संस्कार ठेवा रे 😡
अजित पवार आज म्हणाले ही महाराष्ट्र ची भाषा नाही पण हे तितके खरे नाही .खरे तर शिवराळ भाषा राजकारणात आणण्याचे श्रेय सेने कडे जाते .भुजबळांना मैद्याचे पोते ,पवारांना बारामती चा मल्ल , ही उपाधी बाळासाहेब यांनीच दिली .मागे फडणीस यांचा वारु मोकाट उधळत होता तेव्हा
छगन उठ कमळ बघ ,शरद कमळ घे असे हलके वक्तव्य करून हा वारसा सुरू केला .आज राणे न चे पोर म्हणतात हे भाडखाऊ सरकार आहे .ही भाषा नाही हे संस्कार आहेत.जनाब सेना ,सोनिया सेना ,जितृदिन आव्हाड, संघोट्या , टरबूज ,चम्पा , बोबड्या , फावड्या , पेंग्विन , धरण मुत्र्या, बेडूक .अरे काय लावलय काय
इतकीच खुमखुमी आहे ते सरळ आई बहिणीवरून शिव्या चालू करा ना .शिव्या पेक्षा ही खालची पातळी राजाकारण्यांनी धरली आहे,त्यात सर्व पक्षीय महिला पदाधिकारी पण चौखूर उधळल्या आहेत.मुख्य म्हणजे महिलांच्या अशा वक्तव्ये किंवा ट्विट ला हजारो लाईक करणारे त्यांचे चाहते आहेत. संजय राऊत यांनी शायरी
केली की तिकडून हंमसफर ,दिल, चाहत ,बेगूनाह अशी शब्दांची भेंडोळी फेकली जाते.राऊत च्या अंगात गालिब घुसला की तिकडे अंगात फिराक गोरखपूरी घुसलाच समजा 😩.पूर्वी ही विरोध होता आरोप प्रत्यारोप होते वादविवाद होते पण भाषणात किंवा बोलण्यात विटाळ असलेले शब्द वापरात नव्हते .खुमासदार शाब्दिक
कोट्या वापरून समोरच्या ला टोमणे मारले जात आणि ज्याला शब्दांचा फटकारा मारला जात असे तो ही मनमुरादपणे हसून दादा देत असे .पूर्वी शरद पवार बाळासाहेब ठाकरे , विलासराव गोपीनाथ मुंडे , आताच्या काळात जयंतराव पाटील नितीन गडकरी हे राजकारणी खुमासदार शैली करता फेमस आहेत.खरे सांगायचे म्हणजे
राजकारणातले सोवळे व्यक्तित्व असणारे राजकारणी संपले आणि चालण्या बोलण्याचा वागण्याचा ताल आणि तोल संपत गेला ..दिलदार विरोधक असणारे राजकारणी आता दुर्लभ झालेत .सगळे बेचव झालेत .आता उरले अरे ला कारे करणारे .😩
ए भाडखाऊ 😡
ए भडवीच्या 😡
संस्कार ठेवा रे 🙏 .
