👇ह्या ट्विट वरून आइन्स्टाईनची एक भारी गोष्ट आठवली..
गोष्टीची सुरुवात👇खग्रास सूर्यग्रहणाच्या छायाचित्रापासून करू..ह्या चित्रात उजवीकडे वर एक तारा दिसतोय..खरे तर अशाच एका चिमुकल्या तारा समूहाच्या मदतीने आइन्स्टाईनने जग नेहमीसाठी बदलून टाकले..!
साल होते..१९१६..पाहिल्या महायुद्धाने जोर धरला होता..ह्या महायुद्धाच्या धामधुमीत वैज्ञानिक जगतात नवखा म्हणावा अश्या फक्त ३७ वय असलेल्या अल्बर्ट आईन्स्टाईनने सापेक्षवादाचा सामान्य सिद्धांत (Theory of General Relativity) मांडला..!
खरं तर वैज्ञानिक जगात प्रतिष्ठेला फार महत्व असते..
त्यात आइन्स्टाईन पडला जर्मन..त्यात नवीन..त्याने त्याचा सिद्धांत मांडून इंग्लंड साठी देवासमान असणाऱ्या न्यूटनच्या सिद्धांतालाच आव्हान केले होते..!!
न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रकाश किरण हे एका सरळ दिशेत प्रवास करतात आणि आइन्स्टाईनचे म्हणणे होते की -
गुरुत्वाकर्षण त्या प्रकाश किरणांना वळवू शकते..! झाला ना मोठा पेच..!
आता कोण बरोबर हे ठरवण्यासाठी काय प्रयोग करायचा हे ठरवता ठरवता २-३ वर्ष गेली..तेवढ्यात महायुध्दही संपले..साल उजाडले १९१९..!
ह्या वर्षी एक मोठे खग्रास सूर्यग्रहण होते..त्याचा फायदा घेऊन प्रयोग करायचे ठरले-
होते काय की..खग्रास सूर्यग्रहणच्या वेळी चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येतो..त्यामुळे पृथ्वीच्या काही भागातून (निळी रेषा 👆) तेवढा वेळ सूर्य दिसतच नाही..म्हणजेच दिवसा रात्र होते आणि दिवसा तारे दिसू लागतात..!
आता..न्यूटनच्या म्हणण्याप्रमाणे अशा वेळेस👆सर्व तारे दिसायला
पाहिजे..फक्त.. सुर्याच्यामागे असणारे तारे सोडून..कारण प्रकाश सरळ रेषेत येत असेल तर सूर्य मध्ये आल्याने त्यामागचे तारे आपल्याला दिसायला नको..🧐
आणि आइन्स्टाइनचे म्हणणे होते की सूर्य त्या ताऱ्यापासून येणारा प्रकाश वळवतो म्हणून आपल्याला ते तारे पण दिसतील..!!
ह्या प्रयोगातील ते तारे म्हणजे वृषभ नक्षत्रातील एक तारका समूह होता..आणि जसे आइन्स्टाईनच्या सिद्धांताने सांगितले तसेच झाले..आणि त्याने जग नेहमीसाठी बदलून टाकले..!!
असे म्हणतात की ह्या सिद्धांतामुळे माणसाने उत्क्रांतीच्या एका नव्या पर्वात प्रवेश केला..इतका हा मोठा शोध होता..😍
अशातच शोधल्या गेलेल्या गुरूत्वीय लहरी ह्या पण आइन्स्टाईनने १०६ वर्षापूर्वीच सांगितलेल्या सिद्धांतालाच बळ देतात.. आणि अजूनही आपण त्या सिद्धांताचे नवनवीन निष्कर्ष शोधतोच आहे..!!
हे 👇 १९१९ च्या त्या सूर्यग्रहणाचे छायाचित्र व त्याचा कॅमेरा अन् उपकरण..❤️
टीप - विज्ञान न आवडणाऱ्या लोकापर्यंत पण आइन्स्टाईनची महती पोचावी ह्या हेतूने खूपशा तांत्रिक बाबी मुद्दाम गाळल्या आहेत..🙏
👇ह्याचे उत्तर किचकट आहे..आणि पहिल्यांदा ऐकणाऱ्याला ते विज्ञान..विज्ञान वाटतच नाही..इतके ते अजब आहे..तरी एक प्रयत्न करतो..
आपण पाहिले की आइन्स्टाईनने प्रकाश गुरुत्वाकर्षणाने वळतो हे सिद्ध केले..पण प्रकाश तसे का वळतो ह्याच्या कारणासाठी त्याने सांगितले की गुरुत्वाकर्षण #म १/९
१९४८ मध्ये ~ भारतासोबतच स्वतंत्र झालेला हा देश..अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला.. पांढऱ्या शुभ्र वाळूने नटलेल्या समुद्र किनाऱ्यांची खाण असलेला हा आपला शेजारी आज आगीत धुमसतोय..!!
