🐢 Profile picture
Sep 24, 2020 13 tweets 3 min read Read on X
#Thread
#भाग२

*सत्यशोधकी विचारांची वृत्तपत्रे*

एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्रे ही मतपत्रे होती. त्यांनी लोकजागृती व लोकमत तयार करण्याचे काम केले. या काळातील सर्व नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशावर्गातील उच्चशिक्षितांनी सुरु केलेली होती.
ती शुद्रातिशुद्रांचे खरे प्रतिनिधीत्व करीत नाहीत, असा महात्मा फुले यांचा आक्षेप होता. 'निबंधमाला', 'विविध ज्ञानविस्तार' या सारख्या वृत्तपत्रांनी महात्मा फुले व सत्यशोधक मताचा विचार आणि कार्याचा विपर्यास करून निंदामूलक व गैरसमज पसरविणारी बेताल टीका केली. त्यामुळे सत्यशोधक
समाजाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी व विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एखादे पत्रक असावे असे सत्यशोधक मंडळीना वाटू लागले. या पार्श्वभूमीवर कृष्णराव भालेकर यांनी ध्येयवादाने प्रेरीत होऊन दिनांक १ जानेवारी १८७७ रोजी 'दीनबंधू' हे सत्यशोधक चळवळीचे पहिले नियतकालिक सुरु केले.
त्यामुळे बहुजन समाजाच्या ध्येयवादी, प्रबोधनपर, समाजनिष्ठ पत्रकारितेचे नवे पर्व सुरु झाले. कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेव बिर्जे, तान्हुबाई बिर्जे यांनी 'दीनबंधू चे संपादक म्हणून कार्य केले. 'सत्सार', 'दीनबंधू', 'दीनमित्र', 'राघव भूषण', 'मराठा दीनबंधु',
'जागरूक', 'जागृती', 'डेक्कन रयत', 'विजयी मराठा', 'भगवा झेंडा', 'तरूण मराठा', 'राष्ट्रवीर', 'प्रबोधन', 'संजीवन', 'सिंध मराठा', 'हंटर', 'मजूर', 'कर्मवीर', 'नवयुग', 'सत्यवादी', 'ब्राम्हणेतर', 'कैवारी', वगैरे प्रमुख नियतकालीके सुरु झाली. मराठी भाषिकांच्या सर्व भागापर्यंत ती पोहचत
होती. 'जागृती' हे साप्ताहिक बडोदयाहून तर 'सिंध मराठा' हे कराचीहून प्रसिध्द होत होते.

सत्यशोधक चळवळीच्या प्रचार व प्रसारासाठी पुरूष पत्रकारांप्रमाणे स्त्री पत्रकारांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. म्हणूनच'तानुबाई बिर्जें हया भारतातील पहिल्या सत्यशोधक महिला संपादक बनू शकल्या.
सत्यशोधक समाजाचे कार्य अलौकिक आहे. सत्यशोधक समाजाच्या कार्याविषयी 'ज्ञानोदय' मध्ये एक वाचक लिहीतो की, 'ज्ञानोदय होऊलागल्यामुळे मतलबी ग्रंथकारांचा लोप होऊ लागला आहे. आपले हक्क कोणते, परस्परांनी कोणत्या नात्याने वागावे, चांगले काय, वाईट काय, हे लोकांना कळू लागले आहे.
असे जे काम करतात ते त्यांपैकीच सत्यशोधक समाज होय. महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक विकासामध्ये सत्यशोधक चळवळीने परिवर्तनवादी कार्य केले. सर्वसामान्य जनतेत आज जो उत्साह, स्वावलंबनाची आवड, आत्मविश्वास, विवेकजागृती, गुलामगिरीचा तिटकारा आणि शिक्षणाविषयीची
तळमळ वैगरे गुण थोडया फार प्रमाणात चमकू लागले, आहेत ते केवळ या समाजाच्या चळवळीने केलेल्या कार्याचे आणि प्रयत्नांचे फळ आहे.

