इतिहासातील ३ महान व्यक्तींचे जीवन आपण जर नीट अभ्यासले तर राजकारण कसे करावे हे खूप चांगले समजते.
१. भगवान श्रीकृष्ण - महाभारतात श्रीकृष्णाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. जन्म झाल्यापासून ते कौरव पांडवांचे युद्ध संपे पर्यंत त्याने सत्य आणि धर्म
१
विजयी व्हावा ह्या साठी अतिशय सुरेख चाली खेळल्या. त्यात शेवट पर्यंत कौरवांना समजून सांगण्याचा प्रयत्न असो किंवा अर्जुनाला गीता सांगून त्याला धर्मयुद्ध का गरजेचे आहे हे समजावणे असो. भीमा कडून जरासंधाला मारून युधिष्ठिराला चक्रवर्ती राजा बनवणे असो किंवा दुर्योधनाला गांधारी समोर
२
विवस्त्र जाण्यापासून थांबविणे असो.
स्वतः युद्धातून पळून जाऊन द्वारका स्थापन करणे असो वा युधिष्ठिराला इंद्रप्रस्थ बनवायला मदत करणे असो. तो जेवढा कृपाळू होता तेवढाच मोठा राजकारणी होता. त्याच्याशिवाय पांडवांना युद्ध जिंकणे अवघड होते. त्याने प्रत्येक डावपेच बरोबर वेळेस खेळले.
३
२. चाणक्य - चाणक्य एक महान शिक्षक होता. आपल्या लहानपणीच त्याने त्याच्या वडिलांकडून (चणक) व त्यावेळचे धनानंद राजाचे महामंत्री शट्टार ह्यांच्या कडून विद्या प्राप्त केली. स्वतःच्या वडिलांना उन्मत्त धनानंद च्या बळी जाताना त्याने पाहिले होते. तक्षशिला येथे जाऊन राजकारणाचे धडे घेतले
४
पुढे पाटलीपुत्र येथे येऊन पाटलीपुत्र ची विदारक परिस्थिती , राजाचा प्रजेवर होणारा अन्याय आणि राज्याकडे असलेले दुर्लक्ष पाहून चंद्रगुप्त सारख्या धनगराच्या मुलाला तक्षशिला येथे नेऊन , त्या मुला ला राजा म्हणून आवश्यक असलेले सर्व गुण शिकवले. आणि त्याला सगळ्या जनपदांचा नेता बनवून
५
अलेक्झांडर असो वा कैकयी नरेश , खुद्द अमात्य राक्षस असो वा धनानंद सगळ्यांना त्यांच्याच राजकारणात फसवून चंद्रगुप्त का सम्राट केले. स्वतः अमात्य राहून राज्याची घडी नीट बसविली आणि पुन्हा शिक्षकाच्या भूमिकेत राहिले. कौटिल्य हे नाव हे उगीचच नाही दिले चाणक्यला.
६
३. छत्रपती शिवाजी महाराज - उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. स्वराज्य संकल्पक वडील शहाजी राजे ह्यांच्या विचारातून , राष्ट्रमाता जिजाऊ ह्यांच्या प्रेरणेतून आणि निरनिराळ्या संतांच्या व गुरूंच्या आशीर्वादाने तयार झालेले हे एक अचाट असे व्यक्तिमत्व. लहान पण पासून त्यांनी राजकारण
७
-
अगदी जवळून पाहिले. स्वराज्यासाठी वडिलांची होणारी तगमग , त्यांचे स्वप्न आणि शहाजी राजे बेंगळुरू ला गेल्यावर आईचा सहवास , त्यांचे प्रेम आणि त्यांची स्वराज्यासाठी असलेली इच्छाशक्ती ह्यातून ते घडतं गेले. रांझे गावच्या पाटलाचा चौरंगा असो वा पुण्यात फिरवला तो सोन्याचा नांगर..
८
सुरत लुटणे असो वा पुरंदरचा तह असो.
आग्र्याहून सुटका असो वा आपल्या तावडीत सापडलेली शत्रू पक्षाची एक अबला स्त्री. अफजल , शाहिस्त्या खानाला शिकवलेली अद्दल असो वा नेतोजी आणि बजाजी ह्यांना स्वधर्मात परत आणणे असो..त्यांची प्रत्येक खेळी ही स्वराज्याचे हित पाहणारी आणि जनतेचे हित
९
जोपासणारी होती.
ह्या तिन्ही महान पुरुषांची चरित्रे प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचली पाहिजेत.
खास करून राजकारणातील व्यक्तींनी.
श्रीकृष्ण हा सत्य आणि धर्म ह्यांच्या बाजूने
चाणक्य हा अखंड भारत आणि
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्यासाठी जगले आणि त्यांचे उद्दिष्ट
१०
त्यांचे ध्येय ते कधीही विसरले नाहीत.
