#केदारनाथ_मंदिर
एक न उलगडलेल कोडं !

(जरा विचार करा)

केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. 1/n
केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेल असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.
केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर,
2/n
दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.
ह्या क्षेत्रात फक्त मंदाकिनी नदीच राज्य आहे .
3/n
थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल.

केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही.
4/n
अशा ठिकाणी त्याचं निर्माण कां केल गेलं असावं ? त्याशिवाय १००-२०० नाही तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहील असेल ? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा. जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होतं
5/n
तर पृथ्वीवरच्या एका छोट्या Ice Age कालखंडाला हे मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला. साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं
6/n
व त्याची शहानिशा करण्यासाठी वाडिया इंस्टीट्युट ऑफ जीओलोजी डेहराडून ने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर लिग्नोम्याटीक डेटिंग हि टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट हे दगडांच आयुष्य ओळखण्यासाठी केली जाते.
7/n
ह्या टेस्टमध्ये अस स्पष्ट दिसून आलं कि साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होत. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही.
8/n

सन २०१३ मध्ये केदारनाथकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच.
9/n
ह्या काळात इकडे सरासरी पेक्षा ३७५% जास्त पाऊस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल ५७४८ लोकांचा जीव गेला (सरकारी आकडे). ४२०० गावाचं नुकसान झालं. तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्त लोकांना भारतीय वायूसेनेने एअरलिफ्ट केलं. सगळंच्या सगळं वाहून गेलं.
10/n
पण ह्या प्रचंड अशा प्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला जरासुद्धा धक्का लागला नाही हे विशेष.

अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मते ह्या प्रलयानंतरसुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडीट मध्ये १०० पेकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे.
11/n
IIT मद्रासने मंदिरावर NDT टेस्टिंग करुन बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे. दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने
12/n
केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही तर सर्वोत्तम असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात ? तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातले सगळं वाहून जाते, एकही वास्तू उभी रहात नाही. तिकडे हे मंदिर दिमाखात उभ आहे आणि नुसतं उभं नाही तर अगदी मजबुत आहे. 13/n
ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधल गेलं आहे. ज्या जागेची निवड केली गेली आहे. ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं असं आजच विज्ञान सांगतं आहे.
14/n
हे मंदिर उभारताना उत्तर–दक्षिण असं बांधलं गेलं आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिर ही पूर्व–पश्चिम अशी असताना केदारनाथ दक्षिणोत्तर बांधलं गेल. जाणकारांच्या मते जर हे मंदिर पूर्व-पश्चिम असं असतं, तर ते आधीच नष्ट झालं असतं.किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालचं असतं
15/n
पण ह्याच्या दिशेमुळ मंदिर वाचलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. अन् विशेष म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही मग कल्पना करा की ते दगड तीथंपर्यंत वाहून नेलाच कसा असेल ?
16/n
एवढे मोठे दगड वाहून न्यायला (ट्रांसपोर्ट करायला) त्याकाळी एवढी साधनंसुद्धा उपलब्ध नव्हती. या दगडाची विशेषता अशी आहे कि वातावरणातील फरक तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या प्रोपर्टीजमध्ये फरक झालेला नाही.
17/n
त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता एशलर पद्धतीने एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंटवर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे.
18/n
२०१३च्या वेळी एक मोठा दगड विटा घळईतुन मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार ही विभागली गेली व मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सर्व आपल्यासोबत वाहून नेलं पण मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित राहिले.ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायूदलाने एअरलिफ्ट केलं होतं
19/n
श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती टिकवून ठेवणार मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच बांधकामाचं मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही.
20/n
Titanic जहाज बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना NDT टेस्टिंग आणि तपमान कसं सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजलं. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता. केदारनाथ त्याच ज्वलंत उदाहरणं नाही का ?
21/n
काही महिने पावसात, काही बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा ऊन, वारा, पाऊस ह्यांना पुरुन उरत समुद्रसपाटी पासून ३९६९ फूट वर ८५ फूट उंच, १८७ फूट लांब, ८० फूट रुंद मंदिर उभारताना त्याला तब्बल १२ फूटाची जाड भिंत आणि ६ फूटाच्या उंच प्लॅटफोर्मची मजबूती देताना
22/n
किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल ह्याचा विचार जरी केला तरी आपण स्तिमित होतोय.
आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने १२ ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचीवरच असा मान मिळवणार केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण नतमस्तक 🙏 होतो.

