राजर्षी शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे पराकोटीचे शत्रुत्व जगजाहीर होते मात्र दोघेही एकमेकांचे मोठेपण जाणून होते. त्यामुळे एकमेकांवर प्रखर टीका करताना दोघांनीही कधीच मर्यादा ओलांडली नाही. ना शाहू महाराज टिळकांना कधी 'समाजद्रोही' म्हणाले, 👇
ना लोकमान्य कधी शाहू महाराजांना 'स्वराज्यद्रोही' म्हणाले. परंतु ही नैतिक मर्यादा टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांना पाळता आली नाही. केळकर, खापर्डे, भोपटकर इत्यादी टिळक अनुयायींनी शाहू महाराजांविरुद्धची विखारी चळवळ कायम धगधगती ठेवण्यासाठी अखंड प्रयत्न केले. 👇
शाहू महाराजांना लोकांच्या नजरेत बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न केले, १८ मे १९२१ रोजी तासगावात झालेली 'कुलकर्णी परिषद' त्यापैकीच एक.
१७ मे रोजी 'केसरी'चे संपादक केळकर यांनी खास अंक काढून शाहू महाराज आणि ब्रिटिश अधिकारी यांच्यात संस्थानातील दहशतवादी कारवाया निपटून काढण्यासाठी 👇
झालेल्या पत्रव्यवहारातील गुप्त पत्रे छापली. "आमचे स्वराज्यद्रोही छत्रपती" असा स्फोटक मथळा देऊन खास अग्रलेखही लिहिला. यात महाराजांची 'जुलमी, एकतंत्री, ब्रिटिश सरकारला स्वराज्यद्रोहाचा उपदेश करणारा आचार्य, स्वराज्यद्रोही' अशा शब्दांत निंदा करण्यात आली होती.👇
या अंकाने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. इतर ब्राह्मणी वृत्तपत्रांनी देखील शाहू महाराजांवर हल्ला चढवला आणि महाराजांना जेवढं बदनाम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर म्हणून ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी 👇
"स्वधर्मातील बहुसंख्य लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीत ठेवणारे आणि देशभक्तीचे ढोंग करून आपल्या जातीपलीकडे न पाहणारे ब्राह्मणच खरे स्वजनद्रोही व स्वराज्यद्रोही आहेत" असे सुनावून हल्ला परतवून लावला.

वस्तुस्थिती काय होती?
जी गोपनीय पत्रे केसरीच्या अंकात छापली गेली होती👇
आणि महाराजांवर स्वराज्यद्रोही असा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला गेला होता ती पत्रे मुळात गोपनीय राहिलेली नव्हती. १९१५ साली महाराजांच्या परवानगीने रा.ब.महादेवराव डोंगरे यांनी ही पत्रे पुस्तकरूपात प्रकाशित केली होती. 'चिरोल खटल्यात' याचा संदर्भ येऊन गेला होता.👇
त्यामुळे केसरीचा हा अंक मराठी माणसाचा बुद्धिभेद करण्यासाठीच प्रकाशित झाला होता असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

या प्रकरणात शाहू महाराजांची बाजू अशी - कोल्हापुरातील सशस्त्र क्रांतिकारकांमध्ये वेदोक्त प्रकरणामुळे दुखावलेला ब्राह्मणवर्ग मोठ्या प्रमाणात होता.👇
सशस्त्र क्रांतीकारकांना त्यावेळी दहशतवादी असे संबोधले जायचे. हे क्रांतिकारक / दहशतवादी इंग्रजांविरुद्ध लढत होते पण वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराज सुद्धा यांचे शत्रू झाले. यांनी शाहू महाराजांना बदनाम करण्यासाठी आणि अडचणीत आणण्यासाठी नानाविध प्रयत्न केले.👇
बलात्काराचे आरोप असो, हत्येचा प्रयत्न असो, राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न असो किंवा राजकन्येच्या लग्नसोहळ्यात बॉम्ब टाकून घातपात करण्याचा प्रयत्न असो, वेळोवेळी शाहू महाराजांना अडचणीत आणण्यासाठी यांनी प्रयत्न केले. या क्रांतिकारक / दहशतवाद्यांमुळे कोल्हापूर संस्थानात👇
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. महाराज ब्रिटिश साम्राज्य सत्तेचे मांडलिक होते, राज्यकर्ता म्हणून संस्थानातील या दहशतवादी कारवायांचा बिमोड करणे शाहू महाराजांना गरजेचे होते. त्यामुळे "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" हे राजनीतीचे तत्व महाराजांनी स्वीकारून 👇
ब्रिटिशांच्या सहकार्याने संस्थानातील दहशतवादी कारवायांचा बिमोड केला. संस्थानातील लोक राज्यकर्त्याच्या विरोधात षडयंत्र रचत असताना राज्यकर्त्याने हात बांधून उभे राहावे अशी अपेक्षा करणेच मुळात चुकीचे. त्यामुळे केसरी मधून झालेले आरोप हे फक्त शाहू महाराजांच्या बदनामीच्या हेतूने 👇
करण्यात आलेले होते असाच त्याचा अर्थ होतो.

