#Thread
• “शिवाजीराजांचा मावळा मी, तुझा कौल हवाय कुणाला?” - दिलेरखानाला धूळ चारणाऱ्या योद्ध्याची शौर्यकथा... (भाग 1)

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सगळीकडे जणू स्वराज्याचे नवचैतन्य सळसळू लागले. पण म्हणतात ना चांगल्या गोष्टीला देखील…

१/१५
…विरोधक असतात, त्याप्रमाणे अनेक वतनदारांचा शिवरायांच्या स्वराज्याला विरोध होता. या साऱ्या मंडळीनां शिवरायांनी स्वराज्याचे महत्व सांगितले. अनेक जण स्वराज्यात सामील झाले. तर अनेक जणांनी आपला विरोध कायम ठेवला.

यापैकी एक होते जावळीचे मोरे घराणे जे आदिलशाही दरबारी सरदार होते.

२/१५
“तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, जर उदईक येत असाल तर आजच या!” जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्‍या चंद्रराव मोर्‍यांनी शिवाजी महाराजांना डिवचले.

हा मग्रुरीचा जबाब ऐकून महाराज संतापले.

३/१५
मोर्‍यांना अखेरची संधी मिळावी म्हणून महाराजांनी एक पत्र मोर्‍यांना धाडलं ‘जावळी खाली करुन, हात रुमालांनी बांधून भेटीस येणे!’

पण चंद्रराव व हणमंतराव गुर्मीला आलेले, कारणच तसे होते. कारण त्यांच्या ताब्यात होते जावळीचे खोरे!

४/१५
जावळी म्हणजे वाघाची जाळी. जावळीचे खोरे म्हणजे महाबिकट मुलुख. जावळीच्या खोर्‍यात उतरणे म्हणजे मृत्यूच्या खाईत उतरण्यासारखे होते.

महाराजांचे कान्होजी जेधे, हैबतराव शिळीमकर, संभाजी कावजी कोंढाळकर, नांदलनाईक यांना तातडीचे हुकूम सुटले.

५/१५
निवडक धारकरी जावळीच्या कीर्र जंगलात घुसले. एकदम भयंकर कालवा उठला. चर्तुबेट, जोर, शिवथर आणि खुद्द जावळीवर एकाचवेळी मराठ्यांचा छापा पडला.

चंद्रराव, प्रतापराव, हणमंतराव आणि सगळी मोरे मंडळी धावली.

६/१५
दोन्ही बाजूंकडून मराठेच आपापसात लढू लागले, पण स्वराज्यासाठी त्यांचा नाइलाज होता. संभाजी कावजी कोंढाळकरांनी हणमंतराव मोरे ठार केला. प्रतापराव मोर्‍यांनी लपत छपत विजापूरचा रस्ता धरला.

७/१५
खास चंद्रराव जावळी हातची जातेय हे पाहून रायरीकडे पळाले. पण जावळीच्या पूर्व बाजूने हत्यारांचा खनखणाट आणि आरोळ्याचा आवाज अजूनही येत होता.

८/१५
राजेंनी विचारले काय आहे हा प्रकार.. “राजे चन्द्ररावांच्या एक सरदार आपल्या कोणालाच ऐकना झालाय, गेली ६ तास अखंड पट्टा फिरवतोय.. कोणालाच जवळ येऊ देइना. आत्तापर्यंत याने ५०-६० मावळे मारले आपले, आणि कित्येक जायबंद केले.

९/१५
एक एक दर्दी धारकरी कार्दळीसारखा कापून काढतोय तो.. मुरारपंत नाव त्याचे..”
राजे घोड्यावर स्वार होऊन घटनास्थळी दाखल झाले. मावळ्यांना थांबायचे आदेश दिले.

मावळे थांबले पण मुरारपंत एवढे बेहोषीने लढत होते. पट्ट्यांची सुदर्शन चक्रासारखे वलये दिसत होती.

१०/१५
राजानी कणखर व तितक्याच ताकतीच्या आवाजाने आज्ञा केली… “मुरारपंत थांबावे…”

पंत थांबले… राजे म्हणाले …“पंत ज्यांच्यासाठी लढत आहात ते गुप्त वाटेने पळून गेले. जावळीवर आता आमची हुकुमत आहे.”

११/१५
पंत म्हणाले – “असे तुम्ही समाजात असाल, पण हा मुरार अजून जिवंत आहे.. स्वामिनिष्ठ मेलेली नाही.”

