Of course बंगालात भाजपमुख्यमंत्री होणार नव्हताच मुळी! तसा चेहरा सुद्धा अद्याप भाजपकडे नव्हता.
मूळ हेतू हा फक्त पक्षाच्या एस्टॅब्लिशमेंटचा होता.
तो सुंदररीत्या साध्य झालाय, भाजप त्यात जिंकलाय!
तळागाळात पोचून पक्षशाखा उघडून आधी सामान्यांना -
कळू तर द्या की भाजप काय आहे.. राष्ट्रनिष्ठा काय आहे.. राष्ट्रवाद काय आहे.. तर पक्ष जिंकेल..
यासाठी पहिल्यांदा चंचुप्रवेश करावा लागतो.
पण भाजपने तर इथे पार खिंडारप्रवेश केलाय..!
८०+ जागा येणं ही चेष्टा वाटली?
खुनी, गुंड, धनदांडग्या बेडकांच्या तळ्यात एवढी कमळं फुलली आहेत हीच एक -
अचिव्हमेंट आहे. त्याबद्दल भाजपचं अभिनंदन!
आता त्यांना 'access' मिळाला आहे.
आता त्यांचे कन्सिडरेबल आमदार आहेत तरी.. लोकांचे प्रश्न धसास लाऊन त्यांना उत्तम प्रशासन द्यायची आता खरी संधी मिळाली आहे..
नक्कीच, आता खरं भाजपचं काम सुरू होईल.
तिथल्या बेबंद सरकारला विरोधी पक्षच नव्हता..
आता विरोधी पक्ष असणं हा डीएनए असलेले भाजप नेते तिथल्या सरकारला सळो की पळो करून सोडतील. भ्रष्टाचाराला आळा बसेल, तुष्टीकरणाची राजनीती थांबेल..
परिणाम - भाजप आणखी बळकट होईल..
भविष्यात आणखी एक राज्य आपल्याकडे यायची तजवीज फक्त भाजप करत होता यावेळी.. ते पूर्ण झालंय..
हे परिवर्तन नाही?
निश्चितच आहे!!
याचे पडघम आता सर्वत्र वाजायला लागतील.
भाजपला आता कंबर कसावी लागेल..
महामारीचं सावट दूर होताच महाराष्ट्रातही राजकिय उषःकाल होईल ही आशा!!
तोवर, आपण सकारात्मक राहू.
सकारात्मकता वाढवू.
🚩🚩🚩
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गजाननमहाराज,स्वामी,साईबाबा असल्यांच्या नादी लागून काय उपयोग? आयुष्यात यांनी कधी काही उपदेश केला नाही की साहित्यनिर्मिती नाही.
मदत,सामाजिककाम तेही नाही..
संतमंडळी जरा तरी बरी, पण हे स्वामी, महाराज, बाबा लोक? श्या!"
👆
अशी मल्लिनाथी ऐकत होतो एकाची!-
विस्मय वाटला. ते मत पटल्यासारखं वाटतंय की काय असं झालं!
अरेच्चा! आईवडलांनी केलेला श्रद्धेचा हा संस्कार चुकीचा आहे की काय? वाईट वाटलं. चिंतन सुरू झालं..
ज्ञानोबा,तुकोबा,रामदासस्वामी यांच्या साहित्यातून बोध तरी होतो, पण या अर्वाचीन संतांचं काय बरं योगदान आहे? पोथ्यांतले चमत्कार?
नाही.
विचार केल्यावर समजतं की यांचे उपकार खरं तितकेच महत्त्वाचे आहेत.
कसे?
बर्याचदा 'उपदेशा'पलीकडे 'सज्जनसंग्रहाची' निकड फार असते.
समाजात जिवाच्या ओढीमुळे शिवाची आठवण रहात नाही तेव्हा पर्यायानं त्याचा परिणाम सौजन्यावर होतो. मग हे सज्जनत्व टिकवून कसं ठेवावं?
पाडव्याच्या दिवशी गळ्यातली सोन्याची चेन मोडली एका मित्राने..
लग्न झालंय मागच्यावर्षी, सलूनचा धंदा बंदय आणि घरात पत्नीआईवडीलआजीआजोबा एवढे लोक आहेत.
ब्रेक द चेन म्हणजे हेच काय?
कष्टानं मिळवलेलं सोनंही मोडलं जावं इतकं गरजेचं आहे Lock-down?
त्या स्वाभिमानी मित्राला नेमकी मदत तरी काय offer करू मी?
वडीलही असायचे दुकानावर..
म्हटला गेले सहा महिने एकट्यानेच काम केलं, दाढीकटींगमुळे संसर्ग वाढेल म्हणून वयस्कर वडलांना घरी ठेवलं,
दुकानात जास्तीचा खर्च करून तापमानडिजिटलचेकर काय, ती सलूनकिट्स काय, स्प्रेज काय सगळं सगळं आणलं..
