संघटना ही कार्यकर्त्यांच्याच जीवावर असते हे खरंय. संघटना आपल्यासाठी असतेच. पण आपल्याशिवाय संघटनाच नाही किंवा आपणच म्हणजे संघटना असं कधीच होत नाही. "प्रत्येक जण महत्वाचा पण अपरिहार्य कुणी नाही" हे आम्हाला अभाविपमध्ये शिकवलं, हे फक्त तेव्हाच काम करताना उपयोगाला आलं असं नाही तर+
आजन्म ज्या ज्या क्षेत्रात आपण जातो त्या त्या ठिकाणी कायम उपयोगाला येतं.काल भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यावर अनेकांनी अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या.काही तर असंही म्हणाले की "भाजपाला गळती लागली, भाजपा संपण्याच्या मार्गावर आहे, भाजपचा अंत जवळ आलाय."+
पण त्यांना मुळात कार्यपद्धती माहिती नाही, संघटनेचं "तत्व" माहिती नाही.

नाथाभाऊ जेष्ठ आहेत, आदरणीय आहेत, अनुभवी आहेत, त्यांनी पक्षासाठी मेहनत घेतलीय, पक्षाला समाज मान्यता मिळवून देण्यासाठी अपार कष्ट केले, बिकट परिस्थितीत पक्ष सामान्य माणसांच्या घरापर्यंत नेला हे भाजपाचा शेवटचा+
कार्यकर्ता किंवा हितचिंतक कधीच आणि कुणीही आजही नाकारत नाही. नाथा भाऊ म्हणतात की, "ज्या काळात शेण फेकलं, अंगावर थुंकलं, लोकांनी मारलं, वाळीत टाकलं त्या काळात आपण भाजपाचा झेंडा जनमानसात रुजवला. म्हणजे गेली 40 वर्षे अव्याहतपणे भाजपाचा जयजयकार केला." हेसुद्धा माझ्यासारख्या सामान्य+
कार्यकर्त्याला मान्य आहे. पण नाथाभाऊंनी ज्या पक्षाचे 40 वर्षे काम केले त्या पक्षाने आपल्याला काय काय दिलं?आणि जे दिलं ते समाधानकारक नाही का? लोकांनी दिलेला त्रास ज्या पद्धतीने नव्या पिढीला सांगता, समाजमाध्यमात सांगता त्याच पद्धतीने, त्याच आविर्भावात पक्षाने दिलेली जबाबदारी, पदे,+
मोठेपणा आणि सर्व प्रकारची ताकद का सांगत नाहीत हे कळायलाच मार्ग नाही!
मीच मोठा, त्या पदावर फक्त मीच, दुसऱ्यांपेक्षा मीच महत्वाचा हा भाव कधी कधी आपल्याला हानिकारक ठरतो आणि तो नाथाभाऊंना ठरला. न्याय हा फक्त भाजपातच मिळू शकतो हे मी उदाहरणांसह पटवून देऊ शकतो, भाजपा हा केवळ पक्ष नाही+
तर परिवार आहे.

विधानसभा निवडणुका रणधुमाळी सुरू झाली, महाराष्ट्रावर अनेकांच्या नजरा होत्या, भाजपा - सेना युती झाली आणि जागावाटप सुरू झालं, भाजपाने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या, अनेक दिग्गज नेते, ज्यांच्या कोअर टीममध्ये पूर्वी महाराष्ट्र भाजपने निवडणुका लढल्या होत्या,+
नेते म्हणून महाराष्ट्रभर फिरले होते, देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या आणि पहिल्या 5-6 क्रमांकाच्या वजनदार मंत्री म्हणून काम केलं होतं अशांना उमेदवारी मिळाली नाही, अगदी शेवटच्या यादीपर्यंत उमेदवारी मिळाली नाही, मात्र कोणतीही तक्रार न करता, शांतपणे निवडणुका पार पाडल्या,+
पक्षाने आपल्या जागी बदलून दिलेला उमेदवार तन, मन, धन अर्पून पराकाष्ठेने निवडुन आणला. पक्षाने घेतलेला निर्णय योग्य असेल, माझ्याबाबतीत काहीतरी विचार केला असेल असं समजून कार्यरत राहिले आणि भारतीय जनता पार्टीने ज्या नेत्याला दावेदार असताना, निवडून येण्याची गॅरंटी असतानाही विधानसभेचं+
तिकीट दिलं नाही, त्या नेत्याला तब्बल एक वर्षाने भारतीय जनता पार्टीचा "राष्ट्रीय सचिव" केलं. त्या नेत्याचं नाव विनोदजी तावडे आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत भाजपात, नेत्याला वाटत असेल की आपल्यावर अन्याय झाला, असूही शकते मात्र न्याय देण्याची भूमिका ही केवळ भाजपातच आहे.

