युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे हि गोष्ट खरोखरच मनाला चटका लावणारी आहे पण ज्यांनी साधा नेपाळ देश पहिला नाही ते लोक परदेशातील भारतीयांना भारतात परत आणण्याबाबत टीका करत आहेत. तुम्हाला लॉजिस्टिक बद्दलच असं कोणतं ज्ञान आहे जे केंद्र सरकारला नाही?
जवळपास अठरा हजार लोक दुसऱ्या देशातून स्वतःच्या देशात परत आणणे म्हणजे सभेला बस करून नेण्याइतकी सोप्पी गोष्ट वाटली का? मुळात प्रत्यक्षात युद्ध सुरु होण्याच्या कितीतरी आधी गाईडलाईन्स दिल्या गेल्या पण कोणीही मनावर घेतल्या नाहीत.
मुळात सरकारने कुणालाही बाहेर पाठवलं नसल्याने परत आणायची जबादारी सरकारची कशी? सरकार हे कर्तव्य समजून करत आहे हेच खूप झालं. कारण हि जबादारी असती तर बाकीच्या देशांनी हि जबाबदारी घेतली असती. मी स्वतः बाहेर राहत असल्याने एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो जे भारत सरकार भारतीयांना परत
आणण्यासाठी करत आहे त्याच्या जवळपास सुद्धा एकही देश नाही. चार केंद्रीय मंत्री स्वतः युरोप मध्ये येऊन हि व्यवस्था पाहणार आहेत. अमेरिकेसारख्या देशाने त्यांच्या नागरिकांना स्वतःच स्वतः बघायला सांगितलं आहे तर बाकी देश सोडा.
पूर्ण कोरोना मध्ये भारताने जे वंदे भारत मिशन राबवलं त्याप्रकारचं मिशन एकही देश राबवू शकला नाही. माझ्यासारख्या कित्येक अनिवासी भारतीयांसाठी अश्या परिस्थितीत भारतात पोहोचणे हे उपकारच आहेत. #UkraineInvasion #IndianGovernment

