शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्म सोहळ्याप्रसंगी माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले… Image
शिवराय आणि जिजाऊंचा आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने यंदा हे दुसरं वर्ष आहे, या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. शिवरायांसमोर नतमस्तक व्हायला शिवजयंतीच असली पाहिजे असं काही नाही. आपल्या मनात, हृदयात त्यांचं एक अखंड एक स्थान आहे. Image
कुठेही, कधीही, कोणत्याही कामाला निघताना छत्रपतींचं स्मरण नकळत होतं. कोणतंही चांगलं किंवा पवित्र काम करताना छत्रपती शिवराय आठवतात. ते आपल्या धमन्यांमध्ये, रक्तात आहेत. आपण या मातीची लेकरं आहोत. Image
महाराष्ट्र म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वेगळे करता येऊच शकत नाहीत आणि ज्या मातीत हे तेज जन्माला आलं त्याच मातीची आपण लेकरं आहोत. छत्रपतींनी मोघलांशी युद्ध केलं, स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्यावर चालून आलेल्यांची काय विल्हेवाट लावली हे आपल्याला परत सांगण्याची गरज नाही. Image
आता तसं युद्ध जरी नसलं, तशा ढाल तलवारी जरी नसल्या, तरी कोरोना बरोबरचं आपलं युद्ध सुरू आहे आणि मास्क ही त्या युद्धातील आपली ढाल आहे. वार करायचा तेव्हा वार करू, पण वार अडवायचा तेव्हा ढाल लागतेच. बाजीप्रभूंनी हातात तलवार घेऊन झुंज दिली. पण आपल्या लढाईत मास्कची ढाल हवीच. Image
शिवराय हे आपलं दैवत आहे. पूर्वीसुद्धा कित्येकांनी राज्यं जिंकली,स्थापन केली, कित्येक राज्यं विलयाला गेली. पण शिवरायांचं वेगळेपण आहे. लढण्यासाठी तलवार आवश्यक असते. पण तलवार घेऊन लढता येतंच असं नाही. तर ती पकडण्यासाठी जी जिद्द लागते, प्रेरणा लागते, ईर्ष्या लागते ती शिवरायांनी दिली. Image
आता इतकी वर्ष झाली, शेकडो वर्ष झाली, वर्ष मोजण्यात काही अर्थ नाही, पुढची हजारो वर्ष होतील तरी तेच आमचं दैवत आहे आणि तेच दैवत राहणार.

आपल्या या दैवताला वंदन करण्यासाठी आपण इथे आलोय. दोन्ही पुरस्कार प्राप्त शिवभक्तांचे अभिनंदन. त्यांचं कार्य वेगळं आहे. Image
आज शिवयोग हा नवीन शब्द समजला. शिवाय शिवसुमन या फुलाचं वैशिष्ट्य आज कळलं. ते आधी पाहिलं होतं पण ही माहिती आज कळली. किती सुंदर आहे. ते याच परिसरात पहिल्यांदा मिळालं हा खरंच शिवयोग. ज्यांनी ते शोधलं त्यांचं कौतुक वाटतं. Image
आपल्या सगळ्यांच्या मनातला शिवप्रेमाचा धागा महत्त्वाचा आहे. हे धागे एकत्र करून गोफ विणणं आवश्यक आहे. हा आपल्या राज्याच्या विकासाचा गोफ असणार आहे. आपल्या मनात शिवरायांचा इतिहास जिवंत आहे आणि राहणार. संपूर्ण जगात ते तेज पसरवायचं आहे. Image
अवघ्या जगामधे शिवरायांचा इतिहास पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार. हे जेव्हा करू, ते जेव्हा शक्य होईल, तेव्हाच आपण सार्थ अभिमानाने म्हणू की, हो आम्ही त्याच शिवरायांच्या भूमीतील लेकरं आहोत. सर्वांना शुभेच्छा!

