aditya chavan Profile picture
11 Apr, 10 tweets, 4 min read
#टीका_नही_चूना_लगा
स्वतंत्र भारताचे १ले पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरु यांचे पिताश्री दिवंगत मोतीलाल नेहरु ब्रिटीश राजवटीतील १ मातब्बर वकील प्रस्थ होते.ब्रिटीशांनी संस्थाने खालसा करण्यासाठी ‘दत्तक वारस नामंजूर’असा कायदा केला.या कायद्याचे प्रचंड ज्ञान मोतीलाल नेहरु यांना होते Image
सबब मोतीलाल नेहरुंच्या कायद्यावरील पकडीमुळे त्यांचे मानधन वाढत गेले व मोतीलाल नेहरु त्याकाळात एक गर्भश्रीमंत प्रस्थ बनले.तरीदेखील मोतीलाल नेहरुंनी स्वातंत्र्यलढा जिवंत ठेवण्यासाठी आपली संपत्ती गांधीजींच्या सल्ल्याने काँग्रेसला दान केली.नेहरुंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान Image
बनू शकले त्यामागे देखील नेहरु कुटुंबाचा देशकार्यासाठीचा त्याग विचारात घेतला गेला होता.पिताश्रींचा वारसा चालवणाऱ्या चाचा नेहरुंनी १९४७ नंतर आपल्या २०० कोटी संपत्ती पैकी १९६ कोटी रुपयांची संपत्ती देशासाठी दान केली.त्यावेळेस शुद्ध तोळे सोने ८८ रुपये प्रतितोळा दराने विक्री केली होती.
नेहरुंचा वारसा पुढे चालवणाऱ्या दिवंगत इंदिराजींनी आजोबा मोतीलाल नेहरु यांनी १९३० मध्ये खरेदी केलेली आनंद भवन नावाची वास्तू १९७० मध्ये देशाच्या नावे केली.यासोबतच दुसऱ्या महायुद्धानंतर नेहरुंनी अमेरीका किंवा सोव्हिएत युनियन यांच्या गटात सामील न होता स्विकारलेला अलिप्ततावाद भारताला Image
आंतरराष्ट्रीय राजकारणात विश्वगुरु बनवून गेला. एका देशाच्या प्रमुखाकडे हवी असलेली शालीनता, सभ्यता,नैतिकता,विद्वत्ता व बुद्धीप्रामाण्यवाद नेहरुंकडे होता.भारताचे सार्वजनिक आरोग्य, विविध रोगांवरील लसीकरण आदी गोष्टींचा पाया नेहरुंनी घातला.अगदी कोरोना महामारीच्या भयंकर कालखंडातसुद्धा
नेहरुंच्या काळात उभारलेली NIV संस्था उपयुक्त ठरली.नेहरुंनी रचलेल्या पायावर भारताचे निर्माण करत असताना नेहरु ते डॉ.मनमोहन सिंग या काँग्रेसी राजवटीच्या ६० वर्षांत भारताने प्रचंड प्रगती केली आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या ८०-८५ टक्के इतकी होती Image
३५ कोटी लोकसंख्येचा देश आज १३५ कोटी लोकसंख्या ओलांडून गेला असताना दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या २५-३० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे इप्सित साध्य झाले होते.गेल्या ६ वर्षांतील नोटबंदी,जीएसटी,लॉकडाऊन आदी कारणांमुळे दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या वाढली आहे. Image
पण वाढलेला आकडा नेमका किती?या प्रश्नाचे उत्तर निती आयोग २ वर्षे झाली देत नाहीये.ज्या देशात पोलाद बनत नव्हते,चांगल्या दर्जाची सुई बनत नव्हती तो देश आज कोरोना सारख्या घातक संसर्गजन्य रोगांवर लस बनवून निर्यात करतोय हे चाचा नेहरु ते डॉ.मनमोहन सिंग या काँग्रेसी राज्यकर्त्यांचे Image
निर्विवाद यश आहे.विचार करा,यापैकी एकाही राज्यकर्त्यांने कधीही कोणत्या रोगावरच्या लसीकरणासाठी ईव्हेंट केला असता तर?तर,त्यांना मूर्ख ठरवण्यात आले असते.वर्षभरात सुमारे १,६८,४६७ देशवासी कोरोनाने आपला जीव गमावलेले असताना,आजही पुरशी हॉस्पीटल्स,पुरेसे बेडस्,व्हेंटीलेटर्स,रुग्णवाहीका
उपलब्ध नसताना जर कोणी लसीकरणाचा उत्सव साजरा करणार असेल,तर त्याला भारताचा वैभवशाली इतिहास अव्वल दर्जाचा कोडगा व मूर्खच ठरवेल.खरे मूर्ख तर ते मतदार आहेत,जे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात,देश ऊभारणीत शून्य योगदान असलेल्या संघटनेकडून विकासाची अपेक्षा करत होते.
