#Thread
#SavarkarJayanti
#सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग १) :-
इसवी सन १८५७ पासून ते भारताने स्वातंत्र्य मिळवेपर्यंत अनेक थोर क्रांतिकारांनी स्वातंत्र्याच्या समरकुंडात आपल्या प्राणांच्या आहुत्या देऊन, आपल्या 'स्वातंत्र्यलक्ष्मीचे' आराधन केले.
१/
त्याच मांदियाळीतील अतीदिव्य तारा म्हणजे स्वा.सावरकर.
बालपणीच आपल्या कुलदेवतेसमोर "सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.!" या घेतलेल्या शपथीचं निर्वहन तात्यांनी शरीरास आत्यंतिक कष्ट सोसवून केलं. बऱ्याच प्रसंगी अशी वेळ येई की वाटे आता प्राणदोर तुटतो की काय.!
२/
पण मनात सतत आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याच ध्येय त्यांना परत आपल्या कर्मात अग्रेसर करी.
अशा या स्वातंत्र्यवीराची बदनामी करण्याचे कारस्थान केवळ आपल्या काही ऐहिक सुखासाठी काही लोक करत आहेत. कारण काय सांगतात तर सावरकरांनी अंदमान मध्ये असताना माफीनामे लिहिले होते म्हणून ते काही
३/
काही शूर वैगरे नाहीत ते माफीवीर आहेत. ह्याविषयी उत्तर देण्याचा प्रयत्न दोन थ्रेडच्याद्वारे करणार आहे.
१९११ साली सावरकरांना जी आतापर्यंत कोणाही कैद्यास झाली नव्हती अशी सलग दोन जन्मठेपींची अर्थात ५० वर्षे कारावासाची शिक्षा झाली आणि त्यांची रवानगी काळ्या पाण्यास म्हणजेच अंदमानात
४/
करण्यात आली. अंदमान म्हणजे साक्षात नरक यातनेचा 'रौरव नरकच' होता. त्यावेळी 'बारी' नावाचा अधिकारी तिथे बंदिपालक अर्थात जेलर होता. बारी क्रुर आणि निर्दयीपणाचे मूर्तीमंत प्रतीक. त्यावेळी अंदमानात राजकीय कैदी (सावरकरांसारखे) आणि इतर गुन्ह्यांत अटक झालेले कैदी असे बंदिवान होते.
५/
तात्याराव ज्यावेळी तिथे गेले त्यावेळी त्यांचे मोठे बंधू बाबाराव ही तिथेच बंदी होते.
त्यावेळी अंदमानात कैद्यांना अत्यंत अमानुष अशी वागणूक दिली जाई. त्याच विस्तृत वर्णन सावरकरांनी माझी जन्मठेप ह्या पुस्तकात केलेले आहे. उदाहरणासाठी जर सांगायचं झालं तर कैद्यांना तिथे काथ्या कुटून
६/
त्याची दोरी बनवण्याचे अत्यंत अवघड काम ज्यात बोट सोलून निघून रक्त निघे, तसेच कोलू फिरवून खोबऱ्याचे तेल काढण्याचे अत्यंत कष्टदायक काम देण्यात येई. ज्यात तो नुसता कोलु पाहून अनेक लोकांना घेरी येई. असे काम सकाळी उठून रात्री झोपेतो अखंड करावे लागे. केवळ काही काळासाठी जेवणासाठी
७/
विश्रांती देण्यात येई. काम पूर्ण नाही झाले की बेड्या ठोकून उभे राहणे, वेत खाणे अशा अनेक शिक्षांना सामोरे जावे लागे. त्यात परत ही कामे कैद्याची कुवत बघुन न देता सर्रास कोणालाही देण्यात येत होती. राजबंद्याना तर जास्त कडक शिस्त असे.
सावरकर त्यात विशेष कैदी होते त्यांना
८/
सगळ्यांपेक्षा वेगळे ठेवण्यात आले होते. कोणासही भेटू देण्यात येत नव्हते आणि कष्ट तर चालूच होते. अशात त्यांनी अथक परिश्रम करून वेगवेगळया प्रयत्नांनी सर्व कैद्यांना एकत्र केले तिथे एक मंडळ तयार केले.जशी जशी ह्यांची एकी आणि ताकद वाढू लागली तसा तसा जाच कमी होऊन सुधारणा होऊ लागल्या.
