"सावरकरांना माफीवीर कुणी बनवलं ??"
कॉँग्रेस की भाजप ??

90's च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारलेले होते बहुदा त्यांची ही शेवटची पिढी... (1/n )
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक कॉँग्रेस विचारधारा मानणारे होते पन त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही उलट आम्हाला आमची स्वतःच मत व्यक्त करायलाच शिकवलं.
केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेसचीच सरकारे होती पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात सावरकर होते....(2/n)
#सावरकर
या देशासाठी योगदान देणार्‍या कोणालाही कॉँग्रेसने कधीच कमी लेखलं नाही.
मला आठवतं सावरकरांची "सागरा प्राण तळमळला" ही कविता आमचे हेच कॉँग्रेस विचाराचे असणारे गुरुजी किती तळमळीने डोळ्यात पाणी आणून शिकवायचे आणि ऐकताना आम्ही मूलमुली अक्षरशः रडायचो !!... (3/n)
#सावरकर
इतिहासाचे गुरुजी समुद्रात घेतलेल्या उडीचं वर्णन करू लागले की अंगावर शहारे उभे राहायचे आणि काळ्या पाण्याचे वेळी झालेला छळ ऐकला की मन सुन्न व्हायचं !

पण या मास्तरांनी कधीही आम्हाला सावरकरांनी माफी मागितल्याच, इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याचं किंवा.. (4/n)
#सावरकर
आपल्या राष्ट्रपित्याच्या हत्येत त्यांच नाव आल्याच कधीही आम्हाला कळू दिल नाही. कारण कॉँग्रेस आणि गांधी-नेहरूंच्या विचारांचे संस्कार !!
आमच्या मनामधे सावरकरांची प्रतिमा एक थोर साहित्यिक, राष्ट्र कवि आणि स्वातंत्र्यवीर अशीच कायम रुजवली गेली होती... (5/n)
#सावरकर
सावरकरांनीविषयी कमालीचा आदरही होता
पण 2014 #भाजपा सरकार आले आणि गांधी-नेहरू कसे हिंदू विरोधी हे दाखवायला आणि सावरकरच कसे वीर होते याची अतिशयोक्ती करण्याच्या नादात गांधी नेहरूंची बदनामी करायला सुरुवात केली गेली. इथूनच खऱ्या अर्थाने सावरकरांच्या वीर पनाची पडझड सुरू झाली कारण..(6/n)
क्रियेला प्रतिक्रिया तर येणारच ना !
डाव्यांनी मग उत्तरादाखल आजपर्यंत माहीत नसलेले सावरकरांचे माफीनामे, इंग्रजनिष्ठा, पेन्शन आणि इतर बाजू लोकांसमोर मांडायला सुरुवात केली.
कॉँग्रेसच्या 70 वर्षात सावरकरांची कधी बदनामी झाली नसेल तेवढी 2014 पासून झाली.. (7/n)
#सावरकर
मला वैयक्तिक सुद्धा सावरकरांनीविषयी ह्या सगळ्या गोष्टी भाजप सरकार आल्याच्या नंतर कळल्या आणि सावरकरांनीविषयी पहिल्यासारखा आदर आता राहिला नाही. एक साहित्यिक कवि म्हणुन आजही सावरकर माझ्या मनात आदरणीय आहेत पण त्याच्या पलीकडे नाही.
मग प्रश्ण आहे .. (8/n)
#सावरकर
सावरकरांना माफीवीर कुणी बनवलं ?
सोप्प आहे.
तुमच्या आजूबाजूच्या कोणालाही विचरा सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून पेन्शन घेतली हे तुला कधी कळाल? उत्तर असेल 2014 नंतर..