जय हिंद! जय महाराष्ट्र! Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with CMO Maharashtra

CMO Maharashtra Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @CMOMaharashtra

21 Feb
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to state today;

We are meeting after several days. You may be aware of the reasons for today’s meeting.
I wanted to meet you for reasons apart from Corona. But you are not at home nowadays. No one wants to sit at home for no reason, including myself. Of course, these restrictions were necessary.
In the first week of March, Maharashtra will complete a year since the first Corona patient was detected.

The other day, someone asked me about my most satisfying moment in those difficult days of the lockdown. I said it was that you all accepted me as a member of your family.
Read 23 tweets
20 Feb
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत विविध मुद्दे मांडले. ही बैठक पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. राज्यातील विविध प्रकल्पांना केंद्रांकडून साह्य मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. Image
उद्योग व्यवसायांच्या बाबतीत आपली स्पर्धा इतर देशांबरोबर असली पाहिजे,राज्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा नको. केंद्राने कार्यक्षमता व गुंतवणुकीसाठी आकर्षकता अशा निकषांवर निकोप स्पर्धेला प्रोत्साहन द्यावे. काही राज्ये वीज सवलतीच्या, जागेच्या दराच्या ऑफर्स देतात. बार्गेनिंग केले जाते. Image
राज्यांत स्पर्धा जरूर असावी पण ती सवलती किती देतात अशी आर्थिक नसावी तर प्रशासकीय कार्यक्षमता व उपलब्ध सुविधांवर निकोप व्हावी. केवळ पैशाच्या स्वरूपात गुंतवणुकीचा विचार न करता रोजगार किती मिळेल याचाही विचार व्हावा. असे झाले तर खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर बनू. Image
Read 12 tweets
19 Feb
CM Uddhav Balasaheb Thackeray’s welcome address at the @nasscom Technology & Leadership Forum; Image
It gives me immense pleasure that the state of Maharashtra is hosting the 29th Chapter of the Nasscom Technology Leadership Forum. The 3-day forum first time in 30 years is completely virtual. Image
It is a testament to the exponential technology adaption that has helped the world survive the pandemic. The new information technology has propelled both India and Maharashtra as technology hubs poised for growth in 2021 and beyond. Image
Read 18 tweets
20 Dec 20
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
मी आजपर्यंत जे जे आपल्याला सांगत आलो, ते ते आपण मनापासून अमलात आणत गेलात आणि म्हणूनच मी म्हणेन की आजच्या परिस्थितीवर आपण पूर्णपणे काबू मिळवला नसला तरी काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण मिळवलं आहे.
जवळपास सर्व गोष्टी आता उघडलेल्या आहेत. रहदारी सुरू झालेली आहे, कारभार सुरू झालेले आहेत, येणं-जाणं भेटणं याही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मात्र आपला कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक पावलावर सावध रहा हे सांगणं माझं कर्तव्य आहे.
Read 31 tweets
22 Nov 20
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the state today;

I would like to thank you all for your cooperation in not bursting crackers during Diwali and celebrating it in a disciplined manner like all other festivals.
Places of worship have reopened but let’s ensure we carry out festivities and celebrations without forming crowds.
With your cooperation, the My Family My Responsibility campaign has been successful and vital in curbing COVID-19 cases. I would like to thank all the doctors, medical staff, officers and all essential staff for their efforts and bravery in making it successful.
Read 10 tweets
22 Nov 20
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
काल मी हुतात्मा चौक येथे गेलो होतो. संयुक्त महाराष्ट्रामध्ये ज्यांनी बलिदान दिले, त्यामुळे ही राजधानी आपल्याला मिळाली. ४ दिवसांनी २६ नोव्हेंबर येतोय. तोही एक वेगळा लढा होता. मुंबईत घुसलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांना बहाद्दर पोलिसांनी, NSG कमांडोंनी तिथे जाऊन ठोकून काढले.
ज्या ज्या वेळेला आपण असा लढा दिला त्या, लढ्यात आपण यश मिळवलं. कारण आपली जिद्द! एकदा का महाराष्ट्राने काही करायचं ठरवलं की महाराष्ट्र करून दाखविल्याशिवाय राहत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती कोरोनाबरोबरच्या लढाईमध्ये करायची आहे.
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!