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अलबेला 🌹
भगवान आबाजी पालव जन्म 1 ऑगस्ट 1913 अमरावती .वाचतांना किती साधे सरळ नाव वाटते ना ? दादर मध्ये वडील गिरणी कामगार म्हणून काम करत होते म्हणून यांचे बालपण पण मुंबईतच गेले .मध्यमवर्गीय कुटुंबातला हा आहे पहिला मराठी आणि हिंदी महानायक.हा होता 'शापित गंधर्व " प्रतिभेचे दान जरी
ईश्वराने पदरात टाकले तरी प्रारब्ध किंवा हाताच्या रेषांचे जाळे तुम्हाला त्यांनी आखून दिलेल्या रिंगणाबाहेर जाऊ देत नाही .भगवान दादा चे पण रिंगण वरतून आखून दिले होते दादर ची चाळ, चाळीतून जुहू चा समुद्र काठचा 20 खोल्यांचा बंगला ,आलिशान 8 दहा मोटारी उत्तुंग यश अमाप पैसा ,प्रसिद्धी
मग अपयश, घर दार गाड्या पैसा सर्व गायब आणि परत दादरची चाळ .लहानपणा पासून चित्रपटाची आवड वडील गिरणीत गेले की दादा परळ च्या स्टुडियोत चक्कर मारणार. एक मुकपट करून झाला ,दादा ला दिग्दर्शन करायची आवड एक दोन चित्रपट ही काढून झालेले.1951 मध्ये दादांनी बनवलेल्या "अलबेला " ने आयुष्याला
घरोघरी चे आहारतज्ञ 😩
काल प्रफुल ने केलेल्या ट्विट वरून जे मनात आहे ते लिहितोय .शब्दशः उच्छाद घातलाय या घरोघरी च्या आहारतज्ञ जमाती ने .आणि ही जमात सगळ्यांच्या घरी असते .शिक्षित अडाणी हुशार मठ्ठ गरीब श्रीमंत सगळीकडे ही जमात पावसाळ्यातील भुछत्र सारखी उगवली आहे.मुख्य म्हणजे
आपले तोकडे ज्ञान इतरांना सांगताना ते किंचित ही लाजत नाही 😱.आता या जमातीचे बोल वाचा माझे एक जवळचे संबंधित आहे त्यांच्या कडे पाच लोक मिळून अर्धा किलो तेल महिनाभर पुरते आम्ही तेल खातच नाही म्हणे, जपान मध्ये उकडलेले अन्न खातात म्हणून 100 वर्ष आरामात जगतात आम्ही उकडलेलं खातो 😩 एकदा
घरी दोस्त आला मी सफरचंद सोलून काप करून त्याला खायला दिले .साल फेकू नये खरे सत्व त्यातच असते तू चुकीच्या पद्धतीने सफरचंद खातो आहे म्हणाला.😩कोणाकडे जेवायला गेले की विचारणार भात वाढू ना शुगर आहे म्हणून विचारतो आहे 😩 अरे वाढ 😡 वरण भाता शिवाय जेवण आहे का ? चहा चे पण तेच साखर टाकू ?
स्वयंप्रकाशीत व्हा 🌹🙏
प्रीतम वय 38 ,पंकजा वय 42 तसे पाहिले तर राजकारणात आल्यात तेव्हा 30 आणि 35 च्या असतील.गोपीनाथ मुंडे हे फक्त मराठवाडा पुरते लाडके व्यक्तित्व नव्हते तर उभा महाराष्ट्रात त्यांचे चाहते होते .आज मुंडे साहेबांन वर लिहिण्याचे काही प्रयोजन नाही विषय मुंडे
साहेबांचा नाही तर त्यांच्या मुलींचा आहे म्हणून त्यांची आठवण काढणे जरुरी आहे.आज जे काही या दोघीना मिळाले आहे म्हणजे प्रीतम ला दोन वेळा लोकसभा आणि पंकजा ला एकदा आमदार पद ते फक्त आणि फक्त मुंडे साहेबांना मरणोत्तर दिलेला सन्मान आहे तो मराठवाडा च्या लोकांनी आणि भाजपा या दोघांनी दिला
आहे.प्रीतम च्या पारड्यात 6 लाख असे विक्रमी मतदान हे मुंडे साहेबांन वरचे प्रेम आणि माया आहे .यात प्रीतम आणि पंकजा यांचा खारीचा वाटा आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही.पंकजा आक्रमक स्वभावाची आहे ती म्हणते मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे त्याची जाणीव गोपीनाथ गडावरच्या भव्य गर्दी
