काही महत्त्वाच्या Technical Discussion साठी गेलो होतो. आमचे ऋणानुबंधही तसे चांगले आहेत.
त्यांनी लगेच बेल वाजवली आणि दरवाज्यातून त्यांचा ॲाफीसबाॅय आत आला, मी त्या ॲाफीसबाॅकडे पाहिले आणि म्हणालो - “सतिशला माहित आहे”
आणि त्यानेही हलकेच हसून मान डोलावली... 2/15 #SaturdayVibes
साहेबांकडे पाहून सतिशने “तुम्ही, काय घेणार सर? असे विचारले, साहेबांनी त्याला त्यांच्यासाठी काॅफी आणायला सांगितले. तो ही लगेच केबिनमधून बाहेर गेला.
जाताजाता मला एका हाताने नमस्कार केला आणि मी ही त्याला तसाच प्रतिसाद दिला.
“तु या सतिशला कसा काय ओळखतोस? आणि तो ही तुला कसा?”3/15
साहेबांनी काम बाजूला ठेवले आणि तोंडाचा चंबू करून एकदम आश्चर्याने माझ्याकडे पहायला लागले..
मी त्यांना शांतपणे आठवण करून दिली की “मागे मी जेंव्हा आलो होतो तेंव्हा हाच होता की आणि मी त्याला सांगितलेले,सकाळी मी काॅफी घेत नाही म्हणून” हे उत्तर ऐकून त्यांचे काही समाधान झाले नाही 4/15
त्यांनी पुन्हा विचारले, “अरे पण तुला इथल्या ॲाफीसबाॅयचे नाव बरोबर लक्षात कसे?
बर ते एकवेळ तुझी स्मरणशक्ती त्यातल्या त्यात बरी म्हणून मान्य करू पण त्याने तुला कसे ओळखले?
आणि त्याला तू काय घेणार हे त्याला कसे काय कळले वा आठवतेय, हे कसे काय शक्य आहे?” 5/15
मी त्यांना म्हटले “बरं, थोडा वेळ थांबा आणि पहा तो माझ्यासाठी लिंबु पाणी घेऊन येईल....”
आणि पाच-दहा मिनिटात सतिश केबिनमध्ये आला.....ट्रे मधे काॅफी, कुकीज आणि माझ्यासाठी लिंबूपाण्याच्या ग्लाससह.....
मी सतिशकडे पाहून मनापासून त्याला धन्यवाद म्हटले आणि साहेबांकडे पाहिले, 6/15
तो आम्हाला सर्व्ह करून केबिनमधून बाहेर पडला.
तोपर्यंत साहेब माझ्याकडे, मी काही जादूगार आहे आणि काहीतरी जादूचा प्रयोगच सादर केलाय या थाटात माझ्याकडे कुतूहलाने पहात होते....
“खरं सांग, त्याला कस कळलं तूला लिंबु पाणी हवयं, कारण आपण दोघे तर बरोबरच ॲाफीसमधे आलोय आणि ..
7/15
तु तर त्याला आत्ता माझ्यासोबतच भेटलास... हे कसे काय मग आश्चर्य?”
मी खळखळून हसलो आणि म्हणालो, “सर आपण माणसांशी कसे वागतो, काय बोलतो आणि त्यांच्यासाठी काय करतो यावर बरेच अवलंबून आहे” मी सांगत होतो आणि साहेब एकदम कान देऊन ऐकत होते.
मी म्हटले “हा सतिश, या ॲाफीसमधे... 8/15
गेली चार-पाच वर्ष झाली काम करतोय, याआधी मी बऱ्याचदा इथे आलोय, आणि या ॲाफीसमधून निघताना मी नेहमी त्याच्याशी जाताजाता दोन-पाच मिनिटे तरी बोलून जातो....
त्यात, त्याचे घरचे कसे आहेत? तो कसा आहे, बऱ्याचदा साहेब लोकं ॲाफीसमधे नसतात तर मग काय करावे? काही वाचन वगैरे करतोस का? 9/15
हे मी निघताना त्याला सहजच विचारतो....
“सतिश दुर्गम खेडेगावातून आलेला गरीब पण अत्यंत हुशार मुलगा आहे, आईवडील गावी शेती करतात, तो मुक्तविद्यापिठातून पदवी घेतोय...”
“.....आणि त्याने गेल्या वर्षी BA ची फायनल परिक्षाही दिलीये.....” हे वाक्य जेंव्हा मी त्याच्याच साहेबाला ..10/15
सांगितले तेंव्हा ते फक्त खुर्चीतून तीन ताड उडायचेच बाकी होते.
त्यांनी खुर्चीतून उठून अत्यंत प्रेमाने त्यांचा हात पुढे केला आणि आपुलकीने माझ्यासोबत हॅंडशेक केले...त्यांना उत्तर भेटले होते.
मंडळी, सतिश असो की अजून कोणी आपण या लोकांना त्यांच्या नावाने ओळखण्यामुळे, चारचौघात 11/15
आपुलकीने बोलल्यामुळे आणि चार चांगल्या गोष्टी (त्यांच्या वैयक्तिक प्रगतीच्या ) सांगितल्या तर त्या कोणाच्याही अंतर्मनाला स्पर्श करतात. ..
मला मुंबईत येऊन वीस वर्षे झाली, आणि माझा स्वानुभव आहे की तुम्हाला माणूसकी, खरे कष्ट, मोठी स्वप्न आणि मुंबई स्पिरीट हे फार मोठ्या प्रमाणात 12/15
याच कष्टकरी तरूणांमधे दिसेल.