ह्यात पॉलिसी घेणाऱ्याकडून थोडे पैसे (प्रीमियम)घेतले जातात आणि काही अघटीत झाल्यास(पॉलिसीत नोंदल्याप्रमाणे उदा. अपघात ,मृत्यू ,आजारपण इ इ)पॉलिसी असणाऱ्याला भरलेल्या प्रीमियमच्या काही पट रक्कम दिली जाते..त्या रकमेला म्हणतात - Sum assured .
आता प्रश्न असा पडतो की इन्शुरन्स कंपनी इतके पटीने पैसे आणते तरी कुठून..??
ह्यासाठी इन्शुरन्स कंपन्या २ गोष्टी करतात - १.मागच्या वर्षी समजा १०० लोकांनी पॉलिसी घेतली आणि त्यातले १० लोकांनी क्लेम केला तर ह्या बाकीच्या ९० लोकांच्या प्रीमियममधून क्लेम केलेल्या लोकांना रक्कम दिली जाते
नामिबिया , पाकिस्तान आणि शाहू ,फुले ,आंबेडकरांचा भारत
२०२१ च्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये नामिबियाची टीम 👇 होती..आता नामिबिया हा आफ्रिकेतील एक देश आहे आणि आफ्रिकेत तर बहुतांशी कृष्णवर्णीय राहतात असे असूनही त्यांची टीम ही अशी का दिसत असावी हा प्रश्न मला पडला..जरा शोधल्यावर मला १/n
कळले की नामिबियात फक्त ६% लोकसंख्या ही श्वेतवर्णीय आहे..आणि ते देशातील ७०% जमीन आणि उद्योगांचे मालक आहेत..! साहजिकच ज्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात त्यांनाच खेळ किंवा मनोरंजन ह्यासारख्या गोष्टींसाठी वेळ भेटतो..! बरं..हे नामिबियासारख्या एखाद्या आफ्रिकेतील देशाचे नाहीये..तर २/n
हे अगदी आपला शेजारी पाकिस्तानातही आहे..पाकिस्तानची बहुतांशी जमीन आणि सर्वच मोठे उद्योग तसेच राजकीय/सरकारी पदे ही त्या देशातील फक्त १००००कुटुंबांच्या ताब्यात आहेत..आणि विशेष म्हणजे तिथे दुहेरी नागरिकत्व चालते..म्हणजे सगळा देश ओरबाडून अंगाशी आले की दुसऱ्या देशात पळायला मोकळे..!३/n
क्रूड ऑईलच्या किमतींचा हा 👇आलेख बघा..ह्यात दिसेल की २००८ तसेच २०११-१४ ह्या काळात क्रूडच्या सध्याच्या किमतीपेक्षा जास्त होत्या व तरीही तेव्हा पेट्रोलच्या किमती आतापेक्षा(कर कमी)किमान ३०-४०₹ नी कमी होत्या..!
आता पेट्रोलच्या किमती वाढल्या की महागाई वाढते हे जरी सर्वांना माहीत असले तरी त्याने गरिबी सुद्धा वाढते हे लक्षात घेतले पाहिजे.ते कसे हे बघू
Disposable Income म्हणजे आपल्या एकूण उत्पन्नातील ते पैसे जे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा (अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य)
पुरवल्यानंतर आपल्याकडे उरतात.
जिथे गरीब माणसाची सर्व कमाई ही मूलभूत गरजा पुरवण्यात जाते तिथे श्रीमंत/मध्यम त्याच्या कमाईचा छोटा हिस्सा अशा मूलभूत गोष्टींवर खर्च करतो.
म्हणून पेट्रोलच्या किमती पर्यायाने महागाई वाढल्याने जेव्हा मध्यम वर्ग किंवा श्रीमंत वर्गाच्या राहणीमानात फारसा
का घ्यावा ?
कोणी घ्यावा ?
किती घ्यावा ?
कधी घ्यावा ?
कोणाकडून घ्यावा ?
कोणता घ्यावा ?
टर्म इन्शुरन्स चा धागा वाचायला सुरुवात करण्यापूर्वी 👇 ह्या poll मध्ये नक्की सहभागी व्हा..!
आपण ह्यापैकी कोणत्या इन्शुरन्स/विमा याचे पैसे एकदा तरी भरले आहेत?
का घ्यावा ?
Insurance/इन्शुरन्स हा शब्द मूळ ensure ह्या शब्दापासून आलाय ज्याचा अर्थ होतो खात्री देणे / शब्द देणे.
म्हणजेच जेव्हा आपण कशाचाही इन्शुरन्स/विमा घेतो तेव्हा ती कंपनी आपल्याला शब्द देत असते की कराराप्रमाणे विमा घेतलेल्या गोष्टीला जर काही झाले तर जबाबदारी आमची..! #म
थोडक्यात काय तर आपण आपली मोठी जबाबदारी (आणि त्या जबाबदारी सोबत येणारा धोका/ risk) थोडे पैसे देऊन त्या कंपनीवर टाकत असतो.
म्हणजेच आपण गाडीचा insurance घेतला आणि गाडीला काही झाले तर कराराप्रमाणे त्या गाडीचा खर्चाची जबाबदारी त्या कंपनीची..!