मित्रानो गेल्या १० महिन्यात आपल्या आसपासच्या समाज जीवनात सर्वच थरांवर खूप मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली ,याच घटनेचे जे निरीक्षण प्रसिद्ध मानसतज्ज्ञ मयुरेश डंके यांनी केले आहे त्यातील शब्दन्शब्द खरा आहे, मी तरी माझ्या आजूबाजूला या सर्व घटना घडलेल्या पहिल्या आहेत @PadmakarTillu
आपल्यापैकी बरीच जणांनी हि पहिल्या असतील त्यावरच आधारित त्यांचा हा लेख आपल्याला नक्कीच अंतर्मुख करेल
"जिंदगी इतनी आसान नहीं होती!"
मी गेले काही दिवस अगदी नियमानं दररोज निरीक्षण करतोय, तेव्हा असं लक्षात आलं, की मोठमोठ्या शहरांमधून माणसांचं स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढतंय.
लोक ओझी कमी करतायत. कारण त्यांना हे सगळं झेपण्याच्या पलीकडं गेलंय. आणि ते नुसते जात नाहीयत,कायमचे जातायत. घर आणि घरातल्या वस्तू मिळेल त्या किमतीला विकून जातायत. मोठ्या शहरांमध्ये राहणं त्यांना परवडत नाहीय आणि पुढेही परवडणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलंय @Arya00716@KohaleMangla
आणि त्यांनीही ते स्वीकारलंय, असं दिसतं. हे लक्षात कसं आलं?
पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमधून घरातल्या वापरलेल्या वस्तू विकण्याचे काही ग्रुप इंटरनेटवर आहेत. काही वेबसाइट्स आहेत. त्यावर घरातली इलेक्ट्रॉनिक उपकरणं, फर्निचर, गाद्या, उशा, वाहनं इत्यादी विकण्याचं प्रमाण
गेल्या तीन महिन्यांपासून दिवसेंदिवस वाढतंय. गेल्या काही वर्षांमध्ये शहरांच्या आजूबाजूचा जो नागरी भाग वेगानं वाढला, तिथल्या सदनिका भाड्यानं देणं किंवा विकण्याचं प्रमाण वाढतंय. अगदी एक-दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या जागासुद्धा लोक सरळ विकून टाकून कर्जमुक्त होण्याच्या प्रयत्नात आहेत
स्वत:चं घर घेऊन पंचवीस वर्षं हप्ते भरण्यापेक्षा भाड्यानं राहिलेलं बरं, असा विचार लोक पुन्हा करताना दिसतायत.किंवा मोठी शहरं सोडताना दिसतायत. वरवर पाहता, आपल्याला यात फार काही विशेष जाणवणारही नाही; पण बदलाचं चक्र फिरायला लागलंय आणि हळूहळू वेग धरायला लागलंय, हे मात्र निश्चित
संधी वाढतायत की कमी होतायत, हा प्रश्न कदाचित वादाचा होऊ शकेल; पण संधी बदलतायत, हे सत्य आहे. माझ्या अतिशय जवळच्या परिचयातल्या जवळपास शंभराहून अधिक लोकांनी खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.अगदी पिठांपासून ते विविध पदार्थांच्या ऑर्डर्स घेण्यापर्यंत
कुणी केक विकायला सुरुवात केली,कुणी चटण्या विकायला सुरुवात केली, कुणी चॉकलेट्स विकायला सुरुवात केली,कुणी इडल्या किंवा वडे विकतायत.सगळे घरगुती! बरं, हे सगळं करणाऱ्यांची शिक्षणं पाहिली,की आपलीच जीभ टाळ्याला चिकटेल
यांच्यातल्या बहुतांश लोकांची शिक्षणं पदव्युत्तर शिक्षणापेक्षासुद्धा अधिक झालीयत.एमएससी झालेल्या व्यक्तीला उटणं विकण्यात अचानकच इंटरेस्ट कसा काय येतो? साड्या,ड्रेस मटेरियल्स, इमिटेशन ज्वेलरी,पर्सेस,बेडशीट्स,चादरी, रेडिमेड कपडे, घरगुती शॅम्पू,हर्बल साबण, फिनाइल्स, फ्लोअर क्लीनर्स
अशा गोष्टी घरगुती तत्त्वावर विकणाऱ्यांची संख्या गेल्या दहा महिन्यांमध्ये अचानकच वाढली,अजूनही वाढतेय.पापड, लोणची, चटण्या, मेतकूट, आमसुलं, आलेपाक, इतकंच काय,पण कांदे-बटाटे विकणारेही आहेत.पाणीपुरीच्या पुऱ्या विकणारे आहेत.भीमसेनी कापूर विकणारे आहेत @smitprabhu@Abhikapshikar