मी ही असाच गावाकडून आलो होतो,तेंव्हा कोणी प्रेमाने बोलले की खुप बरे वाटायचे, चार गोष्टी शिकवायचे, चुकले तर समजून घ्यायचे, मदत करायचे. आजही ते सर्व लोक लख्ख पणे आठवतात आणि मी तर कायमच त्यांचा ऋणांत आहे.
असे कितीतरी “सतिश” कित्येकांच्या लेखी आज 13/15
फक्त एक ॲाफिसबाॅय,नवे इंजिनियर कामगार किंवा हेल्पर असतील पण ते त्यांच्यात्यांच्या कुटुंबाचे महत्वाचे आर्थिक आधार, कुटूंबप्रमुख असतात, त्यांनाही स्वप्न असतात, परिस्थितीवर मात करण्यासाठीची ते पण लढाईच लढत असतात.
त्यांची विचारपूस करा,त्यांच्याशी प्रेमाने बोला,नावाने हाक मारा 14/15
शक्य असेल तर नक्की काही मदत करा” आणि पहा, अनुभवा - “माणूसकीची खरी जादू”
आपल्या स्वप्नांवर कुत्सितपणे हसणाऱ्यांना कधीही उत्तरं द्यायचं नसतं……आपल्या समाजाचा खूप मोठा हिस्सा अशा लहान लहान लोकांनीच भरलेला आहे.
हे वाक्य लहानपणापासून प्रचंड अवहेलना वाट्याला तमाशात काम करणाऱ्या वडीलांच्या मुलाचे आहे. तो एका मल्टीनॅशनल कंपनीत मलेशियात कंट्री हेड आहे.
कोण कोणाच्या पोटी जन्म घेतो. त्याचे आईवडील काय करतात? त्याची जात कोणती? धर्म कोणता? भाषा? रंग ? किंवा प्रांत यात कशातच कोणाला जन्माच्या आधी चॉइस नसतो. मग जी गोष्टीत आपले काहीच कर्तृत्व नाही त्याचा फुकाचा अभिमान बाळगून काय हशील?
आपापल्या कर्तृत्वाच्या जोरावर जो तो पुढे जातोच. एखाद्याच्या स्वप्नपुर्तीसाठी आपण हातभार लावत नसू तर निदान हे कुत्सितपणे हसणं किमान एकविसाव्या शतकात तरी थांबायला हवं.
काळ बदलला आहे. इंटरनेट आणि जगाच्या स्पर्धेत आपल्या माणसांनी आता १८ व्या, १९ व्या, २० व्या शतकातून बाहेर पडून
आपल्याकडे इंडस्ट्री आल्या, शहरीकरण वाढले,पायाभूत सोईसुविधांसाठी सरकारकडून जमिनींचे अधिग्रहन झाले.
खाजगी उद्योगासाठी,बिल्डींग्जसाठी जमिनींचे व्यवहार झाले.अनेकांकडे अचानक खूप पैसे आले.
काहींनी तो पैसा जपला परंतू बरीच मंडळी तो पचवू शकली नाहीत
#आर्थिकसाक्षरता #SaturdayThread १/१४
त्यातच इंटरनेटमुळे जागतिकीकरणास अधिक गती मिळाली.
काही मंडळी चांगली शिकली. काहींना सरकारी/खाजगी नोकऱ्या लागल्या.
चांगले पगार मिळायला लागले.
काहींनी उद्योग व्यवसायातून पैसा उभारला. बहुतांश लोकांनी आपापल्या बौद्धीक व सामुहीक परंपरेनुसार तो पैसा जसा वापरता येईल तसा वापरला,
२/१४
काहींनी तो गुंतवला.
ते करत असताना मात्र यातल्या अधिकाधिक लोकांनी तो रिअल इस्टेट, गाड्या,टोलेजंग घरं, ब्रॅंडेड वस्तू,गॅझेट्स, लग्न समारंभ, खाणपिणं, राजकारण किंवा एकमेंकांच्या द्वेष व मत्सरापोटी खर्च केला.
यातले बहुतांश फार लवकरच कफल्लक झाले किंवा पहिल्यापेक्षा अधिक गरिबीत
३/१४
बऱ्याचदा स्वतःच्याच क्षमता आपल्याला नीट उमजत नाहीत….. सहसा गरीब, निम्नमध्यम वर्गीय किंवा समाजाच्या खालच्या स्तरातल्या कुटूंबात तर कोणी यावर साधी चर्चाही करत नाही.
काय करावं, कुठे जावं काही समजत नाही!
तूला जसं जमतेय ते कर यामागे स्वातंत्र्य नसते तर - नक्की आपण काय सांगायचं हे अगतिक अज्ञान असतं.
कितीतरी जीव फक्त - आता पुढे काय करायचं या प्रश्नापुढे जातच नाहीत…. एक भयंकर न्यूनगंड (जे जवळपास प्रत्येकातच असतो) आहे त्या परिस्थितीतच ठेवतो…..
निर्लज्ज पणे करियर बद्दल प्रश्न विचारता यायला हवेत, तसं वातावरणं तयार व्हायला हवं. खर तर पुस्तकं, इंटरनेट आणि समाजमाध्यम यात फार मोठी भूमिका निभावू शकतात पण त्यात फार कोणाला इंटरेस्ट नसतो….. ट्रॅक्शन नसतं… हे जग नक्की आपल्याला कुठे घेवून चाललंय?