पंढरीच्या कौलाचे गुपित..🌷👇
पंढरपूर - मंगळवेढ्याच्या संतभूमीत भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले अन सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. हा विषय खरंच राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणारा आहे, याची अनुभूती लवकरच दिसेल. मात्र हा निकाल घोषित झाल्यानंतर महाआघाडीच्या काही महत्वाच्या नेत्यांच्या+
चुकीच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मात्र मला स्वस्थ बसवेना..
मंगळवेढा आणि पंढरपूर ही संतांची भूमी आहे, कर कटेवरी ठेऊन उभा असलेला विठूमाऊली अन मंगळवेढ्यावर दृष्टी ठेऊन असलेले दामाजीपंत! सोबतीला ज्ञानोबा, तुकोबाराय, मुक्ताई, जनाई, नामदेव आणि अशा अनेक महान संतांचे अधिष्ठान या भूमीत+
आहे. या महान भूमीतल्या निवडणूकीत यंदा भाजपाचाच पठ्ठा विजय करायचा हा खुद्द पांडुरंग परिवाराचाच निश्चय! त्याप्रमाणे विजय झालाही!
पण या विजयामागे असलेलं एक गुपित म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, ती लोकांना माहिती नाही. आघाडीच्या नेत्यांना कळेना की सगळं काही ठीक असताना आपण निवडणूक हरली+
कशी! भाजपाच्या या विजयाच्या मागे असलेले मास्टरमाईंड आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांतजी भारतीय यांना आघाडीच्या एका नेत्याने तसा थेट सहज प्रश्नही केला की, "नेमकं तुम्ही काय केलं, की ही निवडणूक जिंकली!"
पण त्यातली गंमत अशी होती की, निवडणूक रंगात आलेली होती, प्रचाराच्या तोफा+
धडाडत होत्या, संतभूमी असलेल्या परिसरात आता राजकीय रणधुमाळी रंगलेली.
ऐन मतदानाचा 17 एप्रिल हा दिवस उजाडला आणि भल्या सकाळीच पहाटे सरचिटणीस श्रीकांतजी भारतीय यांना राज्याचे लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी फोन केला आणि म्हणाले, "श्रीकांतजी, आज मतदानाचा दिवस आहे, तुम्ही सर्व+
कार्यकर्त्यांनी गेले काही दिवस खूप चांगलं काम केलंय, मीही पंढरपुरात येऊन गेलो, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मला मायबाप विठ्ठलाचं दर्शन काही घेता आलं नाही. तुम्ही असं करा, आता सकाळीच नामदेव पायरीवर जा, तिथे दर्शन घ्या आणि विठ्ठलाला साकडं घाला. विठूमाऊलींचे आशीर्वाद तर आपल्यावर+
आहेतच"
अन श्रीकांतजी थेट नामदेव पायरीवर जाऊन लिन झाले, दर्शन घेतलं आणि पुढं मतदारसंघात मार्गस्थ झाले.👍
2 मे रोजी पांडुरंग पावला, साक्षात विठ्ठलाने भाजपाला आशीर्वाद दिलाही. देवेंद्रजी हे वारकरी आहेत, त्यांच्या देवघरात असलेली प्रसन्न विठ्ठलाची मूर्ती जास्त कुणाला माहिती नसेल, पण+
देवेंद्रजी विठ्ठलभक्त आहेत, त्यांना असलेली विठ्ठलाची ओढ, आपुलकी आणि श्रद्धा आपण कामाच्या माध्यमातूनही बघितलीच आहे. मग ते उभारलेले भव्य वारकरी भवन असो नाहीतर भिजत पंढरीची वारी करणाऱ्या हजारो वारकऱ्यांना वाटप केलेले रेनकोट असो!
पण या निवडणुकीत आघाडीचं काय चुकलं हेही बघावं लागेल,+
आघाडीच्या नेत्यांना आता भाजपावर निशाणा साधावा वाटतोय पण जेव्हा साक्षात पंढरीत निवडणूक सुरू होती, तेव्हा मात्र चित्र वेगळंच होतं. आघाडीच्या नेत्यांना तेव्हा ना पांडुरंग आठवत होते ना दामाजीपंत! हेही दूरची गोष्ट त्यांना त्या दरम्यान कधी नामदेव पायरीही कधी आपली वाटली नाही, ना कधी+
तिथे जाऊन आपलं मस्तक टेकवावं वाटलं! त्याही उलट या विठ्ठलाच्या संतभूमीत येऊन आमदार रोहित पवारांना राजकारणासाठी किती कळस गाठावा वाटला ते दुर्दैवी होतं, अन एका सभेत थेट त्यांनी डोक्यावर जाळीची टोपी घालूनच सभा घेतली. मग मला सांगा संतांच्या भूमीत राजकारण करणाऱ्या या आघाडीला विठ्ठल+
पावणार तरी कसा!
