातीतील मुलांनी शाळेत जावं या साठी त्यांच्या पालकांना आर्थिक प्रोत्साहन दिले आणि या जातीतील मुलांना स्लेट आणि खडूचे वाटप केले.
५/१३
एकदा मुलांना एकत्र शिक्षण मिळालं कि ते नंतरच्या जीवनात जातीभेद पाळणार नाहीत. त्यांना त्याची गरज भासणार नाही. याव्यतिरिक्त, सरकारने मागासवर्गीय जातीच्या मुलांसाठी विशेष शाळा बंद केल्या पाहिजेत. ह्याने शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये हीनतेची भावना निर्माण होते - हे त्यांचं मत होतं.
६/१३
सावरकरांनी अस्पृश्यतेविरूद्ध सर्वात शक्तिशाली सामाजिक चळवळ सुरू केली होती.
१९२९ मध्ये त्यांनी अस्पृश्य समाजासाठी यज्ञोपवीत समारंभ, वेदांचे पठण आणि सामुदायिक भोजन आयोजित केले होते.
७/१३
सावरकरांना वैदिक साहित्य केवळ ब्राह्मणांसाठी नव्हे तर प्रत्येकासाठी लोकप्रिय करायचे होते.
त्यांनी स्वत: अस्पृश्य समाजातील लोकांना गायत्री मंत्र वाचणे, लिहिणे आणि पाठ करणे शिकवले होते.
हिंदु सणा दिवशी ते विविध जातीतील लोकांच्या घरी जाऊन मिठाई वाटप करत असत.
८/१३
#सावरकर हे केवळ समाजसुधारक नव्हते तर ते एक सक्रिय सामाजिक क्रांतिकारक होते.
जानवी घाला जानवी! - स्वातंत्र्यवीर विनायाक दामोदर सावरकर यांनी अस्पृश्य समाजाला केलेल्या या उपदेशावरुन त्यांच्या सामाजिक क्रांति ची ओळख आपल्याला पटेल.
९/१३
अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी रत्नागिरीत १९३१ साली पतित पावन मंदिराची स्थापना केली.
या मंदिराच्या समितीवर प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व करणारी लोकं होती.
याच बरोबर सावरकरांनी काही मंदिरात सामुदायिक जेवणाचेही आयोजन केले होते.
१०/१३
२१ सप्टेंबर, १९३१ रोजी पतितपावन मंदिरात महिलांसाठी महाराष्ट्रातील प्रथम सामुदायिक भोजन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सुमारे ७५ महिला उपस्थित होत्या. १९३५ पर्यंत ही संख्या ४०० वर गेली होती.
यावर कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध ब्राह्मणेतर नेते माधवराव बागल यांचे मत👇🏼
११/१३
१ मे, १९३३ रोजी सावरकरांनी अस्पृश्यांसह सर्व जातींच्या हिंदूंसाठी एक खानावळ सुरू केली. त्यांनी महार जातीतील एका व्यक्तीला तिथे भोजन देण्यासाठी नोकरी दिली होती.
संपूर्ण भारतातील ही पहिली अशी खानावळ होती. हे अशा वेळी होते जेव्हा आंतरजातीय जेवण समाजासाठी अकल्पनीय होते.
१२/१३
#समाजसुधारक_सावरकर एके ठिकाणी म्हणाले होते की, "तुम्ही माझी मार्सेलिसची उडी विसरलात तरी चालेल, पण माझी जात्युच्छेदक, अस्पृश्यता निवारक आणि विज्ञानवादी विचारप्रणाली मात्र मुळीच विसरू नका !"
सावरकरांचे हे कार्य जास्तं लोकांपर्यंत नाही पोहोचले हेच या देशाचे दुर्दैव!
१३/१३
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#Thread: समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगाबाद खंडपीठाचा ‘तो’ निकाल!
इतिहासाचे विकृतीकरण हे काही महाराष्ट्राला नवीन नाही. अनेक बाष्कळ वाद आपण सर्वांनीच ऐकले/वाचले आहेत. त्यात दोन्ही बाजूंचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे शिवसमर्थ संबंध.
१/७
शिवसमर्थ संबंधांवर वाद सुरु झाला की आजकाल एक नवीनंच गोष्ट ऐकायला मिळेत. ती म्हणजे औरंगाबाद उच्चन्यायालयाने या संबंधांवर दिलेल्या निकालाची.