हॅट्स ऑफ टू यू
दाद्दया त्यागी 🔥🔥🔥🔥
नारायण तातू राणे
काल राणे नि शपथ घेतली आणी रथी महारथी मुत्सद्दी ,हुद्र्य सम्राट , जाणते राजे , साधे राजे , टगे,सगे ,सोयरे सगळ्यानी तोंडात बोट नाही तर पाची बोटे घातलीत.राणे कोणत्याही पक्ष्यात गेले तरी राणे नि स्वतः च्या विचारसरणी त फार
बदल घडून आणला नाही.खरे तर सेने बरोबर पंगा घेणे तर ते पण बाळासाहेब असतांना हाच राणे न चा धमाका होता.मग काँग्रेस प्रवेश पण काँग्रेस म्हणजे प्रत्येक घोंगडे भिजत घालून सावलीत वाळत टाकणारे लोक.त्यात पृथ्वी राज बाबा, अधोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे एकाहून एक अडथळे पार पाडण्या पेक्षा
राणे नि स्वाभिमानी हा पक्ष काढला वास्तविक स्वाभिमान या शब्दाचा दूरदूर संबंध आपल्या राजकीय जीवनात त्यांनी ठेवला नाही.दस्तुरखुद्द राणे ना कधी कुठल्या पक्षात आपण जाऊ आणि सोडू याची खात्री तमा आणि पर्वा नसायची.कोकणी माणूस वरतून काटेरी आणि आतून फणसा सारखा गोड याला राणे नि तिलांजली
राहू दे खर्च पाण्याला
दिलदार बाप 🌹🙏
फक्त EBC च्या फॉर्म वर पालका चा व्यवसाय म्हणून लिहिणाऱ्या जागेत पालक -शेती म्हणून लिहायचो तेवढीच शेती नावावर होती.वडिल मूर्तिकार ,पेंटर , चित्रकलेचे क्लासेस घायचे .इतर ही काम करायचे खास असे नियमित उत्पन्न नसायचे पण एकत्र कुटूंबात निभावून
जायचे. वडील थोडीशी घेत असत पण कधी घरी तमाशा किंवा गोंधळ कधीच करत नव्हते . इतर वेळी तुझे सर भेटले होते काल गणित कच्चे आहे म्हणत होते / शर्टवर शाई कोण फेकते रे तुझ्या ?/ पुस्तके फाटतात कशी तुझी 😡 इतक्या लवकर वही संपली ? पाऊस चालू तर जा ना विरघळणार आहे का पाण्यात ? हजारो प्रश्न
आणि मी कातवलेला .,शक्यतो बापा पासून लांबच राहायचो.पण पिऊन आलेले वडील पाहिले की मी एकदम मोकळा रिलॅक्स व्हायचो न पिलेला बाप म्हणजे गरम पाण्याचा बंब आणि पोटात गेलेली असली की बापा सारखा "गोड्या पाण्याचा झरा " दुसरा कुठेच नाही .इतर वेळी कमी खा शाळेत झोप येईल म्हणणारा बाप अचानक
दिलीप कुमार 🌹
1945 ते 1970 पर्यंत या तिघांनी हिंदी चित्रपट सृष्टी झाकोळून टाकली होती गोबऱ्या गुलाबी गालांचा नायिकेला लुभवणारा राज / थोडी मान वाकडी करून नायिकेच्या मागे धावणारा देव आणि तिसरा नायिकेच्या आकंठ प्रेमात पडून ग्लासात डुंबणारा दिलीप कुमार म्हणजे आपला ट्रेजीडी किंग
एक पिढी आज संपली.मधुमती ,मुगले आझम, गोपी, नया दौर ,हे तर ब्लॅक अँड व्हाइट च्या काळचे होते पण आज च्या पिढी ने मशाल ,शक्ती ,सौदागर , विधाता हे चित्रपट पाहिले असतीलच .मला भावलेला दिलीप म्हणजे गोपी मधला गळ्यात उपरणे आणि कपाळावर गंध लावून सुख के सब साथी दुःख मे ना कोई म्हणणारा गोपी.
त्याच्या अभिनया ची भुरळ इतकी पडलेली की दिलीप कुमार चे नाव युसूफ खान आहे हे विसरून च एक पिढी वयस्कर झाली.दिलीप चे वय 44 तर सायरा 22 ची त्यांचे सहजीवन एकूण 56 वर्षांचे 🌹 हे प्रेम घेऊन आज सकाळी साडेसात वाजेपर्यंत सायरा सावली सारखी दिलीप कुमार च्या सोबत सेवा करत राहिली