सुशिक्षित कोण आणि अशिक्षित कोण ? या प्रश्नाचा एक नवा वेध घेणे गरजेचे आहे. सध्याची सुशिक्षित लोकांची व्याख्या त्याच्या शिक्षण नावाच्या रचनेशी जोडलेली आहे. अर्थात जो शिकलाय तो सुशिक्षित आणि नाही शिकला तो अशिक्षित . इथे एक प्रश्न जाणीवपूर्वक उभा करायला हवा की,
खरोखरीच शिक्षण घेतलेले " सुशिक्षित " आहेत का ? शिक्षण म्हणजे नेमके काय ? चार पुस्तके आणि शाळा नावाची रचना मनुष्याला सुशिक्षित बनविण्यासाठी पुरेशी आहे का ? सदसदविवेकबुध्दी शाबूत राखून या तीन प्रश्नांची उत्तरे शोधल्यास काही नकारार्थी उत्तर हाती येऊ शकतात. शिक्षण घेतलेल्या
बहुतांशी व्यक्तीचे सामाजिक वर्तन हे अत्यंत मागास दर्जाचे असते. याची उदाहरणे नुसते डोळे उघडून सर्वत्र फिरवले तरी ठायीठायी दिसतील. भ्रष्टाचार , व्यसनासक्त ,जातीयता अंधश्रध्दा अशा बरेच बाबतीत सुशिक्षित मंडळी मागे नाहीत तर पुढेच आहेत हे नाकारता येत नाही .
अन्याय विरोधात तुमच्या मनात विद्रोह पेरते ते शिक्षण होय. पण सर्वत्र अन्याय दिसत असूनही निमुटपणे जगणारी सुशिक्षित मंडळी लाखोनी दाखवता येतील.चार पुस्तके व शाळा नावाची रचना मनुष्याला फक्त पोटार्थी बनवते , माणूस नावाची रचना उभी करण्याची ताकद अजूनही या रचनेने फारशी कमवलेली नाही हे
कटूसत्य आहे. सुशिक्षित व अशिक्षित यातील फरक असा विरळाहून विरळ आहे. तेव्हा ....शिक्षण घेतलेलृ ते सुशिक्षित व न घेतलेले अशिक्षित असा भ्रम जरा तपासून पहायला हवाच.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Chamber of Secrets.

Chamber of Secrets. Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishalShinde_

2 Jan
#अजिंक्य विजय

हिरोला गुंडांनी बेदम मारले आहे... तो जमिनीवर अगदी मरणोन्मुख होऊन पडला आहे.. व्हिलनला वाटते तो मेलाच... आणि अचानक कशाने तरी प्रेरित होऊन तो उभा राहतो आणि सगळ्या गुंडांना मारतो- हे पाहणे आपल्या भारतीयांना जाम आवडते. भारताने दुसऱ्या कसोटीत मिळवलेला विजय यापेक्षा

1
काही वेगळा नव्हता. पण हा विजय केवळ क्रिकेटप्रेमींनी साजरा करावा असाच नाही, तर सगळ्यांनी काही लाईफ लेसन्स घेऊन जावे असा आहे..

त्याआधी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. ह्या जानेवारीमध्ये विरुष्काच्या प्रेमाला गोड फळ येणार हे आधीच डिक्लेअर झाले होते. जानेवारीतच भारत
2
महत्वाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही येणार होता. म्हणजे पहिल्या कसोटीनंतर विराट पितृत्व रजेला जाणार त्यानंतर उपकप्तान अजिंक्य रहाणे कडे नेतृत्वाची धुरा जाणार हे आधी माहित होतेच. बहुतेकांनी याकडे थोडे नाक मुरडूनच पहिले. म्हणजे ठीक आहे की तो कसोटी संघाचा उपकप्तान आहे,

3
Read 28 tweets
13 Dec 20
शेतकरी आंदोलन करताहेत हा प्रॉब्लेम नाहीये,

शेतकरी सरकार प्रत्यक्ष चालवणाऱ्या दृश्य असलेल्या अदृश्य हातांचा बहिष्कार करायला सांगताहेत आणि कृती करताहेत हा खरा प्रॉब्लेम आहे.

कधीही कुठेही या दोन उद्योग समूहांचा उल्लेख आला की भक्त मंडळी, आयटीसेल, भाजपचे लोक का चिडतात आणि
तुटून पडतात त्यामागे हेच उघड गुपित आहे.

सगळ्यांना पक्के ठाऊक आहे,

महामहिम फक्त परदेश दौरे आणि चमकोगिरी करण्यापूरते आणि संघाचा धार्मिक अजेंडा राबवायला आहेत.

सरकारची आर्थिक, औद्योगिक धोरण ठरवणारे दुसरेच आहेत.