ही सगळी विक्रेते मंडळी पदवी किंवा त्याहीपेक्षा अधिक शिकलेली आहेत.काही महिन्यांपूर्वी आपण असं काही करावं हे यांच्या कल्पनेतही नव्हतं; पण कर्मधर्मसंयोगानं आज ते या क्षेत्रात उतरले आहेत. मी यांच्यातल्या अनेकांना फोन केले,व्हिडिओ कॉल्स केले आणि त्यांच्याशी बोललो
यांच्यात अनेक वैद्यकीय पदवीधर आहेत,अनेक अभियांत्रिकी पदवीधर आहेत.‘अरे, गुंतवणूक काही नाहीय; पण रोज एखादी ऑर्डर मिळाली तरी तेवढेच चार पैसे मिळतील,’ असं उत्तर मला अनेकांकडून ऐकायला मिळालं. ‘घरात बसून तरी काय करायचं? तेवढाच आपला काही तरी टाइमपास,’ असंही अनेकांनी सांगितलं
जगात एवढ्या प्रचंड संधी असताना ही चांगली शिकली-सवरलेली माणसं अचानकच अशा गोष्टी टाइमपास म्हणून नक्कीच विकणार नाहीत. टाइमपास म्हणून विकणारे असतील, तर दररोज, नित्यनेमानं, तिन्ही त्रिकाळ जाहिराती टाकत बसणार नाहीत. कुठल्याही चौकशीच्या मेसेजला अगदी त्वरित प्रतिसाद देणार नाहीत
पण ह्यांचं तसं नाहीय. रात्री दहा वाजता मेसेज पाठवला, तरी दुसऱ्या मिनिटाला यांचं उत्तर येतंय. ‘काही डिस्काउंट नाही का?’ असं नुसतं विचारायचा अवकाश. लगेच पाच-पन्नास रुपये कमी होतायत. जाहिरातीत पाचशे रुपये किमतीची गोष्ट एका मिनिटात चारशे रुपयांना विकायला ही माणसं तयार होतायत
टाइमपास म्हणून एखाद्या गोष्टीची विक्री करणारा माणूस इतक्या सहजासहजी भाव पाडायला कसा काय तयार होईल? पंचवीस तर पंचवीस, पन्नास तर पन्नास, पण विकलं गेलं पाहिजे आणि दिवसाला शे-पाचशे रुपये सुटले पाहिजेत, अशी भयंकर निकड अनेकांना जाणवायला लागली आहे.काही काळापूर्वी नोकरदार होण्यात कमालीचा
रस असलेला वर्ग आज ‘वाटेल ते करू पण स्वत:चं करू,नोकरीचा काही भरवसा राहिला नाही’ अशा भूमिकेपर्यंत येऊन हळद, गोडा मसाला,तांदळाची पिठी,घरगुती तूप,सुवासिक मुखवास,भाजणी वगैरे विकायला लागतो तेव्हा कोविड हा फक्त रोग नसून एक महाप्रचंड हिमनग आहे, हे जाणवायला लागतं @Vishakh50862352
आज अशा प्रकारे अर्थार्जनाच्यामागं लागलेल्या या व्यक्तींचे काही वर्षांपूर्वी ह्याच वस्तूंच्या किंवा पदार्थांच्या विक्रीविषयीचे विचार काय होतेआणि खरोखरच यांना अशाप्रकारे विक्रीतच रस होता,तर मग हे यापूर्वीचका सुरू केलं नाही?किंवा याचंच उत्पादनाचं किंवा विक्रीचं शिक्षण का घेतलं नाही?
या प्रश्नाचं उत्तर बहुतेकांकडं नाही. आपल्याच वर्गातला एखादा मित्र बारावीनंतर पुढचं शिकता शिकता घरच्या किराणा मालाच्या दुकानात बसायला लागला तेव्हा आपल्या दृष्टीनं तो लो प्रोफाFल होता, त्याला करिअरचं महत्त्वच कळलं नव्हतं
वार्षिक पॅकेजची गंमत त्याला कळलेलीच नाही असं समजून आपण त्याच्यावर चक्क हसत होतो. त्याची रेवडी उडवत होतो. आपलाच एखादा वर्गमित्र शाळेनंतर किंवा कॉलेजनंतर घरच्या मेसचे डबे पोहोचवायला जायचा किंवा मंडईत घरच्या दुकानात भाजी विकायला बसायचा, तेव्हा आपल्याला त्याचं हसू यायचं
त्याची येथेच्छ टिंगल व्हायची. आज तो त्याच्या व्यवसायात शेठ झालाय आणि इतक्या वर्षांनंतर आपण आज काय करतोय? घरगुती पोळ्या विकतोय, साबुदाणा वडे विकतोय, साड्या विकतोय, फुलवाती विकतोय, हलव्याचे दागिने विकतोय, केक विकतोय!
