फ्रॉड करणाऱ्या लोकांचा एक वेगळाच स्वॅग असतो. यांची काही वैशिष्ट्य.
1. ही लोकं प्रचंड आत्मविश्वासानं डोळ्यात डोळं घालून खोटं बोलतात आणि ते अगदी सहज. 2. फेकायच्या बाबतीत जगातले सारे विक्रम मोडीत काढायची क्षमता यांच्यात असते.
(1)👇
यात घरं, गाड्या, पार्टनर्शीपसह बड्या बड्या ओळखी वगैरे प्रामुख्याने. बरं समोरच्याला माहीत असलं तरीही हे तीव्र पद्धतीनं फेकण्याची कला ढिल्ली सोडत नाहीत. 3. राहणीमान एकदम क्लास. म्हणजे घरात दरिद्री असली तरी सोशल मीडियात किंवा कुणाला भेटायचं असल्यास तरी प्रचंड काळजी घेतात.
(2)👇
4. महागडं वर्तन जगाला दाखवत राहायचं. त्यात, गाडी, मोबाईल, विमान आणि क्लासिक फोटोज अतिमहत्वाचं. 5. ही लोकं त्यांचा फ्रॉड सापडेपर्यंत समाजासाठी फारच ग्रेट वगैरे असतात. म्हणजे सामाजिक कार्यकर्ते, किंग ऑफ हर्ट, बादशाह, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस वगैरे वगैरे.
(3)👇
जसं मांजरीला वाटतं आपण दूध चोरून पितोय पण बघत नाहीत तसं यांचं असतं.पण हे जास्त काळ टिकत नाही. कधीतरी क्षुल्लक गोष्टीत सापडतात आणि बांबू बसतोच. क्षणात सगळं धुळीस मिळतं त्यावेळी अशांच्या सोबतही कुणी नसतं. सोशल मीडिया आहे आज. इथं उठलेला बाजार तुम्हाला कधीच उबदारी येऊ देत नाही.
(4)👇
मित्रांनो, कष्टाला पर्याय नाही. कष्टाचं इवलेसे सुखही प्रचंड आनंददायी असतंय. एखाद्याची फसवणूक करून, बड्या बड्या बाता हाणून मिळवलेल्या गोष्टी तुम्हाला क्षणिक सुख देतीलही पण ते सुख पर्मनंट कधीच नसतं.
(5)👇
असो, आपण अशा लोकांपासून सावध राहा. कुणाच्याही रेफरन्सने किंवा एखादा बोलतोय म्हणून कुणावर विश्वास ठेवू नका. सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर 'भारी' वाटतो, टीमक्या मारतो, म्हणून अशा माणसांवर अजिबातच विश्वास ठेवू नका.
(6)👇
निळू फुले या नावाची, व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख करून द्यायची खरंतर गरज नाहीच. आजही खेड्यांमध्ये पन्नास ते नव्वदच्या दशकातील बायकांना निळू फुलेंबद्दल विचारलं तर त्या नाक मुरडतात, शिव्या देतात. प्रत्यक्ष आयुष्यात 'हिरो' असलेल्या निळूभाऊंच्या कामाची ही पावतीच.
(1)👇 #niluphule
आपल्याकडे सरसकट 'बाई वाड्यावर या' हा डायलॉग म्हणजे निळू फुले असं समीकरण लोकांनी करून टाकलंय आणि कॉमेडी शोमध्ये लोक त्याच्याशी संबंधित फालतू विनोदांवर टाळ्याही वाजवतात हे दुर्दैव आहे.
आपणच आपल्या एका महान कलाकाराला किती खाली आणतोय याची त्यांना कल्पनाही नसते. (2)
👇
बाई वाड्यावर या या डायलॉगच्या पलीकडे निळूभाऊ ९९% शिल्लक राहतात आणि ते जाणून, समजून घेतले तर हा माणूस किती मोठा होता हे लक्षात येतं.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या 'समता संगर' नावाच्या पुस्तकात निळूभाऊंच्या भन्नाट आठवणी सांगितल्यात. (3)
👇
कृपया हा थ्रेड नीट वाचावा.
हा माणूस आपल्यासारखं घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा नाही. 'अमक्या कार्यकर्त्यांनी धारावी कोरोनामुक्त केली, तमक्या साहेबांनी दौरे झोडले, दमक्या भाऊंनी ह्यांव केलं' अशा गोष्टी घरात बसून फॉरवर्ड करणाऱ्या लोकांनी ही त्यांनी मांडलेली गरज लक्षात घ्यावी.
नाहीतर प्रेतं पुरायला, जाळायला जागा शिल्लक राहायची नाही. देव, अल्लाह, जीजस वगैरे सर्वव्यापी आहेत ना, मग त्यांनी निर्मिलेल्या या विश्वात महामारी येतेच कशाला? आणि आली तरी हे सगळे कुठं गेलेत?
कुणाच्याही धार्मिक भावनेला ठेस पोहोचवायची नाहीये, मंगेश दादाच्या मताशी पूर्ण सहमत आहे.
तुम्ही हजार देवळं, मशिदी, चर्च बांधा, पण त्या देवळात, मशिदीत जायला माणसं राहावीत यासाठी दवाखाने, दवाखान्यांच्या सोयीसुविधा ह्या गोष्टींना आधी प्राथमिकता दिलीच पाहिजे.