स्वराज्य या संकल्पनेचा अर्थ ब्राम्हण राष्ट्रवादी केवळ राजकीय हक्क मिळवणे एवढाच संकुचित घेत होते. याउलट स्वराज्यात राजकीय हक्कांसोबत सामाजिक हक्कांची प्राप्ती सुद्धा झाली पाहिजे, किंबहुना राजकीय हक्क मिळण्याअगोदर सामाजिक हक्क 👇
मिळाले पाहिजेत, किमान प्राथमिक शिक्षण देऊन आपला समाज हे राजकीय आणि सामाजिक हक्क मिळवण्याचा लायकीचा होईल असा व्यापक अर्थ शाहू महाराज घेत होते. त्यामुळेच शाहू महाराज मला #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.

समाप्त.

#राजर्षी_शाहू_महाराज

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Digvijay Vibhute

Digvijay Vibhute Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Digvijay_004

15 Feb
आपल्याच देशबांधवांना स्वातंत्र्याचे हक्क नाकारणाऱ्या, पण इंग्रजांकडे स्वातंत्र्याचे हक्क मागणाऱ्या लोकांविषयी

१. स्वामी विवेकानंद म्हणाले होते -

"भारताचा उद्धार करावयास हवा. गरिबांना पोटभर अन्न द्यावयास हवे. शिक्षणाचा प्रसार करायला हवा; आणि पुरोहितगिरी नष्ट करायला हवी. 👇
पुरोहितांचा जुलूम नको. सामाजिक अत्याचार नको..

इंग्रजांकडून अधिक सत्ता मिळावी म्हणून आपल्यातील काही खुळे तरुण सभा भरवतात. त्यांचे हे प्रयत्न पाहून इंग्रज लोक नुसते हसतात. ज्याला इतरांना स्वातंत्र्य देण्याची इच्छा नसते तो स्वतःच स्वातंत्र्याला लायक नसतो..! 👇
कल्पना करा,इंग्रजांनी सारी सत्ता तुम्हाला दिली तर परिणाम काय होईल?जे सत्ताधारी होतील ते बाकीच्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यापर्यंत काही ती सत्ता पोहोचू देणार नाहीत..!अशा गुलामांना सत्ता हवी असते इतरांना गुलाम बनविण्यासाठी."

- स्वामी विवेकानंदांची पत्रे, पृ.२९२.👇
Read 6 tweets
31 Jan
शाहू महाराज ब्राम्हणद्वेष्टे होते का?

उत्तर : अजिबात नाही. जातिभेदाविरुद्ध लढणारा व्यक्ती एखाद्या जातीचा द्वेष करू शकेल काय? नक्कीच नाही.

मग ब्राम्हण आणि ब्राह्मणेतर असा संघर्ष का उभा राहिला?