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with स्वीडनकर

स्वीडनकर Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @pramodnmhatre

Apr 25, 2021
केंद्र राज्यांना मदत नाही करत आहे केंद्र काय करत आहे म्हणून खडे फोडणाऱ्यांनो दुसर्‍या लाटेच्या गेल्या एका आठवड्यात,
१. देशात ऑक्सिजन एक्सप्रेस रेल्वे चालवित आहे.
२. केंद्राने जर्मनीकडून 23 ऑक्सिजन टँकर आणले.
३. केंद्राने युएईहून ऑक्सिजन टँकर आणले आहेत.
४. केंद्राने हवाई मार्गे सिंगापूरहून ऑक्सिजन टँकर आणले आहेत.
५. एकूण प्रत्येक राज्यात २६२ ऑक्सिजन प्लांट उभारत आहे ३३ आधीचे उभारलेले आहेत
६. केंद्राने औद्योगिक क्षेत्रांच्या दिग्गजांना विश्वासात घेत अंबानी/अदानी/ टाटा/जिंदाल त्यांच्या प्लान्टमधून ऑक्सिजन द्यायला सांगितले आहे.
७. आयसीयू आणि ऑक्सिजनसह दिल्लीमध्ये १०००+ बेड तयार केले
८. लाइफ सेव्हिंग इंजेक्शन रीमडिशिव्हरचे उत्पादन ४० लाख प्रति महिन्यावरून ९० लाख प्रति महिन्यात वाढले.
९. डीआरडीओ/आयटीबीपी/आर्मी तर्फे बेड्स,डॉक्टर आणि सर्व काही पुरवित आहेत.
Read 8 tweets
Dec 23, 2020
१.एकदा एक हिंदू व्यक्ती परदेशातून भारतात बोटीने प्रवास करत होती.त्याच बोटीत दोन इसाई धर्माचे मिशनरी पण होते.त्यांनी जाणूनबुजून हिंदू प्रवाश्यासोबत धर्माविषयी तुलनात्मक चर्चा चालू केली.पण हिंदू प्रवाशी दोघांवरती भारी पडला आणी जेव्हा मिशनरींना लक्षात आलं कि आपण हरू लागलोय
त्यांनी अश्लील भाषेत हिंदू आणी हिंदू धर्माची निंदा करायला सुरुवात केली.हिंदू प्रवाशाने थोडा वेळ धीर धरला पण शेवटी त्याला राहवलं नाही हळू हळू एकाच्या जवळ जाऊन त्याच्या शर्टाची कॉलर पकडून त्यानंतर मजेत पण दृढ शब्दात बोलला "आता जर ह्या पुढे माझ्या हिंदू धर्माची निंदा केलीस
तर बोटीतून खाली फेकून देईन" तो मिशनरी घाबरला आणि कापत बोलला "कृपा करून मला सोडून द्या, मी पुन्हा अशी चूक करणार नाही" त्यानंतर जेव्हा कधी ते एकमेकांसमोर येत तेव्हा मिशनरी नम्रतेने बोलू लागले.
Read 14 tweets
Dec 13, 2020
गोव्यामध्ये एके सकाळी एक स्कूटर वरून चाललेल्या माणसाला कारने जाणाऱ्या मुलाने टक्कर दिली.तो मुलगा रागाने कारच्या बाहेर आला आणी म्हणाला मी गोवा कमिशनरचा मुलगा आहे.त्यावर स्कुटर वरील माणूस त्याला हसत हसत म्हणाला मी गोव्याचा मुख्यमंत्री आहे. ती व्यक्ती
मनोहर गोपाल कृष्ण प्रभू पर्रीकर यांची आज जयंती.अफाट प्रतिभा आणी असंख्य व्यक्तिमत्वाचे पैलू.पहिला आयआयटी आमदार,पहिला आयआयटी मुख्यमंत्री.त्यांच्या साधेपणा,सच्चेपणा ह्याबद्दल कोणाच्याच मनात दुमत नसेल.गेल्या वर्षी आपल्यातून निघून गेले पण एक साधा नेता म्हटल्यावर तेच समोर येतात
सरकारी ताकत हातात असून तिचा वापर फक्त आणी फक्त लोक कल्याणासाठी करणारा,व्हीव्हीआयपी सेवा नाकारणारा मंत्री.आजच्या जमान्यात नगरसेवक झाल्यावर लक्झरी गाड्या घेऊन फिरणाऱ्या नेत्यांमध्ये,गोव्यात स्कूटरवर कार्यालयात जाणारा मुख्यमंत्री वेगळाच.
Read 7 tweets
Dec 6, 2020
बाबरी मशीद बरोब्बर २८ वर्षांपूर्वी पाडली गेली आणी गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर श्रीराम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला.पण अजूनही खूप लोकांना कोर्टाचा निर्णय पटलेला नाही त्यामध्ये प्रामुख्याने तीन कारणं.
एक वर्ग ज्यांनी कोर्टाचा १०४५ पानी निकाल पाहिला नाही, दुसरा वर्ग जाणूनबुजून एका समाजाचं तुष्टीकरण करण्यासाठी सत्याकडे दुर्लक्ष करत आहे,तिसरा वर्ग मीडियाने आणी तुष्टीकरण करणाऱ्या नेत्यांनी तयार केलेल्या इमेजमुळे.
माझे बरेचशे मित्र ह्या तिसऱ्या प्रकारात मोडतात त्यामुळे त्यांनी निकाल विस्तृत वाचायची तसदी घेतली नाही.जर हि अवस्था उच्चशिक्षित शिकलेल्या तरुणांची असेल तर बाकीच्यांच काय? मुळात १. राम मंदिर हा आस्थेचा आणि भावनेचा विषय आहे पण कोर्टाने खरोखरचं त्याआधारे निर्णय दिला आहे का?
Read 16 tweets
Nov 30, 2020
शिवसेनेच्या नेत्याला अजान अचानक गोड वाटू लागली आहे. असो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मी देखील वेगवेगळ्या प्रार्थनास्थळांना ह्या आधी भेट दिलेली आहे. पण ज्या भारत देशात आपण राहतो तिथे सर्व धर्मांचा आदर केला जातो,अजान चा विषय निघाला आहे तर खरोखर ती आदराची भावना दुसऱ्या
धर्मासाठी इस्लाम धर्मात आहे का?अजान जाणूनबुजून इंग्रजीमध्येही टाकत आहे कारण मराठी मध्ये एखाददोन शब्द मिस होऊ शकतात."अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर"-(Allah is almighty and the greatest)म्हणजे अल्लाह सर्वात मोठा आहे. तुम्ही कधी हिंदूंच्या प्रार्थनेत ऐकलंय का ईश्वर सर्वात मोठा आहे?
"अश-हदू अल्ला इलाहा इलाहा अल्लाह"-(I Bear witness that there is no one who should be prayed other than allah) म्हणजे मी साक्षी देतो दुसरं कोणीही पूजा आणि उपासना करण्यायोग्य नाही एक अल्लाह सोडून. म्हणजे बाकी धर्मात जी पूजा केली जाते त्याला काही अर्थ नाही का?
Read 10 tweets
Oct 27, 2020
मराठ्यांना शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजत नसेल तर अवघड आहे. अजूनही हे सरकार आरक्षणासाठी गंभीर आहे असं वाटत त्यांना. मराठ्यांचं हातचं आरक्षण हे बारामतीला गहाण पडलेल्या मराठा नेत्यांनीच घालवलं आहे. वैयक्तिक स्वार्थ हा समाजाच्या पुढे त्यांना जास्त महत्वाचा वाटतो.
ज्या व्यक्तीने शालिनीताईंना मराठा आरक्षण मागितल्यावर पक्षातून काढलं तो खरोखर मराठ्यांचं हित जपेल का? आयुष्य जाती जातीमध्ये भांडण लावून स्वतःचं भविष्य सुरक्षित केलं, सर्व काही हातात असताना काही नाही केलं तो व्यक्ती तुम्हाला झुलवू शकतो पण न्याय देऊ शकत नाही.
दुसरीकडे मुका मोर्चा म्हणून हिणवणारे मुख्यमंत्री पदी बसलेत म्हटल्यावर अपेक्षा कसली आहे. फडणवीसांनी शिव्या खाऊन देखील मराठा समाजाला साथ दिली पण जातीच्या द्वेषात अडकवून मराठा नेत्यांनी त्यांची बायको काढली तरीही फडणवीसांनी तोल ढळून न देता सर्वाना सोबत घेऊन हायकोर्टात आरक्षण टिकवलं.
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(