म्हणूनच खऱ्या मालकांची नाव घेतली की भक्त चवताळून जातात.
आणि हीच दुखरी नस शेतकऱ्यांनी दिल्लीत दाबलीय,

म्हणूनच आंदोलन चिरडण्याचा पहिला टप्पा सुरू झालाय,

पियुष गोयल, दानवे वगैरे उगाच बोलत नाहीयेत,
आंदोलनाच्या खर्चावर, लंगर वगैरेवर पोस्ट याचसाठी पडायला लागल्यात,
Read 4 tweets
13 Dec 20
दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांना लंगर, रोटी मशिन्स, दूध तूप भाजीपाला यांना पैसे कोण देतंय म्हणून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना ,

नोटबंदी मध्ये अचानक भाजपची सगळ्या देशभरात टोलेजंग ऑफिसेस कशी उभी राहिली याचे प्रश्न पडले कधी ?
काकाजी दहा लाखाचा सूट कुठून घालत्यात आणि तैवानी मश्रुम कुठून आणतात याचे प्रश्न पडलेत कधी ?

ठोक भावात कानडी, एमपी मधले आमदार खासदार खरेदी करायला पैशे कुठून येतात याचे प्रश्न पडलेत कधी ?

पीएम केअर फंडात आलेले पैसे कुठं गेले याचे प्रश्न पडलेत कधी ?
सरकारी कंपन्या विकून, रेल्वे,विमानतळ, सगळं विकून आलेले पैसे कुठं गेलेत याचे प्रश्न पडलेत कधी ?

रिझर्व्ह बँकेकडून घेतलेले पावणे दोन लाख कोटी कुठं खर्चले याचे प्रश्न पडलेत कधी ?

हजारो कोटी रुपयांच्या जाहिराती दर निवडणुकीत भाजप करतय त्याचे पैसे कुठून येतात हे प्रश्न पडलेत कधी ?
Read 5 tweets
29 Aug 20
शेठ जसे सत्तेत आले तस मालकांनी देशातील कोणकोणत्या सरकारी संस्था,कंपन्या यांना विकून टाकले,किंवा त्या कंपन्यांत असणारी सरकारी गुंतवणूक काढून घेतली...यावर एक नजर टाकूयात.

2014-15

1. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड.
0.29% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
2. SAIL (Steel Authotiry of india ltd.)
5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

3. NALCO (National Aluminium Company Ltd.)
0.13 % सरकारी हिस्सा विकण्यात आला.

4. MMTC (Minerals and Metals trading Company)
0.073% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
5. CIL (Coal India ltd.)
10% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.

6. NTPC (National thermal power corporation)
7. HCL (Hindustan Copper Ltd.)

दोघांची प्रत्येकी 0.05℅ सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
Read 16 tweets
14 Jun 20
लॅटिन अमेरिका नावाने ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण अमेरिका खंडातील, अर्जेंटीना या देशातील एक तरुण, १९५१ साली आपल्या मित्राबरोबर, मोटरसायकलीवर स्वार होऊन पॅसिफिक किनारपट्टीने, लॅटिन अमेरिकेच्या सफरीवर निघाला. ही सफर त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.
लॅटिन अमेरिका खंड म्हणजे अनेक छोट्यामोठ्या देशांचा समूह. युरोपियन साम्राज्यवादाचे बळी असलेले, हे सर्व देश शोषण, दारिद्र्य, बेरोजगारी आदी समस्यांनी ग्रस्त. शेतकरी, खाण कामगार यांची पूंजीपती वर्गाने चालवलेली भयंकर पिळवणूक बघून तो तरुण कमालीचा अस्वस्थ झाला.
अत्यंत व्यथित मनाने तो सफरीवरुन परतला.
सफरीवरुन परल्यावर त्याने डॉक्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डिग्रीही संपादन केली. परंतु लॅटिन अमेरिकन जनतेचं खुणावणारे दु:ख, दैन्य, शोषण त्याला स्वस्थ्य बसू देईना. त्यांच्या या अरिष्टाचं कारण साम्राज्यवाद व भांडवलशाही आहे,
Read 13 tweets
11 Jun 20
" चीन नेहरू मोदी आणी संघी पिलावळ.!"

चीनने दिल्लीतील मोदी यांचे सरकार 'छानछोकी'तच मश्गूल असतांना लडाख मधील अत्यंत मोक्याच्या भुभागाचा ताबा मिळवून त्या भागात पर्मनंट स्ट्रक्चर बनवून अत्याधुनिक क्षेपणास्त्रे,रडार, युध्दसज्ज वाहने सैनिक यांचे तळ ही उभारले.

1/15
दोन महिन्यांपासून सरकार बेसुध होते. काही
राष्ट्रप्रेमी सामायिक वार्ताहर,माजी लष्करी अधिकारी आणी विशेषतः मा राहूल गांधी यांनी जबरी टिका सुरू केल्यावर हे 'कुंभकर्ण' ऊठलेत म्हणे .बरं हे असे का झाले यांचे आणी आपला भुभाग परत ताब्यात करण्यासाठी मिळवण्याचे नियोजन करायच्या ऐवजी ही
2/15
पिलावळ राहूल गांधी वरच तुटून पडली आणी १९६२ च्या हरलेल्या युध्दाचे दाखले
देत यांनी 'बेशुधी'तच आत्ता घालवलेल्या भुभागाचे निर्लज्ज समर्थन करत वरून- राजकारण करू नका , सरकारला प्रश्र्न विचारू नका असा भडिमार बिनडोक नेते आणी गोदी मिडीयातून करू लागले आहेत.

3/15
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!