Discover and read the best of Twitter Threads about #चेतन_शब्दयोगी

Most recents (9)

#झुंड पाहिला एकदाचा. २०१६ पासून वाट बघत होतो.. पुढं नागराज आणखी काय दाखवणार .. काय सांगणार .. काय मांडणार ..

फँड्री मध्ये दगड फेकून मारला होता पण या झोपलेल्या म्हणा किंवा झोपेचं सोंग घेतलेल्या समाजाला जागं करण्यासाठी यावेळी त्यानं ' लात ' मारली आहे .. ते पण प्रस्थापितांच्या 👇
मनुवाद्यांच्या अवघड जागेवर .. त्यांच्या कपाळात गोट्या येणारंच की !

' मैं सुधारणा चाहता हूँ तो ये लोग मुझे सुधारणे क्यूं नहीं दे रे ? ' ' भारत मतलब ? ' एक ना असे अनेक प्रश्न तो पात्रांच्या तोंडी घालून समाजाला विचारतो ! आपल्यालाच आपल्या नजरेत नागडं करतो .. उघडं पाडतो 👇
@Nagrajmanjule ही एक व्यक्ती राहिली नसून बंड करणारी संस्था झालेली आहे. 'ism ' हा प्रकार मराठीत नागराज मंजुळे आणू शकतो .. जो त्याने आणला देखील आहे...

आज गल्ला भरू काळात मोठमोठे नायक आणि दिग्दर्शक त्यांचा एखादा चित्रपट चालला की त्याचे बळंच पुढचे भाग बनवतात ..ओरिजिनल 👇
Read 5 tweets
मला नेहमी प्रश्न पडायचा की शूद्र म्हणून छळला गेलेला समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षापर्यंत निमूटपणे अन्याय आणि अत्याचार का म्हणून सहन करत जगत होता.. या प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ' दलित साहित्य आणि सौंदर्य ' या पुस्तकात मिळाले 👇
पृष्ठ क्र. २१२ व २१३ वर ) तिथं ते म्हणतात

" ही व्यवस्था ईश्वराने निर्माण केली आहे. हा जन्म पूर्व जन्मी केलेल्या पापांमुळे प्राप्त झालेला आहे. यातून मुक्ती मिळवायची असेल, या जन्मी सत्कर्म करून पुण्य मिळवणे हा एकच मार्ग आहे. अन्यथा नरकात जावे लागेल. " अशा दैवी धमकीमुळे 👇
दलितांच्या हजारो पिढ्या निमूटपणे हीन आणि लाचार होऊन जगल्या. त्यानी ' आपला हा भोगवाटा आहे, हे आपलं नशीब आहे. ते आपल्याला बदलता येणार नाही कारण तशी ईश्वर इच्छा आहे. ' अशी समजूत करून घेऊन दलितांनी परंपराशरणवृत्ती स्वीकारल्याचे दिसते. ' आपला जन्म हा ईश्वराच्या हाती आहे आणि त्यानीच 👇
Read 5 tweets
#ओळख_चित्रपटांची
चित्रपट - जय भिम
लेखन व दिग्दर्शन - T.J.Gnanavel

संपूर्ण चित्रपट पाहिला.. शोषित वर्गावर होणारा अन्याय पाहिला.. त्या लोकांच्या न्यायासाठी लढणारा ( ते ही विना मोबदला ) नायक पाहिला... त्याचा काळा कोट पाहीला.. 👇
त्याच्या डोळ्यावरच्या गोल चष्मा पाहिला... शोषित वर्गासाठी लढण्याची त्याची तळमळ आणि चळवळ पाहिली.. त्याचा संघर्ष पाहीला.. त्याचा प्रस्थापित व्यवस्थेशी दिलेला लढा पाहिला.. आणि जो शब्द एकदाही उच्चारला नाही तो शब्द या चित्रपटाचे 👇
शीर्षक का ठेवले याचे उत्तर जाणले.. #जय_भिम

संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे #जय_भिम..
अन्याया विरुद्धचा आवाज म्हणजे #जय_भिम..
संघटना अन चळवळ म्हणजे #जय_भिम..
एका मस्तकाची दुसऱ्या मस्तकाला साद म्हणजे #जय_भिम.. 👇
Read 8 tweets
चित्रपट - ' Fandry ' ( 2014 )

खरं तर चित्रपट समीक्षा लिहिण्यास सुरुवात करावी असा एकमेव चित्रपट आहे. म्हणून हा पहिला.