नाथा भाऊंच्या+
पक्षातून जाण्यानं नुकसान झालं वगैरे ठीक आहे, पण एखाद्या नेत्याला जर भरभरून देऊनही अन्याय वाटत असेल तर विचार पक्षाने नाही त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी जरूर करायला हवा. दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक, सूत गिरणी, महामंडळ, आमदार, विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री, खासदार असं सगळं+
भरभरून दिलं, आणि कायम दिलं. एकट्यालाच नाही तर घरातील 4-5 सदस्याला दिलं. म्हणजे पदं घरात कायम पाणी भरत ठेवली. तरीही अन्याय झाला!
"समय बडा पहेलवान होता हैं, यानुसार पूर्वीचा काळ वेगळा होता, आता वेगळा आहे. नेतृत्व बदलते, कामाची पद्धत थोडी वेगळी असेल. पण कार्य पद्धती आणि तत्व कधीच+
बदलत नाही. ज्या माणसाचं नातं तत्वाशी असतं ती माणसंही कधी बदलत नाही, दूर जात नाहीत, अन्याय झाला म्हणून घर सोडून बाहेर पडत नाहीत.

नाथा भाऊंच्या जाण्यानं मला वाईट वाटलं नाही, कारण गेल्या 2-3 वर्षांपासून केवळ भाजपच्या सर्वमान्य नेतृत्वावर कायम पक्षात राहूनच टीका करणारे, विरोध+
करणारे नेते पक्षात काय कामाचे? त्यापेक्षा सरळ विरोधात गेलेले कधीही चांगलेच आहे. अवघ्या महाराष्ट्राने ज्यांच्यावर विश्वास दाखवला त्या देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या एकनाथ खडसेंनी आता आवरते घेऊन जाणाऱ्या नवीन पक्षात हिरहिरीने काम करावं. आपला असलेला आदरभाव असाच जपावा,+
नाहीतर सतत आरोप आणि टीका करत रहाल तर आपल्याबद्दलची उरली सुरली आत्मीयता, आदरभाव आमच्या मनातून गमावून बसाल. आयुष्यभर ज्यांच्या विरोधात आवाज उठवला त्यांच्या पाया पडणारे नाथाभाऊ पाहून जरूर वाईट वाटलं, पण जे नाथाभाऊंनी स्वीकारलंच आहे त्याला आपण करी काय करणार!

नाथाभाऊंच्या सून आणि+
भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे भाजपातच असतील असं नाथाभाऊ म्हणतात मात्र मुलगी रोहिणीताई खडसे या त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत जात आहेत. म्हणजे ही निष्ठा नाही, पद जाण्याची भीती आहे म्हणून हे सगळं चाललंय. निष्ठा असती तर एकसंघ खडसे परिवार भाजपच्या सोबत असला असता. मुलीला भाजपाने तिकीट+
दिलं, आता पराभव झाल्याच्या नंतर तुम्ही पाडल्याचा आरोप करणार, निवडून आल्या असत्या तर पक्ष बदलला असता का? हा संशोधनाचा विषय आहे.
नाथाभाऊंवर अन्याय एवढाच झाला की वर्षानुवर्षे पदाच्या गराड्यात राहिल्यानंतर आता पद नसणे याची त्यांना अस्वस्थता वाटत असावी, सगळं मलाच हवं हा भाव त्यांना+
सत्तेकडे ओढत आहे. पक्षांतराकडे ओढत आहे. केवळ बदनामीसाठी एक नाव हवं होतं, ते नाव देवेंद्रजींचं घेतलं. पण असो. तुमच्या एका विरोधात जाण्यानं देवेंद्रजींचे काय वाईट होईल!

