नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर.... शहादा तालुख्यातील घटना
अवश्य वाचा व आपल्या गावातही अंमलात आणा.....
शेत नांगरावे लागते ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे, पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेसेच वाटते ना? सतरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ,पण
+
तिचे समकालीन मूल्य मात्र आजही तितकेच आहे शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव गोमाई मध्यप्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे
२००० ची गोष्ट
+
आहे. डांबरखेडा परिसरात अचानक असे लक्षात आले की, परिसरातील बऱ्याच विहिरी, बोअरवेलना पाणी येत नव्हते. चारसहा महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहीरी, बोअर मृत पाचशे ते सातशेफुटापर्यंत जलस्तर खोल गेला. लोक बोअरची खोली तेवढी वाढवत होते. पण पाणी
+
वरती येत नव्हते असे का? शेतकरी हैराण कुणाकडे नीट उत्तर नव्हते मोतीलाल पाटील ( पटेल ) तात्या नांदरखेडा त्यांचे गाव शहाद्याला त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते त्यामुळे डांबरखेड्याची पाणी समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली होती. तात्या पुणे विद्यापीठाचे
+
१९७० चे एम एस्सी ऍग्री डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक होती. गावात नदी असून विहरी, बोअर कोरड्या होत्या सर्वचजण विचारात पडले होते, पण उत्तर सर्वांकडे नव्हते
तात्यांनी एकेदिवशी डांबरखेड गावाच्या सरपंचांना मनातल्या चार गोष्टी सांगितल्या खूप दिवसानंतरच्या आपल्या चिंतनाचा परिपाक
+
लोकांपुढे ठेवला. समस्येचा मुळापर्यंत जाऊनच उत्तर सापडतात आणि ती चिरस्थायी असतात. जलस्तर खोल गेला या समस्येवर तात्यांनी सांगितलेला उपाय अगदीच वेगळा होता. काहीसा वेडेपणाचा, पण त्यामागे अभ्यास, संशोधन आणि चिंतन होते. लोकांनी तात्यांचे ऐकले आणि पाचशे ते सातशे फुटावर गेलेला जलस्तर
+
चक्क नव्वद फुटावर आला. डांबरखेडच्या लोकांसाठी तात्यांनी स्वतः डिझल पुरवले, ट्रॅक्टर, लाकडी नांगर, लोखंडी नांगर अशा साधनांनी गोमाई नदी उन्हाळ्यात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले. चार किमी. नदी आडवी नांगरायचा हा अजब प्रयोग काहीसा चेष्ठेचा विषय झाला. गावकऱ्यांनी फक्त फक्त
+
एक किलोमीटर इतकीच नदी नांगरली जून कोरडा गेला, जुलैत पहिला पाऊसपूर आला मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही. नांगरलेल्या नदीने रात्रीच सर्व पूरपाणी पिऊन टाकले अवघ्या चोवीस तासात पाचशे फुटावरचे पाणी नव्वद फुटावर आले लोक आनंदले सकाळी परिसरातील मोटारींनी फोर्सने पाणी फेकले
+
तत्कालीन जिल्हाधिकारी असीमकुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांना "वॉटर मॅन ऑफ शहादा" असे संबोधून तात्यांचे तोंडभरून कौतुक केले होते महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळ्या प्रयोगाची
पाहणी करून कौतुक केले. नदी नांगरण्याची ही अभिनव कल्पना कशी सुचली? या विषयी सांगताना तात्या बोलले, "दरवर्षी येणाऱ्या गढूळ पूरपाण्यातले 'फाईन पार्टीकल' वाळूत साचून साचून दोन-तीन फुटावर हे पार्टीकल सेटल होतात, थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत जाते. अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून
जाते. माझ्या अनेक वर्षांच्या अभ्यास आणि चिंतनातून मला समस्येचे हे कारण लक्षात आले खेतीया या मध्यप्रदेशातील शहारापर्यंतच्या अनेक गावातील लोकांनी नंतर सातत्याने गोमाई नदी नांगरली आहे, आणि वाहून जाणारे पाणी आपल्याच गावात जिरवले आहे. हे तात्यांच्या कल्पक प्रयोगाचे फलित आहे. निराश न
+
होता, आत्महत्येचा पर्याय न अवलंबता शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर जिवंत करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतल्यास उत्तर नक्की सापडेल. मोतीलाल तात्या पटेल या वेड्या माणसासारखा परिपक्व विचार शेतकऱ्याने करावा बस.....