! ॐ नमः शिवाय !

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with नितीन | नि-3

नितीन | नि-3 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Nitin_vn46

17 Oct
ज्याप्रकारे मुंबई पोलीसांनी रिपब्लीक चॅनलचे पत्रकार प्रदीप भंडारी यांना बेकायदेशीरपणे ९ तास अटक करुन पोलीस स्टेशनमधे ठेवलं होतं, त्यांच्याकडील तीन फोन्स जप्त केले आणि त्यांना त्यांच्या आईशी देखील बोलू दिलं नाही की खायला-पाणी प्यायला देखील दिलं नाही. +
कारण काय तर त्यांनी कंगना राणौतच्या घराबाहेर उभे राहून रिपोर्टींग केलं. पण तसं रिपोर्टींगतर बर्याच इलेक्ट्रॉनीक वाहीन्यांनी केलेलं होतं. मग फक्त प्रदीप भंडारी यांनाच चौकशीला बोलावून बेकायदेशीर अटक आणि धक्काबुक्की करण्याचं काय कारण? ++
काही लिबटार्ड्स जे फ्रीडम ऑफ स्पीच विषयी रडत असतात त्यांना आता यात फ्रिडम ऑफ स्पीच वर घाला घातलाय असं आजीबात वाटत नाहीये. हे तर काहीच नाही पण एकही इलेक्ट्रॉनीक चॅनल याविषयी एक अक्षर काढत नाहीये. याचाच अर्थ इतर च्यानल एकतर विकले गेले आहेत किंवा त्यांच्यात दहशत पसरली आहे.
Read 8 tweets
11 Oct
#थ्रेड

प्रतापचंद्रजी सारंगी 🙏

आमदार, खासदार, नेते म्हणलं कि डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, महागड्या गाड्या, बंगला, कार्यकर्त्यांचा गराडा. पण या सर्वांपासून कोसो दूर एक असा नेता आहे जो आज सुध्दा अनेक वेळा सायकल वर फिरताना दिसेल, गवताच्या काड्या आणी बांबूंच्या घरात राहतो.
👇
घरासमोरील सरकारी नळावर स्नान करून दिनक्रमाला सुरुवात, सायकल वरून निवडणूक प्रचार, आजही सायकल चा वापर,एक ही स्वतःची कार किंवा बंगला नाही.
ते म्हणजे

प्रतापचंद्रजी सारंगी.

त्यांचा जन्म 4 जानेवारी 1955 मध्ये एका गरीब कुटुंबात झाला.

👇
निलगिरी येथून त्यांनी आपले उच्चशिक्षण पूर्ण करून लहानपणापासून असलेली इच्छा म्हणजे संन्यासी होण्यासाठी ते कलकत्ता येथील रामकृष्ण मठात गेले. पण आई एकटी असल्यामुळे त्यांना आईचा सांभाळ करण्याचा सल्ला देऊन परत पाठवले गेले. इथून त्यांनी समाजसेवेची सुरुवात केली.
👇
Read 9 tweets
25 Jul
कारगिल विजय.
कृष्णकांत- the unsung hero of kargil.
कृष्णकांत चंद्रकांत धाराशिवकर.(माझे काका )
कृष्णजन्माष्टमी दिवशी झालेला जन्म उदगीर -लातूर ) म्हणून आई ललिता यांनी कृष्णा हे नाव सुचविले.
अत्यंत लहान वयात एनडीए पुणे, येथून सैन्य भर्ती शिक्षण पूर्ण करून आर्मी जॉईन केल्यानंतर👇
पहिली जॉइनिंग मिळाली ती डेहराडून येथे.
1999 मध्ये कृष्णा ची नियुक्ती "घातक" या अत्यंत महत्वाच्या सैन्य पथकात झाली.ती ही बढती सह. लेफ्टनंट पदावर. जानेवारी मध्ये सुट्टी निमित्त गावी आलेला. देशावर युद्धाचं सावट, आई ललिता आणी वडील चंद्रकांत यांनी कृष्णा ला खूप समजावलं कि सुट्टी 👇
पूर्ण करून जा. पण देशसेवेवेळी भावना बाजूला सारून तो निघाला. कारगिल येथे कुपवाडा सेक्टर 8 मध्ये तो रुजू झाला. 3 एप्रिल चा तो दिवस. घातक पथकाच्या गस्ती दरम्यान 14 पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला चढवला. यात 6 जणांच्या या अतिशय घातक अश्या पथकाने त्या 14 जणांना यमसदनी धाडले.👇
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!