७ ऑगस्ट २०२१ रोजी टोकियो ऑलम्पिक मधे सुभेदार नीरज चोप्रा ने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून भारताला ऑलम्पिक च्या इतिहासात मैदानी खेळात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. १२१ वर्ष
एक स्वप्न जे भारतीयांनी आणि भारताचे दिग्गज मैदानी खेळाडू मिल्खा सिंग आणि पी.टी. उषा यांनी बघितलेलं होतं ते काल प्रत्यक्षात साकार झालं. नीरज ने त्या स्वप्नांचा मान ठेवताना आपलं पदक स्वर्गीय मिल्खा सिंग यांना समर्पित असल्याचं सांगून एक
आदरांजली भारताच्या एका सर्वश्रेष्ठ खेळाडूला वाहिली. कालच त्याच यश किती महत्वाचं आहे असेल याचा अंदाज कदाचित पी.टी.उषा यांना आला असेल ज्याचं पदक १९८४ च्या लॉस अँजेलिस ऑलम्पिक मधे अक्षरशः १ शतांश सेकंदांनी हुकलं होतं. त्या क्षणापासून गेल्या ३५ वर्षापेक्षा जास्त काळात त्या स्वतः आणि
भारतीय नागरिक ऑलम्पिक पदकाचं एक स्वप्न बघत होते ज्याची पूर्तता काल नीरज ने आपल्या भाल्या ने केली. नक्कीच ही वेळ आनंद साजरा करायची आहे. नक्कीच ही वेळ नीरज च्या कामगिरीचं कौतुक करण्याची आहे. पण त्याच वेळी ही वेळ त्या भाल्याचा प्रवास समजून घेण्याची सुद्धा आहे.
नीरज चोप्रा च्या भाल्याचा हा प्रवास सुरु होतो हरयाणा राज्यातील पानिपत जवळ असणाऱ्या खंडारा या गावापासून. साधारण ५०० लोकवस्ती असणाऱ्या या गावात नीरज च बालपण गेलं. अवघ्या १२ व्या वर्षी नीरज च वजन ९० किलोग्रॅम इतकं आभाळाला टेकलं होतं. त्याच्या स्थूलतेमुळे तो
गावातील चेष्टेचा विषय बनत चालला होता आणि हेच कुठेतरी त्याच्या आई-वडिलांना खटकत होतं. त्यांनी छोट्या नीरज ला जिम मधे जाऊन व्यायाम करून वजन कमी करण्याचा सल्ला दिला. पण अवघी ५०० लोकवस्ती असणाऱ्या गावात कुठून आली जिम? नीरज जिम साठी ६ किलोमीटर लांब जिम मधे जायला लागला. तिकडेही आपल्या
अवाढव्य वजनामुळे त्याची चेष्टा झाली आणि वजन कमी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि वजने ही त्याला मिळत नव्हती. शेवटी कुटुंबाने त्याला स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या पानिपत इथल्या सेंटर मधे जायला सांगितलं. इकडेच त्याची ओळख भाला फेक शिकवणाऱ्या जयवीर सिंग यांच्याशी झाली.
कोणतंही प्रशिक्षण नसताना नीरज ने ४० मीटर भाला फेकून जयवीर सिंग यांच्यावर आपल्यातील प्रतिभेचा ठसा उमटवला. तिकडेच सुरु झाला एका भल्याचा प्रवास....
नीरज ने मग मागे वळून बघितलं नाही. आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीवर त्याने मेहनत घ्यायला सुरवात
केली आणि भाला फेक या खेळाचे प्राथमिक धडे घ्यायला सुरवात केली. २०१६ मधे पोलंड इकडे झालेल्या अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक पटकावलं आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा तारा उदयास येत असल्याची वर्दी दिली. त्याच वर्षी साऊथ एशियन स्पर्धेत सुवर्ण पदक त्याने
पटकावलं. १५ मे २०१६ रोजी त्याने भारतीय सेनेत प्रवेश केला. २०१७ साली एशियन एथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्ण पदकाला गवसणी घातली. नीरज ने जागतिक मंचावर आपल्या येण्याची वर्दी दिली. नोव्हेंबर २०१७ मधे भारत सरकारने भाला फेक स्पर्धेत उदयोन्मुख खेळाडूंसाठी
२०२० साली होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेच महत्व लक्षात घेऊन त्यांना जागतिक दर्जाचे कोच नेमण्याच ठरवलं. त्यांच नाव होतं 'उवे हान'.
