अत्यंत महत्वाचा थ्रेड👇
राज्यातल्या कोरोनाग्रस्त लाखो सामान्य रुग्णांना दिलासा देणाऱ्या एका याचिकेची नुकतीच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी ही याचिका दाखल केली होती, त्यांचा आक्षेप असा होता+
की, शासनाने 23 मे 2020 रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ केवळ व्हेंटिलेटरवरील गंभीर कोविड रुग्णांनाच देण्यात येतो, तो कोविडच्या सर्व रुग्णांना त्या योजनेंतर्गत लाभ देण्याची मागणी केली होती. दरम्यान या याचिकेवर सुनावणी सुरू असताना+
न्यायालयाने सरकारची भूमिका विचारली त्यावेळी या आघाडी सरकारने न्यायालयात शपथपत्रासह सांगितले की, व्हेंटिलेटरवरील 8 उपचारासहित 20 अन्य उपचार कोविड रुग्णांना महात्मा फुले योजनेत मोफत देण्यात येईल.
मात्र वस्तुस्थिती अशी होती की, सरकार केवळ घोषणा करून कागदी घोडे नाचवत आहे, वास्तविकता+
कोविड रुग्णांना मोफत लाभ राज्यात कुठेच मिळत नाही, खाजगी दवाखाने रुग्णांकडून लाखो रुपयांची बिले वसूल करत आहेत. याचे पुरावे म्हणून ओमप्रकाश शेटे सरांनी 20 ते 25 रुग्णांची लाभार्थीसाठी पात्र असूनही लाखो रुपयांची बिले भरून उपचार घेतल्याची बिले व इतर माहिती शपथपत्रासह न्यायालयात सादर+
केली. यावेळी मात्र राज्य सरकारला झटका बसला आणि तातडीने आम्ही त्या रुग्णालयाला नोटिसा देत कायद्यानुसार कारवाई करणार असल्याची माहिती न्यायालयात दिली. त्यावर उच्च न्यायालयाने येत्या 22 जून 2021 रोजी या खाजगी दवाखान्यांवर काय कारवाई केली याचा अहवाल सादर करण्यास सांगितला आहे.
दरम्यान+
ओमप्रकाशजी शेटे यांची एकच भूमिका कायम होती की, आज राज्यातलं वास्तव विदारक आहे, ज्यांच्याजवळ पैसे आहेत अशाच रुग्णांना उपचार केला जातो, ज्याच्याजवळ पैसे नाहीत त्यांना दवाखाना उभाही करत नाही, तथापि लाखो सामान्य रुग्णांना उपचारासाठी आपले घर, जमिन, सोनंनाणं आणि इतर संपत्ती विकावी+
लागली आहे. आयुष्यभर कष्ट करून जमा केलेली पुंजी केवळ एका आजारात नष्ट होतानाच चित्र आज महाराष्ट्रात आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत लाभ द्यावा आणि ज्यांनी गेल्या दीड वर्षात पात्र लाभार्थी असतानाही लाखो रुपये देऊन उपचार घेतले त्यांचे पैसे परत करावेत ही मागणी+
त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयासमोर केली आणि त्याला यश येण्याच्या दृष्टीने न्यायालयाने राज्य सरकारला कडक शब्दात फटकारत कोणताही रुग्ण आर्थिक कारणामुळे उपचारापासून वंचित राहू नये,तातडीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याचे आदेश दिले.+
ज्या रुग्णांनी लाभार्थी असूनही पैसे भरून उपचार घेतले त्यांनी आपले अर्ज त्या समितीकडे लेखी स्वरूपात द्यावेत. त्यावर ती समिती तातडीने निवारण करेल असे आदेश दिले. सरकारने ती समिती तातडीने गठीत केलेली आहे.
खरंतर महाआघाडी सरकारच्या आशीर्वादाने खाजगी दवाखाने अक्षरशः सामान्य माणसाला+
लुटत आहेत, त्याला या आघाडी सरकार आणि राजेश टोपेचाच वरदहस्त आहे, आज माहिती घेतली तर धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे, राज्यातल्या 45 लाख कोरोना रुग्णांपैकी केवळ 132219 रुग्णांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यातही खाजगी रुग्णालयात केवळ 54233 तर सरकारी रुग्णालयात 77986 जणांना+
लाभ मिळाला आहे. एकूण रुग्ण 45 लाख आणि लाभार्थी आकडा जर पाहिला तर केवळ 2 ते 2.5 टक्के लाभार्थी यामध्ये आहेत, मग बाकी रुग्णांनी पात्र असतानाही लाखो रुपये भरले, मग ही लूट नाही तर काय आहे? दिवसाढवळ्या आपल्या खिशात हात घालून लाखो रुपये या राज्य सरकार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी+
खाजगी दवाखान्याच्या माध्यमातून लुटले आहे. अन यामुळे लाखो लोकांची आयुष्य उध्वस्त झाली हे दुर्दैवी आहे.
