#Thread : एकता

गेल्या काही दिवसांपासून ‘मराठ्यांच्या राज्याचा अखेर’- ह्या विषयावरचे समकालीन संदर्भ चाळताना यशवंतराव होळकर यांची काही महत्त्वाची पत्रे वाचनात आली.

त्यावेळची आणि आजची परिस्थिती काही वेगळी नाही. म्हणूनंच प्रत्येकाने यशवंतरावांचे विचार आत्मसात करणे गरजेचं आहे.

१/१४
महादजींच्या मृत्यूनंतर त्यांचे दत्तकपुत्र दौलतराव ह्यांच्या हाती सत्ता आली.

दौलतराव महत्वाकांक्षी होते. तुकोजी होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ज्येष्ठ पुत्रास (काशीराव) हाताशी धरुन सगळी सत्ता स्वतःकडे घ्यायची होती.

रावबाजी तर पहिल्यापासून दौलतरावाच्या अमलाखाली होते.

२/१४
पण नाना फडणवीस आणि मल्हारराव होळकर ह्यांना हे मान्य नव्हतं. मल्हारराव कर्तृत्ववान होते.

पेशवे-शिंदे-होळकर ह्यांच्यात रावबाजी-दौलतराव-काशीराव आणि नाना-मल्हारराव असे गट निर्माण झालेले.

नानाच्या भितीमुळे बाजीरावाने दौलतरावास पुण्यात ठेवून घेतलेलं.

३/१४
दौलतरावांनी काशीरावाला हाताशी धरुन पुण्यात मल्हाररावांना ठार केलं. ह्या भयानक हत्येमुळे नाना फडणवीस हदरुन गेलेले.

ह्या सगळ्यामुळे होळकर-शिंदे वाद लयाला गेला.

पुढे १६-४-१८०१ रोजी बाळोजी कुंजराच्या ऐकून मूर्ख रावबाजीने विठोजी होळकर ह्यांची अमानूष हत्या करवली.

४/१४
नरसिंह विंचूरकर ह्यांच्या विनवण्यांचा ही फायदा झाला नाही.

इथूनंच मराठ्यांच्या राज्याच्या अखेराला सुरुवात झाली.

एवढं सगळं होऊन ही यशवंतरावांच्या मनात पेशव्यांसाठी असलेला जिव्हाळा कमी झालेला नव्हता.

१७-६-१८०१ रोजी लिहीलेल्या पत्रातून यशवंतरावांची पवित्र भावना दिसून येते.

५/१४
पुढे १८०२ मध्ये यशवंतराव पुण्यास यायला निघाले.

दौलतरावांच्या तावडीतून पुण्याला सोडवायचे आणि रावबाजीकडून बाळोजी कुंजर ला आपल्या ताब्यात घ्यायचे अशी त्यांची इच्छा होती.

पण यशवंतराव पुण्यावर चालून येत आहेत म्हटल्यावर बाजीराव कासावीस झाले.

६/१४
यशवंतरावांनी समेट घडवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण बाळोजी कुंजर ह्याने हा समेट होऊ दिला नाही.

२५-१०-१८०२ रोजी हडपसरच्या युद्धात यशवंतराव होळकर ह्यांनी पेशवे-शिंदे ह्यांच्या फौजांना पाणी पाजलं.

युद्धाचा परिणाम लक्षात येताच रावबाजी पर्वतीवरुन सिंहगडाच्या पायथ्याशी पळून गेला.

७/१४
पण यशवंतरावांचा रोष रावबाजीवर होता का?

नाही!

यशवंतरावांच्या शौर्याचं वर्णन करताना रियासतकार सरदेसाईंनी यशवंतरावांच्या मनातील भावना फार छान टिपल्या आहेत.

ज्या माणसाने आपल्या भावाची अमानूष हत्या केली त्याच्याबद्दल पण यशवंतरावांची काय भावना होती ते पहा👇🏼

८/१४
यशवंतरावाने दुसऱ्या बाजीरावास परत येण्यास सांगितले. पण रावबाजी सुवर्णदुर्गमार्गे वसईला गेला.

इंग्रजांसोबत रावबाजीने वसईचा तह केला. तहानंतर लगेच बाजीराव आणि यशवंतराव ह्यांच्यामध्ये काही गुप्त पत्रव्यवहार झाला.

ह्यासंबंधी इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे ह्यांचा लेख👇🏼

९/१४
१६-३-१८०३ रोजी यशवंतरावांनी अमृतराव पेशव्यांना एक पत्र पाठवलं.

यशवंतराव म्हणतात, "श्रीमंतांची दौलत मोठी आहे, माणसं आता शंभर वर्षात वाढली आहेत त्यामुळे एकदिली नाही असं वाटल्यास तसं समजू नये. पूर्वापार चालीवर दृष्टी ठेऊन सगळे एका दिवशी एकदिल होतील, आणि हेच उत्तम आहे”.