९/
हे १९११-१९ ह्या अंदमानातील काळाच अगदीच संक्षिप्त वर्णन आहे. आपण विस्तृत वर्णन वरील पुस्तकात अवश्य वाचावे.
ह्याच काळात सावरकरांनी सरकारला विविध अर्ज केले. ते वर्ष होतं १९१४ चं जगात पहिलं महायुद्ध उसळलं होत. इंग्लंड विरुद्ध जर्मनी अशी लढाई झाली होती. पूर्ण जगाची व्यवस्था अस्थिर
१०/
झाली होती आणि हीच संधी भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. त्यामुळे कुठल्याही खोट्या आश्वासनांवर का होईना आपण सगळ्यांची सुटका करून घेतली पाहिजे. हे हेरून तात्यांनी सरकारला अर्ज केला की "अशा युद्धप्रसंगी सरकारने राजबंद्याना मुक्त करावे जेणे करून सरकारला युद्धास
११/
पाठिंबा मिळेल. तसेच भारतीयांमध्ये सरकारचा विश्वास द्विगुणित व्हायला मदत मिळेल.त्यासाठी मी स्वतः ह्या युद्धात सरकारकडून लढण्याची हमी देतो." यात शेवटचा परिच्छेद महत्त्वाचा आहे ज्यात ते म्हणतात की "जर तुम्हाला वाटत असेल की मी हे फक्त माझ्या सुटकेसाठी करत आहे तर सरकारने खुशाल मला
१२/
फक्त बंदी ठेवावे बाकी लोकांना जाऊ द्यावे." आता सांगा कोण कुठे माफी मागतोय.?
सावरकरांचं जे म्हणणं होत तेच त्यावेळी काँग्रेसच म्हणणं होत मग यात कसली चुकीची गोष्ट आहे. उलट ते म्हणत आहेत त्यांना बंदीच ठेवा आणि बाकींना जाऊ द्या. युद्धात लढण्याचे आश्वासन वैगरे त्या शत्रूस खेळवत
१३/
ठेवण्याच्या गोष्टी आहेत. शत्रूस असे खोटी आश्वासने द्यायचीच असतात ही आम्हाला महाराजांची शिकवण आहे. तिचेच पालन इथे तात्यांनी केले. एवढं सांगून पण सुटका झालीच नाही.
त्यानंतरचा अर्ज आहे ऑक्टोबर १९१७ चा ज्यावेळी इंग्लंडचा युद्धात विजय होण्याची चिन्हे दिसू लागली.अशात सरकार भारतात
१४/
नवीन कार्यक्रम राबवणार ही बाब तात्यांना लक्षात आली ते विचारात घेऊन त्यांनी हा अर्ज केला आहे. त्यात विशेषतः ते सांगत आहेत की "जर भारताच्या कल्याणार्थ सरकारला काही योजना आखायाच्या असतील तर त्या सर्वांना समान लक्षात घेऊन व्हायला हव्यात.अशावेळी राजकीय कैद्यांचा विचार व्हायला हवा.
१५/
जगातील कुठल्याही देशात राजबंद्यांना कारावासात ठेवत नाहीयेत. तुम्ही आयर्लंड बाबतीत काय धोरण ठेवले आहे ते बघा. भारतात पण सर्व राजबंद्यांना तशीच वागणूक भेटायलाच हवी" आणि शेवटी परत तेच म्हणणे की "मला सोडता येत नसेल चालेल पण बाकी लोकांना सोडा." ह्याच उत्तर पण नकारात्मकचं आलं.
१६/
ह्यात उत्तराखातर जे पत्र आलं त्याच्यात सरळ सरळ उल्लेख आहे की सर्वांना सुटका देण्याबाबत जो अर्ज आला होता तो अग्राह्य आहे. कुठेही फक्त 'सावरकरांची सुटका' असा उल्लेख नाही ये. तरीही माफीवीर कोण सावरकर का?
