#मूल्यशिक्षण : काळाची गरज
समाजात वावरताना आपण अनेक घटना पाहतो, ऐकतो. अल्पवयीन मुलांकडून चोरी, मारामाऱ्या, खून, बलात्कार असले गंभीर गुन्हे होत आहेत. आजकालची तरुण पिढी अल्पवयातच वाईट व्यसनांच्या आहारी चालली आहे. सामाजिक स्तरावर वाढत चाललेली ही विकृती, 👇
अनैतिकता हा एक प्रकारचा मोठा सामाजिक भूकंप आहे, जो समाजाचे आणि नीतिमूल्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. याची भयानकता किंवा दुष्परिणाम कमी करायचे असतील तर 'शालेय स्तरावरील प्रभावी मूल्यशिक्षण' हाच मोठा उपाय असू शकतो. तंत्रज्ञानाच्या युगामुळे बऱ्याच गोष्टी 👇
सोप्या झाल्या असल्या तरी अल्पवयीन मुलांचा किंवा तरुण पिढीचा मोबाईल-इंटरनेट यांसारख्या गोष्टींनी ताबा घेतला आहे. यामाध्यमातून चुकीच्या गोष्टी यांच्यासमोर येत आहेत. आणि नैतिकतेची पातळी खालावत आहे. यासाठी इयत्ता पहिली ते बारावी 'मूल्यशिक्षण' हा विषय अनिवार्य करणे गरजेचे आहे. 👇
या विषयाला गणित आणि विज्ञान प्रमाणेच महत्व असावे, यासाठी याची काठिण्य पातळी जास्त असावी. आणि शालेय मुले आजकाल जास्तीत जास्त मोबाईल आणि इंटरनेटच्या संपर्कात असतात तर त्यावर काही असे उपक्रम सुरु करणे गरजेचे आहे ज्यातून हीच मुले चांगल्या गोष्टीत गुंतून राहतील.👇
अनेकांना मूल्यशिक्षण हा दुर्लक्ष करण्याजोगा विषय वाटत असला तरी समाजात एक व्यक्ती म्हणून चांगले आयुष्य जगण्यासाठी याच विषयांची मदत होते.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात निरोगी आणि निरामय आयुष्य जगण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे.👇
कुटुंबातील आणि समाजातील प्रत्येकाशी आदराने आणि सद्भावनेने वागायला मूल्यशिक्षण शिकवते. आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराला स्वच्छ, नीटनेटके ठेवायला आणि आपल्या परिसरावर, राज्यावर, देशावर प्रेम करायला मूल्यशिक्षण शिकवते. मूल्यशिक्षणामुळे सदाचार, नैतिकता, सभ्यता, सुसंस्कृतपणा 👇
इत्यादी गुण वाढीस लागतात. संवेदनशीलता, वक्तशीरपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, नीटनेटकेपणा, सौजन्यशीलता, श्रमप्रतिष्ठा, स्त्री-पुरुष समानता, सर्व धर्म सहिष्णुता, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता ही दहा मूल्ये प्रामुख्याने जोपासली जाणे गरजेचे आहे. 👇
ब्रिलि ग्रॅहम यांचे "If character is lost everything is lost" हे वचन शालेय वयात मुलांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे. मूल्यशिक्षणाची ही नांदी आजची नसून स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली आहे. भारताच्या इतिहासातील अनेक महान व्यक्तींनी मूल्यशिक्षणाला अपार महत्व दिलेले आहे. 👇
त्यांची चरित्रे हेच मूल्यशिक्षणाचे केंद्र ठरलेले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर साने गुरुजी यांनी लिहिलेल्या #श्यामची_आई ची समाजाला आजही गरज आहे.

#मूल्यशिक्षण

#दिग्विजय_004

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Digvijay Vibhute

Digvijay Vibhute Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Digvijay_004

24 Nov
#महात्मा_जोतीराव_फुले
भाग १
"महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या संदर्भात ज्या काही चळवळी झाल्या आणि ज्यांच्या पुढाकाराने झाल्या त्यामध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल व त्यांना मानाचा मुजरा करावा लागेल." प्रसिद्ध शिक्षणतज्ञ विठ्ठलराव घाटे👇
यांचे हे वाक्य खूप काही सांगून जाते. त्या काळात संपूर्ण समाज वर्णव्यवस्थेच्या कुलंगड्यात अडकून पडलेला होता, सनातन्यांच्या कर्मकांडाला ऊत आला होता आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हळूहळू पाय पसरायला सुरवात केलेली होती. त्याच काळात बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ चालीरीती, रूढी,👇
परंपरा यांच्या कर्दमात खितपत होता. दुःख व दारिद्रय त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते; अशावेळी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे जोतीरावांनी ओळखले. राजकीय गुलामगिरीपेक्षाही सामाजिक व मानसिक गुलामगिरी ही भयानक असते; त्यामुळे शोषितांच्या वाट्याला जनावरासारखे जगणे येते, शोषकांचे हिंस्त्र👇
Read 9 tweets
15 Jul
#बेरोजगार आहात? स्वतःचा #व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहात? व्यवसाय काय करावा हे सुचत नाहीये? नवीन कल्पना शोधत आहात? मग हे नक्की वाचा :