असो, नाथाभाऊंच्या निर्णयाला खूप शुभेच्छा! त्यांच्या जागी भाजपात नवं नेतृत्व येईल, जागा खाली केल्याबद्दल आभारच,+
कारण त्या ठिकाणी एका नवीनला संधी उपलब्ध होईल. नाथाभाऊंचा निर्णय बरोबर की चुकीचा याचं उत्तर येणारा काळ देईल, कारण समय बडा पहेलवान हैं....☺☺

पटलं तर शेअर करा.🙏

- विकास विठोबा वाघमारे

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with vikas waghamare

vikas waghamare Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @WaghamareVikas

19 Oct
पावसामुळे शेतकरी उध्वस्त झालाय आणि अनेकांच्या टीकेनंतर कित्येक महिन्यांनी मुख्यमंत्री घराबाहेर पडले आहेत. घराबाहेर पडले म्हणजे जणू उपकारच केला आहे अशा अविर्भावात त्यांचा दौरा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फसव्या घोषणा करणारा हा माणूस आता नुकसानाची पाहणी करायला सांगवी+
खुर्द ता. अक्कलकोट येथे आला.

अक्षरशः गाव पाण्यात गेलं आहे, कित्येकांचे नुकसान झाले आहे, शेती वाहून गेली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ पाहणीचा फार्स करायला आले आहेत. त्यातही हद्द ही केली की, बोरी नदीच्या पुलावर शेतकऱ्यांना भेटायला बोलावलं आहे, कारण काय असेल! गावात जायला+
भीती वाटते? रस्त्यात चिखल आहे? त्याहून मोठी गोष्ट अशी की, ज्या पुलावरून हे पाहणी करत आहेत तिथे पाहणी करण्यासाठी एक स्टेज उभारला आहे, हा काही महाबळेश्वर पाहणी दौरा नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेलं पाणी पुसण्यासाठी तुमची गरज आहे म्हणून बोलावलं होतं. त्या खुर्चीवर आहात म्हणून+
Read 8 tweets
22 Sep
कृषी विधेयके रद्द करा -खा. शरद पवार
😂🤙

● जेव्हा सभागृहात विधेयकावर चर्चा होती तेव्हा साहेब गैरहजर होते.
● जेव्हा सभागृहात विधेयक मंजूर होत होते तेव्हा साहेब गैरहजर होते.
●जेव्हा विधेयक मंजूर होत होते तेव्हा राष्ट्रवादीच्या उरलेल्या राज्यसभा खासदारांनीही सभात्याग केला होता.+
● साहेबांना स्वतःला कारखाने, सहकारी संस्था वगैरे प्रचंड आवडतात पण शेतकरी व्यापक भूमिकेवर येतोय, डेव्हलपमेंटच्या संधी दिसताहेत, कॉर्पोरेट कंपन्या आता ग्रुपच्या माध्यमातून शेतकरीही करू शकतो, कॉर्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांच्या बांधावर जातील, शेतकऱ्यांकडे तंत्रज्ञान येईल असं हे उज्वल"+
भविष्य दिसायला लागले तर लगेच आता विरोध सुरू केलाय!

कार्यकर्त्यांनो, तुमच्या साहेबांना एकच प्रश्न विचारा, जर हे विधेयक इतके वाईट आहे तर सभागृहात चर्चेला का नव्हतात? मंजूर होताना मतदान (विरोधात/समर्थनात) करायला सभागृहात का नव्हतात? राष्ट्रवादीच्या बाकीच्या खासदारांना पण सभात्याग+
Read 6 tweets
20 Sep
आज राज्यसभेत 'कृषी सुधारणा विधेयके' मंजूर झाली आणि खऱ्या अर्थाने देशातल्या अवघ्या शेतकऱ्यांना आनंद झाला. खरंतर हा क्षण यायला 70 वर्षे उलटून गेली मात्र कोई माय का लाल हे करू शकला नाही पण "नरेंद्र दामोदरदास मोदी" या युगपुरुषाने हे करून दाखवलं. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तळहातावर+
फोड घेऊन, कधी अनवाणी पायाने, अंगावर चिंध्या पांघरून, मिरची भाकरी खाऊन अवघ्या जगाला पोसण्याचं काम हा शेतकरी मायबाप करतो. सगळं जग थांबलेलं होतं तेव्हाही माझा बाप शेतात राबत होता कारण तो शेतकरी आहे. पण त्याच शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी, त्याच्या पायातल्या बेड्या सोडवण्यासाठी आजचा+
दिवस यावा लागला. हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंद होणारा दिवस आहे, आणि हे भारतीय जनता पार्टीने करून दाखवले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो आहे.