या सोबतंच कुठल्यातरी फालतू स्थानिक वृत्तपत्रातील हे👇🏼कात्रण फिरवून लोकांनी दिशाभूल केली जाते.
२/७
आता औरंगाबाद हे बॉम्बे उच्चन्यायालयाचे एक ‘खंडपीठ’ आहे हे ही या विचारदळिद्री लोकांना माहिती नसतं. असो.
पण खरंच औरंगाबाद घटनापीठाने रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु नाहीत असा ‘निकाल’ दिला आहे का? शिव-समर्थांचा एकत्रीत फोटो टाकल्यास खरंच कारवाई होऊ शकते का?
#Thread: शनिवारी काही कामानिमित्त रत्नागिरीला जाण्याचा योग आला. पुण्याहून प्रस्थान करण्याच्या आधीच ठरवले होते की काहीही झाले तरी दोन ठिकाणी जाऊन डोकं ठेवून यायचं.
रत्नागिरी - या शहराचे २० व्या व २१ व्या शतकातील भारताच्या राजकाराणावर तसेच समाजकारणावर अनेक उपकार आहेत.
१/१२
होय. कारण रत्नागिरी ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जन्मभूमि आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जात्युच्छेदक कार्याची समरभूमि.
२३ जुलै, १८५६ रोजी आजच्या टिळक आळीतील या वाड्यात जन्माला आलेला केशव गंगाधर टिळक पुढे जाऊन तत्कालीन भारताच्या…
२/१२
राजकारणातील सर्वोच्च नेता होईल असा कोणी विचार तरी केला असेल का? पण स्वकर्तृत्वाच्या व बुद्धिमतेच्या जोरावर केशव तथा बाळ ‘लोकमान्य’ झाले!
गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या भारतीयांना भारतीयत्वाची जाणीव करुन देऊन पुन्हा एकदा स्वराज्याची आठवण लोकमान्य टिळकांनी करुन दिली.
#Thread: छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी ही कुठे ही मशीद बांधली नाही!
राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर कधी थांबेल कोणासठाऊक. दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे महाराजांच्या अद्वितीय इतिहासाचे विकृतीकरण महाराष्ट्रात होत आहे.
गंगाधर यशवंत आणि राघोबादादा यांचे कारस्थान - ही मालेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या सत्तासंघर्षाची एक बाजू आहे.
नेहमीप्रमाणे, नाण्याची एकंच बाजू दाखवून काँग्रेस च्या चमच्याने त्याचे काम चोख बजावले आहे.
पण इतरांना दुसरी बाजू कळणे गरजेचे आहे.
२/७
गंगोबा तात्या चंद्रचूड आणि राघोबादादा यांचे कारस्थान रंग घेत असताना अहिल्याबाईंनी मराठ्यांचे तत्कालीन पंतप्रधान (पेशवे) थोरले माधवराव यांना पत्रव्यवहाराद्वारे सगळी हकीकत कळवली.
माधवरावांसारख्या करारी राज्यकर्त्याने स्वराज्यहितापुढे आपल्या सख्ख्या काकाला ही सोडले नाही.
अभ्यासपूर्ण लेख लिहीण्याचा प्रयत्न केलास पण गर्वाने “सत्य उशिरा येत पण पद्धतशीर घोडा लावून जात” - ही टिप्पणी करुन स्वतःचा विचारदळिद्रीपणा सिद्ध करायला विसरला नाहीस.
असो, बघ आता ‘घोडे कसे लागतात ते’😋
आणि हो, #Thread: छत्रपती शिवाजी महाराज हे ‘गोब्राह्मणप्रतिपालकंच’!
यंदाच्या गणेशोत्सवाची एक वेगळीच मजा होता. एक वेगळाच उत्साह होता. पाऊसातही तो उत्साह काही कमी झाला नाही. पाऊसातल्या गर्दीत ही श्रींना माझ्या कॅमेरात टिपण्याचा मोह काही मी आवरु शकलो नाही. त्यातील काही छायाचित्रे या थ्रेडमध्ये टाकत आहे.
१/१०
मानाचा पहिला - श्री कसबा गणपती
पुण्याचे ग्रामदैवत ज्याची स्थापना दस्तुरखुद्द हिंदुराष्ट्रमाता जिजाऊसाहेबांनी केली होती.
२/१०
मानाचा दुसरा - श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या बाहेर विराजमान झालेला हा गणपती मला वयक्तिकरित्या सगळ्यात आवडतो.