माझी सर्वाना विनंती आहे की हा प्रयोग प्रत्येक गावाने केला
+
तर आपले गाव पण पाण्याच्या समस्येतून मुक्त होईल.....
महाराष्ट्रातील एका वृद्ध शेतकऱ्यावर उपचार करत असताना डॉक्टरांनी त्याच्याशी संभाषण सुरू केले
अखेर हा विषय मामु आणि त्यांच्या भूमिकेपर्यंत पोचला
म्हातारा शेतकरी म्हणाला, "सर्व ठीक आहे साहेब, पण आमच्या गावच्या दृष्टीने आपला मामु म्हणजे काय माहिती का?? त्याला
+
आम्ही म्हणतो "खंबे का कछुआ"!
या शब्दाशी परिचित नसल्याने डॉक्टरांनी त्यांना विचारले, "खंबे का कछुआ" म्हणजे काय? 🤔
म्हातारा शेतकरी म्हणाला, 'जेव्हा तुम्ही एखाद्या खेड्यातून जात असता आणि जर तुम्ही एखाद्या कुंपणापाशी आला आणि तिथे खांब असेल आणि त्यावर समजा एक कासव बसले असेल तर
+
त्याला म्हणतात 'खंबे का कछुआ'.
त्या शेतकर्याने डॉक्टरचा चेहरा पाहिला आणि त्यांना या गोष्टीतले काही समजले नाही दिसून आले म्हणून त्याने खुलासा पुढे चालू ठेवला..
आता पहिली गोष्ट स्पष्ट आहे की कासव तिथे काही स्वतः जाऊन बसले असेल हे शक्यच नाही
टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.. पण त्या सोबतच आपल्या सर्व खेळाडूंना पदका पर्यंत पोहोचविन्यासाठी मोदी सरकारची "TOPS" पॉलिसी मैलाचा दगड ठरत आहे..
याच पॉलिसी बद्दल थोडक्यात..
+
ही पॉलिसी आहे, ऑलिम्पिक पर्यंत पोहोचून तेथे निर्णायक विजय मिळवु शकणाऱ्या खेळाडूंना शोधणे, त्यांना लागेल त्या योग्य सुविधा, प्रशिक्षण देणे आणि त्यांना ऑलिंपिक पोडियमपर्यंत पोहोचविणे..
२०१४ मध्येच मोदी सरकार प्रथम सत्तेवर आल्यावर त्यावेळचे
+
क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली ही पॉलिसी अमलात आणण्याचा निर्णय झाला होता. ही पॉलिसी त्यावेळी ताबडतोब अमलात आणली गेली. टोकियो ऑलिम्पिकचे वैशिष्ट्य पाहिले तर या पॉलीसीचे महत्त्व नक्कीच लक्षात येईल.. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक मधले पदक विजेते सर्व भारतीय खेळाडू हे
#रोड_मराठा
... इतिहासातील दोन प्रकरणे मी कधीच वाचत नाही किंबहुना माझ्याच्याने ती वाचण्याची हिम्मतच होत नाही... याला कारण आहे हिंदूंची झालेली कत्लेआम आणि त्यानंतर झालेली ससेहोलपट... त्यातील पहिले प्रकरण आहे पानिपत आणि दुसरे आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन अर्थात देशाची फाळणी..
... पानिपतावर मराठ्यांचा झालेला पराभव हा आज तागायत आमच्या जिव्हारी लागलेला आहे... ज्यावेळी प्रचंड अपयश येते त्यावेळी आपण त्याचे पानिपत झाले म्हणतो... पानिपतावरच्या "काला आम"ची कथा आजही प्रसिद्ध आहे... दोन मोत्ये गळाली, सत्तावीस मोहरा हरपल्या, एक लाख बांगडी फुटली हे वर्णन आजही
+
विषण्ण मनाने सांगितले जाते... सावरकरांनी लिहिलेले उत्तरक्रिया हे संगीत नाटक पानिपताच्या पराभवावाचे उट्टे काढण्या वरून आहे... पानिपतचा पराभव आजही आमच्या समाज मनातील सल आहे...