१०/१४
ह्या पत्रातून यशवंतरावांचे उच्च विचार दिसून येतात.

आज सगळ्यांनी हे विचार आत्मसात करण्याची अत्यंत गरज आहे.

इतिहासाचं विकृतीकरण करणारे #बाजारु_विचारवंत नेहमी बाजीराव-यशवंतराव वाद रंगवून सांगतात आणि ब्राह्मण-धनगर वाद पेटवून द्यायचा प्रयत्न करतात.

११/१४
प्रत्येकाने एकदा तरी इतिहास जातीचा चष्मा काढून वाचावा. आपल्या लक्षात येईल की अगदी १६४६ पासून १८१८ पर्यंत मराठ्यांच्यात अनेक वाद झाले. पण ते कधीही जातीय नव्हते. राजकारणापूर्ते मर्यादित होते.

मराठ्यांच्या राज्याचा अखेर होण्याचे एकंच कारण होते - आपापसातील वाद!

१२/१४
दुर्दैवाने आज ही परिस्थिती वेगळी नाही. पण इतिहासातून बोध घेऊन आपण हे सगळे वाद मिटवून ‘येक होऊन परराष्ट्राचा प्रसार नाही होऊ दिला पाहिजे’.

जातीभेद उभा जाळावा, अवघा हिंदु तितुका मिळवावा!

🚩#जयभवानी_जयशिवराय🚩

१३/१४
संदर्भः

१) मराठी रियासत उत्तर विभाग ३ (रियासतकार सरदेसाई)

२) पेशवे दप्तर खंड ४१

३) भारत सरकारचा केंद्रीय दफ्तरखाना - ऐतिहासिक मराठी साधनें

१४/१४

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devashish Kulkarni (Modi Ka Parivar)

Devashish Kulkarni (Modi Ka Parivar) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @AjaatShatrruu

Mar 13, 2023
#Thread: समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगाबाद खंडपीठाचा ‘तो’ निकाल!

इतिहासाचे विकृतीकरण हे काही महाराष्ट्राला नवीन नाही. अनेक बाष्कळ वाद आपण सर्वांनीच ऐकले/वाचले आहेत. त्यात दोन्ही बाजूंचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे शिवसमर्थ संबंध.

१/७
शिवसमर्थ संबंधांवर वाद सुरु झाला की आजकाल एक नवीनंच गोष्ट ऐकायला मिळेत. ती म्हणजे औरंगाबाद उच्चन्यायालयाने या संबंधांवर दिलेल्या निकालाची.

या सोबतंच कुठल्यातरी फालतू स्थानिक वृत्तपत्रातील हे👇🏼कात्रण फिरवून लोकांनी दिशाभूल केली जाते.

२/७
आता औरंगाबाद हे बॉम्बे उच्चन्यायालयाचे एक ‘खंडपीठ’ आहे हे ही या विचारदळिद्री लोकांना माहिती नसतं. असो.

पण खरंच औरंगाबाद घटनापीठाने रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु नाहीत असा ‘निकाल’ दिला आहे का? शिव-समर्थांचा एकत्रीत फोटो टाकल्यास खरंच कारवाई होऊ शकते का?

३/७
Read 7 tweets
Mar 6, 2023
#Thread: शनिवारी काही कामानिमित्त रत्नागिरीला जाण्याचा योग आला. पुण्याहून प्रस्थान करण्याच्या आधीच ठरवले होते की काहीही झाले तरी दोन ठिकाणी जाऊन डोकं ठेवून यायचं.

रत्नागिरी - या शहराचे २० व्या व २१ व्या शतकातील भारताच्या राजकाराणावर तसेच समाजकारणावर अनेक उपकार आहेत.

१/१२ Image
होय. कारण रत्नागिरी ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जन्मभूमि आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जात्युच्छेदक कार्याची समरभूमि.

२३ जुलै, १८५६ रोजी आजच्या टिळक आळीतील या वाड्यात जन्माला आलेला केशव गंगाधर टिळक पुढे जाऊन तत्कालीन भारताच्या…

२/१२ ImageImageImageImage
राजकारणातील सर्वोच्च नेता होईल असा कोणी विचार तरी केला असेल का? पण स्वकर्तृत्वाच्या व बुद्धिमतेच्या जोरावर केशव तथा बाळ ‘लोकमान्य’ झाले!

गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या भारतीयांना भारतीयत्वाची जाणीव करुन देऊन पुन्हा एकदा स्वराज्याची आठवण लोकमान्य टिळकांनी करुन दिली.

३/१२ ImageImage
Read 13 tweets
Jan 20, 2023
#Thread: छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी ही कुठे ही मशीद बांधली नाही!

राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर कधी थांबेल कोणासठाऊक. दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे महाराजांच्या अद्वितीय इतिहासाचे विकृतीकरण महाराष्ट्रात होत आहे.