आज श्री ओमप्रकाश शेटे सर जर न्यायालयात गेले नसते तर हे वास्तव समोर आले नसते, राज्यातल्या रुग्णांना विनंती आहे की, आपल्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या+
समितीकडे अर्ज दाखल करा, अर्ज दाखल करत असताना सोबत कोरोना रुग्णांना उपचार घेतल्यानंतर खाजगी रुग्णालयाने आकारलेले बिल,रेशन कार्ड व आधार कार्ड झेरॉक्स प्रत सोबत जोडावी.राज्यातले लाखो अर्ज जेव्हा एकत्र होतील तेव्हा या सरकारला पैसे माघारी द्यावे लागतील. कारण या सरकारच्या लुटीचं रौद्र+
रूप मा.उच्च न्यायालयाला दिसेल. सामान्य माणसांच्या जगण्यामरण्याची लढाई आहे, आज न्यायालय न्याय देण्यासाठी सक्षम आहे, पण हे विदारक वास्तव निदर्शनास आणून द्यावं लागेल, एका शेटे सरांनी न्यायालयाच्या माध्यमातून हा लढा उभा केलाय, आपण सर्वजण एकत्र येत आता तो यशस्वी करूया. सामान्य+
माणसांना न्याय देऊया...👍
(जास्तीत जास्त शेअर करा. अर्जाचा फॉरमॅट कमेन्टमध्ये टाकला आहे. अधिक माहितीसाठी इनबॉक्समध्ये संपर्क साधा.🙏)
- विकास विठोबा वाघमारे
मोहोळ,जि. सोलापूर @OmprakashShete@ShreeBharatiya
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पंढरीच्या कौलाचे गुपित..🌷👇
पंढरपूर - मंगळवेढ्याच्या संतभूमीत भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले अन सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. हा विषय खरंच राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणारा आहे, याची अनुभूती लवकरच दिसेल. मात्र हा निकाल घोषित झाल्यानंतर महाआघाडीच्या काही महत्वाच्या नेत्यांच्या+
चुकीच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मात्र मला स्वस्थ बसवेना..
मंगळवेढा आणि पंढरपूर ही संतांची भूमी आहे, कर कटेवरी ठेऊन उभा असलेला विठूमाऊली अन मंगळवेढ्यावर दृष्टी ठेऊन असलेले दामाजीपंत! सोबतीला ज्ञानोबा, तुकोबाराय, मुक्ताई, जनाई, नामदेव आणि अशा अनेक महान संतांचे अधिष्ठान या भूमीत+
आहे. या महान भूमीतल्या निवडणूकीत यंदा भाजपाचाच पठ्ठा विजय करायचा हा खुद्द पांडुरंग परिवाराचाच निश्चय! त्याप्रमाणे विजय झालाही!
पण या विजयामागे असलेलं एक गुपित म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, ती लोकांना माहिती नाही. आघाडीच्या नेत्यांना कळेना की सगळं काही ठीक असताना आपण निवडणूक हरली+
महत्वाचा थ्रेड👇🌷
राज्य सरकार नेमकं मोफत काय देणार! आणि फुकटच्या क्रेडिटसाठी राज्य नेमकं कितीवेळा तोंडचलाखी करणार हे सांगणं तसं अवघड आहे. आयजीच्या जीवावर बायजी उधार म्हणजे काय खाली सांगतो बघा! उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री म्हणून तर सपशेल अपयशी आहेतच, पण माणूस म्हणूनही ते त्या+
पात्रतेत बसत नाहीत, कारण या मरणासन्न काळात सर्वात जास्त राजकारण आणि द्वेष जर कुणी केला असेल तर उद्धव ठाकरे यांनीच केलाय.
काल मीडियाच्या माध्यमातून अजून एक दलाली करण्याचा प्रयत्न केला आणि राज्यातल्या लोकांना एक मेसेज पोहचवण्याचा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे सरकारने केला की,+
"केंद्र सरकार विकत लस देत आहे, आणि राज्य सरकार आपल्या पैशातून सर्व नागरिकांना मोफत लस देत आहे." मग सगळे पाळलेले दलाल आणि गुलाम वाहवा करायला लागले. पण तुम्हाला मी सत्यता सांगतो. सोबतच गुलामांच्या आणि राज्य सरकारची दलाली करणाऱ्यांच्या तोंडावर हाणायला लिंकसुद्धा देतो.👇
होय! हे तेच @AjitPawarSpeaks आहेत, ज्यांनी पंढरपूर - मंगळवेढ्याच्या विधानसभा पोटनिवडणुकीत येऊन प्रचार केला. केवळ जाहीर सभाच नाही तर गल्लोगल्ली फिरून याच दादांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
त्या भागात आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना मात्र हेच अजित दादा बेताल वक्तव्ये करत+
सुटले आहेत. हे म्हणतात की, "या कोरोनाच्या उद्रेकाला तिथली जनताच जबाबदार आहे".