#टिका_उत्सव #टीका_नही_चूना

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with aditya chavan

aditya chavan Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Chav0_

14 Apr
#आरएसएस
हेडगेवारांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान केवढे?तर शेळीच्या शेपटीएवढे;धड लाजही राखता येत नाही आणि धड माश्याही हाकता येत नाहीत!स्वातंत्र्यपूर्व भारतात काँग्रेसच्या त्रिपुरा येथील अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. Image
व्यापक देशहिताच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्षाने परस्पर विरोधी मत असलेल्या नेतेमंडळींना भेटून स्वातंत्र्यलढ्यात सोबत घेण्यासाठी कार्यक्रम आखला.या कार्यक्रमांतर्गत नेताजींनी बाळाजी हुद्दार नावाच्या संघस्वयंसेवकाला माजी सरसंघचालक डाॅ.हेडगेवार यांचेसोबत भेटीसाठी निरोप दिला. Image
नेताजींचे सचिव 'शहा' यांना घेऊन हुद्दार नाशिकला 'बाबासाहेब रघाटे' यांच्या घरी निवासाला असणाऱ्या हेडगेवारांना भेटायला गेले.त्यावेळी शहांना बाहेर थांबवून हुद्दार घरात गेले.तेथे हेडगेवारांचा हास्यविनोद सुरु होता.हुद्दारांनी सर्वांना बाहेर काढून हेडगेवारांना नेताजींच्या भेटीचा निरोप Image
Read 13 tweets
13 Apr
मंगळवेढातालुक्यात आज उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये एका नखरेल 'नाच्याचा' तमाशा पार पडला,असा नाच्या की तो लाल लाल कलिंगडाच्या आतील गरासारखा देखणा व गोलमटोल,हा '#नाच्येन्द्र' गेल्या अनेक वर्षे फालतू विनोद,चेष्टामस्करी व बौद्धिक विकृती दाखवायचा,शेवटी प्रेक्षकांनी वैतागून बुडावर लाथ मारली Image
तेव्हापासून हा असाच बेवार्श्यासारखा स्वतःसोबत अख्खा १०४ जणांचा मोठा फड सगळ्या महाराष्ट्रभर घेऊन लाचारासारखे हिंडत असतं.जिथे मिळेल तिकडे तंबू ठोकायचा आणि तमाशा सुरू करायचा.शेवटी लोकांना फुकटचा मनोरंजन मिळत आहे म्हणल्यावर कोण नाही बघणार तमाशा?तमाशा मध्ये #नाच्येन्द्र 'फड'वाला अनेक
नक्कल करून(जे लांब लांब पर्यंत काहीच साम्य नसतं)लोकांना मनोरंजित करतो.पण अश्या ह्या '#नाच्येन्द्र' तमाशा बघायला जाताना सर्व सामान्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्या,मास्क घाला व सामाजिक अंतर पाळा.हा निर्लज्ज व भिकारी आहे ज्याला तुमच्या जीवाची पर्वा नाही अन् मतलबी आहे.#नाच्येन्द्र
Read 5 tweets
8 Apr
#२००कोटीदेवेंद्रच्यापोटी #जळगावभ्रष्टाचार #JalgaonScam
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी @AnilDeshmukhNCP यांनी महिना १०० कोटी वसूली करायला सांगितल्याचा नुकताच एक आरोप केला होता.