व्यवसाय म्हणजे मोठी रिस्क, व्यवसाय म्हणजे २४X७ ची नोकरी हे आपण ऐकलेच असेल.
👇
खूप सारे नवीन व्यवसाय, नवीन #स्टार्टअप्स चालू झालेले आपण पाहिले असतील. ७०% नवीन व्यवसाय एका वर्षात बंद पडतात हेही ऐकलं असेल. नवीन व्यवसाय उभारताना रिस्क कमी करण्यासाठी, चांगली कल्पना शोधण्यासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी या काही टिप्स -
👇
१. व्यवसाय करायचा असेल तर पहिल्यांदा ग्राहकाची #गरज ओळखायला शिका. आपला ग्राहक कोण असावा हे ठरवा, त्यानुसार त्यांच्या गरजा त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून घ्या. एकदा का तुम्हाला ग्राहकाच्या गरजा समजल्या की त्या आपण कशा पूर्ण करू शकतो याचा विचार करा.
👇
Read 12 tweets
14 Jul
#अधिक_मास का येतो?

पृथ्वीचा सूर्याभोवती परिभ्रमणाचा काळ ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद एवढा आहे. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे बारा महिने पूर्ण होतात. (इंग्रजी कॅलेंडर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यावर आधारित आहे.)
👇
भारतीय पंचांग चंद्रमास प्रमाणे चालते. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ चांद्र मास मात्र ३५४ दिवसांत पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमावस्येला संपणारे असतात. (इतर राज्यांत पौर्णिमेला)
👇
चंद्राचा अमावस्या ते अमावस्या असा परिभ्रमण काळ २९.५३०५९ दिवस आहे. असे १२ महिने झाले की ३५४.३६ दिवस होतात. सौरवर्ष हे अर्थातच ३६५.२५ दिवसाचे असते. ह्यातून १२ चांद्रमास वजा केल्यास १०.८९ दिवसाचा फरक येतो. त्यामुळे दर ३ वर्षांनी ३२.६७ दिवसांचा फरक पडतो.
👇
Read 5 tweets
13 Jul
फेब्रुवारी महिन्यात फक्त २८ दिवसच का? चार वर्षातून एकदा येणारा लीप डे फेब्रुवारी मध्येच का येतो? समजून घेण्यासाठी हे नक्की वाचा -

पूर्वी एक वर्ष हे ३०६ दिवसांचे आहे असे मानले जायचे. त्याप्रमाणे पूर्वी एका वर्षात फक्त १० महिने होते.
👇
वर्षाचा पहिला महिना मार्च असायचा. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे १० महिने पूर्वी मोजले जायचे. नंतर लक्षात आले की एक वर्ष हे ३०६ दिवसांचे नसून ३६५ दिवसांचे आहे.
👇
राहिलेले ५९ दिवस मोजण्यासाठी, डिसेंबर नंतर जानेवारी घेतला गेला ज्यात ३१ दिवस गणले गेले. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये राहिलेले २८ दिवस गणले गेले. म्हणजेच पूर्वीच्या काळी फेब्रुवारी हा महिना वर्षाचा शेवटचा महिना होता.
👇
Read 6 tweets
9 Jul
#गोबेल्सनीती

लोकांचा नाझी पक्षाला पाठिंबा आहे, हे दर्शवण्यासाठी रोड शोज आणि मोठे इव्हेंट आयोजित केले जायचे. त्या वेळी नेत्यांची भाषणं व्हायची. देशात सर्वकाही कसं चांगलं आहे (सब चंगा सी), अशा प्रकारच्या भाषणांची उजळणी या ठिकाणी केली जायची.
👇
हिटलरच्या वाढदिवशीदेखील मोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे. 1936 मध्ये ऑलिंपिकचं आयोजन करण्यात आलं होतं. जर्मन सरकार कसं यशस्वी आहे, हे दाखवण्याची आयती संधीच या कार्यक्रमातून गोबेल्सच्या हाती आली होती.
👇
त्याने तिचा पुरेपूर वापर केला आणि आर्यन वंश कसा शक्तिशाली आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला. कला आणि कलाकार दोन्हीवर सरकारचं नियंत्रण हवं, असं या प्रचार मंत्रालयाला वाटायचं.
👇
Read 7 tweets
8 Jul
#गोबेल्सनीती

1934 साली हिटलर सत्तेत आल्यानंतर जोसेफ गोबेल्सला Ministry of Enlightenment and Propagandaचा कारभार देण्यात आला. प्रचार हा अदृश्य आणि सर्वत्र असावा, असं त्याला वाटायचं. त्यामुळे माध्यमं, साहित्य, कला यांच्यावर कठोर निर्बंध लादली जायची.
👇
हलके फुलके मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा नाझी विचारांचा प्रचार करणारं साहित्य, चित्रपटांना परवानगी दिली जायी. आर्यन वंश हा सर्वांत शुद्ध आहे आणि ज्यू हे राष्ट्रद्रोही आहेत, या संदेशाचा मारा जर्मन लोकांवर केला जायचा. ज्यू पत्रकारांवर बंदी घालण्यात आली होती.
👇
प्रत्येक बातमीला नाझी अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यावरच ती छापली जायची. 1939 पर्यंत जर्मनीत असलेल्या वर्तमानपत्रांपैकी 69 टक्के वर्तमानपत्रं ही नाझींच्याच मालकीची होती. त्याच सुमारास जर्मनीत रेडिओ लोकप्रिय होऊ लागला.
👇
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!