मग आता तुम्हीच ठरवा सावरकर माफीवीर होते हे लोकांना कुणामुळ समजल कॉँग्रेस की भाजप 🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with आत्मनिर्भर शेठजी

आत्मनिर्भर शेठजी Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Rationalist_04

11 Oct
देशात घडणाऱ्या कोणत्याही बदलाची सुरवात ही नेहमी महाराष्ट्रातूनच झालिये हा आजपर्यंतचा भारताचा इतिहास आहे.

मुघल साम्राज्याला सुरुंग लावणं असो की ज्ञानेश्वरनांनी सुरू केलेली संत परंपरा..ब्राह्मण्याला विरोध करणारा तुकारामांचा विद्रोह असो की... (1/n)

#महाराष्ट्र_बंद
मुलींना उंबरट्याबाहेर आणणारी जोतिसावित्रीची पहिली शाळा असो ती रुजवली ह्या मराठी मातीनेच..!
भारताला आधुनिकतेच्या दारात घेऊन जाणारी रेल्वे धावली तीही महाराष्ट्रातच आणि उद्योगाची नांदी ठरणारी कारखान्याची चाक फिरू लागली ती सुद्धा या महाराष्ट्रातच..!!
भारताबाहेर.. (2/n)
इंग्रजांना हाकलण्यासाठी देशभरातून एकत्र आलेल्या कॉंग्रेसची स्थापना असो की स्वातंत्र्यासाठी लढलेला शेवटचा लढा "चले जाव" असो देशात आजपर्यंत झालेला कोणताही मोठा बदल घ्या त्याची सुरुवात तुम्हाला मराठी मातीतूनच झालेली आढळेल.
सांगायची गोष्ट एवढीच की.. (3/n)
#MaharashtraBandh
Read 5 tweets
30 Jun
कॉंग्रेसने 70 वर्षात काय केले..."

2] विज्ञान आणि तंत्रज्ञान..

स्वातंत्र्यानंतर देशापुढे दारिद्र्य, रोजगार, भूक, उपासमारी हे प्रश्ण आ वासून उभे होते पण तरी बाकी प्रगत जगासोबत आपणही पुढे नाही गेलो तर हा देश कधीच... 👇(1/)
स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही याची जाणीव नेहरूंना होती त्यामुळं 1952 साली अमेरिकेच्या MIT सारख्या संस्था भारतात उभारण्याचा निर्णय नेहरूंनी घेतला. पहिली #IIT खरगपूरला स्थापन केली गेली. त्यानंतर मद्रास,मुंबई अशा वेगवेगळ्या शहरात #IIT आणि #IIM या संस्था उभ्या राहिल्या..👇(2/)
येणारा काळ अणुऊर्जाचा असणार आहे हे दूरदृष्टीचे नेहरू जाणून होते त्यामुळं 1956 साली मुंबईच्या तुर्भे इथ भारतातलीच नव्हे तर आशिया खंडातील पहिली अणुभट्टी सुरू केली. आजघडीला देशात अशा 7 अणुभट्ट्या आहेत. आज जगातल्या ज्या मोजक्या देशाकड अण्वस्त्र आहेत त्यात आपण.. (3/)👇
Read 9 tweets
19 Jun
"गेलो होतो पप्पूला ऐकायला पण... "

2019 च्या एप्रिलमध्ये लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा इथ राहुल गांधींचा "Pune Students Dialogue" हा कार्यक्रम होणार होता. त्याचे पासेस आमच्या कॉलेजात आले होते आणि योगायोगाने मला त्याचे 4 पासेस मिळाले. मग माझा मित्र निखिल मी आणि आमच्या.. (1/)👇
2 मैत्रिणी असे चौघे तिथ गेलो. आमच्या मनात तोपर्यंत WhatsApp फेसबुक, यू ट्यूब या सोशल मीडियाच्या माध्यमातुन रागाची 'Immature पप्पू' हीच image थोपवलेली होती. जरी मी #भाजप आणि #संघ विचारांचा विरोधी असलो तरी रागाची image इतरांप्रमाणे माझ्याही मनात "पप्पू" अशीच होती पण तरीही.. (2/)👇
या माणसाला जवळून ऐकण्याची संधी मिळतेय म्हणून मग आम्ही गेलो. आपला सुबोध भावे आणि RJ @mymalishka यांनी उत्तम सूत्रसंचलन केल होत कार्यक्रमाचं.
त्यादिवशी मी पहिल्यांदा खऱ्या अर्थानं राहुल गांधी ह्या माणसाला भेटलो. अगदी लहान वयात आपल्या आजीचं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं...(3/)👇
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(