आता कळतोय नथुराम??

होय त्याहीवेळी हाच बंगाल होता.
हेच बंगाली बांधव मरत होते.
तेच बंगाली राक्षस माजले होते.

पाकिस्तानपेक्षा पूर्वपाकिस्तानची फाळणी जास्त दुखरी होती.
जणू जिथे सिंदूर भरावा अशा भांगेत कुर्‍हाड मारून दोन तुकडे झाले होते बंगालचे!

ढाकेतून मृतदेह येत होते कोलकतेत..
मार खाल्लेले, सर्वस्व गमावलेले हिंदू येत होते पळून इकडे..

आणि एक महात्मा त्यांनाच उपदेश करत होता!
बाबांनो,
सशस्त्र प्रतिकार करू नका बरं!
स्वतःचा खून होऊ द्या..
बलात्कार करून घ्या.
रक्त वाहू दे..
पण हो, त्या आपल्या बांधवांवर तुम्हीमात्र प्रतिवार नका हं करू!

अहिंसा परमो धर्म☝️
समोर घडणारे अत्याचार पाहून, बलात्कार पाहून, खून पाहून त्वेषानं मुठी आवळल्या जात होत्या, दात कराकरा चावले जात होते, रक्त साकळेपर्यंत ओठ दाबले जात होते,

पण करणार काय?

त्यांना महात्म्याचा पाठींबा आहे.
आणि खुद्द पंतप्रधानदेखील देशाहून त्यालाच मोठा समजतोय!
तेही त्या उपोषणाला घाबरून?
जनतेचा तो त्वेष, त्या मुठी, ते दात, ते ओठ आणि ती बुद्धी..
आता वळली!

जे अत्याचार करत आहेत त्यांच्यापेक्षा,
जो अत्याचार व्हायला जबाबदार आहे त्याचा राग आता यायला लागला..
आता बांध फुटायला लागला!

उपोषणाची भीती कुठवर बाळगावी?
आणखी काही काळ हा उपोषणासूर जिवंत राहू दिला तर?
तर काय?
तर हैद्राबादही पाकिस्तानकडे जाईल..
तर लाहोर ते ढाका अशी जमीनपट्टी पाकिस्तानला जोडून द्यावी लागेल..
तर पाकिस्तानला आणखी 25 कोटी द्यावे लागतील..
तर आणखी हिंदू मरतील..
तर काश्मीर भारताच्या हातून जाईल..

एक ना अनेक, प्रचंड प्रमाणात अफवा, भाकीतं भारतभर पसरली.. आंतरिक चीड उत्पन्न
झाली..

उपोषण सुरू झाल्यावर जे होईल ते भारताच्या विरुद्धच होईल अशी खात्री वाटावी अशी वाईट प्रतिमा त्या एका महात्म्याची झाली!

हिंदूविरोधी भूमिका किती घ्यावी?
किती लांगूलचालन करावं?
हा अपमान, अन्याय असह्य झाला आणि एक सुशिक्षित पत्रकार असलेला युवक थेट महात्म्याची हत्या करू धजावला!
त्याने केली ती कृती चूक होती का?
तर अर्थात होती.
त्याचं समर्थन की निषेध हा लांबचा प्रश्न आहे.

ते का घडलं यावर कुणीच विचार करत नाही?
त्याने नाही तर अजून कुणी, महात्म्याचा वध केलाच असता.
दहाच्यावर मर्डरअटेम्प्ट झाले होते आधीच..

मग लोकांना इतका राग यावा असं काय केलं होतं त्यांनी?
याची उत्तरं शोधायच्याऐवजी फक्त वध करणार्‍या नथुरामालाच खलनायक करण्यात तत्कालीन सरकार यशस्वी झालं..

पण ती कारणमीमांसा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धार्मिक तेढ मिटणार नाही.
अजूनही बंगाल तसाच धुमसतो आहे. ज्वाला कदाचित कमी उंचीच्या असतील, पण निखारे तेच आहेत..

यावर उपाय काय?
आतातरी -
लांगूलचालन थांबेल?
आतातरी कठोरपणे केंद्रसत्ता राबवली जाईल?
आतातरी समान नागरीकायद्याचा धाक बसेल?
आतातरी इथल्या हिंदूंना स्वत्व सापडेल?

१९०५ वंगभंग आंदोलनातच पाकिस्तान सापडलेला!
तेव्हाही बंगालनेच सुरुवात केलेली..
आताही तेच होताना दिसतंय..

वेळीच आवरा!
हातात आहेत अजून गोष्टी!
आपल्याला आता अजून एक नथुराम नकोय.
ती प्रवृत्तीही नकोय.

पण ही चिंता करायची ती राज्यकर्त्यांनी!

देश दृष्ट लागण्यासारखी प्रगती करत असताना केवळ सत्तेसाठी धर्म/जाती वापरणारी ही मंडळी दूर झाली नाहीत तर मात्र असे नथुराम थोपवता येणार नाहीत!

