महत्वाचा थ्रेड👇
आज सभागृहात देवेंद्रजी फडणवीस यांनी मावा आघाडी या अनैतिक सरकारच्या कारभाराची करुण कहाणी राज्याच्या आणि देशाच्या समोर ठेवली. आज देवेंद्रजी जे बोलले ते सभागृहात ऑन रेकॉर्ड बोलले आहेत. भाजपा नेत्यांना थांबवता येत नाही तर खोटे गुन्हे नोंद करून, मोक्का लावून आणि तेही+
खोटे गुन्हे लावत असताना तशा स्टोरी आणि कथानक उभं करण्यासाठी अनेक मोठे नेते काम करत आहेत. स्वतः सरकारी वकीलसुद्धा?
यातून निष्पन्न काय होणार तर नेत्यांना अटक होणार, मोठे गंभीर गुन्हे दाखल होणार, त्यात फसवले जाणार आणि मग हे गावभर बोंबलत फिरणार भाजपाचे नेते बघा काय करतात, पण+
देवेंद्रजींनी या आघाडीच्या भिकार मानसिकता असलेल्या नेत्यांच्या खोटेपणावर पाणी फेरले आहे, धुळ्याचे गोटे अण्णा असू द्या नाही तर मुक्ताई नगरचे लाथाभाऊ खडसे! यांचं वय झालं आहे, मार्गदर्शन करण्याच्या आणि आदर घ्यायच्या वयात यांनी माणुसकीची निचता गाठली आहे, CD च्या बाता करणारे लाथाभाऊ+
आता स्वतःला कर्माचे हिशोब करत असतील, गोटेंची वेगळी काय अवस्था असणार!
यांनी असे खोटे प्रयोग आणि कुभांड रचण्यात देवेंद्रजींना देखील सोडले नाही, आजकाल शरदराव पवार देवेंद्रजींसोबत रोज बरोबरी करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्यावर टीका करतात मात्र स्वतःला देशाचे सर्वेसर्वा समजणारे+
80 वर्षाचे पवार साहेब 71 वर्षाच्या मोदीजींसोबत बरोबरी करत नाही पण 51 वर्षाच्या देवेंद्रजींसोबत बरोबरी करतात याचा अर्थ देवेंद्रजी यांना पुरून उरत आहेत. आणि गुलाम विचारतात देवेंद्रजी कोण आहेत, काय आहेत.
ताई तर म्हणतात अकेला फडणवीस क्या करेगा, आज देवेंद्रजींनी सभागृहात टराटरा+
फाडलेले यांचे मुखवटे पाहिल्यानंतर ताईंना त्या वाक्याचा अर्थ आणि देवेंद्रजींची खरी ओळख पटली असेल.
देवेंद्रजींनी सभागृहात बोलताना आज सरकारी वकील यात मदत करत असल्याचा उल्लेख केला मात्र सोबतच मोठे साहेब असाही उल्लेख केला आहे, ते मोठे साहेब कोण हा प्रश्न राज्याला पडला आहे, हळूहळू+
तेही समोर येईलच.
आजचा हा तर फक्त ट्रेलर होता, खरा पिक्चर अजून बाहेर काढलाच नाही. पिक्चर तब्बल १२५ तासांचा आहे. हे सगळे व्हिडीओ आणि त्यातले संभाषण काढले तर मोठे नेते, आघाडीचे दलाल आणि सर्वेसर्वा असलेल्या सगळ्यांची काय अवस्था होईल फक्त विचार करा.
अजून बरंच काही बाकी आहे, अजून+
मुखवटे फाडले जातील तेव्हा यांना राज्यात थोबाड दाखवायला जागा उरणार नाही! Wait and watch...
थ्रेड
आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवला जाईल, ज्या ज्यावेळी या हिंदुस्थानात हिंदू राजा झाला आहे त्यांनी हिंदूंच्या आस्था, अध्यात्म आणि सनातन संस्कृती रक्षणाचे काम केलंय, मग ते हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवराय असतील नाहीतर हिंदूंच्या आस्था आणि कित्येक मंदिरांचा+
जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी!
आज बनारसमध्ये काशी विश्वनाथ धाम लोकार्पणाचा डोळे दिपवणारा देखणा सोहळा पाहिल्यानंतर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचा नरेंद्र मोदीजींबद्दलचा आदर लाखो पटीने वाढला आहे. हिंदुस्थानात हिंदूंच्या अस्मितेला खुल्या मनाने व्यापक पातळीवर+
मांडणारा एकमेव लोकशाहीचा राजा हे नरेंद्र मोदीजी आहेत. 303 खासदार हा फक्त आकडा आहे, पण त्यांच्या राजकीय भूमिकेला विरोध करणारी काँग्रेस असेल नाहीतर मूठभर पक्ष एकत्र येऊन तयार झालेली UPA असेल. असे कितीही बाटगे एकत्र आले तरीही मोदीजींना पर्याय होऊ शकत नाही. कारण काम बोलता हैं...+
नेत्याच्या वाट्याला देवपण येणं सोप्पं नसतं,आजही मराठवाड्याच्या कोणत्याही भागातली माणसं गाठ पडली अन राजकीय गप्पा निघाल्या तर मुंडे साहेबांची आठवण निघतेच! पण जी माणसं राजकीय चाकोरीच्या बाहेर आहेत, ज्यांना आपल्या कच्च्याबच्च्यासाठी कष्ट करावे लागतात ती माणसं डोळ्यात पाणी आणून मुंडे+
साहेबांच्या आठवणी सांगतात, अनेकांच्या देव्हाऱ्यात मी मुंडे साहेब पाहिले आहेत. हे कमावणारा नेता विरळा आहे.
भाजपाचं राजकीय आणि पक्षीय अस्तित्व तसं नगण्य होतं तो संघर्षाचा काळ पायपीट करून, सायकलवर आणि सामान्य माणसांच्या गराड्यात झोकून देत धनदांडग्या प्रस्थापितांसोबत दोन हात करत+
सत्ताकाळापर्यंत केलेला प्रवास अद्वितीय आहेच, पण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा आहे. गावगाड्यातल्या दुर्बल माणसाच्या खांद्यावर हात टाकत, त्याच्या डोळ्याचं पाणी पुसत आधार दिला, न्याय दिला, सत्ता त्यांच्यासाठी राबविली. बीड- अंबेजोगाईच्या मातीतून महाराष्ट्र+
महत्वाचा थ्रेड👇
शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंद असल्याचं आज राज्यसभा खासदार @PawarSpeaks यांनी बोलताना सांगितले.
आता त्याच राष्ट्रवादीच्या शरद पवारांना शेतकऱ्यांची हत्या आणि त्यांची कारकीर्द याचीही आठवण करून देणं क्रमप्राप्त आहे.
पवार साहेब,+
तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना 23 नोव्हेंबर 1994 या दिवशी आदिवासी गोवारी हत्याकांड घडले होते. गोवारी आदिवासींचा मोर्चा नागपुरात आला होता. त्या दिवशी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. त्या मोर्च्यावर सरकारने लाठीमार केला अन त्यात एकूण 114 गोवारी बांधव मृत्यूमुखी पडले. हजारो+
जखमी झाले. ते तुम्ही सत्तेत असताना सरकार पुरस्कृत झालेले सर्वात मोठे हत्याकांड होते. तेव्हा महाराष्ट्र बंद केला होता का! त्या रक्तरंजित आरोळ्या अन जखमा महाराष्ट्र अजून विसरला नाही.
पवार साहेब, 9 ऑगस्ट 2011 ला पवनेच्या पाण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मावळमध्ये मोर्चा काढला होता.+
राज्यातल्या धुळे, नंदुरबार, अकोला, पालघर, वाशीम व नागपूर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. भारतीय जनता पार्टी मुसंडी मारत नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. प्रामुख्याने तीन पक्षांशी लढत असून आणि ते तिन्ही पक्ष सत्तेत असूनही भाजपा+
जिल्हा परिषदेत पुढेच आहे. मात्र भाजपाला राज्यात धोका देऊन सत्तेत असणारी शिवसेना मात्र या निकालात थेट तिसऱ्या/चौथ्या क्रमांकाचा फेकली गेलीय.यात पालघरला सेना खासदार राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव करत जागा भाजपाने जिंकली आहे.ज्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद आहे त्यांचे पतन होणे हे
+
त्यांच्या अपयशी कर्तृत्वाचे यशच म्हणावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सेनेला पाठीमागे टाकण्यात यश मिळवलं आहे.
नागपूरच्या बाबतीत भाजपाने राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघात 2 जिल्हा परिषदा ताब्यात घेतल्या आहेत, नागपुरात पंचायत समितीच्या जागाही भाजपाच्या वाढल्या+
थ्रेड 👇
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यात प्रयाग चिखलीपासून ते नृसिंहवाडीपर्यंत पायी साधारण 97 किलोमीटरची पदयात्रा काढली, पूरग्रस्तांना मदत करा अन्यथा जलसमाधी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी ती स्थगित केली हा विषय निराळा...+
खरंतर राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत, त्यांनी आत्तापर्यंत अनेकदा संघर्ष केला आहे, ते योगदान कोणी नाकारणार नाही, पण काही राजकीय गणितं बिघडली, विशेषत्वाने बारामतीशी जवळीक अंगलट आली हे खरंय. आणि त्यांच्या वाट्याला राजकीय पराभव आला. कदाचित ते पुन्हा योग्य मार्गावर येत आहेत.
पण+
त्यांनी मागच्या 5 दिवसात जी यात्रा काढली त्यात एक आग्रही मागणी होती की, "2019 च्या शासकीय परिपत्रकाप्रमाणे पूरग्रस्तांना मदत द्या."
मी अनेकदा 2019 च्या पूरग्रस्त मदतीसंदर्भात देवेंद्रजींवर टीका झालेली ऐकली, मात्र आज खुद्द राजू शेट्टींसारखा जाणता शेतकरी नेता देवेंद्रजींच्या GR चा+
थ्रेड
विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळ्या सुरू झाल्या की राष्ट्रवादी नेटाने महिला धोरणांवर बोलायला उभी राहते, "साहेबांचे महिला धोरण" या टॅगखाली मोठीमोठी भाषणं होतात. मात्र एकीकडे काही घटना अशा पुढं आल्या की नेमकं राष्ट्रवादीच्या नेत्यांना साहेबांचं महिला धोरण समजलं का? की+
साहेबांचं महिला धोरण त्यांच्या नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी सोयीस्कर आहे हे कळायलाच मार्ग नाही. सर्रास बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या घटना रोज घडताहेत त्यावर मात्र साहेबांचे धोरण सांगणाऱ्या रुपालीताई चाकणकर शांत असतात.
राज्यात ठाकरे सरकार हे राष्ट्रवादीच्या पुढाकाराने आणि+
पवार साहेबांच्या आशीर्वादानेच आहे, या सरकारने अत्याचाराच्या घटना रोखल्या पाहिजेत, मात्र अशा घटना घडवण्यात खुद्द राष्ट्रवादीच काही मागे नाही. पुण्याच्या कदमवाक वस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने बेदम मारहाण केली. एका महिला सरपंचावर हात उगारने, थेट+