टाळ - मृदुंगाच्या तालावर विठू माऊलीचा गजर करत अवघ्या हिंदू धर्माला सहिष्णुता शिकवणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या मेळ्यात येऊन तुम्ही जर तेढ आणि दुही निर्माण होईल असं राजकारण करणार असाल आणि तुम्हाला नामदेव पायरीची साधी आठवणही येणार नसेल तर तुम्हाला विठ्ठल सोडा,+
अत्यंत महत्वाचा थ्रेड👇
राज्यातल्या कोरोनाग्रस्त लाखो सामान्य रुग्णांना दिलासा देणाऱ्या एका याचिकेची नुकतीच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी ही याचिका दाखल केली होती, त्यांचा आक्षेप असा होता+
की, शासनाने 23 मे 2020 रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ केवळ व्हेंटिलेटरवरील गंभीर कोविड रुग्णांनाच देण्यात येतो, तो कोविडच्या सर्व रुग्णांना त्या योजनेंतर्गत लाभ देण्याची मागणी केली होती. दरम्यान या याचिकेवर सुनावणी सुरू असताना+
न्यायालयाने सरकारची भूमिका विचारली त्यावेळी या आघाडी सरकारने न्यायालयात शपथपत्रासह सांगितले की, व्हेंटिलेटरवरील 8 उपचारासहित 20 अन्य उपचार कोविड रुग्णांना महात्मा फुले योजनेत मोफत देण्यात येईल.
मात्र वस्तुस्थिती अशी होती की, सरकार केवळ घोषणा करून कागदी घोडे नाचवत आहे, वास्तविकता+
महत्वाचा थ्रेड👇🌷
राज्य सरकार नेमकं मोफत काय देणार! आणि फुकटच्या क्रेडिटसाठी राज्य नेमकं कितीवेळा तोंडचलाखी करणार हे सांगणं तसं अवघड आहे. आयजीच्या जीवावर बायजी उधार म्हणजे काय खाली सांगतो बघा! उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री म्हणून तर सपशेल अपयशी आहेतच, पण माणूस म्हणूनही ते त्या+
पात्रतेत बसत नाहीत, कारण या मरणासन्न काळात सर्वात जास्त राजकारण आणि द्वेष जर कुणी केला असेल तर उद्धव ठाकरे यांनीच केलाय.
काल मीडियाच्या माध्यमातून अजून एक दलाली करण्याचा प्रयत्न केला आणि राज्यातल्या लोकांना एक मेसेज पोहचवण्याचा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे सरकारने केला की,+
"केंद्र सरकार विकत लस देत आहे, आणि राज्य सरकार आपल्या पैशातून सर्व नागरिकांना मोफत लस देत आहे." मग सगळे पाळलेले दलाल आणि गुलाम वाहवा करायला लागले. पण तुम्हाला मी सत्यता सांगतो. सोबतच गुलामांच्या आणि राज्य सरकारची दलाली करणाऱ्यांच्या तोंडावर हाणायला लिंकसुद्धा देतो.👇
होय! हे तेच @AjitPawarSpeaks आहेत, ज्यांनी पंढरपूर - मंगळवेढ्याच्या विधानसभा पोटनिवडणुकीत येऊन प्रचार केला. केवळ जाहीर सभाच नाही तर गल्लोगल्ली फिरून याच दादांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
त्या भागात आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना मात्र हेच अजित दादा बेताल वक्तव्ये करत+
सुटले आहेत. हे म्हणतात की, "या कोरोनाच्या उद्रेकाला तिथली जनताच जबाबदार आहे".
खरंतर अशा प्रकारचे वक्तव्ये हे लाजिरवाणे आहे, दादा हे वागणं बरं नव्हं. जर त्या भागात तुमचे अर्धा डझन मंत्री आणि तुम्ही स्वतः येऊन सभा घेतली नसती तर कशाला लोक जमले असते?लोकांना दोष देणं बंद करा.
भाजपाने+
प्रचार केला, मात्र अशाप्रकारे जबाबदारी ढकलली नाही, ना बेताल वक्तव्ये केलीत. उलट त्या ठिकाणी कोविड सेंटर व्हावे यासाठी भाजपा नेतेच प्रयत्नशील आहेत.