हेच आपल्या सर्वांना करायचे आहे.
आपल्या भारतमाते विषयी आपली श्रद्धा , आपले प्रेम आणि तिला परमवैभवाकडे नेण्याची इच्छाशक्ती ,ध्येय आपण कायम आपल्या हृदयात ठेवले पाहिजे तरच आपल्या स्वप्नातील भारत जगद्गुरु होईल असे मला वाटते.
ॐ
🙏🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
१३ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांना मी खालील email केले होते..त्यावर २ दिवसानंतर मी पुन्हा एकदा त्यावर पोच पावती / उत्तर देण्याची विनंती केली.
विषय - दहावीची परीक्षा न घेण्याच्या आपल्या निर्णयाला उच्च न्यायालयाने मान्यता न दिल्या बद्दल.
माननीय,
आपल्या राज्यात शिक्षणाचा अधिकार असलेल्या सर्वांना शिक्षण देणे हे सरकारचे धोरण असले पाहिजे. कदाचित तुमचे सुद्धा असेल.
+
पण गेल्या वर्षभरात corona मुळे ह्या धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला कोणालाच फार काही करता आले नाही.
तरी खूप शाळांनी online शाळा घेऊन शिक्षण देण्याचे कर्तव्य केले.त्यात प्रामुख्याने १०वी चे वर्ग ही होते.
१०वी आणि १२वी ह्या आपल्याकडील अतिशय महत्वाच्या परीक्षा मानल्या जातात. +
१०वी ही तर शालांत परीक्षा असते. म्हणजे शाळे बाहेरील पहिली परीक्षा देण्याची पहिली संधी मुलांना मिळते. महाराष्ट्र सरकारने त्यांना ही संधी corona चे कारण देऊन दिली नाही. असे काहीही नव्हते की परीक्षा घेता आली नसती. कित्येक शाळा कित्येक कॉलेजेस ह्या दरम्यान बंदच होते. +
मला सहजच त्या म्हाताऱ्या माणसाची गोष्ट आठवली जिथे तो आपल्या मुलांना काड्या देतो आणि मोडायला लावतो ..मग नंतर काड्यांची मुळी बनवतो...जी त्यांना मोडता येत नाही.
विषय निघालाच म्हणून...सांगतो की खूप वर्षांपूर्वी मी एक कविता केली होती...
श्रीराम मंदिर करावे म्हणून...जी त्या वेळी मी तत्कालीन सरसंघचालक पूजनीय सुदर्शनजी ह्यांना दिली होती..त्यावर त्यांची
बंगाल आणि इतर राज्यातील निकाल लागल्यानंतर त्या त्या पार्टीचे कार्यकर्ते एकत्र येऊन गप्पा गोष्टी करायचे ठरवतात.
सगळ्यांना जवळ पडेल म्हणून मध्य प्रदेशात एकत्र यायचे ठरवतात. तसे,
+
तामिळनाडू, केरळ , पुद्दूचेरी आसाम आणि बंगाल मधून कार्यकर्ते येतात.
तामिळनाडूतील जिंकलेल्या दृमुकचा कार्यकर्ता येतो , केरळ मधील डाव्या पार्टीचा , पूद्दुचेरी , आसाम आणि बंगाल मधून भाजपचे कार्यकर्ते येतात. तामिळनाडू चा कार्यकर्ता म्हणतो की बंगाल चा कार्यकर्ता कसा काय आला ,
+
तो तर हरला आहे?
त्यावर बंगालचा कार्यकर्ता म्हणतो की हो , मी हरलोय पण तरीही आलो. मला हे बघायचे आहे की तुम्ही जिंकलेली लोकं कसे एन्जॉय करता? कारण आमच्या कडे कोणी जिंकले की ते दुसऱ्या पार्टी च्या लोकांना मारतात , त्यांची घरं , दुकानं जाळतात.
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते का नाही, ह्या वादावर अजून एक वाद म्हणून आता , छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या भेटीचा तपशील मागत कोकाटेंनी वाद निर्माण केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे श्रेय विशिष्ट सनातनी घेत आहेत+
सातारा शहरातील शिल्प बसविण्याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसताना, अनधिकृतपणे शिल्पाची उभारणी केली आहे.
या शिल्पामधून भाजपने जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.👇
आता थोडेसे त्या शिल्पा बद्दल. सातारा शहरातील ,
ह्या शिल्पाचे अनावरण , महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्र जी पवार साहेब ह्यांच्या हस्ते २६ एप्रिल १९९० साली झाले होते.
आणि योगायोग असा की , आज कोकाटे जे बोलले आहेत ते छापून आणण्याचे काम सुध्धा