महात्मा फुले यांचे व्यक्तिमत्वही असेच महान व सर्वस्पर्शी होते. गेल्या दोन दशकामध्ये पिळवणूक, दडपशाही, प्रदूषण व दुष्काळ इत्यादी विरूध्द नव्या चळवळी
उभ्या राहिल्या. नव्या संदर्भात नव्या मागण्या घेऊन शेतकऱ्यांच्या चळवळी उभ्या राहिल्या. अशा काळात महात्मा जोतीराव फुले यांचा विचार व त्यांचे कार्य याचे मूल्यमापन होणे फार महत्त्वाचे आहे. त्यांनी शंभर वर्षापूर्वी दडपलेल्या जातीचे शोषण, स्त्रियांची गुलामगिरी, शेती,
पर्यावरणाचा प्रश्न, शेतकऱ्यांची लूट व शिक्षण याविषयी नवे मूलभूत विचार मांडले. दुसऱ्यावर विश्वास न टाकता, मध्यस्थांची गरज न बाळगता, स्वावलंबनाने व आत्मपरीक्षणाने स्वतःचा आणि समाजसेवेच्या रूपाने इतर बंधूभगिनींचा उध्दार करावा ही शिकवण आजही प्रेरणादायी आहे.
वरील माहिती "सत्यशोधक चळवळीचा परिक्षणात्मक आढावा मधून घेतलेली आहे.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🐢

🐢 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @kahipnapl13

Nov 27, 2020
अर्बन नक्सल, देशद्रोही, लुटियन गॅंग, सुडो लिबरल, खान मार्केट गॅंग, हिंदू विरोधी, धर्म विरोधी, कटमुल्ले, अॕन्टी नॅशनल, तुकडे तुकडे गॅंग, अवाॅर्ड वापसी गॅंग, इत्यादी ते आता खलीस्थानी...

हक्कासाठी उठणार्‍या प्रत्येक आवाजाचं दमन करण्यासाठी वापरली गेलेली ही हत्यार आहेत.
पण कुणा कुणाला बदनाम करणार, किती लोकांचा आवाज दाबणार आहात.
काल विद्यार्थी शिक्षणाच्या मुलभूत हक्का साठी संघर्ष करत होते, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तिथं यशस्वीही झालात पण ती लढाई ते आजही करत आहेत.
नामांकित विचारवंतांना देशाची धोरणे आधीच लक्षात आली त्यांनी त्यांच्या
पध्दतीने त्यांचा विरोध दर्शविला तुम्ही त्याची दखल घेणं सोडाच तुम्ही त्यांनाही टॅग लावून त्यांचा आवाज दाबला.
सगळी सरकारी संपत्ती उद्योगपतींच्या घशात घालत आहात त्यांना हवे तशे कामगार कायद्यात बदल केलेत आज देशभर कामगार वर्षात असंतोष आहे, त्यांनाही दाबण्याचे प्रयत्न चालू आहे
Read 5 tweets
Nov 2, 2020
#thread
३१ आॕक्टोंबर १९८४ रोजी #इंदिरागांधी ची त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी गोळ्या झाडून हत्त्या केली होती. त्यामागील कारण काय होते ? Operation blue Star काय होतं ? दमदमी टकसाल संघटना काय आहे ? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत..

#म #रिम (1/n)
१९७० साली पंजाबमध्ये एक संघटना उभारीस आली "दमदमी टकसाल" यांचे अध्यक्ष होते "जनरल सिंग भिंडरावाले" सुरवातीला यांच्या ५ मागण्या होत्या

१) यमुना - सतलज नदींना जोडणार्‍या कॅनल ला विरोध

२) पंजाबांचे वेगळे राज्य

३) चंदिगड हे फक्त पंजाबची राजधानी व्हावी (2/n)
४) कॅनलचे मुख्यालय पंजाबमध्ये व्हावे

५) रक्षा, विदेश, संचार, मुद्रा हे केंद्र सरकार ने सांभाळावे बाकीचे सगळे अधिकार राज्यांना द्यावे.
पुढे चालून या संघटनेनं उग्र रूप धारण केलं, जनरल सिंघ आपल्या उग्र भाषाणाद्वारे सिख लोकांना चिथवण्याचे कार्य केले बघता बघता संघटनेनं हजारो
(3/N)
Read 26 tweets
Oct 21, 2020
छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे महात्मा फुले
शिवरायांच्या राजधानीचे दर्शन घ्यावे ज्योतिबाला फार दिवसांपासून वाटत असे, त्या काळी आजच्या सारखी वाहनांची सोय नव्हती, पायी किंवा घोडा गाडीशिवाय प्रवासाला अन्य मार्ग नव्हता, इच्छा असूनही त्यांनी आपले जाणे लांबणीवर 👇(1/n)#म #रिम
टाकलेपण मनाची रूरत थांबेना, त्यासाठी १८६९ त्यांनी शिवाजी महाराजांचा एक सुंदर पोवाडा लिहून प्रसिद्ध केळ पण एव्हळ्यानेही शिवरायावरील निष्ठा स्वस्थ बसू देईना म्हणून त्यांनी रायगडाला प्रयाण केले. रायगडावर पोहचले त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी दिसली नाही, किल्ल्यावर 👇(2/n)
सगळीकडे गवत व झाडे झुडुपांचे जंगल माजलेले, धड रस्ता नाही, की मनुष्यवस्तीची चिन्हे नाही. ज्योतिबांनी चारही बाजूला पाहिले, काही दगड विस्कटलेले दिसले. ज्योतिबा त्या दिशेने आधाशासारखे धावत गेले. ती शिवरायाची समाधी होती. तिची ही दुर्दशा पाहून त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. 👇(3/n)
Read 9 tweets
Oct 19, 2020
#थ्रेड