१/१० Image
शिवछत्रपतींनी मशिदी पाडल्या, भ्रष्ट केल्या, त्यांची धान्य कोठारे केल्याचे समकालीन पुरावे:

🔸 समकालीन जेझुईट पाद्री आंद्रे फ्राईर याचे पत्र. Andre freire's letter of 1678 published in historical miscellany published by BISM, Pune 1928, p.13

dspace.gipe.ac.in/xmlui/handle/1…

२/१०
🔸शिवभारत, कविंद्र परमानंद, १८:५२

archive.org/details/ShriSh…

🔸शोणाचलपती येथे मशीद पाडून देऊळ बांधले, राज्यव्यवहार कोश प्रस्तावना, शिवचरित्र प्रदीप, पान नं १४३

archive.org/details/Shivch…

३/१०
Read 10 tweets
Nov 4, 2022
“कैलासवासी सुभेदार होते, त्यांनी एकनिष्ठतेनें श्रीमंतांची चाकरी करुन उत्तम परिणाम करुन गेले”.

- अहिल्यादेवी होळकर

(कै.सुभेदार - मल्हारराव होळकर;
श्रीमंत - थोरले बाजीराव)

संदर्भः महेश्वर दरबाराची बातमीपत्रे

नेहमीप्रमाणे, पाटीलांनी अर्धवट इतिहास मांडलाय. असो.

१/७
गंगाधर यशवंत आणि राघोबादादा यांचे कारस्थान - ही मालेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या सत्तासंघर्षाची एक बाजू आहे.

नेहमीप्रमाणे, नाण्याची एकंच बाजू दाखवून काँग्रेस च्या चमच्याने त्याचे काम चोख बजावले आहे.

पण इतरांना दुसरी बाजू कळणे गरजेचे आहे.

२/७
गंगोबा तात्या चंद्रचूड आणि राघोबादादा यांचे कारस्थान रंग घेत असताना अहिल्याबाईंनी मराठ्यांचे तत्कालीन पंतप्रधान (पेशवे) थोरले माधवराव यांना पत्रव्यवहाराद्वारे सगळी हकीकत कळवली.

माधवरावांसारख्या करारी राज्यकर्त्याने स्वराज्यहितापुढे आपल्या सख्ख्या काकाला ही सोडले नाही.

३/७
Read 7 tweets
Oct 22, 2022
अभ्यासपूर्ण लेख लिहीण्याचा प्रयत्न केलास पण गर्वाने “सत्य उशिरा येत पण पद्धतशीर घोडा लावून जात” - ही टिप्पणी करुन स्वतःचा विचारदळिद्रीपणा सिद्ध करायला विसरला नाहीस.

असो, बघ आता ‘घोडे कसे लागतात ते’😋

आणि हो, #Thread: छत्रपती शिवाजी महाराज हे ‘गोब्राह्मणप्रतिपालकंच’!

१/२२
हे माझे कालचे ट्वीट. ज्यामुळे तू आणि तुझी टोळी सैरभैर झाली आहे.

एक साध्या प्रश्नाचे उत्तर दे - या ट्वीट मध्ये मी कुठेही असे म्हंटले आहे का की 'छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला 'गोब्राह्मणप्रतिपालक' म्हणत आहेत?

नाही ना? मग🤷🏻‍♂️ कशाला आभाळ हेपलताय🤦🏻‍♂️

असो, मुद्याकडे येऊयात.

२/२२
शिचसा ३, ले.५३४ आणि त्याचा सारांश👇🏼

मोरेश्वर गोसावी, म्हणजेच महासाधू मोरया गोसावी यांचे वंशज. चिंचवडकर देव यांचे महाबली शहाजीराजे यांच्या काळापासून घरोब्याचे संबंध होते.

खालील पत्र हे शिवाजीराजे यांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना लिहीले गेले होते.

३/२२
Read 22 tweets
Sep 18, 2022
पुण्याचा गणेशोत्सव - २०२२ (वर्ष १३० वे)

यंदाच्या गणेशोत्सवाची एक वेगळीच मजा होता. एक वेगळाच उत्साह होता. पाऊसातही तो उत्साह काही कमी झाला नाही. पाऊसातल्या गर्दीत ही श्रींना माझ्या कॅमेरात टिपण्याचा मोह काही मी आवरु शकलो नाही. त्यातील काही छायाचित्रे या थ्रेडमध्ये टाकत आहे.

१/१०
मानाचा पहिला - श्री कसबा गणपती

पुण्याचे ग्रामदैवत ज्याची स्थापना दस्तुरखुद्द हिंदुराष्ट्रमाता जिजाऊसाहेबांनी केली होती.

२/१०
मानाचा दुसरा - श्री तांबडी जोगेश्वरी गणपती

ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या बाहेर विराजमान झालेला हा गणपती मला वयक्तिकरित्या सगळ्यात आवडतो.

३/१०
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(