आजही, अजूनही,अगदी आत्ताच्या क्षणालासुद्धा आपल्याला आपल्या स्वत:च्याच वागण्याचा तळ शोधणं जमत नाहीये,साधत नाहीये.ध्येयं, दिशा, उद्दिष्टं यांची पुरेशी स्पष्टता आपल्याला आलेली नाहीय. अजूनही जगण्याचा पाया भक्कम झालेला नाहीये. आपण हे दाखवत नसलो, तरी आपण फक्त आला दिवस जगतोय
हे सगळं पुढं कुठल्या टोकाला जाणार आहे, याचा विचारही कुणी करायला धजावत नाहीय.‘९९९/-भरा आणि गाडी घरी घेऊन जा’ यांसारख्या आकर्षक जाहिरातींनी आपल्याला भुरळ घातली होती. आज त्याच भुरळीच्या हप्त्याचा चटका बसतोय, तो सोसवत नाहीये;
पण अजूनही ऋण काढून सण करण्याच्या आणि टोकाच्या सुखासीन वृत्तीनंच आपलं सर्वाधिक नुकसान केलंय, स्वत:ला नीट न ओळखणं आणि उच्चभ्रू होण्याच्या मागं छाती फुटेस्तोवर धावत सुटणं आपल्याला फार महागात पडलंय, हे आपण मान्यच करणार नसू, तर आपल्या शिक्षणाला तरी काय अर्थ आहे?
उसनं अवसान आणून प्रश्न कसे सुटतील? निदान आता तरी आयुष्याची चौकट चकचकीत करण्यापेक्षासुद्धा भक्कम कशी करता येईल, यावर चिंतन करण्याची गरज आहे, मार्गदर्शन घेण्याची गरज आहे, हे स्वत:शी मान्य करायला हवं!
जिंदगी इतनी आसान नहीं होती!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मित्रानो आजच्या धाग्याचे नाव आहे डिसले तसे नसते अर्थात सध्या गाजत असलेल्या डिसले गुरुजींचा विषय त्यांना मिळालेल्या७ कोटीच्या पुस्काराची एक बाजू विमुक्त नी एका थ्रेड मधून मांडली आहेच त्याच संदर्भातडॉ विनय काटे यांचा एक लेख वाचनात आला त्याचेच सार ह्या धाग्यात आहे @PadmakarTillu
चला तर वाचू या "डिसले तसे नसते" धागा
गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, देशातील मीडियात रणजितसिंह डिसले गुरुजींचं नाव गाजत आहे,कारण त्यांना मिळालेला "ग्लोबल टीचर अवार्ड 2020"अगदी अलीकडेच म्हणजे2015साली वरक्के (Varkey)फाउंडेशन या ब्रिटनमध्ये ऑफिस असणाऱ्या संस्थेने हे अवार्ड सुरूकेले
आणि त्याची रक्कम 1 मिलियन डॉलर इतकी ठेवली. भारतीय चलनात ही रक्कम 7 कोटींपेक्षाही जास्त असल्याने या रक्कमेकडे पाहूनच भारतीय लोकांचे डोळे विस्फारले. मग डिसले गुरुजींना महाराष्ट्रभूषण द्या, राज्यपालनियुक्त आमदार बनवा वगैरे मागण्या राजकीय क्षेत्रातून आल्या, @ROHITKUMBHOJKAR
" शारदीय नवरात्र"
हिंदु धर्मात भगवती देवीची विशेष आराधना वर्षातून 2 वेळा केली जाते.
वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्धप्रतिपदा ते चैत्र शुद्धनवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. @kul_anagha@Amruta39117837
शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरदऋतूच्या प्रारंभी येते. पूर्वीच्या ऋषी-मुनींनी बल संवर्धनार्थ हेच शारदीय नवरात्र पसंत केले
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात,
काही तयार झालेली असतात आणि शेतकरी निवांत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
मित्रानो गेले काही दिवस मी रोज समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक पोस्ट करत आहे
मनाच्या श्लोकात श्री रामाचे नाव असते.