खदखद काय असते आणि तिला व्यक्त कशी करायची असते. अख्खं जग विरोधात समोर उभं असताना पण त्यांना पाठ न दाखवता निधड्या छतीनं सामोरं जाऊन चार वार झेलायचे कसे आणि
👇
आठ वार करायचे कसे. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच ' Fandry '.

मला 100% खात्री आहे, कि या जगात कोणीच, या चित्रपटाला शब्दांत व्यक्त करून न्याय देऊ शकत नाही. त्याला वेगळं सांगायची गरजच नाही. तो स्वयंपूर्ण आहे.
👇
' जे वर्षानुवर्ष, पिढ्यान पिढ्या दलदलीत ते दलित.' ज्यांना माणसाचं समसमान असण्याचं तत्वच नाकारलं गेलं आहे. ज्यांना तुम्ही स्पर्धा सुरू होण्याआधीच नालायक म्हंटलं गेलं आहे. ज्यांना तुम्ही स्पर्धेत उतरवन्याच्या आधीच ( कर्ण ) तुम्ही शूद्र किंवा कमी दर्जाचे आहात हे शतकोनी शतक
👇
Read 14 tweets
Alone ( एकटं )

मला जवळ जवळ कायमच एकटं (Alone) राहायला आवडतं. मला माझी सोबत जगात इतर कोणाही पेक्षा जास्त आवडते. मीच अशी ती व्यक्ती आहे जिच्यावर मी सगळ्यात जास्त प्रेम करतो, जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तसंच जिची सर्वात जास्त काळजी घेतो.
@Archanagsanap2
@Rupachi_Rani
👇
मी बर्याचदा अनेकांना एकटं राहायला जगायला घाबरलेलं पाहिलं आहे. मी याच्या शिवाय जगू शकत नाही त्याच्याशिवाय जगू शकत नाही असं आपण म्हणतो पण तसं खरंच नसतं त्याचा एवढाच साधा अर्थ असतो की मी आमूक आमूक व्यक्ती सोबत थोडा जास्त आनंदी जगेल. बस्स. यापेक्षा आधिक त्यात काहीही अर्थ नसतो.
👇
जी व्यक्ती स्वताहा सोबत comfortable आहे ती जगात कोठेही कुणाही सोबत राहू शकते. कसल्याही परिस्थितीत जगू शकते कारण ती स्वताहाबरोबर आनंदी आहे well tuned आहे.
@lankesh009696
@Adiitiii_05
@jorkar_vikas
@NehaV_Jain
@niyati_nimit
@kapse_pranita
@rautsavi9 @Nilesh_P_Z
@paddy_064
👇
Read 7 tweets
नुकतीच मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीतून रक्त ओकल्यासारखे शब्द लिहिलेली ' आघात ' नावाची कादंबरी वाचून संपवली..

अण्णाभाऊंच्या लेखनी म्हणजे तळपती तलवार जणू.. अशी कोणतीही भावना, विचार किंवा गोष्ट नाही जी ते तीला आपल्या लेखणीने योग्य न्याय नाही देऊ शकत..
👇
झोपडित राहणाऱ्या पण परिस्थितीशी झगडनाऱ्या लोकांचे जीवन चित्रित करणारी " आघात " ही कादंबरी, अण्णाभाऊंना कशी सुचली असेल हा प्रश्न पडत नाही.. कारण स्वताहा अण्णाभाऊ अशाच झोपडिवजा भागात लहानाचे मोठे झाले.. गरीबी, कष्ट, दारू, रोगराई, भांडण, संघर्ष, शिव्यागाळ्या हे
👇
सर्वच त्यांच्या पाचवीला पुजलेलं..

