सावरकर बंधू अंदमान तुरुंगात होते. अनेक वर्षे त्यांची आणि कुटुंबाची भेट नव्हती.नारायणराव सावरकरांनी इंग्रजांकडे त्यांना भेटू द्यावं म्हणून अनेकदा अर्ज केले. पण दर वेळी ते फेटाळून लावण्यात आले.
अखेर अथक प्रयत्न केल्यावर इंग्रजांकडून परवानगी मिळाली. ते ही केवळ 2 व्यक्तींना.
++
त्या 2 व्यक्तींपैकी एक नारायणराव सावरकर, कारण त्यांना त्यांच्या दोघी वाहिनींपैकी एकीला अंदमानला घेऊन जावे लागणार होते.
सावरकर बंधूंना भेटण्याची परवानगी मिळण्याला विलंब झाला होता.तो पर्यंत येसुवहिनी हे जग सोडून गेल्या होत्या.
नारायणराव व माई अंदमानला गेले.येसुवाहिनींचे निधन
+
झाले, ही बातमी बाबारावांना कशी द्यायची हे त्या दोघांनाही कळत नव्हते, ते किती खचतील ह्याची नारायणराव आणि माईंना पूर्ण कल्पना होती.
सगळं धैर्य एकवटून ते दोघे बाबारावांना भेटण्यास गेले. बाबाराव जेव्हा त्यांच्या समोर आले, त्यांनी माई आणि नारायणला पाहिले मात्र, त्याच क्षणी
++
त्यांना कळले की येसू हयात नाही. माईंनी आश्चर्याने त्यांना विचारलं, "तुम्हाला कसं कळलं?"
त्यावर बाबाराव म्हणाले, "माई, जर येसू असती, तर तू स्वतः कधीच आली नसती. इंग्रजांनी केवळ दोनच व्यक्तींना परवानगी दिली असतांना, येसूला मला भेटायला मिळावं म्हणून तू तिलाच इथे पाठवलं असतं
++
तुला तात्याला भेटायला मिळावं ह्यापेक्षा तू आम्हां दोघांना भेटता यावं म्हणून स्वतः माघारी थांबली असतीस. ज्याअर्थी ती नाही तू आलीस, त्या अर्थी येसू आता ह्या जगात नाही"
ह्या कौटुंबिक एकीला तोड नाही. निस्वार्थपणे एकमेकांना दिलेल्या साथी मागे केवळ देशप्रेम हीच प्रेरणा होती.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अर्जुनाचे वर्णन करतांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात"तुझेनि नामे अपयशीं । दिशा लंघिजे ॥
तू शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।
तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं।।"
साक्षात परमेश्वराने ज्याचे सारथ्य केले, कृष्णाचा सखा, पितामह भीष्मांचा लाडका, द्रोणाचार्यांचा शिष्योत्तम, +
वेदव्यास ज्याला नारोत्तम म्हणतात अशा अर्जुना बद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
कुंतीपुत्रांमध्ये सगळ्यात लहान, कर्तृत्वात श्रेष्ठ , इंद्राचा अंश. अर्जुन अतिशय कोमल हृदयाचा, संयमी आणि शांत स्वभावाचा होता. बालपण अरण्यात त्यानंतर अनोळखी आणि कपटी कौरवांच्या सोबत काढल्यानंतर गुरूगृही +
शिष्योत्तम म्हणून अर्जुनाने स्थान मिळवले. त्यात त्याची जिद्द, मेहनत, शिकण्याचा ध्यास, स्थिरचित्त हे गुण दिसतात. अर्जुनाच्या संयमी आणि विवेक बुद्धी मुळे, तो गैरवापर करणार नाही ह्याची खात्री पटल्यावर द्रोणाचार्यांनी त्याला दिव्यास्त्रे शिकवली. +
Remembering women from our glorious past this Navratri ...
Savarkars
The freedom struggle of the Savarkar brothers — Ganesh Savarkar, Vinayak Savarkar & Narayan Savarkar is often spoken about. But the sacrifices & struggles of their wives — Yashodabai, +
Yamunabai & Shantabai Savarkar respectively, on personal, social & freedom fronts, are not known much.
These three ladies, in spite of having to suffer the anguish of separation from their husbands, starvation & hunger, carried on their husbands’ struggles for freedom. +
They knew that their husbands had taken up the oath to serve the country. They handled the family, supported each other and played their part in the battle for freedom.