आधी ती काळजी घ्या.

हिंदूहितरक्षण करा🙏🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with प्रतीक पुष्कराज 🚩🚩

प्रतीक पुष्कराज 🚩🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PraPuDeshmukh

2 May
अरे मोदीशहा इतके येडे वाटले का रे?

Of course बंगालात भाजपमुख्यमंत्री होणार नव्हताच मुळी! तसा चेहरा सुद्धा अद्याप भाजपकडे नव्हता.
मूळ हेतू हा फक्त पक्षाच्या एस्टॅब्लिशमेंटचा होता.
तो सुंदररीत्या साध्य झालाय, भाजप त्यात जिंकलाय!

तळागाळात पोचून पक्षशाखा उघडून आधी सामान्यांना -
कळू तर द्या की भाजप काय आहे.. राष्ट्रनिष्ठा काय आहे.. राष्ट्रवाद काय आहे.. तर पक्ष जिंकेल..

यासाठी पहिल्यांदा चंचुप्रवेश करावा लागतो.
पण भाजपने तर इथे पार खिंडारप्रवेश केलाय..!

८०+ जागा येणं ही चेष्टा वाटली?
खुनी, गुंड, धनदांडग्या बेडकांच्या तळ्यात एवढी कमळं फुलली आहेत हीच एक -
अचिव्हमेंट आहे. त्याबद्दल भाजपचं अभिनंदन!

आता त्यांना 'access' मिळाला आहे.
आता त्यांचे कन्सिडरेबल आमदार आहेत तरी.. लोकांचे प्रश्न धसास लाऊन त्यांना उत्तम प्रशासन द्यायची आता खरी संधी मिळाली आहे..
नक्कीच, आता खरं भाजपचं काम सुरू होईल.

तिथल्या बेबंद सरकारला विरोधी पक्षच नव्हता..
Read 5 tweets
14 Apr
"स्वामीसमर्थ हे काय संत आहेत?

गजाननमहाराज,स्वामी,साईबाबा असल्यांच्या नादी लागून काय उपयोग? आयुष्यात यांनी कधी काही उपदेश केला नाही की साहित्यनिर्मिती नाही.
मदत,सामाजिककाम तेही नाही..

संतमंडळी जरा तरी बरी, पण हे स्वामी, महाराज, बाबा लोक? श्या!"

👆
अशी मल्लिनाथी ऐकत होतो एकाची!-
विस्मय वाटला. ते मत पटल्यासारखं वाटतंय की काय असं झालं!
अरेच्चा! आईवडलांनी केलेला श्रद्धेचा हा संस्कार चुकीचा आहे की काय? वाईट वाटलं. चिंतन सुरू झालं..
ज्ञानोबा,तुकोबा,रामदासस्वामी यांच्या साहित्यातून बोध तरी होतो, पण या अर्वाचीन संतांचं काय बरं योगदान आहे? पोथ्यांतले चमत्कार?
नाही.
विचार केल्यावर समजतं की यांचे उपकार खरं तितकेच महत्त्वाचे आहेत.
कसे?
बर्‍याचदा 'उपदेशा'पलीकडे 'सज्जनसंग्रहाची' निकड फार असते.
समाजात जिवाच्या ओढीमुळे शिवाची आठवण रहात नाही तेव्हा पर्यायानं त्याचा परिणाम सौजन्यावर होतो. मग हे सज्जनत्व टिकवून कसं ठेवावं?

उत्तर - सद्संगतीनं!
Read 12 tweets
13 Apr
कंबरडं मोडतंय रे सामन्यातिसामान्यांचं..

पाडव्याच्या दिवशी गळ्यातली सोन्याची चेन मोडली एका मित्राने..

लग्न झालंय मागच्यावर्षी, सलूनचा धंदा बंदय आणि घरात पत्नीआईवडीलआजीआजोबा एवढे लोक आहेत.

ब्रेक द चेन म्हणजे हेच काय?
कष्टानं मिळवलेलं सोनंही मोडलं जावं इतकं गरजेचं आहे Lock-down?
त्या स्वाभिमानी मित्राला नेमकी मदत तरी काय offer करू मी?
वडीलही असायचे दुकानावर..
म्हटला गेले सहा महिने एकट्यानेच काम केलं, दाढीकटींगमुळे संसर्ग वाढेल म्हणून वयस्कर वडलांना घरी ठेवलं,

दुकानात जास्तीचा खर्च करून तापमानडिजिटलचेकर काय, ती सलूनकिट्स काय, स्प्रेज काय सगळं सगळं आणलं..
का तर, दुकान बंद नको रहायला..
मामाला जागेचं भाडं द्यावं लागतं, त्याचं घर पण भाड्यावर सुरू आहे.. तो तरी बिचारा काय करणार..

