वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध #चौकोनीपाव आणि कुद्रे बिस्किट्स

चौकोनी पाव म्हणजे आमच्या वेंगुर्ल्याची खासियत !

#वेंगुर्ले हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किना-यावरील आयात-निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.
(१/६)
वेंगुर्ले बंदराजवळील सागर बंगला, दीपगृह, मंदिरे, फळसंशोधन केंद्र, विस्तीर्ण समुद्रकिनारा ही इथली आकर्षणे !
इथली खाद्यसंस्कृतीही जरा हटकेच आहे. सकाळच्या नाष्ट्याला अगदी दुपारी २ पर्यंत इथल्या लहान-मोठ्या हॉटेलांतून उसळ-चौकोनी पाव, हाफ भजी, कटींग चाय यालाच जास्त मागणी असते.
(२/६)
चाकरमानी देखील हॉटेलात यथेच्छ ताव मारुन चौकोनी पाव पार्सल बांधून घरी नेतात. हे चौकोनी पाव फक्त वेंगुर्ल्यातच बनविले जातात.

इथे सुरेश शिवलकर, नार्वेकर, भैरे, पाटणकर, सुदन रेडकर अशा मोजक्याच चौकोनी पाव बनविणाऱ्या बेकऱ्या आहेत.
(३/६)
मीठ आणि साखर विरहीत असलेले हे पाव मैदा आणि चणाडाळ पिठापासून बनविले जातात. यामध्ये ‘इस्ट‘ हे प्रिझरेटीव्ह नसल्यामुळे २४ तासच हे पाव चांगले राहू शकतात. याचं पीठ स्वतंत्र लाकडी भांड्यात भिजवले जाते.
(४/६)
सध्या या व्यवसायाकरिता कारागिरांची कमतरता, पाव २४ तासच टिकण्याची मर्यादा यामुळे वेंगुर्ल्याबाहेर याचा प्रसार झाला नसल्याचे बेकरीवाले सांगतात त्यामुळे वेंगुर्ल्यात आल्यावर फक्त इथेच मिळणारे उसळ आणि चौकोनी पाव खाल्ल्याशिवाय गेलात तर वेंगुर्ला भेट अपूर्ण राहील.

(५/६)
इथल्या बेकरीत मिळणारी खास कुद्रे बिस्किटेही चाकरमानी मुंबईकर आवर्जून घेऊन जातात.

लेखक - अभिषेक कांबळी

कोकणातील अशाच अतरंगी माहितीसाठी #BeingMalvani ला इन्स्टाग्राम वर नक्की फॉलो करा - instagram.com/beingmalvani07/

(६/६)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with स्मित सुशील प्रभूखानोलकर 🇮🇳

स्मित सुशील प्रभूखानोलकर 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @smitprabhu

12 Oct
लखोबा लोखंडेने बहुजन (खरं तर ते सर्वांचेच आदर्श आहेत) समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान केला म्हणून ज्यांनी कोर्टाबाहेर त्याच्यावर हल्ला केला, इथे twitter वर येऊन 'तो लिमये, म्हणजे ब्राह्मण...म्हणून इतर समाजातील आदर्शांचा अपमान करतो' असं certificate देऊन मोकळे झालेले -

(१/६)
- आपल्या पुरतं सोयीस्कर 'सत्य' शोधून जातीचं राजकारण करणारे #ठेकेदार, हा भय्या पाटील समर्थ रामदास स्वामी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असा जाहीर अपमान करत असताना कुठे लपले आहेत ?

समाजात जातीय तेढ निर्माण करून हा विकृत भैया पाटील काय साधू पाहत आहे?

(२/६)
मा.@sachin_inc हे या भैया पाटीलला follow करतात, म्हणजे काँग्रेसी तर्कानुसार भैया पाटलाच्या या लिखाणाशी सावंत सहमत आहेत का?
सावरकर, हिंदू आणि ब्राह्मणद्वेष घेऊन जन्मास येणाऱ्या काँग्रेसी पिलावळीकडून दुसरी अपेक्षा ती काय करणार!
सावरकरांना गांधीहत्येत गोवण्यात अयशस्वी ठरलेल्या -
३/६
Read 6 tweets
27 May
#स्वातंत्र्यवीरसावरकर

इथे पुण्यात येरवडा तुरुंगात रँड आणि आयर्स्ट यांचा 'कट करून हत्या' प्रकरणी दामोदर हरी चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली आणि तिथे भगूरला अवघ्या साडे चौदा वर्षाचा विनायक त्या बातमीने मात्र प्रचंड अस्वस्थ झाला.
काय करावं, काही सुचेना त्याला !
(१/५)
रात्र उलटून चालली होती.
'काय करावं ?' या विचाराने विनायक नुसता तळमळत होता.

लहानपणापासूनच 'मातृभूमीसाठी कोणताही त्याग करण्याचा' विचार जोपासणाऱ्या विनायकाला चाफेकरांच्या हौतात्म्यातून आपलं जगण्याचं उद्दिष्ट गवसलं.
(२/५)
आणि त्या रात्री आपल्या देवघरातल्या #अष्टभुजा देवीच्या मूर्ती समोर उभा राहून बाल विनायकाने जी शपथ घेतली ती शेवटच्या श्वासापर्यंत पाळली.

"माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीन, चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवरायांसारखा विजयी होऊन -

(३/५)
Read 5 tweets
26 May
#गांधीगोंधळ
भाग १: स्वातंत्र्याचा मार्ग

"छे ! आत्मत्याग, आत्मबल, सत्याग्रह, अहिंसा, सत्य इ. गोंडस नावाखाली हितशत्रूसच शोभण्यासारखा राष्ट्राचा जो तेजोभंग आजपर्यंत करण्यात आला तो पुरे झाला !
राजकारणाचा पोरखेळ करून टाकला तो पुरे झाला. हा #गांधीगोंधळ आता पुरे झाला !

(१/६)
म्हणे कलकत्त्यास पायी जा आणि ओरडा !

हो, जर तुम्हांस राष्ट्रासाठी खरोखरच काही करून दाखवायचे असेल, तर हे बालिश तत्वज्ञान नि हे षंढतेचे शास्त्र पहिल्याने पायाखाली तुडवून टाका !

पुन्हा 'हे कृत्य सत्याग्रह आहे की नाही' हा प्रश्न एखाद्या आजीसारखा विचारीत न बसता -
(२/६)
- एखाद्या शिवाजीसारखे इतकेच पाहा की, ते कृत्य एकंदरीत आपणांस अल्पात अल्प स्वार्थत्याग करावयास लावून दुष्ट विपक्षाची अधिकात अधिक हानी करीत आहे की नाही !

मग त्यास भाबडेगिरी किंवा भामटेगिरी, सत्याग्रह म्हणो किंवा शस्त्राग्रह म्हणो !

(३/६)
Read 6 tweets
4 Jan
#केसरी

आजच्याच दिवशी १४० वर्षांपूर्वी, म्हणजे ०४ जानेवारी १८८१ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दैनिक #केसरी हे वर्तमानपत्र सुरु करून भारतीय असंतोषाला वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली.

#लोकमान्यटिळक
(१/८)
२ जानेवारी १८८० साली लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कुल' ची स्थापना केली.

महादेव बल्लाळ नामजोशी हे संपादक सुद्धा ह्या शाळेच्या संचालक मंडळाचा भाग होते.

(२/८)
१८८० च्या अखेरीस वामनराव आपटे शाळेत रुजू झाले आणि त्यांच्याच घरी एके दिवशी जेवताना विष्णुशास्त्री आणि नामजोशींनी वृत्तपत्र काढण्याची कल्पना सर्वांसमक्ष मांडली.

टिळक आणि आगरकरांनी ती उचलून धरली आणि ठरले की आता केवळ शाळा काढून थांबायचे नाही तर तिच्या कक्षेच्या विस्तारासाठी -
(३/८)
Read 8 tweets
2 Jan
#सावरकरांच्या_आठवणी
भाग २२ : #मास्टरतारासिंग_आणि_स्वातंत्र्यवीरसावरकर

अकाली दलाचे माजी अध्यक्ष, तसेच गुरुव्दाराप्रबंधक समितीचे माजी अध्यक्ष आणि शिखांचे पुढारी मास्टर तारासिंग हे काँग्रेसचे कट्टर विरोधक होते. काँग्रेसचे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे धोरण त्यांना पटत नव्हते.

(१/८) ImageImage
त्यांचा नि अकाली दलाचा काँग्रेसला ठाम विरोध होता.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि त्यांच्या पंजाबच्या दौऱ्यात आणि दिल्लीत त्यांच्या तेथील मुक्कामात भेटी होत, चर्चा होत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली #हिंदू या शब्दाची व्याख्या मास्टर तारासिंगांना पटत असे.

(२/८)
त्या व्याख्येप्रमाणे शीख हे हिंदूच आहेत, असे ते मान्य करीत. हिंदुराष्ट्रात समाधानाने राहण्यास शिखांची सिद्धता आहे. उभयतातील या समान ध्येयांमुळे हिंदूसभेचे आणि अकाली दलाचे ध्येय व धोरण प्रामुख्याने हिंदू-मुस्लिम प्रश्नावर समान होते.

(३/८)
Read 8 tweets
1 Jan
#सावरकरांच्या_आठवणी
भाग २१ : #गीतरामायण

सुप्रसिद्ध कवी कै.ग.दि.माडगूळकर यांनी त्यांचे #गीतरामायण हे काव्य लिहावयास आरंभ केला होता आणि काही कडवी रविवारच्या #केसरी त प्रसिद्ध होऊ लागली होती.
तात्याराव सावरकर ती कडवी अगदी न चुकता वाचत असत.

(१/८)
ग. दि. माडगूळकरांच्या कल्पकतेची झेप आणि अर्थपूर्ण शब्दांची यथायोग्य योजना तात्यांना फार आवडे.

एकदा केसरी मधील #गीतरामायण काव्य वाचून झाल्यावर तात्या म्हणाले, “माडगूळकरांची प्रतिभा उत्तुंग आहे. ते खरे प्रतिभासंपन्न कवी आहेत."

(२/८)
#गीतरामायण ला पुढे प्रख्यात संगीत दिग्दर्शक #सुधीरफडके ह्यांनी अर्थपूर्ण चाली देऊन ते स्वतः त्याचे गायनाचे कार्यक्रम करीत.
त्या सुमारास एक घटना घडली.
तात्यांचा पुण्यात दौरा होता. सकाळी नगर वाचनालयात सभा होती. त्या सभेत सुरुवातीला सुधीर फडके यांनी #सागरास हे सावरकरांचे गीत गाईले.
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(