या नवीन विधेयकांमुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे आणि ‘एक देश एक बाजार’ या संकल्पनेला प्रोत्साहन मिळणार आहे. शेतकऱ्यांना बाजार+
Read 27 tweets
18 Sep
👇हा व्हिडीओ(48 सेकंदानंतर बघा) पाहिल्यापासून भयंकर अस्वस्थ आहे,निशब्द, हतबल आहे. डोळ्यात पाणी कधी आलं कळलं नाही. राज्य अक्षरशः मरतय..😢
कोरोनाच्या भयंकर परिस्थितीवर बोलताना हुंदका देऊन रडणारा नितळ मनाचा माणूस कोण हे माहितीय का! हे आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजी+
प्रमुख ओमप्रकाशजी शेटे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षात 21 लाख रुग्णांना 1500 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देत उपचार करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी.
राज्यातली कोरोनाची परिस्थिती भयंकर वाईट आहे, भयंकर वाईट!😢 लाखों लोकं उपचारासाठी+
धडपड करताहेत...घरदार विकताहेत..ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना कोणीच उभा करत नाही. सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही. सत्ताधारी घराच्या बाहेरही पडत नाहीत, लोकांना वाली कोणीच नाही... भावांनो, आत्तापर्यंत राज्यात कोरोनामूळे तब्बल 31 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालाय.😢+
Read 5 tweets
17 Sep
राज्यात एकीकडे कोरोनाचा हाहाकार माजला आहे, परिस्थिती अक्षरशः हाताच्या बाहेर गेलीय, महाविकास आघाडी सरकार नागरिकांना फसवत आहे, लुटत आहे. नागरिकांना बेड मिळत नाही, उपचार मिळत नाही, व्हेंटिलेटर नाहीत, अम्ब्युलन्स नाही, ऑक्सिजन नाही आणि ज्यांना या व्यवस्था मिळतात त्यांना लाखोंची बिलं+ Image
दिली जातात,ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना रुग्णालयात घेतलेच जात नाही, मग तो त्याच्या नशिबाने वाचला तर वाचला नाहीतर तरफडत मरण येतच आहे.ही विदारक परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या राज्यात असताना त्या विरोधात सरकारला जाब विचारत एका व्यक्तीने दंड थोपटले आहेत.+
ते म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे माजी कक्षप्रमुख श्री. ओमप्रकाश शेटे सरांनी.
केवळ त्या विरोधात आवाजच उठवला नाही तर त्यांनी राज्य सरकारच्या आरोग्य क्षेत्रातले कोरोना उपचार संदर्भातील घोटाळे आणि फसवणुक पुराव्यासह मुंबईच्या हुतात्मा चौकात मांडून सिद्ध करतो, चर्चेला या असे+
Read 21 tweets
15 Sep
मराठा आरक्षण संदर्भात होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीचे देवेंद्रजी फडणवीस यांना राज्य सरकारने आमंत्रण दिलेलं नाही.
एकीकडे परवाच आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले होते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यात आल्यानंतर सर्वपक्षीय बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार.
मुळात+ Image
देवेंद्रजींना सोबत घेतल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही कारण अभ्यास करणं हे तुम्हाला झेपणारी गोष्ट नाही.
भाजपा बद्दल केवळ द्वेष पसरवण्याचे काम काही मीडिया आणि सरकारमधल्या व्यक्ती करत आहेत. आज काही बातम्या अशा होत्या की "देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसल्याने मराठा आरक्षण+
विषयाची बैठक रद्द होणार आहे." मात्र देवेंद्रजींना मुळात राज्य सरकारने बैठकीचे निमंत्रणच दिलेले नाही, जर बैठकीचे निमंत्रण मिळाले तर आज देवेंद्रजी बिहार वरून परत येणार आहेत, त्याच क्षणी बैठकिला उपस्थित राहू शकतात. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रजींना फोन+
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!