SDeshmukh Profile picture
Nov 21 27 tweets 4 min read
#शापित_राजहंस

सावरकरप्रेमींकडून अत्यंत आग्रही मागणी होत असते की सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. सावरकर हे देशाचं रत्न आहेत, त्यांचा या पुरस्कारावर अधिकार आहे वगैरे.
पण तांत्रिकदृष्ट्या, भारतरत्न हे सावरकरांना देता येत नाही..
#VeerSavarkar
फक्त लोकप्रियता या निकषावर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जात नाही. विशेषतः भारतरत्न हा पुरस्कार तर नाहीच नाही.

या पुरस्कारांचे निकष आपल्याला माहित नसतात आणि याचाच फायदा राजकारणी घेतात, त्याच त्याच मुद्यांचं अखंड रवंथ करत बसतात
एका पक्षाने सावरकरांचा अर्वाच्य उद्धार करायचा, त्यांना लाखोल्या वाहायच्या,
दुसऱ्या पक्षाने सावरकरांची बाजू घेऊन शिव्या देणाऱ्यांची लाज काढायची,
तिसऱ्या पक्षाने 'मग द्या कि त्यांना भारतरत्न' अशी बिनडोक मागणी करायची.
चौथ्या पक्षाने एकांगी विचाराने दूषित असा इतिहास पसरवायचा.
यात, मधल्यामध्ये आपली फरफट आणि सावरकरांचं प्रतिमाहनन, तेही मरणोपरान्त .
याला तेव्हाच खोळ बसेल जेव्हा आपण पूर्ण माहितीनिशी उत्तरं द्यायला शिकू.

भारतरत्न पुरस्कार हा १९५४ साली तयार करण्यात आलेला एक पुरस्कार आहे.
भारत गणराज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या व्यक्तींचा सन्मान व्हावा हा त्यामागचा उद्देश.

लक्षात घ्या, 'भारत गणराज्य' आणि 'जडणघडणीत' हे दोन अत्यंत महत्वाचे शब्द आहेत. याच दोन शब्दांचा उपयोग करून पुरस्कारार्थी शोधले जातात.
भारताच्या जडणघडणीत आणि भारत गणराज्याच्या जडणघडणीत यातला फरक लक्षात येतोय का?
इथेच खरी गोम आहे.
१५ ऑगस्ट १९४७ या तारखेआधीच्या एकाही कार्याचा समावेश भारतरत्नाच्या गुणवत्तेसाठी करता येत नाही.
या पुरस्काराची घटनाच तशी लिहिली गेली आहे. आणि अर्थात, तेच योग्य आहे.
विचार करा, जर आधीच्या सर्वांना रत्न म्हणून गौरवायचं ठरवलं तर सूची किती मोठी होईल?
म्हणून, ठाम नाही!!
फक्त आणि फक्त स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्यांचं कार्य देशासाठी भरीव ठरलं आहे त्यांनाच हा पुरस्कार देण्यात येतो.
म्हणूनच सावरकर, फुलेदाम्पत्य, रानडे, ध्यानचंद, लोकमान्य, भगतसिंह यांना भारतरत्न देता येत नाही. फक्त स्वातंत्र्योत्तर कार्य विचाराधीन असतं.
आता सावरकरांकडे येऊयात.

भारतीय गणराज्य सोडा,
आधीच्या भारतातही सावरकर खरंतर किती खोल पोहोचू शकले?
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे वादळ भारतीय राजकारणात खऱ्या अर्थाने कधी आलंच नाही.
कोवळ्या वयात हा अगदी २३ वर्षाचा पोर उच्य शिक्षणासाठी लंडनला आला..
आपण शिष्यवृत्तीवर इथे आलो आहोत याचं भान बाळगून विनायकाने फक्त अभ्यास केला, अधाशासारखी पुस्तकं वाचून काढली. देशोपयोगी कामे केली.
इतर वर्गमित्र अर्थात उच्चभ्रू, पण त्यांच्या संगतीचा परिणाम न होऊ देता उलट त्यांच्यातल्याच धिंग्राप्रभृतींना विनायकाने प्रभावित केलं.
इथे सावरकर पहिल्यांदा गांधींना भेटले. २७ वर्षांचे सावरकर आणि ४१ वर्षांचे गांधी.
मदनलालचा निषेध करायला आलेले गांधी तिकडे.
आणि सावरकर तर मदनलालचे आधारस्तंभ.
इथे सावरकर पहिल्यांदा गांधींना भेटले. २७ वर्षांचे सावरकर आणि ४१ वर्षांचे गांधी.
मदनलालचा निषेध करायला आलेले गांधी तिकडे.
आणि सावरकर तर मदनलालचे आधारस्तंभ.
२७व्या वर्षी हा माझ्याएवढा तरुण ऑलरेडी १०-१२ केसेस मध्ये गुंतला होता.
कुठल्या केसेस?
देशद्रोहाच्या केसेस. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या वधाच्या केसेस.
देशद्रोही साहित्यनिर्मितीच्या केसेस.
२७व्या वर्षी!!!
अंगावर काटा येतो.
इतक्या लहान वयात कोर्टकचेऱ्या आणि थेट अटक.

