होय त्याहीवेळी हाच बंगाल होता.
हेच बंगाली बांधव मरत होते.
तेच बंगाली राक्षस माजले होते.
पाकिस्तानपेक्षा पूर्वपाकिस्तानची फाळणी जास्त दुखरी होती.
जणू जिथे सिंदूर भरावा अशा भांगेत कुर्हाड मारून दोन तुकडे झाले होते बंगालचे!
ढाकेतून मृतदेह येत होते कोलकतेत..
मार खाल्लेले, सर्वस्व गमावलेले हिंदू येत होते पळून इकडे..
आणि एक महात्मा त्यांनाच उपदेश करत होता!
बाबांनो,
सशस्त्र प्रतिकार करू नका बरं!
स्वतःचा खून होऊ द्या..
बलात्कार करून घ्या.
रक्त वाहू दे..
पण हो, त्या आपल्या बांधवांवर तुम्हीमात्र प्रतिवार नका हं करू!
अहिंसा परमो धर्म☝️
समोर घडणारे अत्याचार पाहून, बलात्कार पाहून, खून पाहून त्वेषानं मुठी आवळल्या जात होत्या, दात कराकरा चावले जात होते, रक्त साकळेपर्यंत ओठ दाबले जात होते,
पण करणार काय?
त्यांना महात्म्याचा पाठींबा आहे.
आणि खुद्द पंतप्रधानदेखील देशाहून त्यालाच मोठा समजतोय!
तेही त्या उपोषणाला घाबरून?
जनतेचा तो त्वेष, त्या मुठी, ते दात, ते ओठ आणि ती बुद्धी..
आता वळली!
जे अत्याचार करत आहेत त्यांच्यापेक्षा,
जो अत्याचार व्हायला जबाबदार आहे त्याचा राग आता यायला लागला..
आता बांध फुटायला लागला!
उपोषणाची भीती कुठवर बाळगावी?
आणखी काही काळ हा उपोषणासूर जिवंत राहू दिला तर?
तर काय?
तर हैद्राबादही पाकिस्तानकडे जाईल..
तर लाहोर ते ढाका अशी जमीनपट्टी पाकिस्तानला जोडून द्यावी लागेल..
तर पाकिस्तानला आणखी 25 कोटी द्यावे लागतील..
तर आणखी हिंदू मरतील..
तर काश्मीर भारताच्या हातून जाईल..
एक ना अनेक, प्रचंड प्रमाणात अफवा, भाकीतं भारतभर पसरली.. आंतरिक चीड उत्पन्न
झाली..
उपोषण सुरू झाल्यावर जे होईल ते भारताच्या विरुद्धच होईल अशी खात्री वाटावी अशी वाईट प्रतिमा त्या एका महात्म्याची झाली!
हिंदूविरोधी भूमिका किती घ्यावी?
किती लांगूलचालन करावं?
हा अपमान, अन्याय असह्य झाला आणि एक सुशिक्षित पत्रकार असलेला युवक थेट महात्म्याची हत्या करू धजावला!
त्याने केली ती कृती चूक होती का?
तर अर्थात होती.
त्याचं समर्थन की निषेध हा लांबचा प्रश्न आहे.
ते का घडलं यावर कुणीच विचार करत नाही?
त्याने नाही तर अजून कुणी, महात्म्याचा वध केलाच असता.
दहाच्यावर मर्डरअटेम्प्ट झाले होते आधीच..
मग लोकांना इतका राग यावा असं काय केलं होतं त्यांनी?
याची उत्तरं शोधायच्याऐवजी फक्त वध करणार्या नथुरामालाच खलनायक करण्यात तत्कालीन सरकार यशस्वी झालं..
पण ती कारणमीमांसा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धार्मिक तेढ मिटणार नाही.
अजूनही बंगाल तसाच धुमसतो आहे. ज्वाला कदाचित कमी उंचीच्या असतील, पण निखारे तेच आहेत..
Of course बंगालात भाजपमुख्यमंत्री होणार नव्हताच मुळी! तसा चेहरा सुद्धा अद्याप भाजपकडे नव्हता.
मूळ हेतू हा फक्त पक्षाच्या एस्टॅब्लिशमेंटचा होता.
तो सुंदररीत्या साध्य झालाय, भाजप त्यात जिंकलाय!
तळागाळात पोचून पक्षशाखा उघडून आधी सामान्यांना -
कळू तर द्या की भाजप काय आहे.. राष्ट्रनिष्ठा काय आहे.. राष्ट्रवाद काय आहे.. तर पक्ष जिंकेल..
यासाठी पहिल्यांदा चंचुप्रवेश करावा लागतो.
पण भाजपने तर इथे पार खिंडारप्रवेश केलाय..!
८०+ जागा येणं ही चेष्टा वाटली?
खुनी, गुंड, धनदांडग्या बेडकांच्या तळ्यात एवढी कमळं फुलली आहेत हीच एक -
अचिव्हमेंट आहे. त्याबद्दल भाजपचं अभिनंदन!
आता त्यांना 'access' मिळाला आहे.
आता त्यांचे कन्सिडरेबल आमदार आहेत तरी.. लोकांचे प्रश्न धसास लाऊन त्यांना उत्तम प्रशासन द्यायची आता खरी संधी मिळाली आहे..
नक्कीच, आता खरं भाजपचं काम सुरू होईल.
गजाननमहाराज,स्वामी,साईबाबा असल्यांच्या नादी लागून काय उपयोग? आयुष्यात यांनी कधी काही उपदेश केला नाही की साहित्यनिर्मिती नाही.
मदत,सामाजिककाम तेही नाही..