का तर, दुकान बंद नको रहायला..
मामाला जागेचं भाडं द्यावं लागतं, त्याचं घर पण भाड्यावर सुरू आहे.. तो तरी बिचारा काय करणार..
जबाबदारीनं वेढलेलं अवघ्या 28 वर्षांचं ते लेकरू पाहून जीव हळहळला.. आम्ही बसल्याजागी पगार घेऊन बेदरकार मतं ठोकतो, पण असे कित्येक तरुण अक्षरशः रस्त्यावर येतायत.
"साधा वाणी असलेला हा तुक्या,
गावातले ब्राह्मण त्याच्या पाया पडतात?"
मंबाजी नावाच्या देहूग्रामपुरोहिताला हे सहन होईना.
लक्षात घ्या,
'ब्राह्मण' पाया पडत आहेत याला त्याचा आक्षेप आहे.
इथे, मंबाजी सोडला तर बाकी सर्व ब्राह्मण तुकोबांच्याच बाजूने आहेत.
मंबाजीनं रामेश्वरशास्त्री बहुलकरांना बोलवून तुकोबांच्या वेदज्ञानाचा पराभव करायला व गावातल्या सगळ्या ब्राह्मणांना शासन करायला सांगितलं.
👆
आता काय झालं? रामेश्वरशास्त्री स्वतःच प्रभावित होऊन तुकोबांचे शिष्य बनले!
पुढे महाराजांच्या प्रसिद्ध चार टाळकऱ्यांत पहिले चार टाळकरी कोण?
होय, ब्राह्मणच.
त्यातल्याच एका 'गंगाधरपंत मवाळ' यांच्या कडूस गावचा मी आहे.. मला अक्कल शिकवू नये.
एका मंबाजी नावाच्या पुजारी लेवलच्या ब्राह्मणाने त्रास दिला पण बाकीच्या समस्त विद्वान ब्रह्मवृंदांनी तुकोबांची कीर्तनं समोर बसून ऐकली ते नाही का दिसत?
तळतळाट, उद्वेग, हळहळ या सगळ्या भावना आल्या.
त्या स्वाभाविक आहेत. 500मधे तीन आठवडे चालणारी माझी प्लॅटिना आता आठवड्याला साधारण तितकंच पेट्रोल मागू लागलीए..
याची चीड रोजची 30km+ drive असणार्याला येणारच रे!
पण नक्की कुणावर रागवायचं⁉️
खरी गोम यात आहे..
कारण असंय, की आपला असा सरळसोट ग्रह झालाय की इंधनकिमती फक्त केंद्रसरकार नियमित करू शकतं..
लिट्रली हाच समज आहे प्रत्येकाचा..
माझाही होता.
लेकिन वैसा है नही!
इंधनकिमतीच्या सुमारे 30 टक्के कर हा राज्य सरकारचा असतो. (अतिरिक्त सेस आणि आता कृषी सेस धरून.)
खरं पेट्रोल महागतं ते इथे👆
कच्चं इंधन आजमितीला 23.9 लिटर मिळतंय.
रिफाइन, प्रोसेसिंग करून पंपात पोचेपर्यंत ते होतं 29rs.
रोडसेस,excice duty कर केंद्राचे असतात. त्याने ते होतं अंदाजे 61rs.
पंप डीलर किती घेतो माहित्येय?
तब्बल 4 रुपये लिटरमागे!🤑
उगाच पेट्रोलपंप उघडत नाहीत राजकारणी!
पेशवाई!
उदाहरण म्हणून.
फक्त राजांच्या गादीशी निष्ठा ठेवणारं पद. स्वराज्य फक्त वाचवलंच नाही तर वाढवलं..
स्वराज्यातला 'स्व' स्वतःचा मानून रक्त सांडणारे पेशवे टीकेचे धनी का आणि कसे झाले?
त्यांच्या श्रीमंती मुकुटाच्याआतले काटे लोकांना दिसले का नाहीत? पराक्रमाचं श्रेय का मिळालं नाही?
हे दिसतं तसं नाही. ही परिस्थिती आजची आहे.
पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत इतका द्वेष नव्हता.. श्रीमंतबाजीरावांचं नाव आदराने घेतलं जायचं सर्वत्र.
जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्रसत्ताघट ढवळता येतो हे इथल्या राजकारण्यांना कळलं आणि इतिहासाचं विद्रूपीकरण सुरू झालं..
सरसकट जाती वर आल्या.
एखाद्या थोर माणसावर अगदी कुणीही उठून शिंतोडे उडवायला लागला.. धरबंध राहिला नाही..
इतर राज्यांहून बराच बरा असलेला महाराष्ट्र पुन्हा जातीपातीच्या राजकारणात अडकला तो कायमचाच!!
पुन्हा वर कधी येणार?
प्रयत्न आपणच करायला हवेत!
इतिहास आपणच उपसायला हवा, समोर आणायला हवा, अभ्यास करायला हवा