हे चाफ्याचं फुल झाडावरून थेट निर्माल्यात पडलं.
सुगंधी घमघमाट होता.

खरा, पण मिरवता आलं का?
२७व्या वर्षी सावरकर कैद झाले.
आधी ब्रिटन,
मग फ्रांस,
मग येरवडा,
मग थेट अंदमान..
ज्या वयात समाजात स्थान मिळवायला बेस तयार करावा,
ज्या वयात भाषणं द्यावीत, पेपरात छापून यावं,
ज्या वयात उत्सवमूर्ती व्हावं,
नेमक्या त्याच वयात सावरकर अंदमानात होते.
कैदेत.
आणि हो, ही कैद नेहरू-गांधींसारखी छानछोकी नव्हती बरं..
एखाद्याला सडवून मारणे, नामोहरम करणे हे या गोऱ्यांकडून शिकावं.

अर्थात, सावरकर टिकले हेच नशीब.
ती तीन माफीपत्रे आणि नंतरची अठरा स्मरणपत्रे (फॉलोअप्स) हा एक सोपस्काराचा भाग असे अशा कैदेत.
जेलर मसुदा लिही आणि त्या प्रिंट्सवर सर्व कैदी सह्या करत..
अक्कलशून्य काँग्रेसजनांनी या फालतू माफीनाम्यावरून चिखल उडवणे यात आश्चर्य नाही.
नेहरूगांधींनी तर स्वतः लिहिलेत माफीनामे, ते यांना दिसत नाहीत. असो.

तर, सावरकर बाहेर आले का या जन्मठेपेतून?
होही आणि नाहीही.
१९२१ साली अंदमानातून सावरकर आले रत्नागिरीत, पण तीही कैदच होती. स्थानबद्धता.
आंबेडकर, नेताजी बोस, गांधी यांच्या भेटी इथे असताना झाल्या खऱ्या, पण उघडपणे राजकारण काही करता आलं नाही.
पुढची तब्बल सोळा वर्षे सावरकर रत्नागिरीतून बाहेर जाऊ शकत नव्हते.
या १९३७ पर्यंत काय काय घडलं होतं भारतात?
शक्तिकेंद्र, प्रमुख मुद्दे सारं सारं बदललं होतं.
दुनिया घडली होती. लाल-बाळ-पाल यांचं निस्वार्थी राजकारण बनियाच्या स्वार्थी मुठीत गेलं होतं..
वयाच्या साठीत सावरकर जरासे मोकळे झाले.. दहा वर्षांसाठी.
१९३७ ते १९४७ या दहा वर्षांत सावरकर राजकारणात होते.
संपूर्ण भारत पादाक्रांत केला, विविधांशी युती केल्या, द्युती केल्या, राजकीय भूमिका घेतल्या, विरोध केले..

स्वातंत्र्यानंतर कदाचित ते आकर्षक विरोधी होऊ शकलेही असते, पण इतक्यात गांधीहत्येचा वेडेपणा झाला आणि सावरकर पुन्हा अडकले
पुढची पंधरा वर्षे सावरकर काळ्या सावलीत राहिले. पुन्हा निर्माल्याची पिशवी.

मुद्दा इथे आहे,
साहित्याचं, जात्युच्छेदनाचं काम सावरकरांनी प्रामुख्याने रत्नागिरीत केलं आणि
समाजबांधणी प्रामुख्याने ४७च्या आधीपर्यंत. बाकी बराचसा काळ ते कोर्टाच्या सावटातच होते, अखंड!
स्वातंत्र्यानंतर त्यांचे पंख इतक्या शिताफीने कापले गेले की हा राजहंस 'भारत गणराज्याच्या जडणघडणीसाठी' काहीच भरीव करू शकला नाही.