'उवे हान' हे नाव भाला फेक स्पर्धेत अतिशय मानाने घेतलं जाते. जर्मन असणाऱ्या हान नी या खेळात
असा पराक्रम गाजवला आहे जो आजवर कोणालाही गाठता आलेला नाही. २० जुलै १९८४ रोजी हान यांनी तब्बल १०४.८० मीटर लांब भाला फेकून जागतिक विक्रम केलेला आहे जो कोणालाही आजवर मोडता आलेला नाही. किंबहुना जगाच्या पाठीवर १०० मीटर पेक्षा जास्त दूरवर भाला फेक
करणारा अजून दुसरा कोणताही खेळाडू नाही. त्यामुळेच अश्या दिग्गज खेळाडू ची कोच म्हणून भारतीय सरकारने ३ वर्षासाठी नेमणूक केली. नीरज चोप्रा च्या यशाचा आलेख हान यांच्या हाताखाली अतिशय वेगाने वाढला. नीरज सोबत अन्नू राणी, शिवपाल सिंग, रोहित यादव या सर्व खेळाडूंच्या
कामगिरीत फरक पडला. नीरज ने २०१८ च्या एशियन आणि कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. पण कदाचित जे भारतीय क्रिकेट संघाच्या बाबतीत ग्रेग चॅपल हे प्रकरण घडलं अगदी तसेच हान यांच्या बाबतीत घडलं. २०२० मधे त्यांचा करार संपता संपता हान आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ
इंडिया चे वाद चव्हाट्यावर आले. मानधना वरून हान यांनी भारताच्या एकूणच सिस्टीम बद्दल नापसंती व्यक्त केली तसेच खेळाडूंना योग्य मदत मिळत नसल्याचं उघडपणे स्पष्ट केलं तर तिकडे त्यांच्या हाताखाली तयार होणाऱ्या खेळाडूंनी हान हे पैश्यासाठी कोरोना काळात विदेशी खेळाडूंना
शिकवत असल्याचं तसेच आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं स्पष्ट केलं. नीरज ने ही याबाबतीत ट्विट करत भारत सरकारची बाजू उचलून धरली. हान यांनी ऑलम्पिक स्पर्धेच्या आधी नीरज वर झालेल्या खांद्याच्या शस्त्रक्रियेवर ही तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तर तिकडे नीरज ने यामुळे आपल्या खांद्याला
जीवनदान मिळाल्याचं म्हंटल होतं. या वादात कोण बरोबर कोण चुकीचं यात मला जायचं नाही. पण एकूणच या सर्व गोष्टींचा परीणाम नीरज चोप्रा सारख्या खेळाडूंच्या खेळावर होणं हे अपेक्षित होतं.
अंत्यंत महत्वाच्या शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर सुद्धा नीरज ने आपल्या ऑलम्पिक तयारीकडे लक्ष केंद्रित
केलं. कोच आणि फेडरेशन च्या वादात न पडता त्याने शांतपणे जे त्याला हान यांच्याकडून शिकायला मिळालं त्यावर मेहनत घ्यायला सुरवात केली. भाला फेक स्पर्धेत सगळ्यात महत्वाचं असते ते भाला ज्या कोनातून फेकला जातो आणि त्याला जास्तीत जास्त वेग मिळण्यासाठी शरीराच्या वजनाचा भार सुद्धा
आपल्या फेकीला द्यावा लागतो. इकडेच मला वाटते नीरज ने ऑलम्पिक स्पर्धेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मात दिली. नीरज ने अंतिम फेरीत जे पहिले दोन्ही भाला फेक ८७ मीटर च्या पुढे केले. त्या वेळेस त्याने उडी मारून आपल्या संपूर्ण शरीराचा भार खांद्यातून आपल्या भाल्या पर्यंत पोहचवला. जे
१-२ मीटर जास्ती त्याच्या भाल्याने गाठलं त्यामागे निर्णायक भूमिका ही त्याच्या भाला फेकीत होती.