माणूसच वाईट नसतो, वाईट परिस्थिती देखील माणसाला वाईट वागण्यासाठी प्रव्रूत्त करते..आणि असं वाईट वागणं आहे ती परिस्थिती आणखी वाईट बनवते.. ह्या चक्रात माणूस कसा भरडला जातो.. तसंच माणसाच्या आयुष्यात किती संघर्ष असावा याची देखील परसीमा असावी
👇
Read 9 tweets
Is it ok.. to Loose ? 😊

मला पडणारा नेहमीचा प्रश्न की आपल्याला जिंकायचंच का असतं? आपण न जिंकता ही आनंदी तसंच यशस्वी जीवन जगू नाही का शकत? का त्यासाठी आपल्याला आनंदी आणि यशस्वी जीवन म्हणजे काय याच्याच व्याख्या बदलाव्या लागणार आहेत ?
👇
मला कायम वाटंत आलं आहे जीवन जगणं मंग ते कशाही प्रकारे असू दे तो एक प्रकारचा mind game च चाललेला असतो. तुमच्या सोबत घडलेल्या घटना व त्याचा तुम्ही तुमच्या बुद्धी नुसार लावलेला अन्वयार्थ तसंच त्याला तुम्ही दिलेला reply.
👇
तुम्हांला असं वाटंत नाही का कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्वांत प्रमुख अट ही असते की तुम्हांला प्रश्न व्यवस्थितच कळला पाहिजे? तर मंग आपण आपल्या समोर वाढून ठेवलेलं जीवन जगताना आपण ते काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही ? की आला दिवस ढकलणार आहोत.
👇
Read 8 tweets
Holding..is BAD

Any kind of 'Holding Is BAD' whether it is Love, Hate, Grudge, Anger, Happiness, Sadness or Kindness!

कोणत्याही प्रकारची भावना प्रमाणापेक्षा जास्त काळ धरून ठेवणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी नक्कीच चांगलं नसते.
👇
कारण त्या भावनेसोबत जगण्याची आपल्याला सवय होते. ती भावना ज्या व्यक्ती, जागे किंवा कामा बाबतीत आहे तिचीही सवय होते. जर future मध्ये ती दूर झाली तर त्याचा आपल्याला त्रास होवून नैराश्य येण्याची शक्यता वाढते.
👇
बदलापूर movie मध्ये शेवटी जेव्हा हूमा कुरेशी येऊन वरून ला सांगते की गेल्या 15 वर्षापासून ज्याचा ( नवाजुद्दीन ) तू सगळ्यात जास्त राग मनात धरलेला तूझा दुश्मन तर आता मेला मंग तू आता काय करणार? तेंव्हा वरून स्तब्ध होउन जातो! तसं.
👇
Read 4 tweets
त्रास म्हणजेच दुःख का ?

आपल्या जीवनात अनेक चांगल्या वाईट गोष्ठी घडत असतात. चांगल्या, मनासारख्या घडल्या की आपल्याला आनंद होतो, मस्त - छान वाटतं.
पण काही न आवडणार्या घडल्या तर ? तर मंग आपल्याला शारीरिक तसंच मानसिक त्रास होतो वा त्याचं दुःख होतं! 👇
आपण आजारी पडलो तर त्याचा आपल्याला शारीरिक त्रास होतो पण आपणच का पडलो असा जर विचार केला तर दुःख होतं. आपल्या हातात काय आहे त्रास टाळनं का दुःख टाळनं, विचार करा!

त्रास होणं आणि दुःख होणं याची गल्लत करू नका कारण दोघेही वेगवेगळे आहेत! सख्खी भावंडं म्हणा ना ती पण जुळी! 👇
आपण आयुष्यभर त्रास कवटाळून नाही बसू शकत, आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढतोच किंवा तो खूप काळ टिकला असह्य झाला तर जीव सोडतो पण त्याच्या उलट आपण दुःख मनाशी कवटाळून बसतो!

एखाद्या घटनेतील त्रासाचं मोठं भूत तेव्हाच तयार होतं जेव्हा आपण त्याचं दुःख मनाला लावून घेतो. 👇
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!