गोडसे, आपटे, बडगे यांच्या उद्योगात गांधींपेक्षा सावरकरांचंच भारी नुकसान झालं. ६४ पर्यंत तर गांधीवध खटलाच ऍक्टिव्हली सुरु होता.
मुंबईत दादरमध्ये सावरकरांच्या घरावर अहिंसेचे पुजारी दगडफेक करत. बाकी कुणीही त्यांना सहजी भेटायला जाऊ शकत नसे.
नेहरूकाळात सावरकर पूर्ण एकाकी पडतील याची परिपूर्ण दक्षता घेतली गेली.

आणि गेले सावरकर मग ६६साली!!

उपेक्षा उपेक्षा आणि फक्त उपेक्षा.
सावरकरांचं तेजस्वी आत्मार्पण आणि तुमचं स्वार्थी अस्मितेनं बरबटलेलं भारतरत्न.
८२वर्षं आयुष्यात ६० वर्षं आपण त्या माणसाला तुरुंग-कोर्टवाऱ्याच घडवल्या.
आणि आता कौतुकं करताय?

निदान, तेवढं तरी थांबवा??
तांत्रिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्याही सावरकरांना भारतरत्न देववत नाही.
स्वतंत्र भारत आणि जडणघडण यांच्या शाब्दिक आणि लाक्षणिक अर्थात सावरकर मावत नाहीत.

जितके मागे लागाल तितका नकार प्रखर होईल, त्या शापित गंधर्वाची तितकीच जास्त अवहेलना होत राहील.
त्या पापाचे भागीदार बनू नका. अवास्तव मागण्या करू नका.

त्यांच्या भाषाग्रहावर लक्ष द्या.
त्यांचं जात्युच्छेदन अंगिकारा.
त्यांचं साहित्य आजमवा.
त्यांच्या राजकीय भूमिका धुंडाळा.
त्यांची धर्मचिकित्सा अभ्यासा

सावरकर जितके कळतील तितकं आपल्यातलं पाखंड उघडं पडेल.

#पुष्कराजदेशमुख

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Nov 20
महाराष्ट्र या स्वातंत्र्यवीरांना ओळखतो का..? ज्यांनी कधी इंग्रजाना माफी मागितली नाही...
#स्वातंत्र्यवीर #Savarkar
१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,
२. स्वातंत्र्यवीर भिमाजी
३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील
४. स्वातंत्र्यवीर भीमराव
५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले
७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले
८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले
९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले
१०. स्वातंत्र्यवीर व्यंकटराव भोसले
११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी
१२. स्वातंत्र्यवीर अन्ना नाथु
१३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण
१४. स्वातंत्र्यवीर बारकू
१५. स्वातंत्र्यवीर भीमा
१६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण
१७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण
१८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण
१९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी
२०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु
२१. स्वातंत्र्यवीर दामू सरमळकर
२२. स्वातंत्र्यवीर नारायण देसाई
Read 20 tweets
Nov 19
इन्दिरा गांधी को "आयरन लेडी" कहने वाले ध्यान से पढ़ें...

विंग कमांडर अभिनंदन का नाम तो याद है, ना?

जिसको छुड़वाने के लिए मोदी सरकार ने पाकिस्तान पर ब्राह्मोस मिसाइल तान दी थी, कुछ अन्य पायलट के नाम यहाँ दिए हैं!
#इंदिरागांधी #IndiraGandhi
#IronLady
पढ़िए ये नाम:

विंग कमांडर हरसरण सिंह डंडोस,

स्क्वाड्रन लीडर मोहिंदर जैन,

स्क्वाड्रन लीडर जे एम मिस्त्री,

स्क्वाड्रन लीडर जे डी कुमार,

स्क्वाड्रन लीडर देव प्रशाद चटर्जी,

फ्लाइट लेफ्टिनेंट सुधीर गोस्वामी,

फ्लाइट लेफ्टिनेंट वी वी तांबे,

फ्लाइट लेफ्टिंनेंट नागास्वामी शंकर,
फ्लाइट लेफ्टिंनेंट राम एम आडवाणी,

फ्लाइट लेफ्टिनेंट मनोहर पुरोहित,

फ्लाइट लेफ्टिंनेंट तन्मय सिंह डंडोस,

फ्लाइट लेफ्टिनेंट बाबुल गुहा,

फ्लाइट लेफ्टिनेंट सुरेश चंद्र संदल,

फ्लाइट लेफ्टिनेंट हरविंदर सिंह,

फ्लाइट लेफ्टिनेंट एल एम सासून,

फ्लाइट लेफ्टिनेंट के पी एस नंदा,
Read 8 tweets
Nov 18
हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गळ्यात ब्रिटिशांनी अंदमानातल्या तुरुंगात अडकविलेला बिल्ला. त्यातले उल्लेख स्पष्ट आहेत. पन्नास वर्षांची शिक्षा. 24 डिसेंबर 1910 ते 23 डिसेंबर 1960. 'D' चा अर्थ धोकादायक. ( Dangerous )
#VeerSavarkar Image
जी काही मालमत्ता होती ती सगळी जप्त केली होतीच मुंबई विद्यापीठामध्ये मिळविलेली बीएची पदवी आणि अगदी चष्मा सुद्धा !!!!