संतमंडळी जरा तरी बरी, पण हे स्वामी, महाराज, बाबा लोक? श्या!"
👆
अशी मल्लिनाथी ऐकत होतो एकाची!-
विस्मय वाटला. ते मत पटल्यासारखं वाटतंय की काय असं झालं!
अरेच्चा! आईवडलांनी केलेला श्रद्धेचा हा संस्कार चुकीचा आहे की काय? वाईट वाटलं. चिंतन सुरू झालं..
ज्ञानोबा,तुकोबा,रामदासस्वामी यांच्या साहित्यातून बोध तरी होतो, पण या अर्वाचीन संतांचं काय बरं योगदान आहे? पोथ्यांतले चमत्कार?
नाही.
विचार केल्यावर समजतं की यांचे उपकार खरं तितकेच महत्त्वाचे आहेत.
कसे?
बर्याचदा 'उपदेशा'पलीकडे 'सज्जनसंग्रहाची' निकड फार असते.
समाजात जिवाच्या ओढीमुळे शिवाची आठवण रहात नाही तेव्हा पर्यायानं त्याचा परिणाम सौजन्यावर होतो. मग हे सज्जनत्व टिकवून कसं ठेवावं?
पाडव्याच्या दिवशी गळ्यातली सोन्याची चेन मोडली एका मित्राने..
लग्न झालंय मागच्यावर्षी, सलूनचा धंदा बंदय आणि घरात पत्नीआईवडीलआजीआजोबा एवढे लोक आहेत.
ब्रेक द चेन म्हणजे हेच काय?
कष्टानं मिळवलेलं सोनंही मोडलं जावं इतकं गरजेचं आहे Lock-down?
त्या स्वाभिमानी मित्राला नेमकी मदत तरी काय offer करू मी?
वडीलही असायचे दुकानावर..
म्हटला गेले सहा महिने एकट्यानेच काम केलं, दाढीकटींगमुळे संसर्ग वाढेल म्हणून वयस्कर वडलांना घरी ठेवलं,
दुकानात जास्तीचा खर्च करून तापमानडिजिटलचेकर काय, ती सलूनकिट्स काय, स्प्रेज काय सगळं सगळं आणलं..
का तर, दुकान बंद नको रहायला..
मामाला जागेचं भाडं द्यावं लागतं, त्याचं घर पण भाड्यावर सुरू आहे.. तो तरी बिचारा काय करणार..
जबाबदारीनं वेढलेलं अवघ्या 28 वर्षांचं ते लेकरू पाहून जीव हळहळला.. आम्ही बसल्याजागी पगार घेऊन बेदरकार मतं ठोकतो, पण असे कित्येक तरुण अक्षरशः रस्त्यावर येतायत.
"साधा वाणी असलेला हा तुक्या,
गावातले ब्राह्मण त्याच्या पाया पडतात?"
मंबाजी नावाच्या देहूग्रामपुरोहिताला हे सहन होईना.
लक्षात घ्या,
'ब्राह्मण' पाया पडत आहेत याला त्याचा आक्षेप आहे.
इथे, मंबाजी सोडला तर बाकी सर्व ब्राह्मण तुकोबांच्याच बाजूने आहेत.
मंबाजीनं रामेश्वरशास्त्री बहुलकरांना बोलवून तुकोबांच्या वेदज्ञानाचा पराभव करायला व गावातल्या सगळ्या ब्राह्मणांना शासन करायला सांगितलं.
👆
आता काय झालं? रामेश्वरशास्त्री स्वतःच प्रभावित होऊन तुकोबांचे शिष्य बनले!
पुढे महाराजांच्या प्रसिद्ध चार टाळकऱ्यांत पहिले चार टाळकरी कोण?
होय, ब्राह्मणच.
त्यातल्याच एका 'गंगाधरपंत मवाळ' यांच्या कडूस गावचा मी आहे.. मला अक्कल शिकवू नये.
एका मंबाजी नावाच्या पुजारी लेवलच्या ब्राह्मणाने त्रास दिला पण बाकीच्या समस्त विद्वान ब्रह्मवृंदांनी तुकोबांची कीर्तनं समोर बसून ऐकली ते नाही का दिसत?
तळतळाट, उद्वेग, हळहळ या सगळ्या भावना आल्या.
त्या स्वाभाविक आहेत. 500मधे तीन आठवडे चालणारी माझी प्लॅटिना आता आठवड्याला साधारण तितकंच पेट्रोल मागू लागलीए..
याची चीड रोजची 30km+ drive असणार्याला येणारच रे!
पण नक्की कुणावर रागवायचं⁉️
खरी गोम यात आहे..
कारण असंय, की आपला असा सरळसोट ग्रह झालाय की इंधनकिमती फक्त केंद्रसरकार नियमित करू शकतं..
लिट्रली हाच समज आहे प्रत्येकाचा..
माझाही होता.
लेकिन वैसा है नही!
इंधनकिमतीच्या सुमारे 30 टक्के कर हा राज्य सरकारचा असतो. (अतिरिक्त सेस आणि आता कृषी सेस धरून.)
खरं पेट्रोल महागतं ते इथे👆
कच्चं इंधन आजमितीला 23.9 लिटर मिळतंय.
रिफाइन, प्रोसेसिंग करून पंपात पोचेपर्यंत ते होतं 29rs.
रोडसेस,excice duty कर केंद्राचे असतात. त्याने ते होतं अंदाजे 61rs.
पंप डीलर किती घेतो माहित्येय?
तब्बल 4 रुपये लिटरमागे!🤑
उगाच पेट्रोलपंप उघडत नाहीत राजकारणी!