त्यानंतर ही भानगड कोर्टात गेल्यावर नैतिकतेसारख्या वैगैरे वगैरेच्या मुद्यावर देशमुखांनी राजीनामा दिला.आता असचं एक २०० कोटींच्या भ्रष्टाचाराचं लफडं जळगावात उघडकीस आलंय आणि विशेष म्हणजे त्यात थेट विरोधी पक्षनेते@Dev_Fadnavis,@girishdmahajanयावर आरोप झाले आहेत.#जळगावभ्रष्टाचार
विरोधकांच्या लफड्यांच्या बाबतीत कार्यतत्पर असणाऱ्या केंद्र सरकारचे अनुकरण करत आपल्या राज्य सरकारनेही तातडीने याबाबतीत चौकशी समिती नेमल्याचा अध्यादेश काढून २ महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
#जळगावभ्रष्टाचार #२००कोटीदेवेंद्रच्यापोटी
Read 17 tweets
8 Apr
@Dev_Fadnavis चा दावा:
महाराष्ट्र सरकारने लसीचं राजकारण बंद केलं पाहिजे; महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसींचा पुरवठा राज्याला करण्यात आला आहे : @Dev_Fadnavis, विरोधी पक्षनेते.
#MaharashtraNeedsVaccine #महाराष्ट्रद्रोहीभाजपा
वस्तुस्थिती :
कोरोना लस वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असूनही,महाराष्ट्राला केवळ ७ लाख ४० हजार डोसचं वाटप झालं आहे. याउलट भाजपशासित राज्यात जास्तीचा लस साठा देण्यात आला आहे.
#MaharashtraNeedsVaccine
महाराष्ट्रात केवळ ३ दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री@rajeshtope11यांनी काल (७ एप्रिल)झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.त्याचबरोबर केंद्राने लवकरात लवकर लसीचा पुरवठा करावा,अन्यथा लसीकरण अभियान थांबेल असा इशाराही केंद्राला दिला.
Read 8 tweets
6 Apr
२०१४ पर्यंत ज्या कॅगचे रिपोर्ट नाचवून भाजपावाले थयथयाट करायचे. तेच भाजपावाले २०१४ नंतर कॅगच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करु लागले. कॅगची स्वायत्तता इतर सरकारी आस्थापनांप्रमाणेच संपवून टाकली.राफेल संदर्भात कॅगचा अहवाल येण्यापूर्वी तात्कालीन देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली Image
यांनी दिलेल्या माहितीनुसार राफेल करार हा युपीए सरकारच्या करारापेक्षा ९% स्वस्त आहे,असे म्हटले गेले.मात्र कॅगने एनडीए सरकारने केलेला नवीन करार युपीए पेक्षा २.८६% स्वस्त असल्याचे नमूद केले.कॅगच्या अहवालातून स्पष्ट दिसत होते की,मोदी सरकारने अनिल अंबानीना फायदा व्हावा म्हणून अनेक Image
कारनामे केलेले आहेत.एन्. राम यांनी ‘द हिंदू’ मधून रोज एक एक कारनामा उघड केला.मुळामध्ये युपीएपेक्षा राफेल डिल स्वस्त नव्हती तर युपीएच्या डिलनुसार १२६ विमानांची खरेदी करायची होती. त्याऐवजी मोदी सरकारने ३६ विमाने घेतली आणि मधस्थ हटवून डिल स्वस्त केल्याचा कांगावा केला. Image
Read 14 tweets
3 Apr
ट्रोल्स असे पोसले जातात.
ट्रोल्सचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आणू इच्छितो मी. परंतु हे ट्रोल्स नेमके कसे पोसले जातात याबाबत आपल्यापैकी अनेकांना माहीतीच नसते.मुळात हे पगारी ट्रोल व यांना मिळणारे मानधन आज निविदा चालू असल्यामुळे द्यायला लागतं.@Dev_Fadnavis ह्याच्या सरकारमध्ये ट्रॉलिंग
ह्या गोष्टीवर लोकंना ट्रोल्सच्या विषयानंतर "आघाडी बिघाडी" फेसबुक पेजवरून बराच हैदोस झाला होता.हे लोक अद्यापदेखील शासनाची बदनामीचे काम करत आहे.त्यांना मुसक्या घालण्यासाठी मी पुराव्यासह माहिती देत आहे,ट्रोल्स कसे पोसले जातात?हा आपला मुख्य विषय आहे.एकतर सरकारी कामांच्या किंमती
भरमसाठ असतात आणि बोटावर मोजता येईल इतक्याच काम करणार्‍या खासगी कंपन्या सरकारने पोसल्या आहेत.जुन्या सरकारमधे हेच लोक काम करत होते आणि आत्तादेखील याच कंपन्या काम करत आहेत.उदा.काही कामांचे शासकीय रेट बघुया.
Gif दोन तिन सेकंदाचा अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ करीता सरकारी भाव प्रत्येकी ४००००/-
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!