जबाबदारीनं वेढलेलं अवघ्या 28 वर्षांचं ते लेकरू पाहून जीव हळहळला.. आम्ही बसल्याजागी पगार घेऊन बेदरकार मतं ठोकतो, पण असे कित्येक तरुण अक्षरशः रस्त्यावर येतायत.
Read 6 tweets
6 Apr
तुकाराम महाराज आणि 'बामणं'.👇

"साधा वाणी असलेला हा तुक्या,
गावातले ब्राह्मण त्याच्या पाया पडतात?"

मंबाजी नावाच्या देहूग्रामपुरोहिताला हे सहन होईना.
लक्षात घ्या,
'ब्राह्मण' पाया पडत आहेत याला त्याचा आक्षेप आहे.
इथे, मंबाजी सोडला तर बाकी सर्व ब्राह्मण तुकोबांच्याच बाजूने आहेत.
मंबाजीनं रामेश्वरशास्त्री बहुलकरांना बोलवून तुकोबांच्या वेदज्ञानाचा पराभव करायला व गावातल्या सगळ्या ब्राह्मणांना शासन करायला सांगितलं.

👆
आता काय झालं? रामेश्वरशास्त्री स्वतःच प्रभावित होऊन तुकोबांचे शिष्य बनले!

पुढे महाराजांच्या प्रसिद्ध चार टाळकऱ्यांत पहिले चार टाळकरी कोण?
होय, ब्राह्मणच.
त्यातल्याच एका 'गंगाधरपंत मवाळ' यांच्या कडूस गावचा मी आहे.. मला अक्कल शिकवू नये.

एका मंबाजी नावाच्या पुजारी लेवलच्या ब्राह्मणाने त्रास दिला पण बाकीच्या समस्त विद्वान ब्रह्मवृंदांनी तुकोबांची कीर्तनं समोर बसून ऐकली ते नाही का दिसत?

ब्रिगेडी लपून धर्मविरोध करतात
Read 6 tweets
1 Mar
काल मी 98ने पेट्रोल भरलं..

तळतळाट, उद्वेग, हळहळ या सगळ्या भावना आल्या.
त्या स्वाभाविक आहेत. 500मधे तीन आठवडे चालणारी माझी प्लॅटिना आता आठवड्याला साधारण तितकंच पेट्रोल मागू लागलीए..

याची चीड रोजची 30km+ drive असणार्‍याला येणारच रे!

पण नक्की कुणावर रागवायचं⁉️
खरी गोम यात आहे..
कारण असंय, की आपला असा सरळसोट ग्रह झालाय की इंधनकिमती फक्त केंद्रसरकार नियमित करू शकतं..
लिट्रली हाच समज आहे प्रत्येकाचा..
माझाही होता.

लेकिन वैसा है नही!

इंधनकिमतीच्या सुमारे 30 टक्के कर हा राज्य सरकारचा असतो. (अतिरिक्त सेस आणि आता कृषी सेस धरून.)

खरं पेट्रोल महागतं ते इथे👆
कच्चं इंधन आजमितीला 23.9 लिटर मिळतंय.
रिफाइन, प्रोसेसिंग करून पंपात पोचेपर्यंत ते होतं 29rs.
रोडसेस,excice duty कर केंद्राचे असतात. त्याने ते होतं अंदाजे 61rs.

पंप डीलर किती घेतो माहित्येय?
तब्बल 4 रुपये लिटरमागे!🤑
उगाच पेट्रोलपंप उघडत नाहीत राजकारणी!

पेट्रोल झालं 65 रुपये!
Read 8 tweets
26 Feb
सावरकर आम्हाला का पूज्य आहेत?

त्यांच्याइतकं नेमकं, bull's eye vision ज्याला म्हणतात तितकं थेट समीक्षण दुसर्‍या कुणाचंही नाही.

ते,
हिंदुत्ववादी, पण सनातनी नाहीत
कविह्रदयी, पण कल्पनाविलासी नाहीत
राजनीतिज्ञ, पण राजकारणी नाहीत

त्यांची एकूणएक कृती तार्किक असण्याचं हेच खरं कारण.
हा तोल कसा सावरला?
किती अवघड आहे हे?

पूर्ण हिंदुत्वाकडे जायचं, मात्र एका कलाकडे झुकत बाजू घ्यायची नाही.
आणि पूर्णतः धर्म नाकारून एककल्ली शुष्कही व्हायचं नाही.
फार अवघड सुवर्णमध्य.

जो धर्मावर कठोर भूमिका घेईल आणि
हिंदुस्थान हिंदूंचाच आहे हेही छातीठोकपणे सांगेल.. एकाचवेळी..!
पण याचा दुहेरी फटका त्यांना बसला!

सर्वधर्मसमभावाच्याखालून स्वार्थ साधणारे तथाकथित secular पक्ष त्यांच्यापासून दूर गेले. कारण सावरकरांनी हिंदुत्व पुरस्कृत केलं.

आणि हिंदुत्ववादी म्हणवणारी सनातनी मंडळी त्यांच्यापासून दूर गेली.. कारण त्यांनी हिंदुत्वाला पारखून घ्यायला सांगितलं..
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!