मित्रानो खूप दिवस झाले थ्रेड लिहून बऱ्याच जणांनी विचारणा हि केली
पण सध्या वेळ आणि शांत मन यांचा ताळमेळ जुळून येत नाहीये सध्या काही दिवस झाले जुन्या पार्टनर(अर्थातच वपु) बरोबर नव्याने मन हलके करतोय
आजूबाजूची परिस्थती हि उबग आणणारी आहे म्हणून मन वपुंच्या विचारांची सावलीत आहे
एक अर्थवाही वपु लेख आपल्यापुढे ठेवत आहे जो सौन्दर्याची वेगळी परिभाषा मांडत आहे
"माणसे जिंकायची आहेत ? मग दोन तीन मिनिटे काढून हे वाचाच !!"
एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते
कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात @PadmakarTillu
ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात.
बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो.
डिस्टर्ब् झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो.
मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो.
"नमस्कार सर, मी स्वरदा बोलतेय."
फोनवरचा तो गोड आणि मंजुळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो.
बॉस : "बोला"
"काही नाही. तुमच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्टच्या जागेसाठी मलाही यायचंय."
बॉस : "मग प्रॉब्लेम काय आहे ? इथे मुलाखती सुरू आहेत. तुम्हीही येऊ शकता"
"तेच तर न सर, मलाही यायचंय पण ट्रॅफिक जाममध्ये अडकली आहे. पोचायला उशीर होतोय:"
बॉस : "ओके ओके, या तुम्ही @3_suhani
इकडे मुलाखत सुरू राहते. अजून एकदोन मुलाखती होतात . पण बॉसच्या कानात त्या स्वरदाचा आवाज गुंजत असतो.
दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा फोन येतो.
"सर, ट्रॅफिक कमी झालेय मी निघाली आहे. पण प्लिज सर उशीर झाला तर समजून घ्या"
बॉस : "हरकत नाही. या तुम्ही, पण शक्यतो वेळेत या @akku_kohale
पुन्हा तो आवाज ऐकून बॉस विचार करू लागतो.
खरेच किती सौजन्यशील मुलगी आहे.
फोनवरचा आवाज ऐकताना आपण मंत्रमुगध होतोय.
हीच मुलगी परफेक्ट आहे रिसेप्शनिस्ट म्हणून !!
तरी इकडे अजून शिल्लक उमेदवाराच्या मुलाखती सुरूच असतात. पण बॉस आता या मुलाखती औपचारिकपणे घेत असतो @KohaleMangla
कारण त्याच्यासाठी "स्वरदा" फिक्स झालेली असते.
इतक्यात अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो.
"सर, मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे.
पण गाडी लावायला जागा नाहीये.
मी बाहेर रस्त्यावर कुठे जागा मिळतेय का पाहून येतेय.
सर प्लिज, त्यामुळे थोडा उशीर होतोय. प्लिज प्लिज"
बॉस : "हरकत नाही. या तुम्ही सावकाश"
आता बॉसला तिला भेटायची, पाहायची उत्सुकता लागून राहते. इतक्या मंजुळ आवाजाची मुलगी, नक्की कशी असेल ? म्यानर्स तर चांगले आहेत. नक्की हिलाच घेऊया.
अजून सात आठ उमेदवार शिल्लक असतानाच एक चिट्ठी घेऊन शिपाई केबिनमध्ये येतो. चिट्ठीवर लिहिलेले असते.
सर, मी स्वरदा, आलेय तुमच्या ऑफिसमध्ये"
बॉस बाकी उमेदवाराची लिस्ट बाजूला ठेवूंन तिला लगेच आत बोलावतो.
स्वरदा आत येते. आणि sssssss
बॉस एकदम दचकतो.
दारात एक सावळी (जवळपास डार्कच कलरची, थोडीशी ग्रामीण ढंग वाटावा अशी "स्वरदा" उभी असते.
बॉसचा भ्रम निरास होतो @BhatkarBharati
त्याच्या अपेक्षेत तिची प्रतिमा जरा वेगळीच (आणि सुंदर वगैरे) असते
स्वरदा बोलू लागते.
