Ajay Profile picture
May 12, 2022 24 tweets 15 min read Read on X
लंकादहन..🔥

श्रीलंका..!

१९४८ मध्ये ~ भारतासोबतच स्वतंत्र झालेला हा देश..अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला.. पांढऱ्या शुभ्र वाळूने नटलेल्या समुद्र किनाऱ्यांची खाण असलेला हा आपला शेजारी आज आगीत धुमसतोय..!!

असे काय झाले की श्रीलंकेवर ही अशी वेळ आली ?

ही आहे त्याची गोष्ट.. #म
श्रीलंका..१९४८ला सिलोन/Ceylon नावाने स्वतंत्र झाला..~७५% सिंहीली बौद्ध,~१२% तमिळ आणि बाकी तमिळ भाषिक मुस्लिम,ख्रिश्चन अशा लोकांचा हा देश होता.

पण नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात जेव्हा आशावाद,देशप्रेम यांना खतपाणी घालायचे असते तेव्हा श्रीलंकेच्या नेत्यांनी द्वेषाला मोठे केले..!
सुरुवात झाली ती ' फक्त ' सिंहीली राष्ट्रभाषा आणि कामकाजाची भाषा जाहीर करण्यापासून..

आणि नंतर राष्ट्रवादाच्या नावाखाली निवडणुकांच्या वेळी दंगली करून तमिळ भाषिकांची अनेकदा कत्तल झाली..!

हे सर्व सहन न झाल्याने तमिळ भाषिक प्रदेशाने 'एलटीटीई' स्थापन करून स्वातंत्र्य जाहीर केले..!
आणि मग सुरू झाले ते युद्ध..(१९८३)
खूप मोठे..
खूप काळ चालणारे..

~ २६ वर्ष चालणारे आणि १ लाखाहून जास्त लोकांच्या प्राणहानीला कारण असलेले ( incl ८११८ भारतीय सैनिक !!) युद्ध..!

तसे पाहिले तर..हिंदी महासागरात अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेला..अनेक जहाजांच्या व्यापारी मार्गावर असणाऱ्या
श्रीलंकेचे नशीब हे खरे तर सिंगापूरच्या वळणावर जायचे होते..पण श्रीलंकेने त्यांच्याकडे असलेली महत्त्वाची वर्षे ह्या द्वेषात वाया घातली..म्हणून २००९ ला हे युद्ध संपेतो , १९६५ ला स्वतंत्र झालेले सिंगापूर एक प्रगत राष्ट्र बनले होते..!

बरं..ह्या सर्व वर्षात श्रीलंकेने काहीच प्रगती
केली नाही असे नाही..मुळातच देशाच्या सर्व राजकीय पार्टी साम्यवादाकडे (कमुनिस्ट) झुकानाऱ्या असल्याने श्रीलंका

ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स,
हॅपिनेस इंडेक्स,
हंगर इंडेक्स,
फ्रीडम आणि डेमोक्रासी इंडेक्स इ मध्ये

भारताच्याही पुढे गेला होता..पण जिथे चीनलाही गरिबीतून वर येण्यासाठी
भांडवलशाही (Capitalism) आणि साम्यवादाचा समतोल साधावा लागला तिथे श्रीलंकेला दुसरा पर्याय नव्हता..!

युद्ध संपल्यानंतर लगेचच श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यावर व्यापाराला चालना देण्यासाठी सिंगापूर ,दुबई , सेऊल इ च्या धर्ती वर megapolis सारख्या खर्चिक प्रोजेक्टचा घाट घातला गेला..!
ह्या प्रोजेक्ट्समुळे अर्थव्यवस्थेत पैसा खेळू लागला..आणि त्यांची बाजारपेठ/GDP वाढायला लागली.. काळ २००९-१२.

पण अर्थशास्त्रात रस्ते, पूल, रेल्वे ,इमारती इ गोष्टी non tradable sector मध्ये येतात..म्हणजे..ह्या गोष्टी झाल्यानंतर तुमच्या देशात उद्योग आले/वाढले तर ह्या गोष्टींचा फायदा..
नाहीतर फक्त तुमच्या देशात चांगले रस्ते आहेत आणि २४ तास वीज,पाणी आहे म्हणून कोण तुम्हाला फुकट क्रूड ऑईल देत नाही..!!

थोडक्यात काय तर श्रीलंकेने अशा प्रोजेक्टवर खूप खर्च केला..कर्ज घेऊन खर्च केला..पण भारताचे कोचीन बंदर आणि सिंगापूर हे इतके पुढे गेले होते की श्रीलंकेतील उद्योग
म्हणावे तसे वर आले नाहीत..आणि म्हणून त्या देशाच्या परकीय उत्पन्नाचा खूप मोठा भाग हा पर्यटन,कृषी उत्पादन,कापड गिरण्या इ ह्यावरच अवलंबून राहिला.

डोक्यावरचे मोठे कर्ज घेऊन श्रीलंका अडचणीत सापडला असताना..त्यांना मदतीचा हात दिला तो चीनने..! पुढील दशकात (२००९-२०१९) चीनने दिलेले कर्ज
एकूण कर्जाच्या <१% वरून > १०% पेक्षा जास्त गेले होते..! ह्यातच त्यांना कर्जाची परतफेड म्हणून त्यांचे हंबनतोटा बंदर त्यांना चीनला ९९ वर्षासाठी मनमर्जी (सैन्यदल)वापरायला द्यायची मानहानी पत्करावी लागली.

तोपर्यंत २०१९ साल उजाडले होते..कर्ज आणि उत्पन्न , निर्यात आणि आयात ह्या दोन्ही
गोष्टींचा मेळ लागत नव्हता(Twin Deficit)..म्हणून वाढ खुंटली..महागाई वाढली..जन त्रासले..तेव्हा

एक नेता पुढे आला..त्याच्याकडे ह्या महागाईवर रामबाण (?) उपाय होता-

तो म्हणजे

वस्तूंवर कर कमी करणे म्हणजे त्या स्वस्त होतील व लोकांवरील(इन्कम टॅक्स) कर कमी करणे म्हणजे पैसे जास्त उरतील!
लोकांना आवडतील अशी अनेक वचने देऊन हा नेता - महिंदा राजपक्सा पंतप्रधान झाला..!

आणि त्याने खरोखरीच कर कमी केला..!

आपला GST म्हणजे त्यांचा VAT १५-२०% वरून ८% वर आणला..!

३० लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना करमुक्त केले..त्यावरील उत्पन्न असलेल्या लोकांना फक्त १५% कर ह्या आणि अशा
करमुक्तीच्या घोषणा अमलात आणल्या..!!

गल्लीपासून दिल्लीपर्यंत आनंदी आनंद जाहला..अशी परिस्थिती झाली..!

पण हा आनंद काहीच वेळ टिकला..कारण ह्या गोष्टींमुळे महागाई कमी होण्याऐवजी वाढली..पण निर्यात काही वाढली नाही..लोक मोठमोठ्या महागड्या गाड्या ,वस्तू आयात करू लागले..आधीच असलेले
परकीय चलनातील कर्ज..जे १ डॉलर ला १८० श्रीलंकन रुपये असे प्रमाण असतानाही भरणे अवघड जात होते..ते आता आयात वाढून श्रीलंकन रुपया अजून पडल्याने १ डॉलरला >२००-२५०₹ झाल्याने भरणे अती अवघड झाले..!

श्रीलंकन सरकार सैरभैर झाले..घाईघाईने चैनीच्या गोष्टींची आयात थांबवली गेली..आणि
अशात २ गोष्टी झाल्या -

१.श्रीलंकेत काही चर्च आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाले.(२०१९)

ह्याने देशात येणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात परकीय चलन पुरवणाऱ्या पर्यटन क्षेत्राला फार मोठा फटका बसला..आणि ही घटना विस्मृतीत जात असतानाच

२.२०२० ला कोरोनाचे थैमान सुरू झाले..त्याने
पर्यटन हे पूर्ण बंद हे झालेच पण बाहेरील देशात काम करणाऱ्या श्रीलंकन नागरिक जो पैसा देशात पाठवीत होते त्याचा ओघही पार आटला..!

कोरोनाने पर्यटन,कापड गिरण्या इ बंद पडले होते..चालू होती ती फक्त शेती आणि कर्ज..!

व पुढे झाले ते अगदी..विनाश काले विपरीत बुद्धी ह्या म्हणीला साजेसे होते..
जिथे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था शेती उत्पन्नाने तारल्या..

तिथे श्रीलंकन सरकारने रासायनिक खते ही प्रामुख्याने आयात करावी लागत असल्याने त्यांची आयात पूर्ण बंद केली..!

ह्याने झाले काय तर चहा ,रबर ,तांदूळ इ शेती उत्पादने निर्यात करणाऱ्या श्रीलंकेचे उत्पादन ~ ५०% पर्यंत घसरले..!!
तोपर्यंत श्रीलंका एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज ह्या दुष्टचक्रात सापडला होता..ह्यातून भारत,जपान इ देशांच्या मदतीने सावरत होताच तो..रशिया - युक्रेन युद्ध सुरू झाले.

भारतासारखीच श्रीलंकेची प्रमुख आयात ही क्रूड ऑईल च्या स्वरुपातच आहे..आणि त्याचेच भाव भडकले..!

हा शेवटचा आघात -
आधीच अती दुबळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेला सहन करता येण्यासारखा नव्हता..आणि कर्जाच्या बोज्याखाली श्रीलंकन अर्थव्यवस्था कोलमडली..!

महागाई १८ टक्के हून जास्त झाली..देशावरचे कर्ज देशाच्या उत्पन्नापेक्षा जास्त झाले.. इतकचं काय तर परीक्षा घ्यायची तर पेपर ,उत्तरपत्रिका साठी
लागणारा कागदही परवडत नाही म्हणून परीक्षा रद्द केल्या गेल्या.. गोडे तेल ,दूध पावडर अशा गोष्टींची किंमत हजार रुपयावर गेली..!!🤯

आणि ह्या सर्व प्रकारात सरकार ढिम्मच राहिले..स्वतःच्या चुका मान्य केल्या नाहीत..उलट राजेशाही थाटात वागत राहिले..!

अशा वेळेस जनतेचा प्रक्षोभ झाला नसता
तर नवलच..!

प्रचंड जाळपोळ झाली..खुद्द पंतप्रधानाचे घर जाळले..त्याला वाचविण्यासाठी सैन्याला हेलिकॉप्टरने गुप्त जागी घेऊन जावे लागले..ह्यात एका खासदाराचा मृत्यूही झाला..राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते लोकांनी चौका चौकात हाणले..!

आता..
आताही..परिस्थिती तीच आहे..
कर्जही आहेच..
पण आता..
महागाईच्या..मानहानीच्या आगीत होरपळलेले नागरिक आहेत..

सोबत जाळपोळीची राखही आहे..

ह्या गोष्टीतून धडा घेऊन...

जुन्या धार्मिक द्वेषाला दूर सारून...

ह्या ह्या शून्यातून..

सोन्याची लंका उभी राहते का ? ?

हेच काय ते बघणे आता बाकी राहीले आहे..!

२३/२३
टीप - वरील #SriLankaEconomicCrisis च्या #मराठी #thread मध्ये राजकारणाचा विषय मुद्दाम टाळला आहे..

कारण लोकशाहीत..

जसा राजा तशी प्रजा

असे नसून

जशी प्रजा तसा राजा हेच खरे असते..🙏

@DrVidyaDeshmukh
@Omkara_Mali
@MJ__Speaks
@trumptatya64

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ajay

Ajay Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @amhiraigadkar

Apr 13
काल चीन मधील एका सिमेंट कंपनीचा शेअर शेवटच्या १५ मिनिटात ९९% नी पडला..🤯🟥🤯

ती कंपनी जर भारतात असती तर ती देशातील ३री सर्वात मोठी कंपनी ठरली असती..!

मग..असं काय झालं की हा शेअर अचानक इतका पडला / पाडला गेला..?!

जाणून घेऊ आजच्या ह्या थ्रेडमधून👇

#StockMarketअभ्यास

#मराठीच #म Image
उत्तर एका ओळीत सांगायचं तर - चीनमधील अनेक मोठे बिल्डर कर्जबाजारी झाल्याने तेथील सिमेंटची मागणी कमी झाली..म्हणून हा शेअर पडला असे म्हणता येईल !

पण..हे बिल्डर कर्जबाजारी झालेच कसे ?

ह्या प्रश्नाचं मूळ मात्र चीनच्या इतिहासात..मुळात चीन कम्युनिस्ट कसा झाला त्या गोष्टीत आहे..👇

२/n Image
पहिली गोष्ट जी अनेकांना माहीत नसेल ती म्हणजे..

भारतात जशी ब्रिटिशांनी वसाहत स्थापन केली तशी वसाहत चीनमध्ये कधीच..कोणाचीही नव्हती..!

काही भाग इतरांकडे होते..
जसे - हाँगकाँग >ब्रिटिश,
कंबोडिया > फ्रेंच इ

पण संपूर्ण चीनवर कधीही परकियांनी सत्ता केली नाही..🤯

न् ह्याची कारणे ३

+ Image
Read 25 tweets
Mar 3
जगाच्या इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात श्रीमंत माणूस , विश्वगुरू भारत , डॉलरचा देश अमेरिका आणि मी ; एक सामान्य नागरिक !

#StockMarketअभ्यास #मराठीच #म

आज जगात सर्वात जास्त गरिबी असलेल्या आफ्रिका खंडात आजपर्यंतचा सर्वात श्रीमंत माणूस होऊन जावा ह्यासारखा विरोधाभास दुसरा नसावा..!

आणि ह्या विरोधाभासाचे नाव होते - मानसा मुसा !

जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांची यादी
'fortune' हे नियतकालिक दरवर्षी प्रसिद्ध करीत असते..अश्या ह्या नियतकालिकाने ह्या चौदाव्या शतकात होऊन गेलेला पश्चिम आफ्रिकेतील ' माली ' ह्या देशाचा राजा आजच्या पैशांत किती श्रीमंत होता ह्याचे वर्णन ' Unquantifiable ' म्हणजेच संपत्ती मोजताच येणार नाही इतका तो श्रीमंत होता असे वर्णन केले होते..😜🤯🤑 असो..

आजचा हा थ्रेड म्हणजे त्याच मुसाच्या एका गोष्टीवर..👇

१/nImage
हा मुसा ' माली ' साम्राज्याचा राजा होता. हे साम्राज्य सोन्याच्या खाणी, गुलाम आणि हस्तिदंत इ चा व्यापाराने भरपूर श्रीमंत झालं होतं. चौदाव्या शतकात म्हणजे जेव्हा भारतात सोन्याचा धूर निघत होता तेव्हा जगातील ~ अर्धे सोन्याचे उत्पादन हे माली साम्राज्य करत होतं..!

पण ह्या साम्राज्याची..त्यांच्या ह्या अपार श्रीमंत राजाची..फार कोणाला माहिती नव्हती आणि ह्याचीच मुसाला खंत होती.म्हणून आपले नाव जगभर व्हावे म्हणून त्याने ' हज ' यात्रा करत करत विपुल प्रमाणात दानधर्म (सोन्याच्या रूपात ) करायचे ठरवले.

आणि त्याने केलेही तसेच..६० हजार गुलाम.. तेवढेच उंट ( हे फक्त सोने वहायला ) ,१२ हजार सैन्य आणि बाकी दरबारी इतका मोठा लवाजमा घेऊन तो प्रवासाला निघाला..वाटेत त्याने अनेक ठिकाणी गोर गरीबांना सोने फुकट वाटले.त्याने त्याची किर्ती वाढली.पण ही प्रसिध्दी तो जेव्हा इजिप्तला पोचला त्यामानाने काहीच नव्हती..👇

२/nImage
त्याकाळी इजिप्त हे मोठे व्यापाराचे, दळणवळणाचे केंद्र होते..पूर्वेकडून आशिया खंडातून येणारे व्यापारी , उत्तरेच्या युरोप खंडातून येणारे व्यापारी आणि सबंध आफ्रिका खंडातून हज ला जाणारे यात्रेकरू या सर्वांनी इजिप्त त्यातही राजधानी कैरो नेहमी गजबजलेला असायचे.

आणि अशा ह्या १३२४च्या कैरोमध्ये मुसा ने चांगला महिनाभर मुक्काम केला..आणि ह्या मुक्कामात त्याने इतके सोने वाटले इतके सोने वाटले/खर्च केले की..; मुसा.. माली साम्राज्य , त्या साम्राज्याची राजधानी- सोन्याची नगरी ' टिंबक्टू ' ह्यांची किर्ती जगभर पसरली..!

हे इतके सोने इजिप्तमध्ये आल्याने तिथले सर्वच लोक श्रीमंत झाले..सगळीकडे आनंदीआनंद झाला..पण तो आनंद फार काळ टिकला नाही..मुसा पुढील वर्षी हज वरून परत जात होता तेव्हा त्याला तिथली व्यवस्था कोलमडलेली दिसली..व्यापार बंद होताना दिसले. त्याचे कारण तेव्हा त्याला कळले का नाही माहीत नाही पण त्याचे कारण मुसा ने वाटलेले सोने..त्यामुळे अचानक आलेली श्रीमंती होती हे आज कळून चुकले आहे.

पण हे असे कसे होऊ शकते ? 👇

३/nImage
Read 7 tweets
Jan 31
उद्या बजेट !

पुढच्या वर्षीसाठी अजून काही नवीन कर येतील..कदाचित जातीलही..🤞

पण ह्या वर्षीच काय ?

शिवाय आपण F&O केलं..Intraday केलं..Positional केलं किंवा Investment केलं म्हणजे कर कमी लागतो ?

अशा प्रश्नांची उत्तरं आजच्या थ्रेड मध्ये 👇

> > > स्टॉक मार्केटमधील कमाई आणि त्यावरचा इन्कम टॅक्स !

#StockMarketअभ्यास #म

ह्यात समजायला सर्वात सोपी गोष्ट म्हणजे- कर भरण्यासाठी आधी नफा व्हावा लागतो..😅

म्हणून नफ्यासोबत फारसा संबंध नसणाऱ्या प्रकारापासून आधी सुरुवात करू..😜👇

आणि तो प्रकार म्हणजे..अर्थातच -

>>> जे लोक Intra Day किंवा फ्युचर्स & ऑप्शन्स करतात

ह्या भल्या लोकांनी जर चुकून माकून पैसे कमावलेच तर ते त्यांचं बिझीनेस इन्कम पकडले जाते.

म्हणजे हे जर नोकरदार असतील किंवा अजून काही प्रकारे ह्यांचं इन्कम असेल तर त्यात हे इन्कम add केले जाते..आणि एकूण रकमेवर टॅक्स भरावा लागतो.

म्हणजे एखादा जर ३०% स्लॅब मध्ये येत असेल तर त्याला Intraday आणि
F & O नफ्यावर पण ३०% टॅक्स द्यावा लागेल..२०% स्लॅब वाल्याला २०% आणि असंच इतर सर्व टॅक्स स्लॅब वाल्यांसाठी.

थोड्क्यात काय तर - नोकरी करणाऱ्या (२०-३०% स्लॅब मधल्या) लोकांनी Intraday आणि F&O करणे म्हणजे मूर्खपणा आहे.

आणि तेही स्वतःच्या अकाऊंटवरून करणे हा तर महामूर्खपणा आहे..😜

आता ह्याला बिझीनेस इन्कम समजायचा फायदा हा होऊ शकतो की एका वर्षीचा लॉस हे लोक पुढच्या ७ वर्षांच्या नफ्यातून वजा करू शकता..!

म्हणजे एका वर्षी १ लाख तोटा झालाय आणि पुढच्या वर्षी १ लाख नफा तर पुढच्या वर्षीच्या नफ्यावर कर भरावा लागत नाही.

फक्त इतकं लक्षात ठेवावं की Intraday चा तोटा Intraday नफ्यातून आणि F&O चा तोटा F&O नफ्यातूनच वजा करता येतो..!

आता..जरा फायद्याच्या गोष्टींकडे वळू..👇

१/nImage
>>> आता जे लोक Intraday किंवा F&O करत नाहीत

त्यांच्या शेअर मार्केटमधील शेअर

(सोबतच म्युचुअल फंड,बाँड, ETF etc etc सर्व गोष्टी पण)

विकून येणाऱ्या कमाईला सरकार २ प्रकारे बघते -

१) जे लोक शेअर्स घेऊन एक वर्षाच्या आत विकतात -

त्यांना १५% ने कर लागतो. ह्याला सरकार म्हणते STCG अर्थात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणजेच कमाई..हा बिझिनेस नाही..!

म्हणजे १ लाख असे जर कमावले असतील तर त्यातले १५% म्हणजे १५ हजार सरकारला जातील बाकी ८५ हजार तुमचे..!

मग टॅक्स स्लॅब कितीही असू द्या..!🤩

२/nImage
२) जे लोक शेअर्स घेऊन एक वर्षानंतर विकतात -

त्यांना १०% ने कर लागतो. आणि ह्याला सरकार म्हणते - LTCG अर्थात लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजेच कमाई..हाही बिझीनेस नाही..!

इथे फक्त फरक इतकाच आहे की इथे आपले दयावान सरकार १ लाखापर्यंत कमाई असेल तर त्यावर कोणताही कर लावत नाही व त्यावरील सर्व कमाईला १०% कर लागतो.

म्हणजे १ लाख कमाई असेल तर शून्य कर !

२ लाख असेल तर पहिल्या एक लाखावर शून्य कर आणि त्यावरील १ लाखावर १०% म्हणजे १० हजार..! असंच पुढच्या सर्व कमाईवर !

आता..इथे लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे की भले मी करोडपती आहे आणि मी तसा ~ ३०-४०% टॅक्स स्लॅब मध्ये येतो पण जर माझा इन्कम शेअर मार्केट मधून १०० कोटी जरी असेल तरी मला १०% नेच टॅक्स लागेल..🤯

सांगायचं हेच की , २०-३०% स्लॅब मधल्या नोकरी करण्याऱ्या कामगार लोकांनी आपली कष्टाची कमाई इथे लावावी..F&O करून सरकार, ब्रोकर , advisor, शेअर मार्केट गुरू बिरू इ सर्व गरीबांना पोसायची जबाबदारी स्विकारू नये..!😏😜😂

पण..

इतक्या वेळा सांगूनही काही अतिहुशार लोक असे असतीलच जे अजूनही F&O आणि Intraday च्याच मागे पळातील..आणि असे होऊ नये म्हणून..

मायबाप सरकारने वरील कॅपिटल Gains कमाई ही बिझीनेस इन्कम नसूनही ह्यात झालेला लॉस पुढच्या ७ वर्षांत Intraday न् FnO सारखाच नफ्यातून वजा करता येईल अशी सूट दिली आहे..🥳🤯🥳

३/५

+ 👇Image
Read 5 tweets
Jan 3
गोष्ट - अमूल , NDDB आणि महानंदची

आणि उत्तरं - ' महानंद ' गुजरातला NDDB कडे जाणं महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी असू शकते का याची !!?

ह्या गोष्टीची सुरुवात..खरे वाटणार नाही पण होते एका युद्धापासुन..'दुसऱ्या' महायुद्धापासून..🤯👇

१९३९ ते ४५ चाललेल्या दुसऱ्या महायुद्धाचा भारताला..मुंबईला..फार मोठा फायदा झाला..मुंबईचा व्यापार..पर्यायाने लोकसंख्या ह्या काळात झपाट्याने वाढली..सोबतच..मुंबईच्या गरजाही वाढल्या..ह्यातलीच एक महत्वाची गरज म्हणजे..सकाळच्या चहाची..न् त्याला लागणाऱ्या दुधाची..!

त्यावेळी बहुतेक सर्व गुजरात..पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक मिळून एकच बॉम्बे हे महाराज्य होते..आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते..गुजरातचे मोरारजी देसाई..!

त्यांनी मुंबईच्या दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी
' बॉम्बे मिल्क स्कीम ' आणली..ह्या स्किमसाठी त्यांनी साहजिकच गुजरातच्याच(😤)..मुंबईपासून ४५० किमी वर असलेल्या कैरा ह्या जिल्ह्याची निवड केली.

तेव्हाच्या बॉम्बेला दूध मिळाले..पण तरीही..तो काळ इंग्रज भांडवलदारांचा होता..म्हणून शेतकऱ्यांना नफा मिळत नव्हता..शेवटी त्या सर्वांनी सरदार पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे आनंद येथे सहकारी दुग्ध संघ स्थापन केला..व सत्याग्रह करून मुंबईला दूध पुरवठ्याचे कंत्राट त्या सहकारी संघाला मिळवून दिले.

आता..धनाढ्य मुंबईला दूध पुरवून हा संघ चांगलाच मोठा झाला..पण..मुंबईची दुधाची भूक वाढतच होती..त्याच्या पुरवठ्यासाठी हळू हळू गुजरातच्या तालुक्यात - गावात असे दूध संघ तयार झाले.

आणि १९५४-५५ येता येता - 👇

#मराठी

#म

१/nImage
आणि १९५४-५५ येता येता अशी वेळ आली की गुजरातचे दूध उत्पादन मागणीपेक्षा बरेच वाढले..आणि ह्या जास्तीच्या दुधाला प्रक्रिया करून पावडर, बटर ,चीज इ प्रकारात साठवून ठेवावे म्हणून ३८ जिल्हा व तालुक्याच्या दुधसंघानी मिळून नेहरूंच्या हस्ते एक कंपनी थाटली..आणि त्या सर्व कंपनीच्या उत्पादनांचा एक ब्रँड बनवला गेला.. त्याचं नाव ' अमूल '..!

असेच एक दशक गेले..अमुलची आणि पर्यायाने गुजरातच्या शेतकऱ्यांची भरभराट होत गेली..असेच एकदा १९६४ साली अमूलच्या एका नव्या फॅक्टरीच्या उद्घाटनाला भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आले होते..ते अमूल ची सर्वसमावेशक प्रगती पाहून इतके खूश झाले की त्यांनी तेव्हाचे अमूल चे मुख्य व्यवस्थापक असणारे ' वर्गीस कुरियन ' ह्यांना सोबत घेऊन हेच ' आनंद मॉडेल ' देशभर लागू करायचे ठरवले..!

त्यासाठीची व्यवस्था पाहणे व अनुभवी मनुष्यबळ तयार करणे ह्यासाठी लगेचच १९६५ साली NDDB अर्थातच ' नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ' ची स्थापना..साहजिकच ' आनंद ' येथेच केली गेली..!

पुढे अशाच प्रकारे..१९६७ साली

२/n

(जय किसान 👇)Image
पुढे अशाच प्रकारे..१९६७ साली ' महाराष्ट्र राज्य दूध महासंघाची ' स्थापना झाली व १९७० साली सुरू झालेल्या ' धवलक्रांती ' अंतर्गत..आपल्या राज्यातील दुधाचे उत्पन्न वाढल्यानंतर सर्व दुधसंघानी मिळून..१९८३ साली महानंद डेअरी आणि तिचा म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा दूध ब्रँड
' महानंद ' तयार केला..!

पण..महानंद तयार व्हायला वेळ झाला होता..हे दुधसंघ किती ताकदवान बनू शकतात ह्याची चुणूक जणू आपल्या राजकारण्यांना दिसली होती..आणि म्हणूनच पुढे जाऊन नकळत..ह्या दुधसंघांचे राजकीयीकरण झाले..लोकल राजकारणी ह्यात धंदा म्हणून नाही तर राजकारणाची पाहिली पायरी समजून उतरू लागले..अनेक जिल्ह्यात त्यांनी स्वतःचे असे दूध संघ स्थापन केले..साहजिकच..
' महानंद ' मागे पडत गेला..!

आज..महानंदची दुधाची पिशवी पाहिलेला माणूस शोधावा लागतो..आज जिथे ह्या क्षेत्रात कालपरवा तयार झालेले डेअरी स्टार्टअप हजारो कोटींचा धंदा करतात..तिथे महानंद डेअरी रडत पडत ५०० कोटींचा धंदा करत तोट्यात जाते.

NDDB सारखी सरकारी संस्था मदर डेअरी सारखा ब्रँड तयार करून वर्षाला १० हजार+ कोटींचा धंदा करते..न् अमूल ची तर गोष्टच करायला नको..अमूल पुढील वर्षात १ लाख कोटींचा धंदा करायचे स्वप्न बघत नाही तर उद्दिष्ट ठेवते..!🔥🤯

आणि तेव्हाच देशभरच्या विद्यापीठात महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि श्रीमंत राज्याच्या दूध क्षेत्रातील अपयशातून काय शिकावे ह्याचे निबंध लिहिले जातात..😬😐😏

आता आपण सर्वाँना पडणाऱ्या प्रश्नांकडे येऊ -

३/n 👇Image
Read 5 tweets
Jan 2
शून्यातून पैसा तयार करायची टाटांची कला ?!🤑

#StockMarketअभ्यास #LiveBlog

२-४ वर्षांपूर्वी तामिळनाडूच्या वालपराई नावाच्या हिल स्टेशन वरून केरळ मधला अथिरपल्ली हा बाहुबली पिक्चरमुळे प्रसिद्ध झालेला धबधबा पहायला बाईकवर जात होतो.

हिल स्टेशनची हद्द संपताच तिथे टाटांच्या कॉफी बागा चालू होतात..रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या..डोंगराच्या डोंगर पसलरलेल्या अशा ह्या उंच उंच बागा..बघूनच थक्क झाल्याचे आठवते..पण विशेष आठवते तो..त्या बागांचा आकार....त्या बागा..इतक्या मोठ्या आहेत..इतक्या मोठ्या आहेत की.. ४०-५० किमी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सोबत करतात..🤯

आता..आज हे आठवायचं कारण हे की - 👇

१/n

#मराठी

#मImage
टाटा कॉफी कंपनीने त्यांचा हा कॉफी ,चहा असलेल्या बागांचा बिझिनेस आणि ह्यापासून तयार होणारी आणि आपण विकत घेत आलेली चहा आणि इन्स्टंट कॉफी इ चा बिझनेस वेगळा करायचे ठरवले आहे..!(असा हे बिझिनेस वेगळा करायच्या पद्धतीला मार्केटच्या भाषेत म्हणतात ' Demerger ' ! )

आणि हा वेगळा झाल्यानंतर राहिलेला बिझिनेस ते टाटांच्याच ' टाटा कन्सूमर ' ह्या कंपनी सोबत एकत्र करणार आहेत..!
(आणि दोन कंपन्या एकत्र करण्याच्या पद्धतीला मार्केटच्या भाषेत म्हणतात ' merger ' !)

आता..तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की..हा एवढा उपद्याप टाटा का करत आहेत ?! 👇

आणि असा कोणताही प्रश्न कधीही तुम्हाला पडला की बहुतेकदा त्या प्रश्नाचं उत्तर..जीवनात अनेकदा..आणि बिझिनेसमध्ये जवळपास नेहमी एकच असतं..ते उत्तर म्हणजे पैसा..🤑
(त्याचा मोह सामान्य जनतेच्या लाडक्या टाटांना ही सुटत नाही बरं..😜)

असो..पुन्हा कॉफीकडे वळू..👇

२/nImage
आता..अल्पभूधारक शेतकऱ्याची अर्धा एक एकर शेती असो का टाटांच्या हजारो - लाखो एकरच्या बागा असो..ह्या दोन्ही मध्ये एक गोष्ट कॉमन आहे - ती म्हणजे काहीही झालं तरी हे दोघेही निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहेत.. इतकचं नाही तर खताचा..कीटकनाशकाचा..आणि पीक आल्यावर मालाचा भाव अश्या त्यांच्या हातात नसणाऱ्या गोष्टींवर त्यांचा धंदा अवलंबून आहे..!

म्हणजे..कितीही काळजी..कष्ट घेतले तरी..त्या कामाचं फळ मिळेलच ह्याची खात्री नाही..आणि म्हणूनच अश्या बिझिनेसला bad बिझिनेस म्हणतात..!

अन् पर्यायाने हा बिझनेस असलेल्या शेअरची किंमत कमी असते..!

याउलट..ह्याचं bad बिझिनेस चा उत्पन्न प्रक्रिया करून पॅकेटमध्ये घातलं की तो होतो good बिझिनेस..! आणि त्यांच्या शेअरला भाव जास्त मिळतो..पण असं का म्हणताय ?!

तर हेच बघा..👇

मागच्या आर्थिक वर्षात..टाटा कॉफी कंपनीचे उत्पन्न ~३००० कोटींचे होते..!
पण..त्यातले लाखो एकरच्या बागांमधून निघालेले उत्पन्न होते फक्त ~ ५०० कोटी (~२०%) आणि कॉफी - चहा पॅकेट विकणाऱ्या २-४ फॅक्टरी मधून येणारे उत्पन्न होते ~ २५०० कोटी (>७५%+) !

आता..bad बिझिनेस सहसा त्यांच्या उत्पन्नाच्या जास्तीत जास्त २-३ पट विकले जातात..good बिझिनेस सहसा त्यांच्या उत्पन्नाच्या ५-१० पट किमतीने विकले जातात..! (अशी कंपनीची किंमत उत्पन्नावरून काढण्याच्या गुणोत्तराला ' Price to sales ' असे म्हणतात.)

म्हणजे कोणाला टाटा कॉफी कंपनी विकत घ्यायची असेल तर तर त्याचं गणित असेल - > 👇

३/nImage
Read 5 tweets
Dec 4, 2023
जर ' राजराजा चोला ' हा तमिळ राजा आधी होऊन गेला..तरीही..मग आपल्या नौसेनेने शिवाजी महाराजांना भारतीय नौसेनेचा जनक (Father of Indian Navy) का म्हंटले ?!

उत्तर ह्या live thread मध्ये 👇

पण..तोपर्यंत तुम्ही तुमचे उत्तर कॉमेंट्स मध्ये नोंदवा..😅

#मराठी

#म Image
आता..

ज्यांनी कोणी आधी जहाज बनवले त्यांनाच जर श्रेय द्यायचंय तर मग..

ते श्रेय हडप्पा संस्कृतीच्या अनामिक लोकांना द्यावे लागेल..!

कारण..

लोथल येथील जहाज उभारणीची गोदी ही सुमारे ४५००+ वर्षांपूर्वी उभारलेली दिसते..!

पुरावा म्हणून त्यांच्या तर नाण्यांवरही तर जहाजे आहेत..😍👇 Image
मग..

आता..

ही👆 चित्रातली जहाजं छोटी वाटताहेत म्हणता ?!

मग हे बघा..ऋग्वेद जो आपल्या पुरातत्व खात्यानुसार ~ ४००० वर्षांपूर्वी लिहिला..

त्यात..१०० लोक वल्हवत जातील इतक्या मोठ्या जहाजांचा उल्लेख आहे..! 👇

मग..ते श्रेय काही नाही तर..

त्यांना तरी द्यायला हवं होतं..😅

पण नाही..+ Image
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(