शाहू महाराजांना समाजातील विषमता संपायची होती, 👇
जातीभेद संपवून मागासलेल्या जातींना त्यांचे सामाजिक हक्क मिळवून द्यायचे होते. ब्रिटिशांच्या काळात सर्व प्रशासनयंत्रणा ब्राम्हण समाजाच्या हातात होती कारण सरकारी नोकरी शिकलेल्याला मिळे आणि शिक्षण ही फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती. शाहू महाराजांकडे राजसत्ता होती आणि 👇
सत्तेच्या जोरावर त्यांनी खंबीर पावले उचलून ही शिक्षणातली आणि प्रशासनातली ब्राह्मणांची मक्तेदारी मोडून काढली. बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी वसतिगृह चळवळ आणि अनेक शिक्षणविषयक कायदे / आदेश काढून शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर समाजासाठी शिक्षणाची गंगा वाहती केली.👇
Read 14 tweets
27 Jan
भारताला शेतकरी आंदोलनाचा फार मोठा इतिहास आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी साहजानंद सरस्वती, प्रोफ. एन जी रंगा, सर छोटूराम, चौधरी चरणसिंग, महेंद्रसिंग टिकैत अशा अनेक दिग्गजांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले आहे. 👇
इंग्रजांपासून ते तत्कालीन काँग्रेस सरकारपर्यंत जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलने झाले तेव्हा सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले, पण कधी आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानी अतिरेकी, लाल बावटे, देशद्रोही, विरोधी पक्षाने प्रेरित ठरवण्याचा प्रयत्न झाला नाही.
१९८७ साली केंद्रात काँग्रेसचे/राजीव गांधी 👇
यांचे बहुमताचे सरकार होते तर उत्तरप्रदेशात काँग्रेस नेते वीरबहादूर सिंग मुख्यमंत्री होते. पश्चिम उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर मधील कर्नूकखेडी गावात शेतीला वीज मिळण्याबाबत काहीतरी समस्या निर्माण झाली. त्याचवेळी विजेचे दर सुद्धा वाढवले गेले होते. 👇
Read 12 tweets
23 Jan
खरंतर १८९६ सालीच शाहू महाराजांनी कोल्हापुरात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम कॉलेजला जोडून एक वसतिगृह स्थापन केले होते. यात सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश होता. या वसतिगृहाचे व्यवस्थापन ब्राम्हण मंडळींकडे होते. शिक्षण ही आपलीच मक्तेदारी आहे 👇
अशी मानसिकता या मंडळींची होती त्यामुळे ब्राह्मणेतर मुलांची संख्या हळूहळू कमी झाली, कालांतराने ते वसतिगृह फक्त ब्राह्मणांचेच बनले. शाहू महाराजांच्या डोक्यात शिक्षण क्षेत्रातील ही मक्तेदारी नाहीशी करण्याबाबत चक्रे फिरत होती. याला वेग आला तो पी.सी.पाटलांमुळे (थोर कृषीतज्ञ).👇
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पी.सी.पाटलांनी त्यांना आलेल्या समस्या शाहू महाराजांना सांगितल्या. गावाचा राजा समजल्या जाणाऱ्या पाटलांच्या पोरांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर मागासलेल्या जातींची काय अवस्था होत असेल या विचाराने महाराज अस्वस्थ झाले.👇
Read 19 tweets
20 Jan
मासिक पाळीच्या दिवसांत स्त्री खरंच अपवित्र किंवा अशुद्ध असते का?
उत्तर : अजिबात नाही. मासिक पाळीचे चक्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालूच असते, त्यामुळे रक्तस्राव होण्याच्या ४ दिवसांपुरती स्त्री अपवित्र आणि इतर दिवशी पवित्र असं असूच शकत नाही.👇
ज्याप्रमाणे आपण अन्न खातो, ते पचवतो त्यातून ऊर्जा तयार होते आणि नको असलेल्या गोष्टी आपले शरीर बाहेर फेकते, हे जसे एक चक्र आहे तसेच मासिक पाळी हे देखील एक चक्र आहे. साधारण २८ ते ३२ दिवसांचे हे चक्र असते, ज्यामध्ये स्त्रीबीज तयार होऊन त्याची वाढ होते. 👇
परिपक्व झालेले स्त्रीबीज मासिक पाळीच्या शेवटच्या टप्प्यात रक्तस्रावाच्या स्वरूपात बाहेर फेकले जाते आणि पुन्हा नवीन स्त्रीबीज निर्माण होऊन परिपक्व होण्याची प्रक्रिया सुरु होते. ही सगळी प्रक्रिया का होते? तर गर्भधारणेसाठी होते. गर्भधारणा झाली नाही तर मग ते स्त्रीबीज शरीराबाहेर👇
Read 11 tweets
16 Jan
#राजर्षी_विरुद्ध_लोकमान्य
#शत्रुत्व_आणि_ममत्व
गेल्या शतकातील पहिल्या दोन दशकात महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक या दोन महापुरुषांचा उदय झाला. शाहू महाराजांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा मानवमुक्ती करणारे स्वातंत्र्य आणि 👇
सामाजिक सुधारणा जास्त महत्वाच्या वाटत होत्या तर लोकमान्य टिळकांना राजकीय स्वातंत्र्य अधिक गरजेचे वाटत होते. ही दोन्ही स्वातंत्र्ये एकमेकांस पूरक आहेत याची जाणीव या दोन्ही महापुरुषांना होती तरीही एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याऐवजी एकमेकांशी दोन हात करण्याची परिस्थिती 👇
त्यांच्यासमोर उभी राहिली हे खरंतर महाराष्ट्राचं दुर्दैव. तसं पाहिलं तर लोकमान्यांच्या मनात कोल्हापूरच्या गादीविषयी प्रचंड आदर होता. या आदरापोटीच त्यांनी व आगरकरांनी चौथ्या शिवाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचाराला 'केसरी' मधून वाचा फोडली. यात त्यांना दिवाण बर्व्यांचा रोष 👇
Read 20 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!