"सर, मला माहीत आहे. तुम्ही मला पाहून निराश झाला असणार. तुमच्या अपेक्षे प्रमाणे मी दिसायला सुंदर नाही. ते मलाही माहीत आहे. पण सर, मी इथे येण्याआधी तुमच्या कंपनीची माहिती काढलीय @bhamare_shweta
त्यानुसार इथे बाहेरून येणारे ग्राहक कोणीच नसतात. आपली सर्व कामे फोनवर चालतात. आणि सर फोनवर आवाज लागतो, सौंदर्य नाही. हे तुम्हालादेखील माहीत आहे. आणि अजून एक सर, केवळ सौंदर्य नाही म्हणून आजवर अनेक ठिकाणाचा नकार पचवलाय. यावेळी म्हणून मी थोडा वेगळा विचार केला @Nature__bird
आणि ठरवून तुमच्याशी मुद्दाम आधीच तीनचार वेळा फोनवर बोलत राहिले. माझे जे मेन qualification आहे तो आवाज तुम्ही ऐकला. म्हणून तर बाकी उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही आधी मला आत बोलावलेय. आता निर्णय तुम्ही घ्यायचाय सर"
दोन मिनिट निशब्द शांतता @sandeepmninawe
बॉस : "ते ठीक आहे. पण तरी इथे इतर स्टाफ वेगळ्या स्टाईलमध्ये राहणारा आहे. त्यांना तू आणि तुलाही ते ऑकवर्ड होईल. त्याचे काय ?"
स्वरदा : "मनासारखी अप्सरा तर कुणालाच मिळालेली नसते. तुमचे लग्न झाले असणारच. विचार करून पहा सर,. तुमच्या १००% अपेक्षेसारखी पत्नी आहे का
पण तरी तुम्ही सुखी होताच न. कारण सहवासाने समोरच्यामधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटत नाही सर. तसेच इथल्याचे होईल"
तात्काळ बॉसने ड्रॉवरमधून अपॉईंटमेन्ट लेटर काढले, त्यावर सही केली आणि म्हणाला,
"उद्या सकाळी तू रिसेप्शन टेबलवर मला दिसली पाहिजेस. गुड लक"
आपल्यात उणीव आहे, किंवा आपण कशात तरी कमी आहोत, म्हणून निराश होण्याचे कारण नाही.
दुसरा असा एकतरी गुण नक्की असेल जो तुम्हाला विजयी करेल.
यशस्वी करेल.
त्या "एका" गुणांचा शोध घ्या.
नक्की सुखी व्हाल......
व. पु. काळे ----
कादंबरी ' स्वर '
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
म्हातारी मला सांगत होती, 'मुली बघणं हा पुरुषांचा स्थायीभावच आहे.बायकांकडे पाहावं ही भावना जोवर जागती आहे, तोवर पुरुष हा पुरुष आहे.आता विनाचे वडील, तसं वय झालेलं,पण असे ह्या खिडकीजवळ उभे राह्यले की गुंग व्हायचे,मोठ्या प्रसन्नतेने रस्त्यावरच्या बायका पाहत राहायचे.ते तर पुरुषच,
1/4
पण तुला गंमत सांगते,एकदोनदा मी पण त्यांच्याजवळ जाऊन उभी राह्यले.रस्त्यावरून जाणाऱ्या पोरींकडे त्यांच्या-म्हणजे तुम्हा पुरुषांच्या-नजरेतून पाहण्याचा प्रयत्न केला.तेव्हाबायांकडे पागल होऊन पाहणारे पुरुष मला पागल वाटेनासे झाले बघ!आता तर रस्त्यावरच्या मुली पाहण्याचा मलाच छंद जडलाय
2/4
बेभान करण्याचं तंत्र बरोब्बर शिकल्यात बघ पोट्ट्या. चित्रासारख्या राहतात बघ. मी तर गेल्या अनेक दिवसांत, कुरूप मुलगीच पाह्यली नाही. मी हसून विचारलं, 'आजी, तुमचे हे विचार एकदा माझ्या बायकोला ऐकवाल का?' 'मुळीच ऐकवणार नाही. 'का?' 'तरुणपणात बेटा अहंकार असतो.
3/4
मित्रानो गेल्या १० महिन्यात आपल्या आसपासच्या समाज जीवनात सर्वच थरांवर खूप मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली ,याच घटनेचे जे निरीक्षण प्रसिद्ध मानसतज्ज्ञ मयुरेश डंके यांनी केले आहे त्यातील शब्दन्शब्द खरा आहे, मी तरी माझ्या आजूबाजूला या सर्व घटना घडलेल्या पहिल्या आहेत @PadmakarTillu
आपल्यापैकी बरीच जणांनी हि पहिल्या असतील त्यावरच आधारित त्यांचा हा लेख आपल्याला नक्कीच अंतर्मुख करेल
"जिंदगी इतनी आसान नहीं होती!"
मी गेले काही दिवस अगदी नियमानं दररोज निरीक्षण करतोय, तेव्हा असं लक्षात आलं, की मोठमोठ्या शहरांमधून माणसांचं स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढतंय.