आज ६३ दिवस झालेत पत्रकार प्रशांत कनोजीया जेल मध्ये आहे. त्याची पत्नी @jagishaarora त्यांच्यासाठी धैर्याने लठा देत आहे...

सध्याच्या काळात आपण पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्याबाबत अनूभवत आहोत 👇+

feminisminindia.com/2020/10/19/jag…
तसं प्रत्येक सरकार कमी, जास्त दमनकारी असतंच पण उ.प्र. मध्ये दमनकारीकतेचा कळसच

१८ आॕगस्ट रोजी प्रशांत च्या पत्नी जगीशाचा @jagishaarora वाढदिवस होता आणि त्याच दिवशी प्रंशातला अरेस्ट करण्यात आलं. बरं त्याचा गुन्हा तरी काय तर एक 👇+ Image
फोटो ट्विट केला.

१. खरा फोटो असा होता की UPSC मधून अभ्यासक्रम काढून वैदिक करावा
२. प्रशांत ने ट्विट केलेल्या फोटोत होत की SC,ST, OBC नां राम मंदिरात प्रवेश नाकारला जावा

हे इडिटेड फोटो आहे हे लक्षात येताच प्रशांतने ट्विट डिलीट केलं 👇+ ImageImage
Read 8 tweets
Oct 10, 2020
मोदींनी सहा वर्षात घेतलेल्या निर्णयांची आणि केलेल्या इव्हेंट्सची यादी तयार केली आहे कोणीतरी, वाचा
● एअरपोर्ट विकले
● रेल्वेचे खासगीकरण
● BSNL मोडीत काढली
● बँकांचे एकत्रीकरण करून रोजगार घटवला

👇👇
● ONGC करीत असलेले 95%काम रिलायन्सला दिले
● फेल गेलेल्या नोटबंदीत 139लोकांना जीव गमवावा लागला
● निरव मोदीला 456कोटी रु रोख रक्कम आणि सोन्याची बिस्किटे घेऊन पळवाट करून दिली
● स्वतःच्या मतदारसंघात 40लाख एकूण लोकसंख्या असताना 42.5लाख टेस्ट केल्याचे सांगितले
👇👇
● काँग्रेसवर खोटे आरोप करीत राहिले , पण सिद्ध एक ही केले नाही
● नोटबंदीच्या इव्हेंटसाठी स्वतःच्या 87 वर्षाच्या आईला ATM च्या लाईनमध्ये लावून इव्हेंटद्वारे सहानुभूती मिळवली
● राफेल घोटाळ्याबाबत संयुक्त संसदीय समिती द्वारे चौकशी होऊ दिली नाही
👇👇
Read 15 tweets
Sep 24, 2020
#thread
#भाग१
#सत्यशोधकसमाज

२४ सप्टेंबर १८७३ रोजी ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आज १४७ वर्षे झालीत.
सत्यशोधक समजाचा संपूर्ण भारताच्या जडणघणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया (1/19)

👇👇👇
भारतीय सुधारणा चळवळी मध्ये महात्मा फुले यांच महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांनी स्त्री, शुद्रादी, अतिशुद्रांना सन्मानाचे व समतेचे जीवन जगता यावे, यासाठी पुरूष प्रधान संस्कृती व जातीभेद यांच्यावर कठोर प्रहार केले. संपूर्ण सामाजिक संरचना क्रांतिकारक रित्या बदलल्याशिवाय स्त्रियांची(2)
बंधमुक्तता, जातीभेदाचे निमूर्लन व समता निर्माण होण्याची मुळीच शक्यता दिसत नव्हती. ही गोष्ट एकटयाने होणे शक्य नव्हते. निश्चित अशी विचारसरणी, तत्त्वज्ञान निश्चित करून संघटना निर्माण करण्याची आवश्यकता होती. (3/19)
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(