जर आपण नीरज चा दुसरा थ्रो पुन्हा एकदा बघितला तर नीरज ने भाला किती अंतर गाठतो आहे याचा विचार न करता आपण आपली कामगिरी फत्ते केली
आहे या विश्वासाने मागे वळून दोन्ही हात उंचावून आनंद व्यक्त केला होता. हा आत्मविश्वास एखाद्या खेळाडूच्या मनात तेव्हाच असतो जेव्हा त्याला त्याच्या क्षमतेची संपूर्ण कल्पना असते. त्यामुळेच जेव्हा पडद्यावर ८७.५८ मीटर चा आकडा दिसला तेव्हा नीरज ला हे कळून चुकलं होतं की पदकावर
आपलं नाव कोरलं आहे आता फक्त त्याचा रंग निश्चित व्हायचा आहे. नीरज च्या सोबत वेटर च्या रूपात तगडा प्रतिस्पर्धी होता. ज्याने कित्येक वेळा लिलया ९० मीटर च्या पुढे भाला फेक केलेली होती. पण अंतिम सामन्यात त्याची लय चुकली आणि भारताच १२१ वर्षाच स्वप्न प्रत्यक्षात उतरलं.
आज सुभेदार नीरज चोप्रा ने सुवर्ण पदक जिंकल्यावर त्याच श्रेय घेण्यासाठी अनेक दावेदार पुढे येतील. पण ज्यांनी हा भाल्याचा प्रवास केला आहे तेच त्याचे खरे हकदार आहेत. अगदी त्याचे पहिले कोच जयवीर सिंग ते हान आणि त्याच्या खांद्याची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि त्याचे इतर कोच या सोबत
त्यांचे कुटुंबीय आणि भारत सरकार. कारण प्रत्येकाने थोडा थोडा वाटा त्याच्या यशात उचललेला आहे. सगळ्यात जास्ती श्रेय नक्कीच सुभेदार नीरज चोप्रा च आहे ज्याने एका शतकापेक्षा जास्ती वेळ भारतीयांनी बघितलेल्या स्वप्नांला मूर्त स्वरूप दिलं आहे. त्याचा हा भाल्याचा प्रवास अनेक भारतीय
खेळाडूंना आणि तरुणांना प्रोत्साहन देणारा असेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. त्याच्या अविस्मरणीय कामगिरीला माझा कडक सॅल्यूट. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
थर्ड क्लास सिनेमांनी मला अनेक दर्जेदार लेखकांशी ओळख करून दिली. झटपट वाचा आणि लोटपोट व्हा !!!
***
तर मंडळी....
.
.
व्हिएफएक्स नं तरूण केलेलं एक अजय देवगण असतंय.
आणि व्हिएफएक्स च्या बी पाक पलीकडं गेलेलं संजय दत्त असतंय.
संजय दत्त पीके पिक्चरमधल्या गेटअप मधे असतंय.
तेच्या कडं एक कापाकापी करणारी कुऱ्हाड असत्या.
त्या कुऱ्हाडीनं ते लाकडं सोडून माणसं कापत असतंय ती बी समदी शत्रूची.
तेजं कामच असतंय ते.
अजय देवगण भुज एअरपोर्ट चं प्रमुख सरदार असतंय.
आणि तरी बी पाकिस्तान ची विमानं आली की ओम्नीच्या पत्र्यापासनं तयार केलेल्या विमानभेदी तोफेवर चढून विमानं उडवायचं काम तेला असतंय.
सात आठ विमानं आली तरी ते एक किंवा दोनच उडवत असतंय.
त्या गणेश मुर्ती विक्रीच्या स्टॉलमधे 'तो' आज सातव्यांदा आला होता. जुनाटसा, कोणत्या तरी मंडळाचा, कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता.
दरवेळी तो यायचा..त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या, तिथे तो जायचा... बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरुन पहायचा, मग किंमत विचारायचा...
'कितना को..दिया..गणेशजी?'
दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा
'अंकल...साडे छहसो रुपये...
सीक्स हंड्रेड फिप्टी. दे दूं..?' तिच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी..
'अय्यो....ईतना..?' असे स्वतःशीच म्हणायचा..खिशात हात घालून काही तरी चाचपायचा, व पुन्हा एकदा त्या गणेश मुर्तींकडे डोळे भरुन पाहून, उदासपणे बाहेर पडायचा.
कालपासून एक बातमी तुमच्या माथी मारली जात आहे. मोदी सरकारने मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारला. प्रॉव्हिडंट फंडातील गुंतवणुकीवरीलव्याज करपात्र.