त्यानंतरचा आणि शेवटचा अर्ज आहे मार्च १९२० चा. इंग्लंडचा विजय झाला आणि देशात
१७/
नवे कायदे झाले. त्याचप्रमाणे वेळोवेळी आपल्या बंधूस पत्राद्वारे इथली जाचक परिस्थिती व कैद्यांचे हाल सावरकर कळवत होते त्याद्वारे ते संपूर्ण देशात कळाले व त्याविषयी रोष निर्माण होऊ लागला. विविध नेते मंडळी ह्याविषयी सरकारला प्रश्न विचारू लागले तसेच अनेक लोकांनी केलेल्या सह्यांचे
१८/
अर्ज सरकारकडे जाऊ लागले. ह्याचा संमिश्र परिणाम असा झाला की अंदमानातील राजकैद्यांना सोडण्याचा आदेश निघाला ज्यात अर्थातच सावरकर बंधूंची नावं नव्हती.म्हणून तात्यांनी अर्ज केला की "त्यांच्यानंतर आलेली लोकसुद्धा नवीन आदेशात सोडली गेलेली आहेत जे आमच्यापेक्षा गंभीर गुन्ह्यात आत
१९/
होते. तसेच आम्ही बंधूंनी जवळ जवळ १० वर्षे शिक्षा सर्व बंधने पाळून भोगली आहे. याउपरही सरकार सांगेल ती आंशिक बंधने आम्ही पाळून बाहेर राहू. पण आम्हाला सोडण्यात यावे." हे असं सांगण्याच मुख्य कारण होत की दोघांची तब्येत खालवत चाललेली होती. तसेच बाबारावांचा क्षय वाढत होता. बाहेर
२०/
काही अंशी जास्त सेवा भारतभूची करता येईल या गोष्टी लक्षात घेऊन हा अर्ज होता. पण परत अपयश आले आणि अर्ज अग्राह्य झाला.
बऱ्याच जणांना वर दिलेल्या अर्जाच्या भाषेविषयी वाटत असेल की ह्यात 'Your Honour', 'I beg', 'I request' असे शब्द आले ज्यात सावरकर माफी मागत आहेत असे दिसत आहे
२१/
तर त्यांना हे माहिती पाहिजे की ही सरकारी पद्धत(प्रोटोकॉल) असते तसे लिहिण्याची. खाली गांधीजींचे एक पत्र देत आहे त्यात असे शब्द आपल्याला आढळतात म्हणून काही गांधीजी इंग्रजाचे गुलाम होतात का.!
सावरकर बंधूंना सोडले नाही ही गोष्ट जेंव्हा गांधीजींना कळाली तेंव्हा ते सुद्धा हळहळले व
२२/
त्यांनी 'यंग इंडियामध्ये' लवकरात लवकर सावरकर बंधूंची सुटका व्हावी या आशयाचा लेख लिहिला. एवढं होऊन पण सरकार बधलं नाही आणि शेवटी ज्यावेळी अंदमान वसाहत काही काळा पुरती बंद करायची हा निर्णय झाला, त्यावेळी सावरकर बंधूंची सुटका झाली ते वर्ष होत १९२१.पण सुटका कसली तिथून त्यांना काही
२३/
रत्नागिरीत तर काही काळ येरवड्यात तुरुंगातच ठेवण्यात आलं व १९२४ साली स्थानबद्धतेच्या निर्बंधात रत्नागिरीस धाडण्यात आले. तिथे त्यांनी १९३७ पर्यंतचा काळ हा स्थानबद्धतेत काढला व शेवटी नाईलाज होऊन सरकारला त्यांना मुक्त करावे लागले.
अशा ह्या स्वातंत्र्य योद्धयाने आपल्या
२४/
जीवनाचा अधिकसा काळ अत्यंत कष्टमय जाचातं काढला. यानंतर ही सावरकर अखंड १९६६ पर्यंत लढतचं राहिले जे की पुढील थ्रेडमध्ये येईलच. ह्या सगळ्याचा उद्देश एकच होता आपल्या 'मातृभूमीचे स्वातंत्र्य' ज्याद्वारे सकळ भारतीयांचे कल्याण साधता येईल.
२५/
तेंव्हा या थोर पुरुषाचा अपप्रचार करण्याचा कट लोकांनी थांबवावा..!! आपल्याला स्वातंत्र्य लढ्यात अनेक प्रकारचा त्रास सहन करावाच लागेल हे सावरकर जाणून होते आणि सर्व लक्षात घेऊनच त्यांनी लढ्यात सहभाग घेतला म्हणून ते म्हणतं,
२६/
की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
लब्धप्रकाश इतिहास-निसर्ग-माने।
जे दिव्य दाहक म्हणुनि असावयाचे
बुद्धयाचि वाण धरिले करि हे सतीचे।।
धन्यवाद..!