खरंतर अशा प्रकारचे वक्तव्ये हे लाजिरवाणे आहे, दादा हे वागणं बरं नव्हं. जर त्या भागात तुमचे अर्धा डझन मंत्री आणि तुम्ही स्वतः येऊन सभा घेतली नसती तर कशाला लोक जमले असते?लोकांना दोष देणं बंद करा.
भाजपाने+
प्रचार केला, मात्र अशाप्रकारे जबाबदारी ढकलली नाही, ना बेताल वक्तव्ये केलीत. उलट त्या ठिकाणी कोविड सेंटर व्हावे यासाठी भाजपा नेतेच प्रयत्नशील आहेत.
पण दादांनी आजच आपली पंढरपूर - मंगळवेढ्याची हार मान्य केली आहे, मतांचा जोगवा मागूनही लोकांनी इंद्रायणी काठ दाखवला असल्याची कुणकुण+
महत्वाचा थ्रेड👇
हे दोन फोटो बघा! राज्यात आरोग्य व्यवस्था आज चव्हाट्यावर आहे, राज्यकर्ते महत्त्वाकांक्षी आणि धोरणात्मक निर्णय घेणारे नसल्याने आज राज्याची वाताहत झालीय हे नाही म्हणलं तरी निखळ सत्य आहे. देवेंद्रजी फडणवीस या माणसावर विरोधकांचा राग असू शकतो पण या माणसाची राज्याच्या+
प्रशासनावर आणि कारभारावर घट्ट पकड होती. आणि आजही आहे. त्याची अनुभूती अवघ्या राज्याला अजूनही येतेय..
खरंतर देवेंद्रजींनी गेल्या पाच वर्षात आरोग्य क्षेत्रात जे काम केलं ते आत्तापर्यंतच्या इतिहासात कधीच झालं नाही हे दाव्याने सांगू शकतो. गावगाड्यातल्या माणसाला उपचार मिळाले पाहिजेत+
आणि उपचाराविना कोणीही जीवानिशी गेला नाही पाहिजे हे काळजात कोरून काम करणारा देवेंद्र नावाचा माणूस! अन सोबतीला झपाटून आणि झोकून देऊन तळमळीने काम करणारे ओमप्रकाश शेटे सर...
महाराष्ट्रात एकही गाव असं नसेल की ओमप्रकाश शेटे सरांना आम्ही ओळखत नाही. अवघा महाराष्ट्र देवदूत म्हणून ओळखतो,+
गेल्या चार - पाच दिवसांपासून महाराष्ट्राचे पप्पू नाना पटोले, वाचाळवीर मंत्री कबाब मलिक आणि इतर राज्यातले उंटावरचे शहाणे हे केंद्र सरकार, देवेंद्रजी फडणवीस आणि प्रवीणजी दरेकर यांच्यावर रेमडीसिविर इंजेक्शन विषयात टीका आणि आरोप करत आहेत, त्या महावसुली वाल्यांना आज त्यांच्याच+
मंत्रिमंडळात असलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सणसणीत चापट लगावली आहे.
डॉ. शिंगणे म्हणतात की, "मागच्या आठवड्यात मला विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर भेटले, त्यांच्यासोबत काही कंपन्यांची माणसं होती, त्यांनी निवेदन दिलं, त्यांनी मला सांगितलं की रेमडीसिविर+
ची उपलब्धता आहे, जे निर्यातीसाठी आहे, पण तो आपल्याला मिळू शकतो, त्यानुसार आम्ही अन्न व औषध प्रशासनाने परवाना दिला आणि तो साठा फक्त सरकारला मिळू शकत होता, ठरल्याप्रमाणे विरोधी पक्ष सरकारलाच मिळवून देत होता, मात्र मधल्या काळात काही वाईट राजकारण झालं."
थ्रेड👇
आज दिल्लीत शरद पवार साहेबांनी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेलं आरोप गंभीर आहेत असं बोलले मात्र सर्व पत्रकार परिषदेत ही परमबीर सिंग दोषी आहेत म्हणत यांच्यावर बिल फाडलं, देशमुखांवर गंभीर आरोप होतात मात्र त्यांना हाकलून दिले जात नाही, त्या+
घटनेची चौकशी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.
त्यांची प्रेस संपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात प्रेस कॉन्फरन्स घेतली, पवार साहेबांनी सरकार वाचवण्यासाठी केलेलं लंगडं समर्थन देवेंद्रजींनी अक्षरशः चिरफाड करून दाखवलं. शरद पवार म्हणतात की,सदर घटनेची चौकशी व्हावी, मग+
त्यामध्ये नेमकी कुणाची चौकशी? फक्त परमबीर सिंगांची की गृहमंत्री अनिल देशमुखांची पण? आणि जर देशमुखांची चौकशी करणार असाल तर गृहमंत्री पदावर असताना कशी निष्पक्ष चौकशी होईल असा सवाल केला. जर मनापासून चौकशी करायची असेल तर तातडीने अनिल देशमुखांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे.
यामध्ये+