लोक ओझी कमी करतायत. कारण त्यांना हे सगळं झेपण्याच्या पलीकडं गेलंय. आणि ते नुसते जात नाहीयत,कायमचे जातायत. घर आणि घरातल्या वस्तू मिळेल त्या किमतीला विकून जातायत. मोठ्या शहरांमध्ये राहणं त्यांना परवडत नाहीय आणि पुढेही परवडणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलंय @Arya00716@KohaleMangla
मित्रानो आजच्या धाग्याचे नाव आहे डिसले तसे नसते अर्थात सध्या गाजत असलेल्या डिसले गुरुजींचा विषय त्यांना मिळालेल्या७ कोटीच्या पुस्काराची एक बाजू विमुक्त नी एका थ्रेड मधून मांडली आहेच त्याच संदर्भातडॉ विनय काटे यांचा एक लेख वाचनात आला त्याचेच सार ह्या धाग्यात आहे @PadmakarTillu
चला तर वाचू या "डिसले तसे नसते" धागा
गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, देशातील मीडियात रणजितसिंह डिसले गुरुजींचं नाव गाजत आहे,कारण त्यांना मिळालेला "ग्लोबल टीचर अवार्ड 2020"अगदी अलीकडेच म्हणजे2015साली वरक्के (Varkey)फाउंडेशन या ब्रिटनमध्ये ऑफिस असणाऱ्या संस्थेने हे अवार्ड सुरूकेले
आणि त्याची रक्कम 1 मिलियन डॉलर इतकी ठेवली. भारतीय चलनात ही रक्कम 7 कोटींपेक्षाही जास्त असल्याने या रक्कमेकडे पाहूनच भारतीय लोकांचे डोळे विस्फारले. मग डिसले गुरुजींना महाराष्ट्रभूषण द्या, राज्यपालनियुक्त आमदार बनवा वगैरे मागण्या राजकीय क्षेत्रातून आल्या, @ROHITKUMBHOJKAR
" शारदीय नवरात्र"
हिंदु धर्मात भगवती देवीची विशेष आराधना वर्षातून 2 वेळा केली जाते.
वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्धप्रतिपदा ते चैत्र शुद्धनवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. @kul_anagha@Amruta39117837
शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरदऋतूच्या प्रारंभी येते. पूर्वीच्या ऋषी-मुनींनी बल संवर्धनार्थ हेच शारदीय नवरात्र पसंत केले
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात,
काही तयार झालेली असतात आणि शेतकरी निवांत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
मित्रानो गेले काही दिवस मी रोज समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक पोस्ट करत आहे
मनाच्या श्लोकात श्री रामाचे नाव असते.
श्री राम कुठे नाही, जळी स्थळी काष्टी पाषाणी राम राहे भरुनी
इतकंच नाही तर आपल्या सर्वांच्या नावातच राम भरून राहिला आहे असे सांगितले तर @kul_anagha
कसा हे मी नाही दुसरे महान राम भक्त संत तुलसीदास सांगून गेलेत कसा ते पाहू या "आपले नाम राम" ह्या धाग्यात
माझ्या वाचनात आल्यावर मी खूप टेम्प्ट झालो आपल्यापुढे ठेवायला म्हणून आज बॅक टू बॅक धागा लिहित आहे
खात्री आहे आपल्याला नक्की आवडेल @Vishakh50862352
तुलसीदासांना एकदा एका भक्तांने विचारले की,
"महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?
तुलसीदास म्हणाले :- "हो"
भक्त :- मला पण दर्शन घडवाल का ?
तुलसीदास :- "हो नक्की" @RajeGhatge_M@TheDarkLorrd
शुभ संध्या मित्रांनो,एक कबीर कथा
कबीराचा मुलगा कमाल एकदा काशीतून फिरत असता एका घराचे दार उघडे दिसले.त्याने आत डोकावून पाहीले तर तिथे एक बाई दळण दळत होती
कमाल खूप वेळ उभा राहून ते पाहात होता.दाणे जातात कुठे ???
त्याला रडू आले
त्याचा समज झाला की सर्व दाण्यांचे पीठ झाले व ते मेले
त्याने विचार केला,आपणही या काळाच्या चक्कीत असेच पिसले जात आहोत
कमाल घरी आला, वडीलांजवळ जाऊन रडू लागला
कबीर महाराज विचारताहेत..
"कमाल अरे काय झाले रे ?
कमाल सर्व पाहिलेलं सांगतो,आणि म्हणतो.
"जात्यामध्ये सर्व दाणे मेले"
कबीर कमालाला घेऊन त्या बाईच्या घरी गेले
जात्याची वरची पाळी बाजुला करुन दाखविली
खुंट्याजवळ२,४दाणे तसेच चिकटलेले होते
ज्या दाण्यांनी त्या खुंट्याचा आधार घेतला होता ते तसेच होते.
कमाल च्या भाषेत ते वाचले