@ShefVaidya @AparBharat @authorAneesh @smitprabhu
संदर्भ:-
१) माझी जन्मठेप - स्वा सावरकर
२) माझ्या आठवणी - स्वा सावरकर
३) Echoes from Andamans - Veer Savarkar
४) सावरकर चरित्र - शी ल करंदीकर
५) Savarkar and His Times - Dhananjay Keer
६) Struggle for Freedom - R C Majumdar
७) Swarajya,OpIndia and StandPointIndia's Articles
८) इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांचा ब्लॉग.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा।

Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा। Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishwambharMule

Jul 13, 2022
-:नास्ति तत्त्वं गुरोः परम्:-
(गुरू आणि सद्गुरू)
#Thread
#गुरूपौर्णिमा #GuruShishyaParampara
#GuruPurnima2022
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस संपूर्ण भारतवर्षात 'गुरुपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो.
१/२५
@ShefVaidya @Drsunandambal
जन्माला आल्यापासून ते मृत्यूपावेतो प्रत्येक क्षणी केवळ आणि केवळ गुरुंच्या मार्गदर्शनाने ह्या अपार संसारसागरात मनुष्य वावरु शकतो, म्हणून प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
२/२५
'गुरू' शब्दाच्या व्याख्येचा विचार करायचा झाला तर, शास्त्रकार सांगतात,
गुरु - गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः।
अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते।।
अर्थात 'गु' कार म्हणजे अज्ञानरुपी अंधकार व 'रु' कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज.
३/२५
Read 25 tweets
Jan 12, 2022
#Thread
-: फलटणचे श्रीराम मंदिर :-
              एखाद्या गावी आपण पहिल्यांदा जावं आणि तिथे जाऊन आपल्याला खंत वाटावी की अरे..! आपण इथे यायला इतका उशीर का लावला..! तसच काहीसं मला फलटण गावी जाऊन वाटलं. तेथील शहररचना,
@ShefVaidya @authorAneesh @MulaMutha
#Temples #मंदिर #राम
१/
जुनी पण नावीन्यपूर्ण अशी बांधकामं आणि एकंदरीत वातावरण ह्या गोष्टींनी मला प्रचंड प्रभावित केले. त्यात अजून आनंद वाढवणारा 'दुग्धशर्करा योग' म्हणजे फलटणमधील अतिशय सुंदर अशी मंदिरे..! पुरातन असे जब्रेश्वर महादेवाचे मंदिर, गिरवीचे श्रीकृष्ण मंदिर आणि फलटणचे प्रसिद्ध राम मंदिर..!
२/
या सर्व मंदिरांना उत्तम स्थितीत पाहून मनाला अतिशय संतोष वाटला.

त्यात मला श्रीराम मंदिराची भावलेली भव्यता,सुंदरता आणि रमणीयता इथे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

फलटण गावात स्थित असणारे श्रीराम मंदिर हे श्रीमंत निंबाळकर यांच्या राजवाड्याच्या परिसरात आहे.
३/
Read 16 tweets
Sep 27, 2021
#Thread
#ज्ञानेश्वरी_जयंती
-:अद्वैतामृतवर्षिणी भगवती ज्ञानेश्वरी जयंती :-
आज मराठी भाषेतील सर्वच पैलूने श्रेष्ठ ठरणारा ग्रंथ कुठला असा जर प्रश्न विचारला गेला तर याचे सर्वानुमते केवळ एकच उत्तर आहे तो ग्रंथ म्हणजे 'भगवती ज्ञानेश्वरी'.
१/
@Kal_Chiron @ShefVaidya @swamiyogeshji Image
कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मज्ञानाचा सागर,भक्तीचा रसकल्लोळ तर मराठी साहित्याचा अद्वितीय आविष्कार आहे.
केवळ संस्कृत भाषेच्या जाणकार लोकांमध्ये सीमित झालेले ब्रह्मज्ञानाचे भांडार ज्ञानेशांनी अगदी सामान्य लोकांना ज्ञानेश्वरीद्वारे खुले करून दिले व त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज
२/ Image
साधकांची 'माऊली' झाली..! आणि त्यानंतर मग जो अमृताचा वर्षाव सगळ्या महाराष्ट्र भूमीवर झाला की अगदी आजपर्यंत साधक लोक त्यात अखंड न्हाहून आपल्या जीवनाची इतिकृत्यता करून घेत आहेत.
योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी गलितगात्र झालेल्या अर्जुनाच्या निमित्ताने भगवद्गीतेचा साक्षात्कार अखिल
३/
Read 17 tweets
Aug 8, 2021
#दीपअमावस्या
दीपसूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेजमुत्तमम्‌।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव।।
आज आषाढ वद्य अमावस्या. आजच्या अमावस्येला 'दीप अमावस्या' देखील म्हणतात. आपल्या सनातन धर्मात आपल्याला आपल्या कार्यात आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी
१/
काही ना काही व्यवस्था केलेली आहे. जसं की सूर्य आपल्याला पाणी प्रदान करतो म्हणून आपण दररोज जल 'अर्घ्य' देऊन त्याविषयी कृतज्ञता दाखवतो. त्याचप्रमाणे दीप हा आपल्याला प्रकाश प्रदान करतो, प्रत्येक जीवास 'तिमिरातून तेजाकडे' जाण्याची प्रेरणा देतो म्हणून ह्या विषयी कृतज्ञता व्यक्त
२/
व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस आहे.
आजच्या दिवशी घरातील सर्व समई नीरांजन वैगरे गोष्टी धुवून स्वच्छ केल्या जातात व नंतर त्याची पूजा केली जाते. आजच्याचं दिवशी समई निरांजन स्वच्छ करण्याचं व पूजा करण्याचं कारण हेच की उद्यापासून श्रावण महिना चालू होणार व
३/
Read 5 tweets
Jul 23, 2021
#Thread
#गुरुपौर्णिमा
श्रीगुरु आणि सद्गुरु :-
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस भारतवर्षात 'गुरुपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक जीवाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्व आहे. आज भारतातील दिव्य ज्ञानामृत केवळ आणि केवळ 'गुरू - शिष्य' परंपरारुपी
१/
#GuruPurnima2021
@ShefVaidya
गंगेतूनचं प्रवाहित होत होत आपल्यापर्यंत आले आहे.
भारतवर्षातील अनेक थोर ऋषीमुनींनी व संत मंडळींनी आपल्या दिव्यवाणीद्वारे गुरुमहिमा सांगितला आहे. त्यापुढे माझा हा लेख म्हणजे सूर्यप्रकाशासमोर एखाद्या पणतीच्या प्रकाशासारखे आहे. पण ह्या थोरामोठ्यांकडून जे
२/
काही मतीस कळाले ते मांडण्याचा प्रपंच इथे करत आहे.
आता महत्वाचा प्रश्न म्हणजे की 'गुरु' या शब्दाची व्याख्या काय? तर शास्त्रकारांनी गुरु ह्या शब्दाची व्याख्या अशी केली आहे की,
गुरु -
गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः।अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते ।।
३/
Read 16 tweets
Jul 11, 2021
#कालिदासदिन
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं । वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
आज "आषाढस्य प्रथम दिवसे" अर्थात आषाढाचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन..!
महाकवी कालिदासांनी आपल्या दिव्य काव्यप्रतिभेच्या जोरावर अनेक रचना करून संस्कृत
१/
@Kal_Chiron @ShefVaidya
भाषेला अधिकच सुंदर केले आणि समस्त रसिक लोकांना उपकृत केले.
"उपमा कलिदासस्य" ही उक्ती नेहमी सांगितली जाते ज्याचा अर्थ उपमा असावी तर कालिदासासारखी..!
आपण जर कालिदासाच्या काही रचनांवर ओझरती नजर जरी फिरवली तरी आपल्याला त्याचा प्रत्यय येईल..!
रघुवंशात कालिदास म्हणतात,
२/
क्व सूर्यप्रभवो वंशः क्व चाल्पविषयामतिः ।
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनाऽस्मि सागरम् ॥
अर्थात - कुठे तो सूर्यापासून उत्पन्न झालेला वंश आणि कुठे मी (कालिदास) त्यांचं गुणगान करण्याचा प्रयत्न करणारा अत्यंत अल्पमति. हे म्हणजे एखाद्या लहानशा नावेने मोठा सागर पार करण्याचे दिव्य
३/
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(