निळू फुले या नावाची, व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख करून द्यायची खरंतर गरज नाहीच. आजही खेड्यांमध्ये पन्नास ते नव्वदच्या दशकातील बायकांना निळू फुलेंबद्दल विचारलं तर त्या नाक मुरडतात, शिव्या देतात. प्रत्यक्ष आयुष्यात 'हिरो' असलेल्या निळूभाऊंच्या कामाची ही पावतीच.
(1)👇 #niluphule
आपल्याकडे सरसकट 'बाई वाड्यावर या' हा डायलॉग म्हणजे निळू फुले असं समीकरण लोकांनी करून टाकलंय आणि कॉमेडी शोमध्ये लोक त्याच्याशी संबंधित फालतू विनोदांवर टाळ्याही वाजवतात हे दुर्दैव आहे.
आपणच आपल्या एका महान कलाकाराला किती खाली आणतोय याची त्यांना कल्पनाही नसते. (2)
👇
बाई वाड्यावर या या डायलॉगच्या पलीकडे निळूभाऊ ९९% शिल्लक राहतात आणि ते जाणून, समजून घेतले तर हा माणूस किती मोठा होता हे लक्षात येतं.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या 'समता संगर' नावाच्या पुस्तकात निळूभाऊंच्या भन्नाट आठवणी सांगितल्यात. (3)
👇
दाभोलकर यांनी लिहिलंय कि, मोठे कलाकार म्हणजे प्रत्येकाचेच ‘इगो’. नाटक असलेल्या ठिकाणी प्रत्येकालाच उत्तम दर्जाची स्वतंत्र वातानुकूलित खोली हवी असे. स्वाभाविकच खोलीवाटपात डावे-उजवे होई. दौऱ्याच्या अगदी सुरुवातीलाच ही राजी-नाराजी सुरू झाली. (4)
👇
याचे उत्तर काढणे माझ्या कुवतीच्या पलीकडचे होते. निळूभाऊंना हे कळले. त्यांनी एकदम अनोखा मार्ग काढला. त्यांनी सांगितले, ‘सगळ्यांत गैरसोईची खोली मला देत चला.’ त्यानंतर इतरांचे आवाज आपोआपच बंद झाले. (5)
👇
कोल्हापूर दौऱ्यात निळूभाऊंचे हॉटेल आणि त्यातील खोली आरक्षित असे. नाटक चालणार निळूभाऊंच्या नावावर त्यामुळं ही व्यवस्था उत्कृष्ट असणे ओघानेच आले. एके दिवशी निळूभाऊंना समजले की, आपल्या एका बॅकस्टेज वर्करचे नुकतेच लग्न झालंय आणि त्याची पत्नी त्याच्यासोबत आहे. (6)
निळूभाऊंनी काय करावे? त्यांनी आपली खोली त्या बॅकस्टेज वर्करला दिली. हॉटेलच्या अन्य खोल्या भरलेल्या होत्या. तेव्हा स्वतःची गादी त्यांनी टेरेसवर टाकायला सांगितली. मराठी सिनेमात त्यांच्या पुढारीछापाच्या आवृत्याच निर्मात्यांनी काढल्या. (7)👇
पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून निळूभाऊंनी त्याला संमती दिली. पण त्यातील पोकळपणा त्यांना पुरा माहीत होता. त्यांनी जवळपास 175 सिनेमात भूमिका केल्या. मात्र त्यातील 10-15 चित्रपट देखील त्यांनी बघितले नाहीत. हे त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळे. (8)👇
यांपैकी 100 हुन अधिक चित्रपटांतील भूमिकेत त्यांनी बलात्कार केले. 'त्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून चळवळीत येतो' असं निळूभाऊ अनेकदा गमतीने सांगायचे. एका चाहत्याच्या घरी गेल्यावर त्याच्या आईने त्यांना बघितल्यावर 'अगं बाई, या मुडद्याला कशाला घरी बोलावलं?' अशी मुक्ताफळे उधळली. (9) 👇
हे आणि असे किस्से निळूभाऊंच्या तोंडुनच ऐकण्यासारखे असायचे, असं दाभोलकर यांनी लिहिलंय.
खरोखर, कलाकार म्हणून निळूभाऊ ग्रेट होतेच पण माणूस म्हणून ते त्याहून महान होते.
या सच्चा आणि खराखुरा 'हिरो असलेल्या नटाला विनम्र अभिवादन. #निळूफुले#NiluPhule
🙏 #म#मराठी
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
कृपया हा थ्रेड नीट वाचावा.
हा माणूस आपल्यासारखं घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा नाही. 'अमक्या कार्यकर्त्यांनी धारावी कोरोनामुक्त केली, तमक्या साहेबांनी दौरे झोडले, दमक्या भाऊंनी ह्यांव केलं' अशा गोष्टी घरात बसून फॉरवर्ड करणाऱ्या लोकांनी ही त्यांनी मांडलेली गरज लक्षात घ्यावी.
नाहीतर प्रेतं पुरायला, जाळायला जागा शिल्लक राहायची नाही. देव, अल्लाह, जीजस वगैरे सर्वव्यापी आहेत ना, मग त्यांनी निर्मिलेल्या या विश्वात महामारी येतेच कशाला? आणि आली तरी हे सगळे कुठं गेलेत?
कुणाच्याही धार्मिक भावनेला ठेस पोहोचवायची नाहीये, मंगेश दादाच्या मताशी पूर्ण सहमत आहे.
तुम्ही हजार देवळं, मशिदी, चर्च बांधा, पण त्या देवळात, मशिदीत जायला माणसं राहावीत यासाठी दवाखाने, दवाखान्यांच्या सोयीसुविधा ह्या गोष्टींना आधी प्राथमिकता दिलीच पाहिजे.