त्यांनी भोगलेल्या करावासातल्या यातनांचे पुरावे मागण्याआधी या बिल्ल्याकडे तरी पुरेसे ध्यान द्या.
पन्नास वर्षांचा तुरुंगवास !! ते ही राजकीय कैदी म्हणून नव्हे, धोकादायक गुन्हेगार म्हणून !!! सहा महिन्यांचा सक्तीचा, कठोर एकांतवास. दहा दहा दिवसांची खोडाबेडी. दुध देण्याची तरतूद असताना आजारी पडल्यावर केवळ भात-पाणी..
Read 6 tweets
Nov 18
रडल्याने आपली बाजू सत्य ठरत नाही"
मी आजारी आहे याचा गैरफायदा घेतला उठाव करणाऱ्या आमदार, खासदारांनी, नगरसेवकांनी आणि पक्ष नेत्यांनी.
मी सत्तेचा भुकेला नाही. लाथ मारली मी मुख्यमंत्री पदाला.
मी फक्त माझ्या वडीलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी धडपडत होतो.
बाळासाहेब माझे वडील आहेत. ते अन्य कोणाचे नाही होऊ शकत.
मला माझ्या मुलाच्या, आदित्यच्या भविष्याची चिंता करण्याचा अधिकार नाही काय?
माझ्या उध्दवला सांभाळून घ्या असे बाळासाहेबांनी सर्व शिवसैनिकांना आणि राजकीय क्षेत्रातील सर्व प्रमुख पक्षांना आणि प्रमुख नेत्यांना बजावले होते.
एकट्या साहेबांनी बाळासाहेबांचे आर्जव ध्यानात ठेऊन मला मदत केली, करत आहेत.
मी बाळासाहेबांचे इच्छेखातर आणि पवार साहेबांचे आग्रहाला मान देऊन मुख्यमंत्री पद स्वीकारले होते. नाही तर मी एकनाथ शिंदे यांचेच नाव सुचविले होते, ठरविले होते.
Read 15 tweets
Nov 17
Ironically, what the Congress forgets is that their own ideological father, Pandit Jawaharlal Nehru wrote a similar mercy petition to the Britishers.Let me remind to Rahul Gandhi that a chapter [“An interlude at nabha”] in Nehru’s autobiography “Toward freedom”.
#VeerSavarkar
Will you describe in your own words what happened in nabha? The ceremony was presided over by the veteran politician & statesman Lord Fenner Brockway, in the concluding part of his emotional message he said
"Savarkar of course I never met, but whatever I have read and heard about him, I have no hitch in saying that when Savarkar was fighting here for his motherland , the Indian national congress had not even thought of it."
Read 13 tweets
Nov 16
मुंबईचे इस्लामीकरण- धक्कादायक

मुंबईबद्दलची ही माहिती अतिशय धक्कादायक आहे. राजकीय पक्षाची विचारधारा कशी सोयीनुसार पूर्णपणे बदलते...जर तुम्ही मुंबईचे सर्वेक्षण केले तर तुम्हाला मुंबई शहरातील सर्व समुद्रकिनारे आणि रस्त्यांवर चहा, नाश्ता, ऑम्लेट, पाणी इत्यादी आढळतील..
ते सर्व मुस्लिम समाजाचे आहेत आणि ते सर्व एकतर इतर राज्यातील किंवा बांगलादेश किंवा रोहिंग्या आहेत. अगदी रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या नारळाच्या गाड्या किंवा भाजीपाल्याच्या गाड्याही हळूहळू मुस्लिम समाजाच्या ताब्यात गेल्या आहेत.
मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ग्रँड रोड येथील बहुसंख्य व्यवसाय एकेकाळी #मराठी आणि मारवाड्यांच्या ताब्यात होते. आज या संपूर्ण परिसरात तुम्हाला एकही #हिंदू व्यापारी सापडणार नाही.लोकसंख्येचा हा बदल अचानक झालेला नाही.
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(