पण दादांनी आजच आपली पंढरपूर - मंगळवेढ्याची हार मान्य केली आहे, मतांचा जोगवा मागूनही लोकांनी इंद्रायणी काठ दाखवला असल्याची कुणकुण+
महत्वाचा थ्रेड👇
हे दोन फोटो बघा! राज्यात आरोग्य व्यवस्था आज चव्हाट्यावर आहे, राज्यकर्ते महत्त्वाकांक्षी आणि धोरणात्मक निर्णय घेणारे नसल्याने आज राज्याची वाताहत झालीय हे नाही म्हणलं तरी निखळ सत्य आहे. देवेंद्रजी फडणवीस या माणसावर विरोधकांचा राग असू शकतो पण या माणसाची राज्याच्या+
प्रशासनावर आणि कारभारावर घट्ट पकड होती. आणि आजही आहे. त्याची अनुभूती अवघ्या राज्याला अजूनही येतेय..
खरंतर देवेंद्रजींनी गेल्या पाच वर्षात आरोग्य क्षेत्रात जे काम केलं ते आत्तापर्यंतच्या इतिहासात कधीच झालं नाही हे दाव्याने सांगू शकतो. गावगाड्यातल्या माणसाला उपचार मिळाले पाहिजेत+
आणि उपचाराविना कोणीही जीवानिशी गेला नाही पाहिजे हे काळजात कोरून काम करणारा देवेंद्र नावाचा माणूस! अन सोबतीला झपाटून आणि झोकून देऊन तळमळीने काम करणारे ओमप्रकाश शेटे सर...
महाराष्ट्रात एकही गाव असं नसेल की ओमप्रकाश शेटे सरांना आम्ही ओळखत नाही. अवघा महाराष्ट्र देवदूत म्हणून ओळखतो,+
गेल्या चार - पाच दिवसांपासून महाराष्ट्राचे पप्पू नाना पटोले, वाचाळवीर मंत्री कबाब मलिक आणि इतर राज्यातले उंटावरचे शहाणे हे केंद्र सरकार, देवेंद्रजी फडणवीस आणि प्रवीणजी दरेकर यांच्यावर रेमडीसिविर इंजेक्शन विषयात टीका आणि आरोप करत आहेत, त्या महावसुली वाल्यांना आज त्यांच्याच+
मंत्रिमंडळात असलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सणसणीत चापट लगावली आहे.
डॉ. शिंगणे म्हणतात की, "मागच्या आठवड्यात मला विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर भेटले, त्यांच्यासोबत काही कंपन्यांची माणसं होती, त्यांनी निवेदन दिलं, त्यांनी मला सांगितलं की रेमडीसिविर+
ची उपलब्धता आहे, जे निर्यातीसाठी आहे, पण तो आपल्याला मिळू शकतो, त्यानुसार आम्ही अन्न व औषध प्रशासनाने परवाना दिला आणि तो साठा फक्त सरकारला मिळू शकत होता, ठरल्याप्रमाणे विरोधी पक्ष सरकारलाच मिळवून देत होता, मात्र मधल्या काळात काही वाईट राजकारण झालं."
थ्रेड👇
आज दिल्लीत शरद पवार साहेबांनी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेलं आरोप गंभीर आहेत असं बोलले मात्र सर्व पत्रकार परिषदेत ही परमबीर सिंग दोषी आहेत म्हणत यांच्यावर बिल फाडलं, देशमुखांवर गंभीर आरोप होतात मात्र त्यांना हाकलून दिले जात नाही, त्या+
घटनेची चौकशी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.
त्यांची प्रेस संपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात प्रेस कॉन्फरन्स घेतली, पवार साहेबांनी सरकार वाचवण्यासाठी केलेलं लंगडं समर्थन देवेंद्रजींनी अक्षरशः चिरफाड करून दाखवलं. शरद पवार म्हणतात की,सदर घटनेची चौकशी व्हावी, मग+
त्यामध्ये नेमकी कुणाची चौकशी? फक्त परमबीर सिंगांची की गृहमंत्री अनिल देशमुखांची पण? आणि जर देशमुखांची चौकशी करणार असाल तर गृहमंत्री पदावर असताना कशी निष्पक्ष चौकशी होईल असा सवाल केला. जर मनापासून चौकशी करायची असेल तर तातडीने अनिल देशमुखांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे.
यामध्ये+