राजे उद्गारले – “पण हीच निष्ठा सत्कारणी लावा, पिढीजात जहागीराचे आम्ही पुत्र, बसून खाल्ले तरी ७ पिढ्या पुरून उरेल. पण आम्ही हा स्वराज्याचा डाव मांडलाय तो आमच्या रयतेसाठी..

१२/१५
३५० वर्षे गुलामगिरीत पिचत पडलेला हा महाराष्ट्र स्वतंत्र करून देव धर्माचे राज आणण्यासाठी आमचा हा खटाटोप आहे. यासाठी आमचा जीव गेला तरी आम्ही ते नशीब समजू. तुमच्यासारखे निष्ठावंत धारकरी स्वराज्यात सामील झाले तर आई जगदंबेची कृपा समजू आम्ही…बघा विचार करून.

१३/१५
नाहीतर आम्ही तुमच्यावर जबरदस्ती नाही करणार. आपली योग्यता आम्ही ओळखतो. तुम्हास आम्ही उपद्रव करणार नाही. तुम्ही खुशाल इथून सहीसलामत जावू शकता.”

मुरारबाजींना आपली चूक लक्षात आली आणि ते स्वराज्यात दाखल झाले.

१४/१५
अश्याप्रकारे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्यांच्या तुर्यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते ‘मुरारपंत’!

मुरारबाजींची इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध घटना म्हणजे दिलेरखानाशी अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा…

१५/१५
भाग २.. लवकरच… !

@TMahrattas @the_mahrattas @ShefVaidya
*राजांनी
#Thread
• “शिवाजीराजाचा मावळा मी, तुझा कौल हवाय कुणाला?”: दिलेरखानाला धूळ चारणाऱ्या योद्ध्याची शौर्यकथा… (भाग २) 👇👇👇

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Tushar Lagad Patil 

Tushar Lagad Patil  Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @lagadpatil_007

1 Dec
#Thread
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी-

१) सईबाई – सईबाई या शिवरायांच्या प्रथम पत्नी असुन त्या सातारा जवळच्या फलटण येथील निंबाळकरघराण्यातील होत्या. मुधोजीराजे निंबाळकर हे त्यांचे वडील तर बजाजी निंबाळकर हे बंधु होते. …

@TMahrattas @ShefVaidya

१/११
…शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४० मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना चार अपत्ये झाली.त्यांचा मृत्यु ५ सप्टेंबर १६५७ रोजी राजगडावर झाला.

२/११
२) सगुणाबाई – सगुणाबाई या शिवरायांच्या द्वितीय पत्नी असुन त्या कोकणातील शृंगारपुर येथील शिर्के घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४१ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक अपत्य झाले.

३/११
Read 12 tweets
29 Nov
#Thread

पद्मभूषण रावबहाद्दूर रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची आज ६२ वी पुण्यतिथी, त्या निमीत्त त्यांना सादर वंदन🙏

त्यांचा मृत्यू नंतर आज ६२ वर्ष झाली तरी त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक लिहिलेल्या मराठी रियासत व मुसलमान रियासत, ब्रिटिश रियासत व पेशवे दफ्तर…

१/५ Image
…ह्या त्यांचा महत्त्वपूर्ण पुस्तकांनां भरपुर मागणी आहे. त्यांचा इतके कष्ट करुन लोकाभिमुख मांडणी इतर कोणीही इतक्या मोठ्या प्रमाणात केली नसेल.

त्यांनी काही हजार कागदपत्रे तपासली ज्यात मोडी, फारसी, गुजराथी, इंग्रजी भाषेतील मजकुर अभ्यासला.

२/५
त्यांच्या बरोबर कै. त्र्यंबक शंकर शेजवलकर ह्यांनी देखील काम केले आहे. त्यांचे निकटवर्तीय मित्र थोर इतिहासकार कै. जदुनाथ सरकार ह्यांनी रियासतकारांबद्द्ल काढलेले गौरवोद्गार - "The greatest living historian of Marathas "

३/५
Read 5 tweets
27 Nov
#Thread

बाळाजी बाजीरावानें सदाशिवरावभाऊची पानिपतसाठी जी निवड केली ती यथायोग्य होती. कारण, सदाशिवरावभाऊ असा उत्तम मुत्सद्दी म्हणून नांवाजला गेला होता तसा लढवय्या सरदार म्हणूनहि त्याचा चांगला लौकिक होता.

@TMahrattas @the_mahrattas @ShefVaidya

१/८
१७४७ त सदाशिवरावभाऊने बहादूर मेंड्याची स्वारी केली (का. पत्रे, यादी ६८). १७५० त यमाची शिवदेवाचें बंड त्याने स्वतः जाऊन मोडिले -१७५१ च्या मार्चात बाळाजीने सलाबताला तुंगभद्रेवर अडविलें त्या वेळी भाऊ त्याच्या बरोबर होता.