श्री राम कुठे नाही, जळी स्थळी काष्टी पाषाणी राम राहे भरुनी
इतकंच नाही तर आपल्या सर्वांच्या नावातच राम भरून राहिला आहे असे सांगितले तर @kul_anagha
कसा हे मी नाही दुसरे महान राम भक्त संत तुलसीदास सांगून गेलेत कसा ते पाहू या "आपले नाम राम" ह्या धाग्यात
माझ्या वाचनात आल्यावर मी खूप टेम्प्ट झालो आपल्यापुढे ठेवायला म्हणून आज बॅक टू बॅक धागा लिहित आहे
खात्री आहे आपल्याला नक्की आवडेल @Vishakh50862352
तुलसीदासांना एकदा एका भक्तांने विचारले की,
"महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?
तुलसीदास म्हणाले :- "हो"
भक्त :- मला पण दर्शन घडवाल का ?
तुलसीदास :- "हो नक्की" @RajeGhatge_M@TheDarkLorrd
शुभ संध्या मित्रांनो,एक कबीर कथा
कबीराचा मुलगा कमाल एकदा काशीतून फिरत असता एका घराचे दार उघडे दिसले.त्याने आत डोकावून पाहीले तर तिथे एक बाई दळण दळत होती
कमाल खूप वेळ उभा राहून ते पाहात होता.दाणे जातात कुठे ???
त्याला रडू आले
त्याचा समज झाला की सर्व दाण्यांचे पीठ झाले व ते मेले
त्याने विचार केला,आपणही या काळाच्या चक्कीत असेच पिसले जात आहोत
कमाल घरी आला, वडीलांजवळ जाऊन रडू लागला
कबीर महाराज विचारताहेत..
"कमाल अरे काय झाले रे ?
कमाल सर्व पाहिलेलं सांगतो,आणि म्हणतो.
"जात्यामध्ये सर्व दाणे मेले"
कबीर कमालाला घेऊन त्या बाईच्या घरी गेले
जात्याची वरची पाळी बाजुला करुन दाखविली
खुंट्याजवळ२,४दाणे तसेच चिकटलेले होते
ज्या दाण्यांनी त्या खुंट्याचा आधार घेतला होता ते तसेच होते.
कमाल च्या भाषेत ते वाचले
मित्रानो आज आठवड्याचा पहिला दिवस,
या आठवड्याचा शनिवार शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ
आजपासून विजयादशमी पर्यंत शक्य तो थ्रेड देवी भवानीच्या संदर्भात पोस्ट करायचा मानस आहे
त्या निमित्ये देवी सेवा आणि देवीचे नाम घेणे होईल @RajeGhatge_M@Vishakh50862352
२ दिवसांपूर्वी मी तुळजाभवानी मातेच्या घोर निद्रेच्या संदर्भात एक विडिओ पोस्ट केला होता
पण माता तुळजाभवानी ची हि एवढीच निद्रा नसते
आजचा धागा त्या महामायेच्या निद्रे विषयी आहे
चला पाहू या हा
"मंचक निद्रा" धागा
श्री तुळजाभवानी देवी वर्षातून ३ वेळा निद्रा घेत असते
या निद्रा दोन प्रकारच्या मंचकावर (पलंगावर) होत असतात ते खालीलप्रमाणे.
१) चांदीचा मंचक
२) लाकडी मंचक
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते.
उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते @shivajirao29
मित्रानो शनिवार रविवार आले कि सर्व जण आपल्या परीने २ निवांत दिवस कसे मजेत घालायचे याचे प्लॅनिंग करतात.
पण दुर्गप्रेमी आज कुठल्या किल्लयाचा ट्रेक करायचा हे खूप आधीच ठरवून
शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवार सकाळीच
आपल्या मोहिमेला सुरवात करतात @Amruta39117837
चला आज आपण हि ट्रेक करून फिरून येऊया
अशा एका किल्ल्यावर ज्या किल्ल्याशी
माझ्या कॉलेज जीवनाच्या आठवणी निगडित आहेत
किल्ला म्हंटले कि त्याला भूगोल आणि इतिहास हा हवाच
नाही तर तो किल्ला कसला @RajeGhatge_M
महाराष्ट्रातले बहुसंख्य किल्लयांना
मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत,
पण आपण आज चाललो आहोत त्या किल्ल्याला काही हजारो वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी आहे.
या किल्ल्याचा संदर्भ श्री रामाचा पूर्वज असलेल्या
राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे