Ajay Profile picture
May 12 24 tweets 15 min read
लंकादहन..🔥

श्रीलंका..!

१९४८ मध्ये ~ भारतासोबतच स्वतंत्र झालेला हा देश..अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला.. पांढऱ्या शुभ्र वाळूने नटलेल्या समुद्र किनाऱ्यांची खाण असलेला हा आपला शेजारी आज आगीत धुमसतोय..!!

असे काय झाले की श्रीलंकेवर ही अशी वेळ आली ?

ही आहे त्याची गोष्ट.. #म
श्रीलंका..१९४८ला सिलोन/Ceylon नावाने स्वतंत्र झाला..~७५% सिंहीली बौद्ध,~१२% तमिळ आणि बाकी तमिळ भाषिक मुस्लिम,ख्रिश्चन अशा लोकांचा हा देश होता.

पण नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात जेव्हा आशावाद,देशप्रेम यांना खतपाणी घालायचे असते तेव्हा श्रीलंकेच्या नेत्यांनी द्वेषाला मोठे केले..!
सुरुवात झाली ती ' फक्त ' सिंहीली राष्ट्रभाषा आणि कामकाजाची भाषा जाहीर करण्यापासून..

आणि नंतर राष्ट्रवादाच्या नावाखाली निवडणुकांच्या वेळी दंगली करून तमिळ भाषिकांची अनेकदा कत्तल झाली..!

हे सर्व सहन न झाल्याने तमिळ भाषिक प्रदेशाने 'एलटीटीई' स्थापन करून स्वातंत्र्य जाहीर केले..!
आणि मग सुरू झाले ते युद्ध..(१९८३)
खूप मोठे..
खूप काळ चालणारे..

~ २६ वर्ष चालणारे आणि १ लाखाहून जास्त लोकांच्या प्राणहानीला कारण असलेले ( incl ८११८ भारतीय सैनिक !!) युद्ध..!

तसे पाहिले तर..हिंदी महासागरात अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेला..अनेक जहाजांच्या व्यापारी मार्गावर असणाऱ्या
श्रीलंकेचे नशीब हे खरे तर सिंगापूरच्या वळणावर जायचे होते..पण श्रीलंकेने त्यांच्याकडे असलेली महत्त्वाची वर्षे ह्या द्वेषात वाया घातली..म्हणून २००९ ला हे युद्ध संपेतो , १९६५ ला स्वतंत्र झालेले सिंगापूर एक प्रगत राष्ट्र बनले होते..!

बरं..ह्या सर्व वर्षात श्रीलंकेने काहीच प्रगती
केली नाही असे नाही..मुळातच देशाच्या सर्व राजकीय पार्टी साम्यवादाकडे (कमुनिस्ट) झुकानाऱ्या असल्याने श्रीलंका

ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स,
हॅपिनेस इंडेक्स,
हंगर इंडेक्स,
फ्रीडम आणि डेमोक्रासी इंडेक्स इ मध्ये

भारताच्याही पुढे गेला होता..पण जिथे चीनलाही गरिबीतून वर येण्यासाठी
भांडवलशाही (Capitalism) आणि साम्यवादाचा समतोल साधावा लागला तिथे श्रीलंकेला दुसरा पर्याय नव्हता..!

युद्ध संपल्यानंतर लगेचच श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यावर व्यापाराला चालना देण्यासाठी सिंगापूर ,दुबई , सेऊल इ च्या धर्ती वर megapolis सारख्या खर्चिक प्रोजेक्टचा घाट घातला गेला..!
ह्या प्रोजेक्ट्समुळे अर्थव्यवस्थेत पैसा खेळू लागला..आणि त्यांची बाजारपेठ/GDP वाढायला लागली.. काळ २००९-१२.

पण अर्थशास्त्रात रस्ते, पूल, रेल्वे ,इमारती इ गोष्टी non tradable sector मध्ये येतात..म्हणजे..ह्या गोष्टी झाल्यानंतर तुमच्या देशात उद्योग आले/वाढले तर ह्या गोष्टींचा फायदा..
नाहीतर फक्त तुमच्या देशात चांगले रस्ते आहेत आणि २४ तास वीज,पाणी आहे म्हणून कोण तुम्हाला फुकट क्रूड ऑईल देत नाही..!!

थोडक्यात काय तर श्रीलंकेने अशा प्रोजेक्टवर खूप खर्च केला..कर्ज घेऊन खर्च केला..पण भारताचे कोचीन बंदर आणि सिंगापूर हे इतके पुढे गेले होते की श्रीलंकेतील उद्योग
म्हणावे तसे वर आले नाहीत..आणि म्हणून त्या देशाच्या परकीय उत्पन्नाचा खूप मोठा भाग हा पर्यटन,कृषी उत्पादन,कापड गिरण्या इ ह्यावरच अवलंबून राहिला.

डोक्यावरचे मोठे कर्ज घेऊन श्रीलंका अडचणीत सापडला असताना..त्यांना मदतीचा हात दिला तो चीनने..! पुढील दशकात (२००९-२०१९) चीनने दिलेले कर्ज
एकूण कर्जाच्या <१% वरून > १०% पेक्षा जास्त गेले होते..! ह्यातच त्यांना कर्जाची परतफेड म्हणून त्यांचे हंबनतोटा बंदर त्यांना चीनला ९९ वर्षासाठी मनमर्जी (सैन्यदल)वापरायला द्यायची मानहानी पत्करावी लागली.

तोपर्यंत २०१९ साल उजाडले होते..कर्ज आणि उत्पन्न , निर्यात आणि आयात ह्या दोन्ही
गोष्टींचा मेळ लागत नव्हता(Twin Deficit)..म्हणून वाढ खुंटली..महागाई वाढली..जन त्रासले..तेव्हा

एक नेता पुढे आला..त्याच्याकडे ह्या महागाईवर रामबाण (?) उपाय होता-

तो म्हणजे

वस्तूंवर कर कमी करणे म्हणजे त्या स्वस्त होतील व लोकांवरील(इन्कम टॅक्स) कर कमी करणे म्हणजे पैसे जास्त उरतील!
लोकांना आवडतील अशी अनेक वचने देऊन हा नेता - महिंदा राजपक्सा पंतप्रधान झाला..!

आणि त्याने खरोखरीच कर कमी केला..!

आपला GST म्हणजे त्यांचा VAT १५-२०% वरून ८% वर आणला..!

३० लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना करमुक्त केले..त्यावरील उत्पन्न असलेल्या लोकांना फक्त १५% कर ह्या आणि अशा
करमुक्तीच्या घोषणा अमलात आणल्या..!!

गल्लीपासून दिल्लीपर्यंत आनंदी आनंद जाहला..अशी परिस्थिती झाली..!

पण हा आनंद काहीच वेळ टिकला..कारण ह्या गोष्टींमुळे महागाई कमी होण्याऐवजी वाढली..पण निर्यात काही वाढली नाही..लोक मोठमोठ्या महागड्या गाड्या ,वस्तू आयात करू लागले..आधीच असलेले
परकीय चलनातील कर्ज..जे १ डॉलर ला १८० श्रीलंकन रुपये असे प्रमाण असतानाही भरणे अवघड जात होते..ते आता आयात वाढून श्रीलंकन रुपया अजून पडल्याने १ डॉलरला >२००-२५०₹ झाल्याने भरणे अती अवघड झाले..!

श्रीलंकन सरकार सैरभैर झाले..घाईघाईने चैनीच्या गोष्टींची आयात थांबवली गेली..आणि
अशात २ गोष्टी झाल्या -

१.श्रीलंकेत काही चर्च आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाले.(२०१९)

ह्याने देशात येणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात परकीय चलन पुरवणाऱ्या पर्यटन क्षेत्राला फार मोठा फटका बसला..आणि ही घटना विस्मृतीत जात असतानाच

२.२०२० ला कोरोनाचे थैमान सुरू झाले..त्याने
पर्यटन हे पूर्ण बंद हे झालेच पण बाहेरील देशात काम करणाऱ्या श्रीलंकन नागरिक जो पैसा देशात पाठवीत होते त्याचा ओघही पार आटला..!

कोरोनाने पर्यटन,कापड गिरण्या इ बंद पडले होते..चालू होती ती फक्त शेती आणि कर्ज..!

व पुढे झाले ते अगदी..विनाश काले विपरीत बुद्धी ह्या म्हणीला साजेसे होते..
जिथे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था शेती उत्पन्नाने तारल्या..

तिथे श्रीलंकन सरकारने रासायनिक खते ही प्रामुख्याने आयात करावी लागत असल्याने त्यांची आयात पूर्ण बंद केली..!

ह्याने झाले काय तर चहा ,रबर ,तांदूळ इ शेती उत्पादने निर्यात करणाऱ्या श्रीलंकेचे उत्पादन ~ ५०% पर्यंत घसरले..!!
तोपर्यंत श्रीलंका एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज ह्या दुष्टचक्रात सापडला होता..ह्यातून भारत,जपान इ देशांच्या मदतीने सावरत होताच तो..रशिया - युक्रेन युद्ध सुरू झाले.

भारतासारखीच श्रीलंकेची प्रमुख आयात ही क्रूड ऑईल च्या स्वरुपातच आहे..आणि त्याचेच भाव भडकले..!

हा शेवटचा आघात -
आधीच अती दुबळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेला सहन करता येण्यासारखा नव्हता..आणि कर्जाच्या बोज्याखाली श्रीलंकन अर्थव्यवस्था कोलमडली..!

महागाई १८ टक्के हून जास्त झाली..देशावरचे कर्ज देशाच्या उत्पन्नापेक्षा जास्त झाले.. इतकचं काय तर परीक्षा घ्यायची तर पेपर ,उत्तरपत्रिका साठी
लागणारा कागदही परवडत नाही म्हणून परीक्षा रद्द केल्या गेल्या.. गोडे तेल ,दूध पावडर अशा गोष्टींची किंमत हजार रुपयावर गेली..!!🤯

आणि ह्या सर्व प्रकारात सरकार ढिम्मच राहिले..स्वतःच्या चुका मान्य केल्या नाहीत..उलट राजेशाही थाटात वागत राहिले..!

अशा वेळेस जनतेचा प्रक्षोभ झाला नसता
तर नवलच..!

प्रचंड जाळपोळ झाली..खुद्द पंतप्रधानाचे घर जाळले..त्याला वाचविण्यासाठी सैन्याला हेलिकॉप्टरने गुप्त जागी घेऊन जावे लागले..ह्यात एका खासदाराचा मृत्यूही झाला..राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते लोकांनी चौका चौकात हाणले..!

आता..
आताही..परिस्थिती तीच आहे..
कर्जही आहेच..
पण आता..
महागाईच्या..मानहानीच्या आगीत होरपळलेले नागरिक आहेत..

सोबत जाळपोळीची राखही आहे..

ह्या गोष्टीतून धडा घेऊन...

जुन्या धार्मिक द्वेषाला दूर सारून...

ह्या ह्या शून्यातून..

सोन्याची लंका उभी राहते का ? ?

हेच काय ते बघणे आता बाकी राहीले आहे..!

२३/२३
टीप - वरील #SriLankaEconomicCrisis च्या #मराठी #thread मध्ये राजकारणाचा विषय मुद्दाम टाळला आहे..

कारण लोकशाहीत..

जसा राजा तशी प्रजा

असे नसून

जशी प्रजा तसा राजा हेच खरे असते..🙏

@DrVidyaDeshmukh
@Omkara_Mali
@MJ__Speaks
@trumptatya64

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ajay

Ajay Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @amhiraigadkar

Apr 29
LIC चा IPO येतोय..हा IPO घ्यावा म्हणून LIC कडून मोठी जाहिरातही केली जाते आहे.

पॉलिसी असणाऱ्यांनी हा IPO घ्यावा यासाठी LIC ने ६० रुपयांचा डिस्काउंट ही जाहीर केलाय..मग -

LIC चा मेगा IPO घ्यावा का ?

आणि

इन्शुरन्स चा धंदा मुळात चालतो कसा ह्याचा घेतलेला हा वेध..

#म #मराठीत
इन्शुरन्स चा धंदा मोठा किचकट आहे.

ह्यात पॉलिसी घेणाऱ्याकडून थोडे पैसे (प्रीमियम)घेतले जातात आणि काही अघटीत झाल्यास(पॉलिसीत नोंदल्याप्रमाणे उदा. अपघात ,मृत्यू ,आजारपण इ इ)पॉलिसी असणाऱ्याला भरलेल्या प्रीमियमच्या काही पट रक्कम दिली जाते..त्या रकमेला म्हणतात - Sum assured .
आता प्रश्न असा पडतो की इन्शुरन्स कंपनी इतके पटीने पैसे आणते तरी कुठून..??

ह्यासाठी इन्शुरन्स कंपन्या २ गोष्टी करतात - १.मागच्या वर्षी समजा १०० लोकांनी पॉलिसी घेतली आणि त्यातले १० लोकांनी क्लेम केला तर ह्या बाकीच्या ९० लोकांच्या प्रीमियममधून क्लेम केलेल्या लोकांना रक्कम दिली जाते
Read 22 tweets
Apr 12
नामिबिया , पाकिस्तान आणि शाहू ,फुले ,आंबेडकरांचा भारत

२०२१ च्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये नामिबियाची टीम 👇 होती..आता नामिबिया हा आफ्रिकेतील एक देश आहे आणि आफ्रिकेत तर बहुतांशी कृष्णवर्णीय राहतात असे असूनही त्यांची टीम ही अशी का दिसत असावी हा प्रश्न मला पडला..जरा शोधल्यावर मला १/n
कळले की नामिबियात फक्त ६% लोकसंख्या ही श्वेतवर्णीय आहे..आणि ते देशातील ७०% जमीन आणि उद्योगांचे मालक आहेत..! साहजिकच ज्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात त्यांनाच खेळ किंवा मनोरंजन ह्यासारख्या गोष्टींसाठी वेळ भेटतो..! बरं..हे नामिबियासारख्या एखाद्या आफ्रिकेतील देशाचे नाहीये..तर २/n
हे अगदी आपला शेजारी पाकिस्तानातही आहे..पाकिस्तानची बहुतांशी जमीन आणि सर्वच मोठे उद्योग तसेच राजकीय/सरकारी पदे ही त्या देशातील फक्त १००००कुटुंबांच्या ताब्यात आहेत..आणि विशेष म्हणजे तिथे दुहेरी नागरिकत्व चालते..म्हणजे सगळा देश ओरबाडून अंगाशी आले की दुसऱ्या देशात पळायला मोकळे..!३/n
Read 7 tweets
Apr 10
#थोडक्यात_पण_महत्त्वाचे

पेट्रोलच्या किंमती ,देशनिर्माण आणि माझी गरिबी

क्रूड ऑईलच्या किमतींचा हा 👇आलेख बघा..ह्यात दिसेल की २००८ तसेच २०११-१४ ह्या काळात क्रूडच्या सध्याच्या किमतीपेक्षा जास्त होत्या व तरीही तेव्हा पेट्रोलच्या किमती आतापेक्षा(कर कमी)किमान ३०-४०₹ नी कमी होत्या..! Image
आता पेट्रोलच्या किमती वाढल्या की महागाई वाढते हे जरी सर्वांना माहीत असले तरी त्याने गरिबी सुद्धा वाढते हे लक्षात घेतले पाहिजे.ते कसे हे बघू

Disposable Income म्हणजे आपल्या एकूण उत्पन्नातील ते पैसे जे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा (अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य) Image
पुरवल्यानंतर आपल्याकडे उरतात.

जिथे गरीब माणसाची सर्व कमाई ही मूलभूत गरजा पुरवण्यात जाते तिथे श्रीमंत/मध्यम त्याच्या कमाईचा छोटा हिस्सा अशा मूलभूत गोष्टींवर खर्च करतो.

म्हणून पेट्रोलच्या किमती पर्यायाने महागाई वाढल्याने जेव्हा मध्यम वर्ग किंवा श्रीमंत वर्गाच्या राहणीमानात फारसा Image
Read 5 tweets
Nov 28, 2021
आजचा धागा - Pure टर्म इन्शुरन्स -

का घ्यावा ?
कोणी घ्यावा ?
किती घ्यावा ?
कधी घ्यावा ?
कोणाकडून घ्यावा ?
कोणता घ्यावा ?

टर्म इन्शुरन्स चा धागा वाचायला सुरुवात करण्यापूर्वी 👇 ह्या poll मध्ये नक्की सहभागी व्हा..!

आपण ह्यापैकी कोणत्या इन्शुरन्स/विमा याचे पैसे एकदा तरी भरले आहेत?
का घ्यावा ?

Insurance/इन्शुरन्स हा शब्द मूळ ensure ह्या शब्दापासून आलाय ज्याचा अर्थ होतो खात्री देणे / शब्द देणे.

म्हणजेच जेव्हा आपण कशाचाही इन्शुरन्स/विमा घेतो तेव्हा ती कंपनी आपल्याला शब्द देत असते की कराराप्रमाणे विमा घेतलेल्या गोष्टीला जर काही झाले तर जबाबदारी आमची..! #म
थोडक्यात काय तर आपण आपली मोठी जबाबदारी (आणि त्या जबाबदारी सोबत येणारा धोका/ risk) थोडे पैसे देऊन त्या कंपनीवर टाकत असतो.

म्हणजेच आपण गाडीचा insurance घेतला आणि गाडीला काही झाले तर कराराप्रमाणे त्या गाडीचा खर्चाची जबाबदारी त्या कंपनीची..!

आपण आरोग्य विमा घेतलाय आणि
#मराठी
Read 35 tweets
Nov 26, 2021
२६/११ हल्ला रोखण्यामागचा आपले पोलिस , NSG आणि सेना ह्यांचे पडदया मागचे राजकारण खूप छान सांगितले तुम्ही..👌

पण हे वाचून येवढेच वाटले की
-> अशा आणिबाणीच्या वेळीही सर्व फोर्सेसची कमान..अशी कमान की जी भारतातील कोणतीही सेना एका आदेशावर बोलावू शकेल..?!

#म #मराठी #२६/११ #श्रद्धांजली
अशी कमान तेव्हाही अस्तित्वात नव्हती आणि आताही नाही..कमीत कमी आणीबाणीच्या काळात अशी एखादी कमान अस्तिवात यायला हवी..! अशी कमान अस्तित्वात असती तर कदाचित ताज हॉटेल पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या नौदलाच्या तळा वरून Marocs कमांडो NSG च्या आधी पोचले असते..किंवा NSG ला RAW च्या
विमानांची वाट पाहत न बसता त्या विमानतळावर जे विमान आहे त्या विमानाला/हेलिकप्टरला आदेश देऊन NSG काही बहुमोल तास ( ज्या तासांची किंमत आपल्याला आपल्या लोकांच्या प्रणांनी मोजावी लागली) वाचवू शकली असती..ह्या आणि अशा अनेक गोष्टी..पुण्याचे दक्षिण कमानचे कमांडो किंवा नगरच्या सेनेच्या
Read 4 tweets
Nov 14, 2021
स्टॉक मार्केट मध्ये कोणता आणि किती पैसा टाकावा ?

प्रश्न जरी साधा असला तरी त्याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असणार आहे..तरी मी साधारण idea देण्याचा व एखादी गोष्ट का करावी हे सांगण्याचा प्रयत्न करेन ज्याने निर्णय घेणे सोपे होईल.

#stockmarketअभ्यास #म #मराठीत
"MF investments are subject to market risk, read the offer document carefully before investing" हे खूप महत्त्वाचे वाक्य आपण #mutualfund च्या जाहिरातीत खूपदा ऐकले असेल.

पण ह्याचा अर्थ असा असतो की मार्केट मधून मिळणारा परताव्याची गॅरंटी नाहीये.तो दिवसागणिक बदलू शकतो.
आज मार्केट मध्ये असणाऱ्या १ लाखाची किंमत उद्या मार्केट पडले तर ५०हजार किंवा वाढले तर २ लाखही होईल.सतत होणारा चढउतार हा मार्केटचा पहिला आणि शेवटचा नियम आहे.
म्हणूनच आपल्याला कधीही लागू शकतो असा पैसा मार्केट मध्ये टाकणे तोटा होण्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरते. हा धोका कमी करण्यासाठी
Read 17 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(