२/८
१७५१ च्या नोव्हेंबरांत सलाबत बुसीला घेऊन कोरेगांवास आला तेव्हा भाऊ लढाईत हजर होता. १७५२ च्या डिसेंबरातं भालकीची लढाई झाली तींत तो होता.

१७५३ च्या जानेवारींत श्रीरंगपट्टणची स्वारी झाली. तींतही भाऊ व रामचंद्रबाबा शेणवई हे दोघे होते.

३/८
Read 9 tweets
26 Nov
चौपाटी रोडवर नाकाबंदी करत असतानाच तेथे एक संशयास्पद वाटणारी गाडी थांबली. दोन पोलीस लाठी घेऊन गाडीकडे गेले असता, त्यांना दोन अतिरेकी दिसले, इस्माईल नामक एका अतिरेक्यास जागीच ठार मारण्यात आले. दुसरा अतिरेकी अजमल कसाब जखमी अवस्थेत दिसला.

#MumbaiTerrorAttack

१/४
कसाबने प्रथम शरणागती पत्करल्याचे नाटक केले, व जसे ओंबळे गाडीजवळ गेले, तसे त्याने "ए के ४७" बंदुकीने सर्व पोलिसांवर निशाणा साधला. हे लक्षात येताच ओंबळेंनी जिवाची पर्वा न करता बंदुकीवर झडप घातली, त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचले पण ...

२/४
त्या दरम्यान ओंबळेंच्या शरीरात २० गोळ्या गेल्या होत्या, ते बेशुद्ध पडेपर्यंत बंदुकीसमोर होते, त्यामुळे बाकीच्या पोलिसांनी कसाबला जागेवर थोड्या झटापटीनंतर पकडले.

तुकाराम ओंबळ्यामुळे मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब पकडला गेला, पण ...

३/४
Read 4 tweets
26 Nov
बांधवानो आपण हे असले प्रकार आणखी किती पाहायचेत याला आता थांबवने खुप महत्वाचे आहे. आज गरज आहे सर्वांनी सहभागी होवून मोठी मोहिम उभारायची. आपण पाहतो की उदा. शिवाजी हायस्कूल, शिवाजी चौक, शिवाजी महाविद्यालय यासर्वांना ...

१/४
‘छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल’, ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय’ करायला लावा तरच बाकी शक्य आहे आजही परिस्थिती अशीच आहे चौक ,शाळा व महाविद्यालयवाले महाराजांचा एकेरी नामोच्चार करतांना सर्रास आढळतात !

२/४
जरा आपल्या सभोवतालच्या परिसरात बघा आपल्याला स्पष्ट जाणवेल या करिता सर्व जिल्यात जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी शाळा महाविद्यालय चे मुख्याध्यापक यांना निवेदन देवून या गंभीर बाबी कडे लक्ष केंद्रित करायला लावा.

महाराजांच्या स्वराज्यात महाराजांचा नामोच्चार अदबिने झालाच पाहिजे !!

३/४
Read 5 tweets
24 Nov
#Thread
• महाराणी ताराबाईसाहेब -

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर दीडच महिन्यात (२१ एप्रिल १७००) सातारचा किल्ला मोगलांनी ताब्यात घेतला आणि त्यानंतर पुढच्या दीडच महिन्यात (९ जून १७००) परळीचा किल्लाही मराठ्यांच्या हातून मोगलांच्या हाती गेला‌.

@TMahrattas @ShefVaidya

१/१० Image
यानंतर औरंगजेबाची कल्पना अशी की, राजाराम महाराजांच्या ‘असाहाय्य स्त्रिया आणि अज्ञान मुले’ यांना शरण आणायला कितीसा वेळ लागणार?

परंतु त्याच्या दुर्दैवाने आणि महाराष्ट्राच्या सुदैवाने त्यावेळी दक्षिणेच्या राजकीय नभोमंडळात एक अत्यंत दीप्तिमान तारा उदय पावत होता.

२/१०
या ताऱ्याच्या प्रकाशाने पुढे अल्पावकाशातच महाराष्ट्राचे मरगळलेले राजकारण पुन्हा उजळून निघाले. विभागून पडलेल्या शक्ती संघटित होत गेल्या. वीरवृत्तींना संजीवनी मिळाली आणि निराशेच्या राखेतून नव्या पराक्रमाचे स्पुरण फुलू लागले.

हा तेजस्वी तारा म्हणजे महाराणी ताराबाईसाहेब.

३/१०
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(