Wasn't it easy for these 3 women to just leave everything & live a comfortable life by shifting to their +
प्रदीप दळवी यांच्या एका प्रसिद्ध नाटकात सावरकरांचं वर्णन करतांना ते म्हणतात, ‘सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकानंही हेवा करावा अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनंही शिष्यत्व पत्करावं इतकी विचारांची प्रगल्भता या साऱ्यांनी धारण केलेले मानवी अवतार म्हणजेच तात्याराव सावरकर!’
सावरकर बंधूंच्या मागे त्यांच्या गृहलक्ष्मी किती खंबीरपणे उभ्या होत्या, त्यांचे देशप्रेम, कष्ट आणि बलिदानाची थोडक्यात माहिती घेऊ.
सरस्वती बाबाराव सावरकर (येसुवहिनी):
तात्यारावांच्या बालपणीच त्यांची आई वारली. त्यांच्या आईची जागा येसूवहिनींनी घेतली. खरंतर त्या तेव्हा केवळ 13
वर्षांच्या होत्या. येसुवहिनींना बाबारावांनी शिक्षणाची दारे उघडून दिली. आपल्या दोघ धाकट्या दिरांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करायला म्हणून लहानग्या येसुवहिनींनी आपले दागिने गहाण ठेवले. आईची उणीव त्यांनी दोघं दिरांना आणि नणंदेला कधीही होऊ दिली नाही. त्यांचा घरात क्रांतिकारकांच्या
पर्वा महालक्ष्मीचे आगमन होणार.. त्या निमित्ताने घरातल्या लक्ष्मी बद्दल थोडेसे..
पर्वा कॅलेंडर बघताना लक्षात आलं, ह्या वर्षीअधिक मास आहे. त्या अनुषंगाने जावयाला दिलं जाणारं वाण आठवलं, आणि आजीची लगबग आठवली. 33 अनारसे, वाण, शाही पंगत, असा सगळा थाट. जसं जसं वय वाढत गेलं, ह्या
गोष्टीतला फोल पणा खटकायला लागला. जावईच का? सुनेला का नाही? म्हणजे जावयाला वाण, साग्रसंगीत जेवण, ह्या बद्दल काहीच म्हणणं नाही, खुशाल करा. पण त्यातलं 1% तरी कोडकौतुक आपल्या घरातल्या सुनेचं करायला काय हरकत आहे?
म्हणजे असं बघा, तुमची सून तुमच्या घरासाठी, तिथल्या लोकांसाठी, आपलं घर,
आपलं नाव, आई वडील, तिथल्या चालीरीती, ती ज्या वातावरणात वाढलीये ते सगळं सोडून आलीये न? ती नवऱ्याच्या घराला 'घर' बनवते, सासू-सासर्यांच्या चालीरीती, तिथलं वातावरण, तिथल्या पद्धती, नातलग, त्यांची ये-जा, त्यांचे मानपान सांभाळणे, सासू-सासर्यांची आजारपणं, सगळं मनापासून करते. इतकंच नाही,
#tweet4bharat #लैंगिकसमानता
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रिया:।।
मनुस्मृती (3-56)
जेथे स्त्रियांची पूजा होते/मान दिला जातो,तेथे देवता आनंदाने राहतात. जेथे त्यांचा मान राखला जात नाही तेथे सर्व कार्ये निष्फळ होतात.
पुत्रेणदुहितासमा
पुत्र, पुत्री हे समान आहेत
प्राचीन काळी स्त्री/पुरूष ह्यांचे सामाजिक स्थान समानतेचे होते. शिक्षण, राजकारण, युद्धशास्त्र, स्वतःचा वर स्वतः निवडणे, पौरोहित्य, संन्यास, अश्या अनेक बाबतीत स्त्रियांना समान अधिकार होते.
आपण सरस्वतीला विद्येची देवता, पार्वतीला शक्तीची
आणि लक्ष्मीला धनसंपदेची देवता मानतो.
मैत्रेयी, गार्गी, कात्यायनी ह्या प्राचीन काळातील विदुषी. कैकयी ने राजनीती, युद्धनीतीचे शिक्षण घेतले होते. आद्य शंकराचार्य - मंडन मिश्रा वादविवादात परीक्षक विदुषी भारती होत्या. संत मुक्ताबाई, जनाबाई या अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रसिद्ध आहेत.
प्रभू श्रीराम हे आपल्या सगळ्यांचे आराध्य. त्यांच्या आयुष्याची भव्यता दाखवावी, एवढी आपली पात्रता नाही.
पण हिंदूंच्या अनेक वर्षांच्या संघर्ष, बलिदान आणि प्रतिक्षेचे फळ आपल्या सगळ्यांना येत्या 5 तारखेला बघायला मिळणार आहे..श्रीराम जन्मभूमी येथे श्रीराममंदिर निर्माण...