... स्वकर्तृत्वाने हिंदू पातशाही ची स्थापना करून हिंदू साम्राज्य दिनाचा अर्थात शिवराज्याभिषेकाचा सोहळा
+
#वेड
... २००२ च्या विम्बल्डन स्पर्धेत... महिलांच्या एकेरी अंतिम फेरीत... वीनस आणि सेरेना या दोन सख्ख्या बहिणी एकमेकींविरुद्ध खेळायला उभ्या राहिल्या होत्या...
... ऐन विशीतल्या आपल्या दोघी लेकींचा अभूतपूर्व सामना पाहण्यासाठी त्यांचे वडील रिचर्ड विलियमस आवर्जून हजर होते...
+
... पत्रकारांनी रिचर्ड यांना गराडा घातला... या सामन्या विषयी आपल्या भावना व्यक्त करताना रिचर्ड विलियम्स म्हणाले...
... या दोघी ४-५ वर्षांच्या असल्यापासून त्यांना प्रशिक्षणासाठी मी रोज सकाळी टेनिस कोर्टवर घेऊन जात असे... आमचे शेजारी आम्हाला हसायचे... हा काळया आपल्या पोरींना
+
विम्बल्डन चॅम्पियन करणार आहे म्हणून शहरातले अनेकजण उपहासाने टिंगल-टवाळी करायचे... पण मी वेडच घेतलं होतं... जिद्दीने चिकाटीने मुलींचं प्रशिक्षण आणि सराव यात खंड पडू दिला नाही... आज हसणार्या त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो...
... ही मॅच कोणी ही जिंको... विम्बल्डनची ट्रॉफी माझ्याच
#आगे_बढ़ो_आगे_बढ़ो
... दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडच्या सुदैवाने त्या देशाला विन्स्टन चर्चिल नावाचा पंतप्रधान मिळाला... रणांगणावर आणि राजकीय डावपेचात तो अक्षरशः शत्रू आणि मित्र राष्ट्रांना पुरून उरला... विन्स्टन चर्चिल हे एक लोक लोकविलक्षण व्यक्तिमत्व होते... विन्स्टन चर्चिलचा
+
हजरजबाबीपणा वाखाणण्यासारखा होता... मात्र आम्हाला त्याचे कौतुक असायचं काहीच कारण नाही कारण... तो प्रचंड हिंदुस्तान द्वेष्टा होता...
... एकदा पत्रकारांनी विन्स्टन चर्चिलला आपल्या आयुष्याचा, जीवनाचा आदर्श कोण? आपले प्रेरणास्थान काय... असा प्रश्न विचारला... क्षणाचाही विलंब न लावता
+
चर्चिल म्हणाला... माझा शिंपी... आश्चर्यचकित झालेल्या पत्रकारांनी विंस्टन चर्चिलला त्याचा शिंपी प्रेरणास्थान कसं असू शकतो म्हणून विचारलं...
... विन्स्टन चर्चिल म्हणाला... ब्रिटनचा पंतप्रधान या नात्याने मी वर्षाला किमान चार जोडी सूट शिवतो... दर तीन चार महिन्याने मी माझ्या
+
#वरपिता
... एक राजा होता... एकदा त्याने आपल्या प्रधानाला विचारले... जगात सगळ्यात जास्त सन्मान कोणाचा?... प्रधान उत्तरला... वर पित्याचा... राजाला खरंच वाटेना... राजाने प्रधानाला वर पित्याचा सन्मान जगात सर्वात जास्त हे सिद्ध करायला सांगितलं...
... दुसऱ्या दिवशी प्रधान राजाला घेऊन
+
एका शेतकऱ्याच्या झोपडीत गेला... झोपडीचा शेतकरी मालक अत्यंत दरिद्री होता... झोपडीत जगायला पुरेसं सामानही नव्हतं... अठराविश्व दारिद्र्य... राजा आपल्या घरी आलेला बघून त्या दरिद्री शेतकऱ्याने खाटेवर कांबळं अंथरलं... राजाला त्या खाटेवर बसवलं आणि आपण खाली जमिनीवर राजाच्या पायाशी बसला..
... राजाचं आपल्या घरी येण्याचं प्रयोजन काय हे विचारल्यावर प्रधान म्हणाला की... राजाला आपली मुलगी तुझ्या घरी द्यायची आहे... शेतकरी गयावया करून रडू लागला... गरीबाची कशाला थट्टा करता म्हणून हात पाय जोडू लागला...
... महत्प्रयासाने प्रधानाने शेतकर्याला पटवून दिलं की... राजाला खरंच
+