ही बातमी खोडसाळ आहे.अर्धसत्य आहे जे तुमची दिशाभूल होईल अशा प्रकारे सांगितले जात आहे.
सत्य परिस्थिती अशी आहे
१ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
कोणत्याही व्यक्तीच्या (२०२१-२२ पासून )आर्थिक वर्षांतील प्रॉव्हिडंट फंडातील अडीच लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीवरील व्याजावर कर द्यावा लागेल.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ लाख रुपये मर्यादा आहे.
2 spt च्या मध्यरात्री सर्व राक्षस लोकांची Emergency मिटींग झाली आणि आपल्यातला एक जण पृथ्वीवर जाणार असं ठराव संमत झाला.
मग काय ३ सप्टेबर ला पृथ्वीवर विजेचा⛈⛈कडकडाट झाला, सुनामीआली ,१० १२ जण मेले आणि निसर्गाची बरीच हानी झाली.
आफ्रिकेत जन्म घेता घेता ऐन टाईमला महाराष्ट्रातील
बारामती येथे भाऊंचा जन्म झाला.
जन्मा पासूनच ४ चाकी चालवण्यास ♀♀ शोकीन असलेले, जन्मल्या जन्मल्या नर्स जवळचा मोबाईल घेऊन DR.DRIVING गमे खेळणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चष्मा घालणारे पुण्यात
हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ#जाळ आणि #धुररर सोबतच काढणारे श्री श्री श्री @Sanket_J_007 यांना वाढदिवसाच्या ..१ ढेपीचे पोत , २ कंटेनर ,३ टमटम ,5 छोटा हत्ती , 10
टायर ट्रक ,11 ट्रैक्टर ,अनि 12 टेम्पो टाटा
मोदींनी रेल्वे, रस्ते, एयरपोर्ट, बंदर, सरकारी गोदाम, स्टेडियम सगळं विकायला काढलं आहे!- WA इकॉनॉमिट्स
मोदी सरकारची National Monetization Pipeline (एनएमपी) योजना काय आहे?
★ 6 लाख कोटी रुपयांच्या चार वर्षांच्या महत्वकांक्षी राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन (NMP) चे अनावरण मोदी सरकारने केले आहे.
★ खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून ऍडव्हान्समध्ये पैसे घेऊन, पण प्रकल्पांचे मालकी हक्क सरकारकडेच ठेवून.. (आय रिपीट : सर्व प्रकल्पांचे
मालकी हक्क सरकार कडेच ठेवून) ठरलेल्या कालावधीसाठी अशा खाजगी कंपन्यांना प्रकल्पांचे महसूल अधिकार हस्तांतरित करायची ही एक अतिशय सुटसुटीत, कोणतंही कन्फ्युजन नसलेली योजना आहे.
★ हा प्रकार देशात पहिल्यांदा होत नाहीये. Operate Maintain Transfer (OMT), Toll Operate
या देशाला स्वातंत्र्य मिळालं मिळताना ज्या काही गोष्टी घडल्या त्या सर्वश्रुत आहेत. धार्मिक द्वेषातून देशाची फाळणी, गांधी हत्या, जातीयवादाचे परिमार्जन म्हणून राखीव क्षेत्र, लांगुलचालन अथवा अतिसहिष्णुपणाचे फळ म्हणून ज्या त्या धर्मानुसार वेगवेगळे पर्सनल लॉ बोर्ड ई गोष्टी ठळक आपल्या
समोर येतात. तत्कालीन अनेक प्रश्न पुर्णतः न सोडवल्याने आजही आपल्या पिढीला काही समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर कित्येकदा माझ्या मित्रांनी अथवा इतरांनी त्या समस्यांवर लिहिले आहे. त्यातून एक मुद्दा समान आढळतो तो म्हणजे विशिष्ट वर्ग विशिष्ट समस्यांवर
कसा मूग गिळतो किंवा त्या समस्येत आणखी भर घालतो.
तर सर्वप्रथम हा जो विशिष्ट वर्ग आहे त्याचे स्वतःचे देखील काही हितसंबंध, विचार अथवा पूर्वानुग्रह आहेत ज्याला अनुसरून हेतुपुरस्सर किंवा नकळतपणे ते सदर गोष्टी करत असतात. यात सध्या